Shivleelaamrit 6 Adhyay: कथा सारा सहित शिवलीलामृताचा ६ अध्याय !
Shivleelaamrit 6 Adhyay: नमस्कार वाचकहो, तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत कधी वाचले आहे का? शिवरात्रीच्या निमित्ताने, शिवभक्तांसाठी एक खास भेट. ‘शिवलीलामृत’ पारायणाची माहिती आणि कथासार… ‘शिवलीलामृत’ हे एक दिव्य ग्रंथ आहे, ज्याच्या पारायणाने भक्तांना अनेक लाभ मिळतात.
Shivleelaamrit 6 Adhyay: शिवरात्रीच्या काळात याचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. ‘शिवलीलामृत’ पारायण कसे करावे? त्याचे लाभ काय आहेत? ‘शिवलीलामृत’ मध्ये किती अध्याय आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेख मालिकेत मिळतील.
Shivleelaamrit 6 Adhyay: या लेख मालिकेत आम्ही तुम्हाला ‘शिवलीलामृत’ कथासार, प्रत्येक अध्यायाची माहिती आणि पारायणाची सोपी पद्धत सांगणार आहोत. रोज एक अध्याय वाचा आणि शिवलीलामृताच्या दिव्य अनुभवात सहभागी व्हा. तर, शिवरात्रीच्या या पवित्र काळात, ‘शिवलीलामृत’ पारायणाने आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा. आमच्या लेख मालिकेत रोज अध्याय वाचा आणि शिवकृपेचा अनुभव घ्या.
तर आज या लेखात आपण शिवलीलामृताचा सहावा अध्याय पाहणार आहोत.
Shivleelaamrit 6 Adhyay: श्री शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन आपली संकटे दूर होऊन आपले सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यासाठी फार उपयुक्त आहे. या ग्रंथाचे सपूर्ण पारायण एका समाहात पूर्ण करावे. त्याचा रोजचा पाठ किती करावा ते पुढे दिले आहे.पोथी घरात सर्वांनी ऐकावी अशी इच्छा असेल तर ज्याला किंवा जिला स्पष्ट वाचन करता येत असेल त्याने किवा तिने रोज ठरावीक वेळी पोथी वाचावी व सर्वांनी ऐकावी, सप्ताह पूर्ण झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटावा,
ॐ नमः शिवाय या शिवमंत्राचा सर्वांनी त्या सप्ताहात त्या वेळी पोथी वाचनापूर्वी १०८ वेळा जप करावा.
अध्याय सहावा सीमंतिनीची कथा
The Story of Simantini

सूत म्हणाले, “सज्जन हो। पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सीमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती. जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्यसौख्य भोगणार होती, पण तीच पत्रिका तिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार असल्याचेही सांगत होती. तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला तर भावी दुर्दैव निरसावे म्हणून याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या सागण्यावरून सीमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली.
ती उपवर झाली तेव्हा चित्रवम्यनि नैषध देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा थाटात विवाह लावून दिला. त्या वेळी दसरा-दिवाळीचे निमित्त करून चित्रवम्यनि आपली मुलगी व जावई यांना आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्याची हौसमौज पुरविली. एकदा चित्रांगद यमुनेत नौकाविहार करीत असताना नौका बुडून तो त्या अधाग जलाशयात दिसेनासा झाला या दुःखद घटनेने सीमतिनीवर जणू आभाळच कोसळले. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूनी नैषध देशावर चढाई करून इंद्रसेनाचे राज्य चळकावले व त्याला कैदेत टाकले. याप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवे आले तरीही सीमंतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले.
इकडे चित्रांगद नदीत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. पुढे तीन वर्षांनी चित्रांगदाने परत जाण्याचा विषय काढताच तक्षकाने त्याला बारा सहस्र नागांचे बळ, अमूल्य भेटी व ‘तू स्मरण करताच तुझ्या भेटीस येईन’ असे बचन देऊन यमुनातीरी आणून सोडले. त्या वेळी सीमंतिनीही स्नानासाठी आली होती.
Shivleelaamrit 6 Adhyay: तिने त्याला पाहिले, पण ओळखले नाही. त्याने तिला ओळखले, तिची चौकशी केली व ‘तुझा पती जिवंत असून तिसऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणीन,’ असे सांगून तो नैषध नगरीस गेला. तेथे शत्रूना शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळविले आणि आपल्या मातापित्यांसह सीमंतिनीस भेटला. त्या वेळी चित्रयम्यनि आपल्या नगरीत मोठा उत्सव केला. चित्रांगदाने आपल्या नगरात अनेक वर्षे राज्य केले. सीमंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्यांचे सर्वतोपरी कल्याण झाले.”
