Shivleelaamrit 7 Adhyay: कथा सारा सहित शिवलीलामृताचा ७ अध्याय !
Shivleelaamrit 7 Adhyay: नमस्कार, तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत कधी वाचले आहे का? शिवरात्रीच्या निमित्ताने, शिवभक्तांसाठी एक खास भेट.’शिवलीलामृत’ पारायणाची माहिती आणि कथासार… ‘शिवलीलामृत’ हे एक दिव्य ग्रंथ आहे, ज्याच्या पारायणाने भक्तांना अनेक लाभ मिळतात.
Shivleelaamrit 7 Adhyay: शिवरात्रीच्या काळात याचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. ‘शिवलीलामृत’ पारायण कसे करावे? त्याचे लाभ काय आहेत? ‘शिवलीलामृत’ मध्ये किती अध्याय आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेख मालिकेत मिळतील.
Shivleelaamrit 7 Adhyay: रोज एक अध्याय वाचा आणि शिवलीलामृताच्या दिव्य अनुभवात सहभागी व्हा. तर, शिवरात्रीच्या या पवित्र काळात, ‘शिवलीलामृत’ पारायणाने आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा. आमच्या लेख मालिकेत रोज अध्याय वाचा आणि शिवकृपेचा अनुभव घ्या.
तर आज या लेखात आपण शिवलीलामृताचा सातवा अध्याय पाहणार आहोत.
Shivleelaamrit 7 Adhyay: श्रीशिवलीलामृत ग्रंथाचे वाचन आपली संकटे दूर होऊन आपले सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यासाठी फार उपयुक्त आहे. या ग्रंथाचे सपूर्ण पारायण एका समाहात पूर्ण करावे. त्याचा रोजचा पाठ किती करावा ते पुढे दिले आहे.
पोथी घरात सर्वांनी ऐकावी अशी इच्छा असेल तर ज्याला किंवा जिला स्पष्ट वाचन करता येत असेल त्याने किवा तिने रोज ठरावीक वेळी पोथी वाचावी व सर्वांनी ऐकावी, सप्ताह पूर्ण झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटावा,
ॐ नमः शिवाय या शिवमंत्राचा सर्वांनी त्या सप्ताहात त्या वेळी पोथीबाचनापूर्वी १०८ वेळा जप करावा.

अध्याय सातवा सोमवंत व सुमतीची कथा
The story of Somwant and Sumati
Shivleelaamrit 7 Adhyay: सूत म्हणाले, “सज्जन हो ! विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते. त्यांचे पुत्र सुमेधा व सोमवंत हेही मित्रच होते. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठविले. त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, “नैषधराजा चित्रांगदाची पत्नी सीमंतिनी शिवव्रतदिनी दांपत्यपूजन करते म्हणून तुमच्यापैकी एकाने श्रीवेष घेऊन दांपत्य म्हणून तिच्याकडे जावे.
Shivleelaamrit 7 Adhyay: ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईन.” मग त्याने सोमवंताला श्रीवेष देऊन सुमेधासह सीमंतिनीकडे पाठविले, तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले, पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे पूजन केले व भोजन, द्रव्य, वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला. मार्गामध्ये सोमवंताला आपण श्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला. सुमेधाने त्याची कानउघडणी करून त्याला घरी नेले. तेथे आपला मुलगा बी झाल्याचे कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला. तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली. देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असे सांगून त्याचे व सुमेधाचे लग्न लावण्यास सांगितले.”
सूत दुसरी कथा सांगू लागले “अवंतीमध्ये मदन नावाचा एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे. एके दिवशी त्यांनी ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला सीमंतिनीची कन्या (कीर्तिमालिनी) झाली तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला. गरोदरपणी तिच्या सवतींनी तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या मायलेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले.
उपचारांनीही उपयोग झाला नाही तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडले. त्या वेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीस आली. तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली कर्मकहाणी सांगितली. राजाने तिच्या राहण्याची व पोटापाण्याची व्यवस्था केली. पुढे एका व्याधीने तिचा मुलगा वारला. तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगास लावले. त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला. ती दोघे निरोगी व सुंदर झाली, शिवयोग्याने तिच्या पुत्राचे ‘भद्रायू’ नाव ठेवले व त्याला अनेक अशीर्वाद देऊन तो म झाला.”
