Shivleelaamrit 5 Adhyay: ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा पाचवा अध्याय !

Shivleelaamrit 5 Adhyay:‘कथा सारा सहित शिवलीलामृताचा  ५ अध्याय !

Shivleelaamrit 5 Adhyay: नमस्कार वाचकहो, तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत कधी वाचले आहे का? शिवरात्रीच्या निमित्ताने, शिवभक्तांसाठी एक खास भेट.’शिवलीलामृत’ पारायणाची माहिती आणि कथासार… ‘शिवलीलामृत’ हे एक दिव्य ग्रंथ आहे, ज्याच्या पारायणाने भक्तांना अनेक लाभ मिळतात.

 Shivleelaamrit 5 Adhyay: शिवरात्रीच्या काळात याचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. ‘शिवलीलामृत’ पारायण कसे करावे? त्याचे लाभ काय आहेत? ‘शिवलीलामृत’ मध्ये किती अध्याय आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेख मालिकेत मिळतील.

 या लेख मालिकेत आम्ही तुम्हाला ‘शिवलीलामृत’ कथासार, प्रत्येक अध्यायाची माहिती आणि पारायणाची सोपी पद्धत सांगणार आहोत. रोज एक अध्याय वाचा आणि शिवलीलामृताच्या दिव्य अनुभवात सहभागी व्हा. तर, शिवरात्रीच्या या पवित्र काळात, ‘शिवलीलामृत’ पारायणाने आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा. आमच्या लेख मालिकेत रोज अध्याय वाचा आणि शिवकृपेचा अनुभव घ्या.

Shivleelaamrit 5 Adhyay: तर आज या लेखात आपण शिवलीलामृताचा पाचवा अध्याय पाहणार आहोत.

श्रीशिवलीलामृत ग्रंथाचे वाचन आपली संकटे दूर होऊन आपले सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यासाठी फार उपयुक्त आहे. या ग्रंथाचे सपूर्ण पारायण एका समाहात पूर्ण करावे. त्याचा रोजचा पाठ किती करावा ते पुढे दिले आहे.

Shivleelaamrit 5 Adhyay:पोथी घरात सर्वांनी ऐकावी अशी इच्छा असेल तर ज्याला किंवा जिला स्पष्ट वाचन करता येत असेल त्याने किवा तिने रोज ठरावीक वेळी पोथी वाचावी व सर्वांनी ऐकावी, सप्ताह पूर्ण झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटावा,

ॐ नमः शिवाय या शिवमंत्राचा सर्वांनी त्या सप्ताहात त्या वेळी पोथीबाचनापूर्वी १०८ वेळा जप  करावा.

Shivleelaamrit 5 Adhyay: नमस्कार वाचकहो, तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत कधी वाचले आहे का? शिवरात्रीच्या निमित्ताने, शिवभक्तांसाठी एक खास भेट.'

अध्याय पाचवा धर्मगुप्ताची कथा

The Story of the Dharmagupat

Shivleelaamrit 5 Adhyay:सूत म्हणाले, “सजन हो! फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यत्याचा वध केला, ते कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले. तेथे एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला. उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने ह्या अनाय राजपुत्राचा सांभाळ केला. त्याचे धर्मगुम असे नाव ठेवले. आपला मुलगा शुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढविले.

एके दिवशी ती एकचक्र नगरीत गेली असता तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुमाला पाहून ‘हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे,’ असे सांगितले, तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले, “याचा पिता विदर्भनरेश सत्यरथ हा प्रदोषसमयीची शिवपूजा सोडून युद्धास गेल्याने अल्पायुषी ठरला. याच्या मातेने सवतीला कपटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला, धर्मगुमाने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मतःच अनाथ झाला.” त्यानंतर शुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले, “याने पूर्वजन्मी अन्याय्य मागनि घन मिळवले, पण त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्रयात जन्म मिळाला.” तेव्हा उमा दोन्ही पुत्रांसह त्यांना शरण गेली असता शांडिल्यांनी दोन्ही बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले.