॥ श्रीशिवलीलामृत अध्याय सहावा ।।
श्रीगणेशाय नमः
।। जय जय मदनांतका दक्षक्रतुदलना मदमत्सरकाननदहना। भवभयपाशनिकृतना। भवानीरंजना भयहारक मनमोहना ।।१।। हिमाद्रिजामाता गंगाधरा । पद्मनाभमनरंजना त्रिपुरहरा। त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ||२|| नीलग्रीव सिंधुरवदनजनका कर्पूरगौरा सुहास्यवदना। नंदीवहना अंधकमर्दना । गजांतका दानवदमना दयानिधे ||३|| अमितभक्तप्रियकरा । ताटिकांतकपूज्य त्रितापहरा । तुझे गुण वर्णावया दशशतवक्त्रा। शक्ति नव्हेचि सर्वथा ।।४।। नित्य शांत निर्विकल्प निरंजना। आशापाशरहित विरक्त पूर्णा। निजभक्तपाशविमोचना। जन्ममरणां मोचक जो विषयकामनायुक्त। तुज स्वामी अनन्य भजत । त्यांसी पुरविसी ।।५।।
जे विषयपदार्थ। जे जे इच्छित सर्वही ।।६।। सकामासी कामना पुरवून। तूं निजध्यानीं लाविसी मन । तेच परम विरक्त होऊन । पद निर्वाण पावती ।।७।। सोमवार शिवरात्रि प्रदोष । आचरतां तरले असंख्य स्त्रीपुरुषयेचविषयी कथा निर्दोष। सूत सांगे शौनकादिकां ।।८।। आर्यावर्त देश-पवित्र । तेींचा चित्रवर्मा नाम नृपवर। जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र। तैसा पुण्यशील प्रतापी ।।९।। जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ। तेसा गोविप्रपाळक नृपाळ। दुष्ट दुर्जन शत्रु खळ । त्यांसी काळ दंडावया ।।१०।। प्रयत्नाविषयीं जैसा भगीरथ। बळासी उपमिजे वायुसुत। समरभूमीस भार्गव अजित। विरोचनात्मज दानाविषयीं ।।११।। शिव आणि श्रीधर। यांच्या भक्तीस तत्पर। त्यास झाले बहुत पुत्र। पितयातुल्य प्रतापी ।।१२।। बहत नवस करितां पंचवदना। एक कन्या झाली शुभानना। सुलोचना नैषधअंगना । उपमेस तिच्या न पुरती ॥१३।।
तारकारिजनकशत्रुप्रिया । वृत्रारिशत्रुजनकजाया। उपमा देतां द्विजराजभार्या। बहुत वाटती हळुवट ।।१४।। ते अपर प्रतिमा भार्गवीची। उपमा साजे हैमवतीची। कीं दूहिणजाया पुत्री मित्राची। उपमा साची द्यावी तीतें ।।१५।। कलंकरहित रोहिणीधव। तैसा मुखशशी अभिनव । त्रैलोक्यसौंदर्य गाळूनि सर्व। ओतिली वाटे कमलोद्भवें ।।१६।। तिच्या जन्मकाळीं द्विजसर्व। जातक वर्णिती अभिनव । चित्रवर्मा रायासी अपूर्व। सुख वाटलें इतचि ।।१७।। एक द्विज बोले सत्य वाणी। ही होईल पृथ्वीची स्वामिणी। दहा सहस्र वर्षे कामिनी। राज्य करील अवनीचे ।।१८।। ऐकतां तोषला राव बहुत । द्विजांस घन वर्षे अलंकार देत । ज्याणें जें मागितलें तें पुरवीत । नाहीं नेदीं न म्हणेचि ।।१९। तिचें नाम सीमंतिनी। सीमा स्वरूपाची झाली तेथूनी। लावण्यगंगा चातुर्यखाणी। शारदेऐसी जाणिजे ।।२०।।
राव संतोष कोंदला बहुत । तों अमृतांत विषबिंदु पडत । तैसा एक पंडित । भविष्यार्थ बोलिला ।।२१।। चौदावे वर्षी सीमंतिनीसी। वैधव्य येईल निश्चर्येसीं। ऐसें ऐकतां राव मानसीं। उद्विग्न बहुत जाहला ।।२२।। वाटे वज्र पडिलें अंगावरी। कीं सौदामिनी कोसळली शिरीं। किंवा काळजीं घातली सुरी। तैसें झालें रायासी ||२३|| पुढती बोले तो ब्राह्मण। राया शिवदर्येकरून । होईल सौभाग्यवर्धन । सत्य सत्य त्रिवाचा ।।२४।। विप्र सदना गेले सवेग। रायासी लागला चिंतारोग । तंव ती शुभांगी उद्वेग । रहित उपवर जाहली ।।२५।। सकळकळाप्रवीण। चातुर्यखाणीचं दिव्यरत्न । तिचें ऐकतां सुस्वर गायन। धरिती मौन कोकिळा ||२६|| अंगीचा सुवास पाहून । कस्तूरीमृग घेती रान। पितयास आवडे प्राणांहन। पाहतां नयन न धाती ।। २७ ।।