।। श्रीशिवलीलामृत अध्याय सातवा ।।
श्रीगणेशाय नमः
।। जय जय किशोरचंद्रशेखरा । उवींधरेंद्रनंदिनीवरा । भुजगभूषणा सप्तकरनेत्रा। लीला विचित्रा तूझिया ।।१।। भानुकोटितेज अपरिमिता । विश्वव्यापका विश्वनाथा । रमाधवप्रिया भूताधिपते अनंता । अमूर्तमूर्ता विश्वपते ।।२।। परमानंदा पंचवक्त्रा । परात्परा पंचदशनेत्रा । परमपावना पयःफेनगात्रा। परममंगला परब्रह्मा ||३|| मंदस्मितवदन दयाळा । षष्ठाध्यायीं अतिनिर्मळा । सीमंतिनीआख्यानलीला। स्नेहाळा तूं वदलासी ।।४।। श्रीधरमुख निमित्त करून । तूंचि वदलासी आपुले गुण। व्यासरूपें सूतास स्थापून । रसिक पुराण सांगविसी ।।५।। ऐसें ऐकतां दयाळ । वदता झाला श्रीगोपाळ । विदर्भनगरीं एक सुशीळ । वेदमित्रनामें द्विज होता ।।६।। तो वेदशास्त्रसंपन्न । त्याचा मित्र सारस्वतनामें ब्राह्मण । वेदमित्रास पुत्र सुगुण। सुमेधा नामें जाहला ||७||
सारस्वतसुत सोमवंत । उभयतांचें मित्रत्व अत्यंत । दशग्रंथी ज्ञान बहुत । मुखोद्गत पुराणें ।।८।। संहिता पद क्रम अरण ब्राह्मण। छंद निघंटु शिक्षा जाण । ज्योतिष कल्पव्याकरण। निरुक्त पूर्ण दशग्रंथी ।।९।। ऐसा विद्याभ्यास करितां । षोडश वर्षे झाली तत्त्वतां। दोघांचे पिते म्हणती आतां। भेटा नृपनाथा वैदर्भासी ।।१०।। विद्या दावूनि अद्भुत। मेळवावे द्रव्य बहुत । मग वधू पाहूनि यथार्थ। लग्ने करूं तुमचीं ।।११।। यावरी ते ऋषिपुत्र । विदर्भरायासी भेटले सत्वर । विद्याधनाचे भांडार। उघडोनि दाविती नृपश्रेष्ठा ।।१२।। विद्या पाहतां तोषला राव। परी विनोद मांडिला अभिनव । म्हणे मी एक सांगेन भाव। धरा तुम्ही दोघेही ।।१३।।
नेषधपुरीचा नृपनाथ। त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात। मृत्युंजयमृडानीप्रीत्यर्थ । दांपत्यपूजा करी बहु ।।१४।। तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी। होवोनि जावें ये क्षणीं। दिव्य अलंकार बहुत धनीं। पूजील तुम्हांकारणे ।।१५।। तेथोनि यार्वे परतोन। मग मीही देईन यथेष्ट धन । मातापितागुरुनृपवचन । कदा अमान्य करूं नये ।।१६।। तंव बोलती दोघे किशोर । हें अनुचित कर्म निंद्य फार। पुरुषास स्त्रीवेष देखतां साचार। सचैल स्नान करावें ।।१७।। पुरुषासी नारीवेष देखतां । पाहणार जाती अधःपाता। वेष घेणारही तत्त्वतां । जन्मोजन्मीं स्त्री होय ।।१८।। हेही परत्रीं कर्म अनुचित । तैसेचि शास्त्र बोलत। त्याहीवरी आम्ही विद्यावंत । धन अमित मळवू ।।१९।। आमुची विद्यालक्ष्मी सतेज । तोषवू अवनीचे भूभुज । आमुचे नमूनि चरणांबुज । धन देती प्रार्थनियां ||२०||
पंडितांची विद्या माय सदृणी। विद्या अकाळीं फळदायिनी। विद्या कामधेनु सांडुनी। निंद्य कर्म न करूं कदा ।।२१।। मातापित्यांहूनि विद्या आगळी। संकटीं प्रवार्सी प्रतिपाळी। पृथ्वीचे प्रभु सकळी। देखोनियां जोडिती कर ।। २२ ।। विद्याहीन तो पाषाण देख। जिताचि मृत तो शतमूर्ख। त्याचें न पाहावें मुख। जननी व्यर्थ श्रमविली ।।२३।। राव म्हणे दोघांलागून। माझें मान्य करावें एवढे वचन । परम संकट पडलें म्हणून । अवश्य म्हणती तेधवां ||२४|| रायें वस्त्रे अलंकार आणून। एकासी स्त्रीवेष देऊन । सोमवारी यामिनीमाजी जाण । पूजासमयीं पाठविले ।।२५।। जे सकळ प्रमदांची ईश्वरी। जिची प्रतिमा नाहीं कुंभिनीवरी। जीस देखोनि नृत्य करी। पंचशर प्रीतीनें ।।२६।।