ऋषीच्या आज्ञेने धर्मगुप्त व शुचिव्रत प्रदोष व्रत करीत असता चार महिन्यांनी शुचिव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्णमोहरांचा हंडा सापडला अणि त्यांचे दारिद्रय सरले. काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर भाळली. आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला. त्याला अपार धन व सेना दिली. त्या सैन्यबळावर शाल्याला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळवले. त्याने शांडिल्यांचा मोठा सन्मान केला. पुढे अनेक वर्षे राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला.”

।। श्रीशिवलीलामृत अध्याय पाचवा ।।

। श्रीगणेशाय नमः ।। 

सदाशिव अक्षरें चारी। सदा उच्चारी ज्याची वैखरी। जो नित्य शिवार्चन करी। तो उद्धरी बहुतां जीवां ||१|| बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार। शास्त्रवक्ते करिती विचार। परी जे शिवनामें शुद्ध साचार। कासया इतर साधनें त्यां ।।२।। नामाचा महिमा परमाद्भुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत। त्यासी सर्वसिद्धि प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ।।३।। तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन । संतति संपत्ति दिव्य ज्ञान। पाहिजे तिंही प्रदोषव्रत पूर्ण। यथासांग करावें ।।४।। प्रदोषव्रत भावें आचरतां । या जन्मीं प्रचीत पाहावी तत्त्वतां । दारिद्र्य आणि महाव्यथा । निःशेष पळती षण्मासांत ।।५।। एक संवत्सरें होय ज्ञान। द्वादशवर्षी महद्भाग्य पूर्ण। हें जो असत्य मानील व्यासवचन । त्यासीं बंधन कल्पांतवरी ।।६।। त्याचा गुरु लटिकाच जाण । त्याची दांभिक भक्ति लटिकेंच ज्ञान। उमावल्लभचरणीं ज्याचें मन । त्याहूनि पावन कोणी नाहीं ।।७।।

मृत्यु गंडांतरें दारुण । प्रदोषव्रतें जाती निरसोन। येविषयीं इतिहास जाण। सूत सांगे शौनकादिकां ।।८।। विदर्भदेशींचा भूभुज । सत्यरथनामें तेजःपुंज । सर्वधर्मरतपराक्रमी सहज। बंदीजन वर्णिती सदा ।।९।। बहुत दिवस राज्य करीत। परी शिवभजनी नाहीं रत। त्यावरी शाल्व देशींचा नृपनाथ। बळे आला चालूनियां ।।१०।। आणिक त्याचे आम । क्षोणीपाळ साहा झाले बहुत । सप्त दिवसपर्यंत । युद्ध अद्भुत जाहले ।।११।। हा एकला ते बहुत । समरभूमीसी सत्यरथ। धारातीर्थी पावला मृत। शत्रू नगरांत प्रवेशले ||१२|| राजपत्नी गरोदर राजम। पूर्ण झाले नवमास । एकलीच पायी पळतां वनवास । थोर अनर्थ ओढवला ।।१३।। 

परम सुकुमार लावण्यहरिणी। कंटक-सराटे रुतती चरणी। मूर्छना येऊनि पडे धरणी। उठोनि पाहे मार्गेपुढे ।।१४।। शत्रु घरितील अकस्मात । म्हणोनि पुढती उठोनि पळत । किंवा ते विद्युल्लता फिरत। अवनीवरी वाटतसे ।।१५।। वस्त्रे-अलंकार मंडित । हिऱ्यांऐसे दंत झळकत । जिचा मुखेंदु देखतां रतिकांत । तन्मय होवोनि नृत्य करी ||१६|| अहा कर्माची गति गहन । जिच्या अंगुष्ठीं न पडे सूर्यकिरण। ते गरोदर हिंडे विपिन । मृगनेत्री गजगामिनी ।।१७।। वनीं हिंडे महासती। जेवीं नैषधरायाची दमयंती। कर्की मिल्लीरूपें हैमवती । दुस्तरवनीं तैसी हिंडे ।।१८।। कर्मनदीच्या प्रवाहीं जाण। पडली तीस काढील कोण। असो एका वृक्षाखाली येऊन । परम व्याकुळ पड़ियेली ||१९|| शतांची शते दासी। ओळंगती सदैव जियेपासीं । इंदुमती नाम जियेसी । ते भूमीवरी लोळत ।।२०।। 