वदन पाहूनि रतिपति लज्जित । कटी देखोनि हरि वदन न दाखवीत । गमन देखोनि लपत । मराळ मानससरोवरीं ||२८|| क्षण एक चाले गजगती। देखोनि शंकला करिपती। कुरळ केश देखोनि भ्रमरपंक्ती। रुंजी घालिती सुवासा ।।२९।। कमळ मृग मीन खंजन। लज्जित देखोनि जिचे नयन। वेणीची आकृती पाहून । भुजंग विवरीं दडाले ||३०|| या वृक्षावरूनि त्या वृक्षीं देख। शुक पळती पाहतां नासिका बिंबफळे अतिसुरेख । लज्जित अधर देखतां ।।३१।। पक्कदाडिंबबीज सुरंग बहुत । त्यांस लाजविती जिचे दंत । कुच देखोनि कमंडलु शंकित। स्वरूप अद्भुत वर्णं किती ।।३२।। तनूचा सुवास अत्यंत । जाय दशयोजनपर्यंत । सूर्यप्रभेसम कांति भासत । शशिसम मनोरमा ।।३३।। झाली असतां उपवर । तिच्या पद्मिणी सख्या सुंदर। किन्नरकन्या मनोहर। गायन करिती तिजपासीं ।॥३४॥ त्यांच्यामुर्खकरोनी। वार्ता ऐके सीमंतिनी। चतुर्दशवर्षी आपणांलागुनी। वैधव्य कथिलें ऋषीने ||३५||
परम संताप पावली ते समयीं। याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी। तिचे पाय धरूनि लवलाहीं। पुसे सद्रद होवोनियां ।।३६।। सौभाग्यवर्धनव्रत । माये कोणतें सांग त्वरित। कोणते पुजू दैवत। कोणत्या गुरूसी शरण जाऊं ।॥३७॥ सांगितला सकळ वृत्तान्त। चौदावे वर्षीं वैधव्य यथार्थ। मग मैत्रेयी बोलत। धरी व्रत सोमवार ।॥३८॥ सांग शिवमंत्र पंचाक्षरी। तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी। निशी झालिया पूजावा त्रिपुरारी। षोडशोपचारें सप्रेम ।। ३९ ।। म्हणे तुज दुःख झालें जरी प्राप्म। तरी न सोडीं है व्रत। ब्राह्मणभोजन दांपत्य बहुत । पूर्जी माये अत्यादरें ।।४०।। पडिले दुःखाचे पर्वत। तरी टाकू नको हे व्रत। उबग न घरी मनांत। बोल न ठेवीं व्रतातें ।।४१।।
त्यावरी नैषधराज नळ जाण । त्याचा पुत्र इंद्रसेन । त्याचा तनय चित्रांगद सुजाण । केवळ मदन दुसरा ।।४२।। चतुःषष्टिकळायुक्ता जैसा पितामह नळ विख्यात । सर्वलक्षणी दिसे मंडित। चित्रांगद तैसाचि ॥४३॥ कृभिनी शोधिली समग्र । परी त्याहूनि नाहीं सुंदर। ती तीस योजिला वर। राशि नक्षत्र पानि ।।४८।। इकडे सीमंतिनी आचरे व्रत । सांगितल्याहूनि विशेष करीत । आठ दिवसां अकरा शत। दांपत्यें पूजीत वस्त्रालंकारे ।।४५।। आणीकही ब्राह्मण भोजन। आल्या अतिथा देत अन्न । सांग करी शिवपूजन। जागरण सोमनिशीं ।।४६ ।। पंचसूत्री शिवलिंग। मणिमय शिवसदन सुरंग। कोणी एक न्यून प्रसंग। न घडे सीमंतिनीपासूनी ।।४७।। शिवास अभिषेकितां पापसंहार। शिवपूजनें साम्राज्य अपार। गंधाक्षता माला परिकर। सौभाग्यवर्धन त्याकरितां ।।४८।।
शिवापुढे धूप जाळितां बहवस । तेणें आंग होय सुवास । दीप चालवितां वंश। वर्धमान होय चैं ।॥४९।। आणिकही दीपाचा गुण। कांति विशेष आयुष्यवर्धन । नैवेद्ये भाग्य पूर्ण। वर्धमान लक्ष्मी होय ।।५०।। तांबूलदानें यथार्थ। सिद्ध चारी पुरुषार्थ। नमस्कारें आरोग्य होत। प्रदक्षिणें भ्रम नासे ।।५१।। जपें साधे महासिद्धि। होमहवनें होय कोशवृद्धी। कीर्तन करितां कृपानिधी। सांब ठाके पुढे उभा ।।५२।। ध्यानें होय महाज्ञान । श्रवणें आधिव्याधिहरण। नृत्य करितांजन्ममरण। धूर्जटी दूर करीतसे ॥५३॥ तत वित्तंत घन सुस्वर। शिवप्रीत्यर्थ करितां वाद्य समग्र । तेणें कंठ सुरस कीर्ति अपार। रत्नदाने नेत्र दिव्य होती ।।५४।॥ एवं सर्व अलंकार वाहतां । सर्वा ठायी जयलाभतत्त्वतां। ब्राह्मणभोजन करितां। वर्णिलं सर्व प्राप्त होय ।।५५।। मैत्रेयीने पूर्वी व्रत। सीमंतिनीसी सांगितले समस्त। त्याहूनि ते विशेष आचरत । शिव पूजित आदरें ।। ५६ ।।