रंभा उर्वशी चातुर्यखाणी। परी लज्जा पावती जीस देखोनी। रेणुका जानकी श्रीकृष्णभगिनी। उपमा शोभे जियेसी ||२७|| तिणें हें दांपत्य देखोनि ।कृत्रिम पाहूनि हांसे मनी। परी भावार्थ धरूनि चातुर्याणी मानी म्हणोनि पूजीत ॥२८॥ अलंकार वर्षे यथेष्ट घना पसने देत भाजना शिवगौरी म्हणोन। नमस्कार करून बोळवी ||१९|| जातां ग्रामपंथी पुढे भ्रतार मार्गे कामिनी। नाना विकार चेष्टा भाषणी। बहुत चोले तमासी ।।३०।। म्हणे आहे हे एकांतवन । वृक्ष लागले निबिड सघन मी कामानळेकरून। गेलें आहाळून प्राणपति ॥३१॥ तू वर्षानि सुरतमध। शीतळ करी ममांग। मी नितंबिनी झालें अभंग। जवळी पाहे येऊनियां ।।३२।।
तो म्हणे कां चेष्टा करिसी विशेष । फेडीं वख होय पुरुष। विनोद करिसी आसमास। हांसती लोक मार्गीचे ||३३|| तंव ते कामे होवोनि मूर्च्छित। मेदिनीवरी अंग टाकीत । म्हणे प्राणनाथा धाव त्वरित। करी शांत कामज्वरातें ।।३४।। तंव तो परतोनि आला सवेग। म्हणे हैं नसते काय मांडिलें सोंग। तुम्ही आम्ही गुरुबंधु निःसंग। ब्रह्मचारी विद्यार्थी ||३५|| चेरी म्हणे बोलसी काये। माझे अवयव चांचपोनि पाहें। गेलें पुरुषत्व लवलाहै। भोगी येथें मज आतां ॥३६॥ हातीं धरूनि तयासी। आडमार्गे नेले एकांतासी। वृक्ष गेले गगनासी। पल्लव भूमीसी पसरले ॥३७॥ साल तमाल देवदार। आम्र कदंबादि तरुवर। त्या वनीं नेऊनि सत्वर। म्हणे शंका सांडी सर्वही ।।३८।।
मी स्त्री तूं भ्रतार निर्धार। नाहीं येथे दुसरा विचार। येरू म्हणे हें न घडे साचार। तुम्ही आम्ही गुरुबंधु ।। ३९|| शास्त्र पढलासी सकळ । त्याचें काय हेंचि फळ । परत्रसाधन सुकृत निर्मळ । विचार करूनि पाहें पां ।।४०।। आधींच स्त्री वरी तारुण्य। परम निर्लज्ज एकांतवन । मिठी घाली गळां धांवून । देत चुंबन बळेंचि ।।४१।। घेऊनियां त्याचा हात। म्हणे पाहें हे पयोधर कमंडलुवत । तंव तो झिडकारूनि मार्गे सारीत। नसता अनर्थ करूं नको ।।४२।। धन्य धन्य ते पुरुष जनीं । परयोषिता एकांत चनीं। सभाग्य सधन तरुणी। प्रार्थितां मन चळेना ॥४३॥ वृत्तीस नव्हे विकार। तरी तो नर केवळ शंकर । त्यापाशीं तीर्थं समग्र । येवोनि राहती सेवेसी ।।४४।। जनरहित घोर वनीं। द्रव्यघट देखिला नयनीं। देखतां जाय ओसंडोनी। तरी तो शंकर निर्धार ॥४५॥
सत्यवचनीं सत्कर्मी रत। निगमागमविद्या मुखोद्रत । इतुकें असोनि गर्वरहित। तरी तो शंकर निर्धार।।४६।। आपणां देखतां वर्म काढूनी। निंदक विधिती वाम्बाणीं। परी खेदरहित आनंद मनीं । तरी तो शंकर निर्धारे ॥४७।। दुसरियाचे कूटदोषगुण। देखे ऐके जरी अनुदिन। परी ते मुखास नाणी गेलिया प्राण। तरी तो शंकर निर्धार ।।४८।। न दिसे स्त्रीपुरुष भाव जाण। गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण। न सांगे आपुले सुकृत तप दान। तरी तो शंकर निर्धार ।।४९।। पैल मूर्ख हा पंडित। निवडूं नेणे समान पाहत। कीर्ति वाढवावी नावडे मनांत। तरी तो शंकर निर्धारें ॥५०।। अभ्यासिलें न मिरवी लोकांत । शिष्य करावे हा नाहींच हेत। कोणाचा संग नावडे, आवडे एकांत। तरी तो शंकर निर्धार ।।५१।।
विरोनि गेल्या चित्तवृत्ती। समाधी अखंड गेली भ्रांती। अर्थ बुडालियाची नाहीं खंती। तरी तो शंकर निर्धा रें ।।५२।। श्रीधर म्हणे ऐसे पुरुष। ते ब्रह्मानंद परमहंस । त्यांच्या पार्टीच्या पादुका निःशेष । होऊनि राहार्वे सर्वदा ।।५३।। वेदमित्रपुत्र साधु परम। धैर्यशखें निवटोनि काम। म्हणे ग्रामास चला जाऊं उत्तम। विचार करूं या गोष्टीचा ।।५४।। ऐसें बोलोनि सारस्वतपुत्र। स्त्रीरूपें सदना आणिला सत्वर। श्रुत केला समाचार। गतकथार्थ वर्तला जो ||५५।। सारस्वते मांडिला अनर्थ। रायाजवळी आला वक्षःस्थळ बडवीत । म्हणे दुर्जना तुवां केला घात। हत्या करीन तुजवरी ।।५६।।