चहुंकडे पाहे दीनवदनी। जिव्हा-मुख वाळले न मिळे पाणी। तों प्रसूत झाली तेच क्षणीं । दिव्य पुत्र जन्मला |२१|| तृषेर्ने तळमळी अत्यंत । कोण उदक देईल तेथ। बाळ टाकूनि उठत बैसत । गेली एका सरोवरा ||२२|| उदकांत प्रवेशली तेच क्षणीं। अंजुळी भरोनि घेतलें पाणी। तंव ग्राहे नेली ओढोनी। विदारुनी भक्षिली ||२३|| घोर कर्माचे विंदान। वीं एकला रडे राजनंदन। तंव उमा नामक विप्रपत्नी जाण । विगतधवा पातली ||२४|| माता पिता बंधु पाहीं। तियेलार्गी कोणी नाहीं। एक वर्षाचा पुत्र तीसही। कडिये घेवोनि आली तेथें ।।२५।। तों नाहीं केलें नालच्छेदन। ऐसें बाळ उमा देखोन। म्हणे अहा रे ऐसें पुत्ररत्न । कोणी टाकिलें दुस्तर वनीं ।।२६।। म्हणे कोण जाती कोण वर्ण। मी कैसें नेऊं उचलून। जावें जरी टाकून । वृक व्याघ्र भक्षितील की ।।२७।। स्तनीं दाटूनि फुटला पान्हा । नेत्रीं ढाळीत अश्रुजीवना। बाळ पुढें घेऊनि ते ललना। मुखकमळीं स्तन लावी ||२८|| 

संशयसमुद्री पडलीबेल्हाळ। म्हणे नेऊं कीं नको बाळ। तंव तो कृपालु पय फेनधवल । यतिरूप धरूनि पातला ||२९|| उमेलागीं म्हणे त्रिपुरारी। बाळ नेई संशय न घरी। महद्भाग्य तुझे सुंदरी । क्षत्रिय राजपुत्र तुज सांपडला ।।३०1। कोणासी न सांगे हे मात। समान पाळी दोघे सुत। भणंगासी परीस होय प्राप्म। तैसे तुज जाहले ।।३१।। अकस्मात निधि जोडत । की चितामणि पुढे येऊनि पडत। की मृताच्या मुखांत। पडे अमृत पूर्वदत्ते ।।३२।। ऐसे बोलोनि त्रिपुरारी। गुम झाला ते अवसरी। मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी। देशग्रामांतरी हिंडत ||३३|| ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत। राजपुत्राचे नाम ठेविलें धर्मगुप्त । घरोघरीं मिक्षा मागत। कड़िये खांदी घेऊनियां ।।३४।। लोक पुसतां उमा सांगत। माझे पोटींचे दोघे सुत। ऐसी हिंडता हिंडत। एकचक्रनगरा पातली ||३५|| घरोघरीं भिक्षा मागत । तो शिवालय देखिलें अकस्मात । आंत द्विज दाटले बहुत । शांडिल्य त्यांत मुख्य ऋषि ।।३६।। 