त्यावरी नैषधाचा पौत्र। चित्रांगद नामें गुणगंभीर। त्यासी आणोनियां सादर। सीमंतिनी दीधली ।।५७।। चारी दिवसपर्यंत । सोहळा झाला जो अद्भुत । तो वर्णिता ग्रंथ यथार्थ। पसरेल समुद्राऐसा ।।५८।। सहस अर्बुदें धन जाणा। रायें दिधली वरदक्षिणा। वस्त्रे अलंकार नवरत्नां। गणना कोणा न करवे ।।५९।। अश्वशाळा गजशाळा । रत्नखचित यानें विशाळा । चित्रशाळा नृत्यशाळा। आंदण दिधलें जामाता ।।६०।। चारी दिवसपर्यंत । चारी वर्ण केले तृप्त । विप्रां दक्षिणा दिधली अपरिमित । नेतां द्विज कंटाळती ||६१|| आश्रमां धन नेतां ब्राह्मण। वाटेल टाकिती न नेववे म्हणून। याचकां मुखीं हेंचि वचन । पुरे पुरे किती न्यावें ।। ६२।। रायाचा औदार्यकृशान । दारिद्रयरान टाकीले जाळून। दुराशा दुष्कंटकवन। दग्ध झाले मुळींहुनी ।।६३।। धनमेघ वर्षतां अपार। दारिद्रयधुरोळा बैसला समग्र । याचक तृप्तितृणांकुर। टवटवीत विरूढले
।।६४।। असो नैषधपुरींचे जन। पाहती सीमंतिनीचे वदन । इंदुकळा षोडश चिरून। द्विज ओतिले बत्तीस ।।६५।। कलंक काढूनी निःशेष। द्विजसंधी भरल्या राजस। मुखींचे निघतां श्वासोच्छ्वास । सुगंधराज तोचि वाटे ।। ६६ ।। जलजमुखी जलजकंठ। जलजमाला तेज वरिष्ठ। जलजनिंबपत्रे करूनि एकवट । ओवाळून टाकिती शशिमुखा ।।६७।। असो साडे झालिया पूर्ण। नैषधदेशा गेला इंद्रसेन । सकळ व-हाडी अनुदिन । सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचें ।। ६८ ।। विजयादशमी दीपावळी लक्ष्न। जामात राहविला मानेंकरून । कितीएक दिवस घेतला ठेवून । चित्रवर्मा राजेंद्रे ।। ६९।। जैसा श्रीरंग आणि इंदिरा । तैसा जोडा दिसे साजिरा। नाना उपचार वधूवरां। समयोचित करी बहु ।।७०।।
कोणे एके दिवर्सी चित्रांगद। सर्वे घेऊनि सेवकवृंद। धुरंधर सेना अगाध । जातमृगयेलागूनी ।।७१।। बनी खेळतां श्रमला फार। धर्म आला तम शरीर। जाणोनि नौका सुंदर। यमुनाडोहीं घातली ॥७२॥ त्यांत मुख्य सेवक घेऊन। बैसला चित्रांगद गुणनिधान। आवले अवलोकिती चहुंकडून। कौतुके भाषण करिताती ॥७३॥ कृतान्त-भगिनीचे उदका कृष्णवर्ण भयानका त्या उदकाचा अंत सम्यका की कोणी न घेतला ॥७४॥ तो प्रभंजन सुटला अद्भुत । नौका तेथे डळमळीत । आवले आक्रोशे बोलत । नौका बुडाली म्हणोनियां ॥७५॥ भयभीत झाले समस्त। नौका बुडाली अकस्मात। एकचि वर्तला आकांत । नाही अंत महाशब्दा ॥७६।॥
तीरी सेना होती अपार। तिच्या दुःखासी नाहीं पार। चित्रांगदाचे पाठीराखे। वीर। आकांत करिती एकसरें ॥७७॥ सेवक धांवती हांक फोडीत। चित्रवर्त्यासी जाणविती मात। राव वक्षःस्थळ बडवीत । चरणीं धावत यमुनातीरीं ।। ७८ ।। शिबिकेमाजी बैसोनी। मातेसमवेत सीमंतिनी। धांवत आली तेच क्षणीं। पडती धरणीं सर्वही ।।७९।। दुःखार्णवीं पडली एकसरी। तेथे कोणासी कोण सांवरी। सीमंतिनी पडली अवनीवरी। पिता सांवरी तियेसी ।।८०।। माता धांवोनि उठाउठीं। कन्येच्या गळा घाली मिठी। शोक करी तेणें सृष्टीं। आकांत एकचि वर्तला ||८१।। सीमंतिनीचा शोक ऐकोनी। डळमळू लागली कुंभिनी। मेदिनीवसनाचे पाणी। तप्त झालें एकसरें ।॥८२।।
पशु पक्षी वनचरें समस्त । वृक्ष गुल्म लता पर्वत । त्यांसही शोक अत्यंत । सीमंतिनीसी पाहतां ॥८३॥ शोके मूर्छना। येऊनि । निचेष्टित पडली सीमंतिनी । तों इंद्रसेनासहित गृहिणी। आली वार्ता ऐकोनियां ।।८४।। अवघीं झालीं एकत्र । दुःखार्णवाचा न लागे पार। स्नुषेर्ते देखोनि श्वशुर। शोकाग्नीनें कवळिला ।।८५।। चित्रांगदाची माता पडली क्षितीं। तिचे नाम लावण्यवती। सकळ स्त्रिया सांवरिती। नाहीं मिती शोकासी ।।८६।। मृत्तिका घेवोनि हस्तकीं। लावण्यवती घाली मुखीं। म्हणे गहन पूर्वकर्म कीं। शोक झाला यथार्थ ।।८७।। माझा एकुलता एक बाळ। चित्रांगद परम स्नेहाळ। पूर्वपापाचे हे फळ। कालिंदी काळ झाली आम्हां ।।८८।। माझी अंधाची काठी पाहीं। कोणें बुडविली यमुनाडोहीं। मज अनाथाची गांठीं पाहीं। कोणें सोडिली निर्दयें ।।८९।।