वेदशास्त्रसंपन्न। येवढाच पुत्र मजलागून। अरे तुवां निर्वंश केला पूर्ण। काळें बदन झालें तुझें ।। ५७।। विदर्भ अधोगतमुख पाहात । म्हणे कृत्रिम केवीं झाले सत्य। शिवमाया परम अद्भुत । अघटित कर्तृत्व तियेचे ।।५८।। रायें मेळवूनि सर्व ब्राह्मण। म्हणे सतेज करा अनुष्ठान। द्यावे यासी पुरुषत्व आणून । तरीच धन्य होईन मी ।।५९।। विप्र म्हणती हे ईश्वरी कळा। आमुचेनि न पालटे भूपाळा। तेव्हां विदर्भराव तये वेळां। आराधिता झाला देवीतें ।।६०।। हवन मांडिलें दुर्धर। राव सप्तदिन निराहार। देवी प्रसन्न झाली म्हणे माग वर। मग बोले विदर्भ तो ।। ६१|| म्हणे हा सोमवंत स्त्रीवेष । यासी पुनः करीं पुरुष। देवी म्हणे ही गोष्ट निःशेष । न घडे सहसा कालत्रयीं ।।६२।।
निःसीम पतिव्रता सीमंतिनी। परम भक्त सदृणखाणी। तिचें कर्तृत्व माझेनी । न मोडवे सहसाही ।।६३।। या सारस्वतासी दिव्य नंदन। होईल सत्य वेदपरायण। ईस सुमेधा वर जाण। लग्न करूनि देइंजे ।।६४।। देवीच्याआज्ञेवरून । त्यासीच दिधलें लग्न करून। अंबिकेचे वचने जाण। पुत्र जाहला सारस्वता ।।६५।। धन्य सीमंतिनीची शिवभक्ती। उपमा नाहीं त्रिजगती। जिचे कर्तृत्व हेमवती। मोडूं न शके सर्वथा ।।६६।। सूत म्हणे ऐका सावधान। अवंतीनगरी एक ब्राह्मण। अत्यंत विषयी नाम मदन । शृंगारसुगंधमाल्यप्रिय ।। ६७ ।। पिंगलानामें वेश्या विख्यात । तिसी झाला सदा रत। सांडूनि ब्रह्मकर्म समस्त । मातापिता त्यागिली ।।६८।। धर्मपत्नी टाकूनि दुराचारी। तिच्याच घरी वास करी। मद्यमांसरत अहोरात्री। कामकर्दमी लोळत ।।६९।।
करावया जगदुद्वार। आपणचि अवतरला शंकर। ऋषभनामें योगीश्वर। होवोनि विचरत महीवरी ॥७०॥ आपुले जे जे निर्वाणभक्ता त्यांचीं दुःखें संकटें निवारीत । पिंगलेच्या सदना अकस्मात। पूर्वपुण्यास्तव पातला ।।७१।। तो शिवयोगींद्र दृष्टीं देखोन। दोघेही धांवती धरिती चरण। षोडशोपचारेंकरून । सप्रेम होऊनी पूजिती ॥७२॥ शुष्क सुपक्क स्निग्ध विदग्ध। चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद । भोजन देऊनि बहुविध ।। अलंकारवखें दीधलीं ॥७३॥ करूनियां दिव्य शेज। निजविला तो शिवयोगिराज । तळहातें मर्दिती दोघे चरणांबुज । सुपर्णाग्रजउदय होय तो ।।७४।। एक निशी क्रमोनि जाण। शिवयोगी पावला अंतर्धान। दोघे म्हणती उमारमण । देऊनि दर्शन गेला आम्हां ।। ७५ ।। मग पिंगला आणि मदन । कालांतरी पावलीं मरण। परी गांठीस होतें पूर्वपुण्य। शिवयोगीपूजनाचे ।।७६।।
दाशार्हदेशींचा नृपती। वज्रबाहुनामें विशेषकीतीं । त्याची पट्टराणी नामें सुमती। जेवीं दमयंती नळाची ।। ७७।। तो मदननामें ब्राह्मण । तिच्या गभर्भी राहिला जाऊन । सीमंतिनीच्या पोटीं कन्यारत्न । पिंगला वेश्या जन्मली ।।७८।। कीर्तिमालिनी तिचें नांव। पुढें कथा ऐका अभिनव । इकडे सुमतीचे पोटीं भूदेव। असतां विचित्र वर्तलें ।। ७९ ।। तिच्या सवती होत्या अपार। ही पट्टराणी ईस होईल पुत्र। त्यांहीं तीस विष दुर्धर। गर्भिणी असतां घातले ।।८०।। तीस तत्काळ व्हावा मृत्यू । परी रोग लागला झाली प्रसूत। विष अंगावरी फुटलें बहुत । बाळकासहित जननीच्या ।।८१।। क्षतें पडलीं झाले व्रण। रक्त पू गळे रात्रंदिन। रायें बहुत वैद्य आणून । औषधे देतां बरें नोहे ।।८२।। रात्रंदिवस रडे बाळ। सुमती राणी शोकें विव्हळ। मृत्यूही नोहेव्यथा सबळ। बरी नव्हेचि सर्वथा ।॥८३॥ लेकरूं सदा करी रुदन। रायासी निद्रा न लागे रात्रंदिन। कंटाळला मग रथावरी घालून । घोर काननीं सोडिली ।।८४।। जेथे मनुष्याचें नाहीं दर्शन। वसती व्याघ्र सर्प दारुण। सुमती बाळ कडे घेऊन । सव्य-अपसव्य हिंडतसे ।।८५।।