शिवाराधना करिती विधियुक्ता तों उमा आली शिवालयांत । क्षण एक पूजा विलोकीत। तो शांडिल्य ऋषि बोलिला ।। ३७ ।। अहा कर्म कैसे गहन। हा राजपुत्र हिंडे दीन होऊन । कैसे विचित्र प्राक्तन । उमा वचन ऐकती जाहली ।।३८।। ऋषीचे चरण उमा धरीत। म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तान्त । त्रिकाळज्ञानी महासमर्थ। भूतभविष्यज्ञान तुम्हां ।।३९।। यार्ची मातापिता कोण। आहेत कीं पावलीं मरण। यावरी शांडिल्य सांगे वर्तमान । याचा पिता जाण सत्यरथ ।।४० ।। तो पूर्वी होता नृप जाण। प्रदोषसमयीं करी शिवार्चन । तो शत्रु आले चहूंकडोन। नगर त्याचें वेढिलें ।।४१।। शत्रूची गजबज ऐकून । उठिला तैसीच पूजा सांडोन। तंव प्रधान आला पुढें धांवोन। शत्रु धरोनि आणिले ।।४२।। त्यांचा शिरच्छेद करून। पूजा पूर्ण न करितां उन्मत्तपणें । तैसाच जाऊनि करी भोजन। नाहीं स्मरण विषयांधा ॥४३॥ त्याकरितां या जन्र्मी जाण । सत्यरथ अल्पायुषी होऊन । अल्पवयांत गेला मरोन। म्हणोनि पूजन न सोडावे ।।४४।। 

याच्या मातेनें सवत मारिली । ती जळीं विवशी झाली। पूर्व वैरें ओढोनि नेली। क्रोधें भक्षिली विदारुनी ।।४५।। हा राजपुत्र धर्मगुप्त । याणें कांहींच केलें नाहीं शिवव्रत । म्हणोनियां मातापितारहित। अरण्यांत पडियेला ।।४६।। याकरितां प्रदोषकाळीं। अव्यग्र पूजावा इंदुमौळी। पूजन सांडूनि कदाकाळीं। सर्वथाही न उठावें ।।४७ ।। भवानीस बैसवूनि कैलासनाथ ।प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत। वाग्देवी वीणा बाजवीत। वेणु पुरुहूत वाजवीतसे ।।४८।। अब्जसंभव ताल सांवरी। भार्गवी गातसे मधुरस्वरी। मृदंग वाजवी मधुकैटभारी। नृत्यगती पाहूनियां ।।४९।। यक्षपति शिव-प्राणमित्र। हस्त जोडोनि उभा समोर। यक्षगण गंधर्व किन्नर। सुरासुर उभे असती ।।५०।। ऐसा प्रदोषकाळींचा महिमा। अगोचर निगमागमां। मग काय बोले उमा। मम पुत्र दरिद्री कां झाला ।।५१।। तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत। पूर्वी घेतले दुष्ट अमित । दान केले नाहीं किंचित । शिवार्चन न करी कदा ।।५२।। 

परान्ने जिव्हा दग्ध यथार्थ। दृष्ट प्रतिग्रहें दग्ध हस्त । स्त्रीअभिलाषे नेत्र दग्ध होत । मंत्रासी सामर्थ्य मग कैंचे ।।५३।। मग उमेर्ने पुत्र दोन्ही। घातले ऋषीचे चरणीं। तेणें पंचाक्षर मंत्र उपदेशुनी। प्रदोषव्रत उपदेशिले ।।५४।। पक्षप्रदोष शनिप्रदोष। महिमा वर्णिला अतिविशेष । निराहार असावें त्रयोदशीस। दिवसा सत्कर्म आचरावें ।।५५।। तीन घटिका झालिया रजनी। प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरूनी। गोमयें भूमि सारवूनी। दिव्य मंडप उभारिजे ।। ५६ ।। चित्रविचित्र वितान । कर्दळीस्तंभ इक्षुदंडेकरून। मंडप कीजे शोभायमान । रंगमाळा नानापरी।।५७।। शुभ वरत्र नेसावें आपण। शुभ्र गंध सुवाससुमन। मग शिवलिंग स्थापून। पूजा करावी विधियुक्त ।। ५८ ।। प्राणायाम करूनि देखा। अंतर्बाह्य न्यास मातृका । दक्षिणभागी पूजावें मुरांतका । सव्यभागी अग्नि तो ।।५९।। वीरभद्र गजानन । अष्ट महासिद्धि अष्ट भैरव पूर्ण। अष्ट दिक्पालपूजन । सप्तावरणीं शिवपूजा ।। ६० ।। 