माझा दावा ने राजहंस। कोणे नेलें गे माझे पाडस । माझा चित्रांगद डोळस । कोणे चोरून नेला गे ॥९०॥ म्हणे म्यां पूर्वी काय केलें। प्रदोषव्रत मध्येच टाकिलें । कीं शिवरात्रीस अन्न घेतले। कीं व्रत मोडिलें सोमवार ||९१।। कीं रमाधव उमाधव । यांत केला भेदभाव। कीं हरिहरकीर्तनगौरव । कधारंग उच्छेदिला ॥९२।। कीं पंक्तिभेद केला निःशेष। कीं संतमहंतां लाविला दोष। कीं परधनाचा अभिलाष। केला पूर्वी म्यां वाटे ।।९३।। कीं दान देते म्हणवून। ब्राह्मणासी चाळविलें बहुत दिन। कीं दाता देतां दान। केलें विघ्न म्यां पूर्वी ॥९४।। कोणाच्या मुखींचा घांस काढिला। कीं गुरुद्रोह पूर्वी मज घडला । कीं पात्रीं ब्राह्मण बैसला। तो बाहेर घातला उठवूनी ।।९५।।
कीं कुरंगी पाडसां बिघडविलें । कीं परिव्राजकाप्रती निंदिलें । तरी ऐसें निधान गेलें । त्याच दोषास्तव वाटे ।।९६।। असो प्रधानवीं सांवरूनी। सहपरिवारें चित्रवर्मा सीमंतिनी। स्वनगरासी नेवोनी। निजसदनीं राहविर्ती ।।९७।। इंद्रसेन लावण्यवती । शोके संतप्त नगरा जाती। तंव दायाद येऊनि पापमती। राज्य सर्व घेतलें ॥९८॥ मग इंद्रसेन लावण्यवती । देशांतरा पळूनि जाती। तेथूनिही शत्रु धरूनि आणिती। बंदीं घालिती दृढ तेव्हां ।।९९|| इकडे सीमंतिनी व्रत। न सोडी अत्यादरें करीत । एकादशशत दांपत्य। पूजी संयुक्त विधीनें ।।१००।। सर्वही भोग वर्जून जाण। यामिनीदिनीं नित्य करी शिवस्मरण। तीन वर्षे झालीं पूर्ण। यावरी वर्तमान ऐका पुढें ।।१।।
इकडे चित्रांगद यमुनेंत बुडाला। नागकन्यांनीं पाताळीं नेला । नागभुवनींची पाहतां लीला। तटस्थ झाला राजपुत्र ||२|| दिव्य नारी देखिल्या नागिणी। पद्मिनी हस्तिनी चित्रिणी। शंखिनी अतिचतुर भामिनी। सुवास अंगीं ज्यांचिया ।।३।। ज्यांच्या पदनखीं निरंतर । गुंजारव करिती भ्रमर। ज्यांचा देखतां वदनचंद्र । तपस्वीचकोर वेधले ||४|| नवरत्नांचे खडे। पसरलें तेथे चहुंकडे। स्वर्गसुखाहूनि आवडे। पाताळभुवन पाहतां ।।५।। तक्षक नागराज प्रसिद्ध। त्यापुढे उभा केला चित्रांगद । साष्टांग नमित सद्गद । होवोनि स्तुति करीतसे ।।६।। निर्भय तेथें राजसुत। तक्षक वर्तमान पुसत । जें जें वर्तलें समस्त । केलें श्रुत चित्रांगदें ॥७।। मागुती नागराजझाला बोलता । तुम्ही कोण्या दैवतासी भजतां । यावरी शिवमहिमा तत्त्वतां । झाला वर्णिता चित्रांगद ।।८।।
प्रकृति पुरुष दोघे जणे। निर्मिली इच्छामात्रे जेणे। अनंत ब्रह्मांडे प्रीतीनें। रचियेली हेळामात्रै ।।९।। इच्च्छा परततां जाण। अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून । प्रकृतिपुरुषांत होती लीन। पंचभूते तत्त्वांसहित ।।११०।। मग दोघे एकप्रीतीं। आदिपुरुषामाजी सामावती। तो सदाशिव निश्चिती । आम्हीं भजतों तयातें ।।११।। ज्याच्या मायेपासून । झाले हे त्रिमूर्ति त्रिगुण । त्या सत्त्वांशंकरून । विष्णु जेणें निर्मिला ||१२|| रजांश केलें विरिंचीस। तमांशे रुद्र तामस। तो शिव पुराणपुरुष। आम्हीं भजतों सर्वदा ।।१३।। पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन । पंचतत्त्व सरिता मेदिनीवसन। भस्म लोष्ट अष्टधातु व्यापून । उरला तो शिव भजतों आम्ही ।।१४।।
अष्टादश वनस्पती सर्व बीजें। आकारा आलीं सहजे। व्यापिलें जेणें कैलासराजें । त्याचे उपासक आम्ही असों ।।१५।। ज्याचे नेत्र सूर्य जाण। रोहिणीवर ज्याचे मन । रमारमण ज्याचे अंत करण। बुद्धि द्रुहिण जयाची ।।१६।। अहंकार ज्याचा रुद्र। पाणी जयाचे पुरंदर। कृतान्त दाढा तीव्र । विराटपुरुप सर्वही जो ||१७||| एवं जितुके देवताचक्रा ते शिवाचे अवयव समग्र । एकादश रुद्र द्वादश मित्र। उभे त्यापुढे कर जोडूनी ।।१८।। ऐसे ज्याचे गुण अपार। मी काय वर्णं मानव पामर। त्याच्या दासांचे दास किंकर। आम्ही असों कश्यपात्मजा ।।१९।। ऐसें वचन ऐकूनि सतेज । परम संतोषला दंदशूकराज । क्षेमालिंगन देऊनि कटुतनुज । नाना कौतुकें दाखवी तया ।।१२०।। म्हणे देवास जे दुर्लभ वस्त । ते येथे आहे समस्त । तूं मज आवडसी बहुत । राहावें स्वस्थ मजपासीं ।॥२१॥