कंटक पाषाण रुतती चरणीं। मूर्च्छा येऊनि पडे धरणीं। आक्रंदे रडे परी न मिळे पाणी। व्रणेकरूनी अंग तिडके ।।८६।॥ म्हणे जगदात्म्या कैलासपती। जगद्वंद्या ब्रह्मानंदमूर्ति। भक्तवज्रपंजरा तुझी कीतीं। सदा गाती निगमागम ।।८७।। जयजय त्रिदोषशमना त्रिनेत्रा। जगदंकुरकंदा पंचवक्त्रा। अज अजिता पयः फेनगात्रा। जन्मयात्रा चुकवीं कां ।।८८।। अनादिसिद्धा अपरिमिता । मायाचक्रचालका सद्गुणभरिता । विश्वव्यापका गुणातीता। धांव आतां जगद्गुरो ।।८९।। ऐसा धांवा करितां सुमती। तंव वनीं सिंह व्याघ्घ्र गर्जती। परम भयभीत होऊनि चित्तीं। बाळासहित क्षिर्ती पडे ।।९० ।। श्रावणारितनयें नेऊन । वनीं सांडिलें उर्वीगर्भरत्न । कीं वीरसेनस्नुषा घोर कानन । पतिवियोगें सेवी जैसें ।।९१।। सुमतीची करुणा ऐकून। पशुपक्षी करिती रुदन। धरणीं पडतां मूर्च्छा येऊन। वृक्ष पंक्षी छाया करिताती ।।९२।।
चंचु भरूनियां जळ । बाळावरी शिंपिती वेळोवेळ। एकीं मधुर रस आणोनि स्नेहाळ। मुखीं घालोनि तोषविती ।।९३।। वनगाई स्वपुच्छेकरूनी । वारा घालिती रक्षिती रजनीं। असो यावरी ते राजपत्नी। हिंडतां अपूर्व वर्तलें ।।९४।। तो वृषभभार वणिक घेवोनी। पंथे जातां देखे नयनीं। त्यांचिया संर्गेकरूनी। वैश्यनगरा पातली ।।९५।। तेथील अधिपति वैश्य साचार। त्याचें नांव पद्माकर। परम सभाग्य उदार। रक्षक नाना वस्तूंचा ।।९६।। तेणें सुमतीस वर्तमान । पुसिलें तूं कोठील कोण। तिणें जें वर्तलें मुळींहून। श्रुत केलें तयातें ।। ९७।। तें ऐकूनि पद्माकर । त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र। श्वासोच्छ्वास टाकूनि घोर। म्हणे गति थोर कर्माची ।।९८।।
वज्रबाहूची पट्टराणी। पतिव्रता अवनीची स्वामिनी । अनाथापरी हिंडे वनीं। दीनवदन आली येथें ।। ९९।। मग पद्माकर म्हणे सुमती। तूं माझी धर्मकन्या निश्चितीं। शेजारीं घर देऊनि अहोरातीं। परामर्श करी तियेचा ।।१००।। बहुत वैद्य आणून । देता झाला रसायन । केले बहुत प्रयत्न । परी व्याधि न राहेचि ।।१।। सुमती म्हणे ताता । श्रीशंकर वैद्य न होतां ।कवणासही हे व्यथा। बरी न होय कल्पान्ती ।।२।। असो पुढे व्यथा होतां कठीण। गेला राजपुत्राचा प्राण। सुमती शोक करी दीनवदन । म्हणे रत्न मेलें माझें ।।३।। पद्माकर शांतवी बहुतां रीतीं। नगरजन मिळाले सभोंवतीं। तो निशांतीं उगवला गभस्ती। तेवीं शिवयोगी आला तेथे ।।४।। जैसे दुर्बलाचें सदन शोधीत। चिंतामणि ये अकस्मात। कीं क्षुधेने प्राण जात। तो क्षीराब्धि पुढे धाविन्नला ।।५।।
पद्माकरें धरिले चरण। पूजिला दिव्यासनीं बैसवून। त्यावरी सुमतीप्रति दिव्य निरूपण। शिवयोगी सांगता झाला ।।६।। म्हणे वत्से सुमती ऐक । कां हो रडसी करिसी शोका तुझे पूर्वजन्मींचे पति पुत्र जनक । कोठे आहेत सांग पां ।।७।। आलीस चौऱ्याऐंशीं लक्ष योनी फिरत। तेथींचे स्वजन सोयरे आप्त। आले कोठून गेले कोठें त्वरित । सांग मजपार्शी वृत्तान्त हा ।।८।। तूं नानायोनी फिरसी। पुढे ही किती फेरे घेसी। कोणाचे पुत्र तूं कां रडसी। पाहें मानसीं विचारूनी ।।९।। शरीर धरावें ज्या ज्या वणीं । त्या त्या कुळाभिमानें नाचती प्राणी। परी आपण उत्पन्न कोठूनी। तें विचारूनी न पाहती ।।११०।। त्वां पुत्र आणिला कोठून। कोण्या स्थळागेला मृत्यु पावोन। तू आणि हे अवघे जन । जातील कोठे कवण्या देहा ।।११।। आत्मा शिव शाश्वत । शरीर क्षणभंगुर नाशवंत । तरी तूं शोक करिसी व्यर्थ। विचारूनि मनीं पाहें पां ||१२||