यथासांग शिवध्यान । मग करावें पूजन। राजोपचारे सर्व समर्पून । करावें स्तवन शिवाचें ||६१।। जय जय गौरीनाथ निर्मळ। जय जय कोटिचंद्रसुशीतळ । सच्चिदानंदघन अढळ । पूर्णब्रह्म सनातन ।।६२।। ऐसें प्रदोषव्रत ऐकवून । बाळ उपदेशिले दोघेजण । मग ते एकमनेंकरून । राहते झाले एकचक्रीं ।। ६३ ।। चार महिनेपर्यंत। दोघेही आचरती प्रदोषव्रत । गुरुवचनें यथार्थ । शिवपूजन करिती पैं ।। ६४।। शिवपूजा न द्यावी सर्वथा । न द्यावें प्रसादतीर्था । शत ब्रह्महत्यांचे पाप माथां । होय सांगता शांडिल्य ।।६५।। सर्व पापांहूनि पाप थोर। शिवपूजेचा अपहार। असो ते दोघे किशोर । सदा सादर शिवभजनीं ।। ६६ ।। ब्रह्मपुत्र शुचिव्रत । एकला नदीतीरीं क्रीडत । दरडी ढांसळतां अकस्मात । द्रव्यघट सांपडला ।। ६७।। घरासी आलाघेऊन माता संतोषली देखीन म्हणे प्रदोषताचा महिमा जाण ऐश्वर्य चहत चालिले ।।६८।। राजपुत्रास महणे ते समर्थी। अर्थ द्रव्यविभाग घेई। पेरू म्हणे सहसाही। विभाग घेई आज ६९।। या अवनीतील धन। आमुचेच आहे संपूर्ण। असी ते दोघे शिवध्यान शिवस्मरण। न विसरती कदाही ॥७०॥ 

यावरी एकदां दोघे जण। गेले वनविहारालागून तो गंधर्वकन्या येऊन । क्रीडां दृष्टीं देखिल्या ।।७९।। वोधे पाहती दुख्नी। परम सुंदर लावण्यखाणी। शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागोनी। परदारा नयनी न पाहाव्या ।।७२।। दर्शन हरती चित्त। स्पर्शने बळवीर्य हरीत। कौटिल्यदंभसंयुक्ता महाअनर्थकारिणी ॥७३॥ब्रह्मसुतास तेथे ठेवून। राजपुत्र चालिला सुलक्षण। स्वरूपसुंदर मन्मथाहन। आकर्णनयन कोमलांग ||७४|| जवळी येवोनि पाहात । तंव मुख्य नायिका विराजित। अंशुमती नामें विख्यात। गंधर्वकन्या पद्मिनी ॥७५॥ कोद्रविणनामा गंधर्वपति। त्याची कन्या अंशुमती। पिता पुसे महेशाप्रती। हे कन्या अर्पू कोणातें ।।७६।।

मग बोले हिमनगजामात। धर्मगुप्त सत्यरथाचा सुत। तो माझा परम भक्ता त्यासी देई अंशुमती ।।७७।। हें पूर्वीचे शिववचन।असी बावरी अंशुमती पाहे दोन न्याहाळीत राजनंदन। बाटे पंचचाण दुसरा ।।७८।। क्षीरसिंधूत रोहिणीरमण। काय आला कलंक धुवोन । तैसे राजपुत्राचे बदन। अंशुमती न्याहाळी ॥७९।। बत्तीसलक्षणसंयुक्त आजानुबाहु चापशरमंडित । विशाळ वक्षःस्थळ चालत । करिनायक ज्यापरी ।।८०।। ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित । अंशुमती सखयांप्रती सांगत। तुम्हीं दुज्या वनाप्रती जाऊनि समस्त । सुमनें आणावीं सुवासें ।।८१।। अवश्य म्हणोनि त्या ललना। जात्या झाल्या आणिका वना। अंशुमती एकली जाणा। राजपुत्रा खुणावीत ।।८२।। भूरुहपल्लव पसरून। एकांतीं घातलें आसन । वरी वृक्षडाहाळिया भेदून । भूमीवरी पसरल्या ॥८३॥ 