चित्रांगद म्हणे महाराजा। शिवकर्णभूषणा सतेजा। जननी-जनकांसी वेध माझा । एवढाच मी पोटीं तयांच्या ||२२|| चौदा वर्षांची सीमंतिनी। गुणनिधान लावण्यखाणी। प्राण देईल ते नितंबिनी। बोलतां नयनीं अश्रु आले ।।२३।। मातापितयांचे चरण। खंती वाटते कीं पाहीन। माझी माता मजविण कष्टी जाण । नेत्रीं प्राण उरलासे ||२४|| तरी मज घालवीं नेऊन । म्हणोनि धरिले नागेंद्राचे चरण । तक्षक होऊन प्रसन्न । देत अपारवस्तूंते ॥२५॥ म्हणे द्वादशसहख नागांचं बळ दिधले तुज हाईल सुफळ । तैसाचि झाला तत्काळ चित्रांगद वीर तो ।।२६।। करशील जेव्हां स्मरण। तेव्हां तुज संकटी पावेन। मनोवेन वारू आणून चिंतामणी सर्वे दिधला ||२७||
दुर्लभ नै भूमंडळी देत अमूल्य तेजागळीं। पर्वताकार मोट बांधिली। शिरी दिधली राक्षसाच्या ॥२८॥ देत दिव्य वर्षे अलंकार। सर्वे एक दिधला फणिवर। मनोवेगै यमुनातीर। क्रमूनि बाहेर निघाला ||२९|| झाले तीन संवत्सर। चहुंकडे पाह राजपुत्र। तेच समयीं सीमंतिनी स्नानासी सत्वर। कालिंदीतीरा पातली ।।१३०।। एकाकडे एक पाहती। आश्चर्य वाटे ओळख न देती। दिव्यरत्नमंहित नृपति । चित्रांगद दिसतसे ||३१|| फणिमस्तकींची मुझे सतेज विशेष। भुजेपर्यंत डोले अवतंस । गजमुक्तांच्या माळा राजस। गळां शोभती जयाच्या ||३२|| पाचू जडल्या कटिमेखलेवरी। तेणें हिरवी झाली धरित्री। मृगपशु धांवती एकसरी। नर्वे नृण वाढले म्हणोनियां ॥२२॥ मुकाफळे देखोनि तेजाळ धांवतचि येती मराळ। देखोनि आरक्त रत्नांचे बाळ। कीर घावती भक्षावया ||३४||
अंगी दिव्य चंदनसुगंध देखाति धांवती मिलिंद। दशदिशा व्यापल्या सुबुद्ध । घ्राणदेवता तृम होती ॥३५॥ विस्मित झाली सीमंतिनी। भ्रमचक्रीं पडली विचार मनीं। चित्रांगदही तटस्थ होऊनी। क्षणक्षणां न्याहाळीत ।। ३६।। कंठभूषणे रहित मंगळसूत्र । हरिद्राकुंकुमविरहित वरख। अंजनविवर्जित नेत्र। राजपुत्र पाहातये ।।३७।। न्याहाळितां तटस्थ स्वरूपासी। वाटती रंभा उर्वशी दासी। कुचकमंडलु यांसी। उपमा नाहीं द्यावया ||३८|| तमचामीकरवर्ण डोळस । चिंताक्रांत अंग झालें कृश । कीं चंद्रकळा राजस। ग्रहणकाळीं झाकोळती ।।१९।। मग तियेपाशी येऊन । पुसे साक्षेपें वर्तमान । म्हणे तूं आहेस कोणाची कोण। मुळापासून सर्व सांग ॥१४०।।
मग आपुल्या जन्मापासून । सांगितलें चरित्र संपूर्ण। बोलतां आसुर्वे नयन। भरूनियां चालिले ।।४१।। अश्रुधारा सवती खालत्या । लाविल्या पयोधरलिंगास गळत्या। दंत जियेचे बोलतां। नक्षत्रांऐसे लखलखती ।।४२।। सीमंतिनीच्या सख्या चतुर । राजपुत्रा सांगती समाचार। तीन वर्षे झाली हिचा भ्रतार। बुडाला येथेयमुनाजळीं ।॥४३।। हिची सासूधशुर दोनी। शत्रूनी घातली बंदिखानीं। हे शुभांगी लावण्यखाणी। ऐसी गती इयेची ।।४४।। कंठ दाटला सद्गदित । चित्रांगद खाली पाहात । आरक्त रेखांकित नेत्र। वर्षे पुसीत वेळोवेळा ।।४५।। सीमंतिनी सख्यांस सांगे खूण। कोण कोठील पुसा वर्तमान। सख्या पुसती येणें कोठून । झालें खूण नाम सांगा ॥४६॥
तो म्हणे आम्ही सिद्धपुरुष। जातों चितिलिया ठायास । क्षणें स्वर्ग क्षणें पाताळास। गमन आमुचे त्रिलोकी ॥४७॥ कळते भूत-भविष्य-वर्तमान। मग सीमंतिनीस हाती धरून। कानीं सांगे अमृतवचन । भ्रतार तुझा जिवंत असे ||४८।। आजि तीन दिवसां भेटवीन । लटिके नव्हे कदापि जाण। श्रीसदाशिवाची आण। असत्य नव्हे कल्पान्ती ।।४९।। सौभाग्यगंगे चातुर्यविलासिनी । तुझें ऐश्वर्य चढेल येथूनी। परी ही गोष्टी कोणालागूनि । दिवसत्रय प्रकटवू नको ॥१५०।। ऐसें सांगोनि परमस्नेहे। येरी चोरदृष्टीं मुख पाहे। म्हणे वाटतें चित्रांगद होये। ऐसें काय घडूं शके ।।५१।। मृत्यु पावला तो येईल कैसा । मग आठवी भवानीमहेशा। करुणाकरा पुराणपुरुषा। न कळे लीला अगम्य तुझी ॥५२॥ हा परपुरुष जरी असता तरी मज कां हातीं धरिता। स्नेह उपजला माझिया चित्ता। परम आप्त वाटतसे ।।५३।।