आत्मा अविनाशी शाश्वत । तो नव्हे कोणाचा बंधु सुत। शरीराकारणे शोक करिसी व्यर्थ। तरी पडलें प्रेत तुजपुढें ।।१३।। जळीं उठतीं तरंग अपार । सवेंचि फुटती क्षणभंगुर । मृगजळचि मिथ्या समग्र । तरी बुडबुडे सत्य कैसेनी ।।१४।। चित्रींच्या वृक्षच्छाये बैसला कोण। चित्राग्नीनें कोणाचें जाळिलें सदन । तेथें गंगा लिहिली सहित मीन। कोण वाहोनि गेला तेथें ।।१५।। वंध्यासुतें द्रव्य आणून । भीष्मकन्या मारुतीस देऊन । गंधर्वनगरींचे वऱ्हाडी आणून । लग्न कोणें लाविलें ।।१६।। वाऱ्याचा मंडप शिवून । सिकतादोरें बांधिला आंवळून । शुक्तिकारजताचें पात्र करून। खपुष्पें कोणीं भरियेलें ।।१७।। कांसवीचे घालूनि घृत। मृगजळींचे मीन पाजळती पोत । ते चरणीं नुपूरे बांधोनि नाचत । जन्मांध पाहत बैसले ।।१८।। अहिकणींचीं कुंडले हिरोनी। चित्रींचे चोर आले घेवोनि। हा प्रपंच लटिका मुळींहूनी। तो साच कैसा जाणावा ।।१९।
मुळींच लटिके अशाश्वत। त्याचा शोक करणें व्यर्थ । क्लेशतरूचें उद्यान समस्त । शरीर हे उद्भवलें ।। १२० ।। सकळ रोगांचें भांडार। कृमिकीटकांचे माहेर। कीं पापाचा समुद्र। कीं अंबर भ्रांतीचें ||२१|| मूत्र श्लेष्म मांस रक्ता अस्थींची मोळी चर्मवेष्टित । मातेचा विटाळ पितृरेत । अपवित्र असत्य मुळींच है ।।२२।। ऐसें हैं शरीर अपवित्र। तें पशुमूत्रे झालें पवित्र। क्षुरें मूर्धज छेदिले समग्र । इतुकेनि पावन केंवि होय ।।२३।। शरण न जाती देशिकाप्रती। तरी कैसेनि प्राणी तरती। कल्पकोटी फेरे घेती। मुक्त होती कधीं है ।।२४।। सुमती तूं सांगें सत्वर । तुझे जन्मोजन्मींचे कोठे आहेत भ्रतार । अवघा हा मायापूर। सावध सत्वर होई कां ।।२५।। जयाचें हें सकळ लेणें। मागतां देतां लाजिरवाणें। तनुघर बांधिलें त्रिगुणें। पांच वांसे आणोनियां ।। २६ ।। याचा भरवसा नाही जाण । केधवां लागेल न कळे अग्न । कीं हे झालें वस्त्र जीर्ण । ऋणानुबंध तंव तगे ||२७||
मिथ्या जैसे मृगजळ । कीं स्वप्नींचे राज्य ढिसाळ । अहा प्राणी पापी सकळ । धन धान्य पुत्र इच्छिती ।।२८।। गंगेमाजी काष्ठे मिळती। एकवट होती मागुती बिघडती।तैसी स्त्रीपुरुषे बोलिजेती | खेळ मुळींच असत्य हा ||२९|| वृक्षावरी पक्षी येती। कितीएक बैसती कितीएक जाती। आणिक्या तरूवरी बैसती। अपत्यें तैसीं जाण पां ।।१३०।। पथिक वृक्षातळीं बैसत । उष्ण सरलिया उठूनि जात । सोयरे बंधु आप्त । तैसेच जाण निर्धारें ||३१|| मायामय प्रपंचवृक्षीं। जीव शिव बैसले दोन पक्षी। शिव सावधान सर्वसाक्षी। जीव भक्षी विषयफळे ।।३२।। तीं भक्षितांच भुलोनि गेला । आपण आपणासी विसरला । ऐसा अपरिमित जीव भ्रमला। जन्ममरण भोगीतसे ।।३३।। त्यांमाजी एकादा पुण्यवंत । सदूरूसी शरण रिघत । मग तो शिव होवोनि भजत । शिवालार्गी अत्यादरें ||३४|| ऐसें ऐकतां दिव्य निरूपण । पद्माकर सुमती उठोन । अष्टभावें दाटोन। वंदिती चरण तयाचे ।। ३५ ।।
म्हणती येवढे तुझें ज्ञान। काय एक न करिसी इच्छेकरून । तूं साक्षात उमारमण । भक्तरक्षणा धांवलासी ।। ३६ ।। मग मृत्युंजयमंत्र राजयोगी। सुमतीस सांगे शिवयोगी। मंत्रूनि भस्म लावितां अंगीं। व्यथारहित जाहली ते ।।३७। रंभाउर्वशींहूनि वहिलें । दिव्य शरीर तिचें झालें। मृत्युंजयमंत्रे भस्म चर्चिलेंबाळ उठिले तत्काळ ॥३८॥ प्रणव्यथा जायोनि सकळ । बत्तीसलक्षणी झाला बाळ। मम शिवध्यान उपासना निर्मळ । सुमतीबाळ उपदेशिले ।।३९।। परीस अगटतां पूर्ण। लोह तत्काळ होय सुवर्ण। तैर्सी दोघे दिव्यरूप जाण। होती झाली ते काळीं ।।१४०।। आश्चर्य करी पद्माकर। म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र। काळ-मृत्युभय अपार। त्यापासूनि रक्षी गुरुनाथ ।।४१।।