असो तेथे बैसला येऊन । राजपुत्र सुहास्यवदन । विशाळभाळ आकर्णनयन । आरक्त ओष्ठ सुकुमार ।।८४।। मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणीं। विंधिली ते लावण्यहरिणी । मनोजमूच्र्छना सांवरूनी। वर्तमान पुसे तयातें ।।८५।। श्रृंगारसरोवरा तुजपार्सी। मी वास करीन राजहंसी। देखतां तव वदन दिव्यशशी। मम मानसचकोर नृत्य करी ।।८६।। तव मुखाब्ज देखतां आनंद। झेंपावती मम नेत्रमिलिंद । कीं तव वचन गर्जतां अंबुद। मम चित्तशिखी नृत्य करी ।। ८७ ।। कवि-गुरूं‌नी तेज विशाळ । आत्मकंठींची काढिली मुक्ताफळमाळ। कंठीं सूदली तत्काळ । चरणी भाळ ठेवीत ।।८८।। म्हणे मी कायावाचामनेंकरून। तुझी ललना झाले पूर्ण। यावरी धर्मगुप्त वचन । काय बोलता जाहला ।।८९।।

मी जनकजननीविरहित । राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत । तव पित्यासी कळतां मात। घडे कैसे वरानने ।।९०।1 यावरी म्हणे अंशुमती। तीन दिवसां येईन या स्थळाप्रती। तुम्हीं यावें शीघ्रगती। लग्नसिद्धि साधावया ।।९१।। ऐसें बोलूनि ते चातुर्यराशी। वेगें आली पितयापाशीं। झालें वर्तमान सांगे त्यासी। तो परम मानसीं संतोषला ।।९२।। राजपुत्र गेला परतोन। बंधूप्प्रती सांगे सर्व वर्तमान। शांडिल्यगुरूचें वचन स्मरून। म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ।।९३।। गुरुचरणीं ज्याचें मन। त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून। काळमृत्युभयापासून। सर्वदा रक्षी देशिक तो ।।९४।। यावरी ते दोघे बंधु येऊन । मातेसी सांगती वर्तमान । येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन । फळ देत चालिले ।।९५ ।। यावरी तिसरे दिवशीं। दोघेही गेले त्या वनासी। गंधर्वराज सहपरिवारेंसी। सर्व सामग्री घेऊनि आला ।।९६।। दृष्टीं देखतां जामात । गंधर्व आनंदसमुद्री पोहत । छत्र सेना सुखासन त्वरित । धाडूनि उमा आणविली ।।९७।।

यावरी यथासांग लग्न । चारी दिवस झालें पूर्ण। कांहीं एक पदार्थ न्यून । पडिला नाहीं तेधवां ।।९८ ।। स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज । विहिणीस देत गंधर्वराज । लक्ष रथ दहा सहस्र गज । तेजः पुंज एक लक्ष वाजी ।।९९।। एक लक्ष दासदासी। अक्षय कोश रत्नराशी। अक्षय भाते देत शक्तीसी। दिव्य चाप बहुसाल ||१००।। अपार सेना संगें देत। एक सेनापति गंधर्व बळिवंत । उमा दोघां पुत्रांसमवेत । मान देवोनि बोळविली ।।१।। सुखासनारूढ अंशुमती। पतीसर्वे चालिली शीघ्रगती। कनकवेत्रपाणी पुढे धांवती । वाहनासर्वे जियेच्या ||२|| चतुर्विध वाद्यांचे गजर। चतुरंग चालिला दळभार। येऊन वेढिलें विदर्भनगर। सत्यरथ पितयाचें ||३|| नगरदुर्गावरूनि अपार। उल्हाटयंत्रांचा होत भडिमार। परी गंधर्वांचे बळ फार। घेतलें नगर क्षणार्धे ।।४।।