काय प्राशूनि आला अमृत । कीं काळे गिळोनि उगळिला सत्य। हे मदनांतक षडास्यतात । तुझे कर्तृत्व न कळे मज ।।५४।। जगन्निवासा हे करशील सत्य। तरी अकरा लक्ष पूजीन दांपत्य।। तितुक्याच वाती यथार्थ। बिल्वदळे अर्पिन ।।५५।। यावरी बोले राजपुत्र। सुकुमारे सदनासी जाईं सत्वर । तुझी सासू आणि श्वशुर। त्यांसी सांगू जातों आतां ।।५६।। तुमचा पुत्र येतो म्हणोन। शुभ समाचार त्यांस सांगेन । येरी करून हास्यवदन। निजसदनाप्रती गेली ।। ५७।। सख्या बोलती आण वाहून । तुझा भ्रतार होय पूर्ण। ऐसा पुरुष आहे कोण। जो तुझा हात धरूं शके ।। ५८ ।। तुझीं वचने ऐकून । त्याच्या नेत्रीं आलें जीवन । सीमंतिनी म्हणे वर्तमान। फोडूं नका गे उग्या रहा ।। ५९।। सीमंतिनीच्या मुखकमळीं। सौभाग्यकळा दिसूं लागली। सुखासनारूढ सदना गेली। कोठें कांहीं न बोले ।।१६०।।
मनोवेगाच्या वारूवरी त्वरित ।आरूढला सीमंतिनीकांत । निजनगराबाहेर उपवनांत। जाऊनियां उतरला ।।६१।। नागें मनुष्यवेष धरून। शत्रूस सांगे वर्तमान । द्वादशसहस्र नागांचे बळ घेऊन । चित्रांगद आला असे ।। ६२ ।। तुम्ही कैसे वांचाल सत्य। तंव ते समस्त झाले भयभीत । येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ। सिंहासनीं स्थापा वेीं ।॥६३॥ मग नाग जाऊन । मातापितयासी सांगे वर्तमान । त्यांसी आनंद झाला पूर्ण। त्रिभुवनांत न समाये ।।६४।। तों शत्रु होवोनि शरणागत । उभयतांसी सिंहासनीं स्थापीत । दायाद कर जोडोनि समस्त । म्हणती आम्हां रक्षा सर्वस्वें ।। ६५ ।। मग सर्व दळभार सिद्ध करून । भेटीस निघाला इंद्रसेन । वाद्यनादें संपूर्ण । भूमंडळ डळमळी ।।६६।। माता पिता देखोन। सप्रेम धांवे चित्रांगद सुजाण । धरूनि पितयाचे चरण। क्षेमालिंगनीं मिसळला ।। ६७ ।।
मग लावण्यवती धांवत । चित्रांगदाच्या गळां मिठी घालीत । जैसा कौसल्येसी रघुनाथ। चतुर्दश वर्षांनंतरें ।।६८।। हारपले रत्न सांपडलें। कीं जन्मांधासी नेत्र आले। कीं प्राण जातां पडलें। मुखामाजी अमृत ।।६९।। करभार घेऊनी अमूप। धांवती देशोदेशींचे भूप। पौरजनांचे भार समीप । येऊनियां भेटती ।।१७०।। हनुमंतें आणिला गिरिद्रोण। जेवीं उठविला उर्मिलारमण । आनंदमय झालें त्रिभुवन । तैसेंच पूर्ण पैं झालें ।॥ ७१।। मातापितयांसमवेत । चित्रांगद चालिला मिरवत। नैषधपुर समस्त । शृंगारिलें तेधवां ॥७२॥ चित्रवर्त्यासी सांगावया समाचार । धावताती सेवकभार। महाद्वारीं येतां साचार। मात फुटली चहुंकडे ।।७३।। हेर जाऊनि रायास वंदित । उठा जी तुमचे आले जामात । राव गजबजिला धावत। नयनीं लोटत आनंदाश्रु ॥७४॥ कंठ झाला सद्गदित । रोमांच अंर्गी उभे ठाकत । समाचार आणिला त्यासी आलिंगीत। धन वस्त्र देत सीमेहूनि ।।७५।।
अपार भरूनि रथ। शर्करा नगरांत वांटीत । मंगळतुरें अद्भुत । वाजों लागलीं एकसरें ।॥ ७६।। धांवले अपार भूसुर। रायें कोश दाविले समग्र । आवडे तितुकें धन न्यावें सत्वर । सुखासी पार नाहीं माझ्या ।।७७।। जय जय शिव उमानाथ। म्हणोनि राव उडत नाचत । उपायनें घेऊनि धांवत । प्रजाजन नगरींचे ॥७८।। सीमंतिनीसी बोलावून ।दिव्य अलंकार लेववून । जयजयकार करून। मंगळसूत्र बांधिले ।। ७९।। दिव्य कुंकुम नेत्रीं अंजन। हरिद्रा सुमनहार चंदन। सौभाग्य लेवविती जाण। त्रयोदशगुणी विडे देती ।।१८०।। एक शृंगार सांवरिती। एक पीकपात्र पुढे करिती। नगरीच्या नारी धांवती। सीमंतिनीसी पाहावया ।।८१।। माता धांवली सद्गदित । सीमंतिनीसी हृदयी घरीत। माये तुझा सौभाग्यसिंधु वर्धत । असंभाव्य उचंबळला ||८२।।