गुरुचरणी रत होती सदा। त्यांसी कैची भवभयआपदा । धनधान्यांसी नाहीं मर्यादा। भेद खेदां वारिलें ।।४२।। बाळ चरणांवरी घालोनी। सुमती लागे सप्रेम चरणीं। म्हणे सद्गुरु तुजवरूनी। शरीर सांडणे हे माझे ।।४३।। या शरीराच्या पादुका करून। तुझिया दिव्यचरणीं लेववीन । तरी मी नव्हे उत्तीर्ण। उपकार तुझे गुरुमूर्ति ॥४४॥ मग शिवयोगी बोलत। आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत । तुझिया पुत्रासी होईल प्राप्त। राज्य पृथ्वीचें करील हा ।।४५।।
त्रिभुवनभरी होईल कीतीं। निजराज्य पावेल पुढती। भद्रायु नाम निश्चितीं। याच ठेविलें मी जाण ।।४६ ।। थोर होय भद्रायु बाळ। तंववरी क्रर्मी येथेचि काळ। मृत्युंजयमंत्र जप त्रिकाळ। निष्ठा धरूनि करीत जा ।।४७।। हा राजपुत्र निश्रिता लोकांत प्रकटी नीं माता हा होईल विद्यावंत । चतुःषष्टिकळाप्रवीण ॥४८॥ ऐसें शिवयोगी बोलोन। पावला तेथेंचि अंतर्धान। गुरुपदांबुज आठवून । सुमति सद्गद क्षणक्षणां ।।४९।। पद्माकरासी सुख अत्यंत । सुनय पुत्राहूनि बहुत । भद्रायु त्यासी आवडत । सदा पुरवीत लाड त्याचा ।।१५०।। पद्माकरें आपुली संपत्ती वेंचून। दोघांचे केलें मेखलाबंधन । दोघांसी भूषणे समान। केलें संपन्न वेदशास्त्रीं ।। ५१।।
द्वादश वर्षांचा झाला बाळ। धीर गंभीर परम सुशीळ । मातेच्या सेवेसी सदाकाळ। जवळी तिष्ठत सादर ।।५२।। पदरी पूर्वसुकृताचे पर्वत। शिवयोगी प्रकटला अकस्मात। सुमती भद्रायु धांवत । पाय झाडीती मुक्तकेशीं ।।५३।। नयनोदके चरणक्षालन । केश वसनें पुसिले पूर्ण। जें सुगंधभरित जाण। स्नेह तेंचि लाविलें ।।५४।। वारंवार करिती प्रदक्षिणा । दाटती अष्टभार्वेकरून । षोडशोपचारे पूजन। सोहळा करिती अपार ।। ५५।। स्तवन करीतसे तेव्हां सुमती। तुझिया प्रसादेंकरून मी पुत्रवंती। यावरी भद्रायूसी नीती। शिवयोगी शिकवितसे ।।५६।। श्रुतिस्मृतिपुराणोक्त पाहीं। धर्मनीतीं वर्तत जाईं।मातापितागुरुपायी। निष्वा असों दे सर्वदा ॥१५७।।
गोमूदेवप्रजापाळण सर्वांभूर्ती पहावा उमारमण । वर्णाश्रमस्वधर्माचरण। सहसाही न सांडावें ।।५८।। विचार केल्यावाचूनियां। सहसा न करावी आन क्रिया। मागे पुढे पाहोनियां। शब्द बोलावा कुशलत्वे ।।५९।। काळ कोण मित्र किती। कोणी द्वेषी शत्रु किती। आय काय खर्च किती। पाहावें चित्तीं विचारूनियां ।।१६०।। माझे बळ किती काय शक्ती। आपुले सेवक कैसे वर्तती। यश की अपयश देती। पहावें चित्तीं विचारूनी ।।६१।। अतिथी देव मित्र। स्वामी वेद अग्निहोत्र । पशु कृषि धन विद्या सर्वत्र। घ्यावा समाचार क्षणक्षणां ।।६२।। लेकरू भार्या अरि दास । सदन गृहवार्ता रोगविशेष । येथे उपेक्षा करितां निःशेष । हानि क्षणांत होत पै ॥ ६३॥
ज्या पंथे गेले विद्वज्जन। आपण जावें तोचि पंथ लक्षून। माता-पिता-यतिनिंदा जाण। प्राणांतींही न करावी ।।६४।। वैश्वदेवसमयीं अतिथी। आलिया त्यासी न पुसावी याती। अन्न वस्त्र सर्वांभूतीं। द्यावें प्रीत्यर्थ शिवाचिया ।। ६५ ।। परोपकार करावा पूर्ण। परपीडा न करावी जाण। करावें गोब्राह्मणरक्षण। सत्य सुजाण म्हणतीतया ।।६६।। निंदा बाद टाकोन। सर्वेदा फीजे शिवस्मरण। तेच म्हणावे मौन। शिवसेवन तप थोर ।। ६७ ।। परदारा आणि परधन। हें न पहावें जेवीं वमन । करावें शास्त्रश्रवण । शिवपूजन यथाविधि ।। ६८ ।। स्नान होम जपाध्ययन । पंचयज्ञ गोवि-प्रसेवन । श्रवण मनन निजध्यास पूर्ण। अनालस्यें करावीं ॥६९।। सुरत निद्रा भोजन। येथे असावें प्रमाण। दान सत्कर्म अभ्यास श्रवण। आळस येथे न करावा ।।१७०।।