जेणें पूर्वी पिता मारिला जाण। त्याचें नाम दुर्मर्षण। तो जिताचि धरूनि जाण। आपला करून सोडिला ।।५।। देशोदेशींचे प्रजाजन । धावती करभार घेऊन । उत्तम मुहूर्त पाहून । सिंहासनारूढ जाहला ।।६।। माता उमाबंधु शुचिव्रत। त्यांसमवेत राज्य करीत दहा सहस्र चर्षेपर्यंत । यशवंत राज्य केले ।।७।। शांडिल्य गुरु आणून । शतपद्म अर्पिले धन। रत्नाभिषेक करून। अलंकार बखें दीघली ||८|| दुर्भिक्ष जलशोष अवर्षण। आधि व्याधि वैधव्य मरण। दुःख शोक कलह विघ्न। राज्यांतूनि पळाली ।।९।। प्रजा भूदेव दायाद। देती रायासी आशीर्वाद। कोणासही नाहीं खेद। सदा आनंद घरोघरी ।।११०।। ऐसा अंशुमतीसमवेत। धर्मगुप्र राज्य करीत। यौवराज्य शुचिव्रतातें देत । पारिपत्य सर्व करी ।।११।। ऐसे दहा सहस वर्षे राज्य करून । सुदत्तपुत्रासी राज्य देऊन। चिंतितां मनीं उमाधवचरण। दिव्य विमान धाडिलें ।।१२।। 

दिव्य देह पावोनि नृपती। माता-बंधूंसमवेत अंशुमती। शिवविमानीं बैसती। करीत स्तुति शिवाची ।।१३।। कैलासपदासी जाऊन । जगदात्मा शिव विलोकून। जयजयकार करून। लोटांगणें घालिती ।।१४।। दीनबंधु जगन्नाथ । पतित-पावन कृपावंत । हृदयर्थी धरूनि समस्त । अक्षयपदीं स्थापिलीं ।।१५।। है धर्मगुप्ताचें आख्यान। करिती जे श्रवण पठन। लेखन रक्षण अनुमोदन । तरी पंचवदन रक्षी तयां ।।१६।। सकळ पापांचा होय क्षय। जेथे जाय तेथे विजय ।धनधान्यवृद्धि होय। ऋण जाय निरसूनी ।।१७।। प्रदोषमहिमा अद्भुत । जे आचरती ऐकूनि ग्रंथ। तेथे कैचें दारिद्रय मृत्य । सत्य सत्य त्रिवाचा

।।१८।। ज्याच्या घरीं शिवलीलामृत ग्रंथ। त्याची शिव पाठी राखीत। सदा हिंडे उमाकांत । अंतीं शिवपद प्राप्त तया ।।१९।। हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस। पद्यरचनाफळे आलीं पाडास । कुतर्कवादी जे वायस । मुखरोग त्यांस नावडे ।।१२०।। जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा। श्रीधरवरदा सर्वसाक्षा। दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा। न येसी लक्षा निगमागमां ।।२१।। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड। परिसोत सज्जन अखंड। पंचमाध्याय गोड हा ।।१२२।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।। ।। शुभं भवतु ।।

Shivleelaamrit 5 Adhyay: Shivleelaamrit Adhyay 4 In Marathi: ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा चौथा अध्याय!

‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा तिसरा अध्याय!

 हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!

Shivleelaamrit 5 Adhyay: १८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!

वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..

 शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

 accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/

 श्री गजानन लीला गाथा ७ अध्याय (लहान पोथी)

Loading