ऐश्वर्यदुम गेला तुटून। पुढती विरूढला भेदीत गगन। तुझी सौभाग्यगंगा भरून । अक्षय चालिली उत्तरेना ।।८३।। धन्य धन्य सोमवारव्रत। अकरा लक्ष पूजिलीं दांपत्यें। जितवन करावयास जामात। बोलावू धाडिलें त्वरेनें ।।८४।। मातापितयांसमवेत । चित्रांगद नगरा येत । चित्रवर्मा नृपती त्वरित । सामोरा येत तयांसी ।।८५।। जामाताच्या कंठीं। धांवोनि श्वशुरे घातली मिठी। ब्रह्मानंदे भरली सृष्टी। पुष्पवृष्टी करिती देव ।।८६।। नगरामाजी आणिर्ती मिरवत । पुनः विवाह केला अद्भुत । मग एकांतीं चित्रांगद नृपनाथ। बोलावीत सीमंतिनीसी ।।८७।। पाताळींचे अलंकार अद्भुत ।सीमंतिनीलागीं लेववीत । नवरत्नप्रभा फांकली अमित। पाहतां तटस्थ नारीनर ।।८८।। पाताळींचा सुगंधराज निगुती। आत्महस्तें लेववी सीमंतिनीप्रती । नाना वस्तु अपूर्व क्षितीं। श्वशुरालागीं दीधल्या ॥८९।।
सासूश्वशुरांच्या चरणीं। मस्तक ठेवी सीमंतिनी । माये तुझा सौभाग्योदधि उचंबळोनि । भरला असो बहु काळ ।।१९०।। पुत्र सीमंतिनीसहित । इंद्रसेन नैषधपुरा जात। अवनीचे राजे मिळोनि समस्त । छत्र देत चित्रांगदा ।।९१।। समस्त राज्यभार समर्पून । तपासी गेला इंद्रसेन । तेथे करूनियां शिवार्चन । शिवपदासी पावला ।।९२।। आठ पुत्र पितयासमान। सीमंतिनीसी झाले जाण। दहा सहस्र वर्षे निर्विघ्न। राज्य केलें नैषधपुरीं ॥९३॥ जैसा पितामह नळराज। परमपुण्यश्लोक तेजः पुंज । तैसाच चित्रांगद भूभुज। न्यायनीर्ती वर्ततसे ॥९४॥ शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत । सीमंतिनी चढतें करीत । तिची ख्याती अद्भुत । सूत सांगे शौनकादिकां ।।९५।। हे सीमंतिनी आख्यान सुरस । ऐकतां सौभाग्यवर्धन स्त्रियांस । अंतरला भ्रतार बहुत दिवस । तो भेटेल परतोनी ।।९६।।
विगतधवा ऐकती। त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती। शिवचरणी धरावी। प्रीती। सोमवारव्रत न सोडावें ।। ९७ ।। ऐसें ऐकतां आख्यान। अंतरला पुत्र भेटेल मागुतेन । आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण। होय ज्ञान विद्या बहु ।।९८।। गंडांतरें मृत्यु निरसोनि जाय। गतधन प्राप्त शत्रुपराजय। श्रवर्णे पठणें सर्व कार्य। पार्वे सिद्धी येणेंचि ||९९।। सीमंतिनी-आख्यान प्रयाग पूर्ण। भक्तिमाघमासीं करितां स्नान । त्रिविध दोष जाती जळोन। शिवपद प्राप्त शेवटीं ।।२००।। सीमंतिनी-आख्यान सुधारस । प्राशन करिती सज्जनत्रिदश । निंदक असुर तामस । अहंकारमद्य सेविती ।।१।। अपर्णाहृदयारविंदमिलिंद । श्रीधरस्वामी पूर्ण ब्रह्मानंद। अभंग अभेद । न चळे न ढळे कदाही ||२|| शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । षष्ठाध्याय गोड हा ।।२०३।। अक्षय
।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।
।। शुभं भवतु ।।
Shivleelaamrit 6 Adhyay: श्री गजानन लीला गाथा १३ अध्याय (लहान पोथी)
Shivleelaamrit 6 Adhyay: Shivleelaamrit Adhyay 4 In Marathi: ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा चौथा अध्याय!
‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा तिसरा अध्याय!
हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!
Shivleelaamrit 5 Adhyay: १८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !
आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
श्री गजानन लीला गाथा ७ अध्याय (लहान पोथी)