काम पूर्ण धर्मपत्नीसी । निषिद्ध जाण परयोषितेसीं । क्रोधे दंडावें शत्रूसी। साधुविप्रांसी नमिजे सदा ।।७१।। द्वेषियांसी धरावा मद। संत-भक्तांसी नम्रता अभेद। संसाररिपूसी मत्सर प्रसिद्ध । असावें निर्मत्सर सर्वांभूतीं ।॥७२।। दुर्जनासी दंभ दाविजे । भल्याचे पदरज वंदिजे। अहंकारें पृथ्वी जिंकिजे। निरहंकार द्विजासी ।।७३।। वाचा सावध शिवस्मरणीं। पाणी सार्थक दानेंकरूनी। पाद पावन देवालययात्रागमनीं। नित्य शिवध्यानीं बैसावें ।॥७४।। पुराणश्रवणीं श्रोत्र सादर। त्वचा संतआलिंगनीं पवित्र । सार्थक शिवध्यानीं नेत्र । जिव्हेनें स्तोत्र वर्णावें ।।७५।। शिवनिर्माल्यवास घेईजे घ्राणीं। ये रीतीं इंद्रियें लावावींभजनी। दीन अनाथ अज्ञान देखोनी। तयावरी कृपा कीजे ।। ७६।।
ईश्वरी प्रेम संतांसी मैत्री। देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी। युक्तनिद्रा युक्ताहारी। मृगया करी परम नीतीनें ।। ७७ ।। अतिविद्या अतिमैत्री। अतिपुण्य अतिस्मृती। उत्साह धैर्य दान धृती। वर्धमान असावीं ॥७८॥ आपुले वित्त आयुष्य गृहच्छिद्र। मैथुन औषध सुकृत मंत्र। दान मान अपमान हीं सर्वत्र। गुप्त असावीं जाणिजे ।। ७९ ।। नष्ट पाखंडी शठ धूर्त। पिशुन तस्कर जार पतित। चंचळ कपटी नास्तिक अनृत। ग्राम्य सभेसी नसावे ।।१८०।। निंदक शिवभक्तिउच्छेदका मद्यपानी गुरुतल्पका मार्गपाडक कृतघ्न धर्मलोपक । त्यांचे दर्शन न व्हावें ।।८१।। दारा धन आणि पुत्र। यांसी आसक्त नसावें अणुमात्र। अलिप्तपणे संसार। करोनि अनासक्त असावें ।।८२।।
बंधु सोयरे श्वशुर स्वजन। यांसी स्नेह असावा साधारण । भलता विषय देखोन। आसक्ती तेथे न करावी ||८३|| करावें रुद्राक्षधारण । मस्तकीं कंठीं दंडीं करभूषण। गेलिया प्राण शिवपूजन। सर्वथाही न सांडावें ।।८४|| शिवकवच।। सर्वांर्गी। लेऊं शिकवी शिवयोगी। भस्म चर्चितां रणरंगी। शस्त्राखबाधा न होय ।।८५।। काळमृत्युभयापासून । रक्षी मृत्युंजयओपासन। आततायी। मार्गघ्न ब्रह्मघ्न। यांसी जीवें मारावें ।।८६ ।। सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष। विधियुक्त आचरावें विशेष । शिवहरिकीर्तन निर्दोष । सर्व सांडूनि ऐकावें ।।८७।। महापर्व कुयोग श्राद्धदिनीं । व्यतीपात वैधृति संक्रमणीं। न प्रवर्ताव मैथुनीं। ग्रहणीं भोजन न करावें ।।८८।।
सत्पात्री देतां दान। होय ऐश्वर्य वर्धमान । अपात्रीं दानें दारिद्रय पूर्ण। शास्त्रप्रमाण जाणिजे ।।८९।। वेद शास्त्र पुराण कीर्तन। गुरुब्राह्मणमुखें करावें श्रवण। दान दिधल्याचें पाळण । करितां पुण्य त्रिगुण होय ।।१९०।। अपूज्याचे पूजन। पूज्य त्याचा अपमान । तेथे भय दुर्भिक्ष मरण। होतें जाण विचारें ।। ९१।। महाडोहीं उडी घालणें । महापुरुषासीं विग्रह करणे। बलवंतासीं स्पर्धा बांधणें। हीं द्वारें अनर्थाचीं ।।९२।। दानें शोभे सदा हस्त। कंकण मुद्रिका भार समस्त । श्रवर्णी कुंडलें काय व्यर्थ । श्रवणसार्थक श्रवणेंचि ||९३।। ज्याची वाचा रसवंती। भार्या रूपवती सती। औदार्य गुणसंपत्ती। सफल जीवित्व तयाचें ।।९४।। देईन। अथवा नाहीं सत्य। हे वाचेसी असावें व्रत। विद्यापात्र येती अमित । सद्यःदान त्यां दीजे ॥९५।। विपत्तिकाळीं धैर्य धरी । वादीं जयवंत वैखरी || युद्धामाजी पराक्रम करीं। याचकांसी पृष्ठी न दाविजे ।।९६।।
ब्राह्मण-मित्रपुत्रांसमवेत । तेंचि भोजन उत्तम यथार्थ। गजतुरंगांसहित पंथ। चालणे तेंचि श्रेष्ठ होय ।।९७।। ज्या लिंगाचें नाहीं पूजन। तेथे साक्षेपें पूजा करावी जाऊन । अनाथप्रेतसंस्कार जाण । करणें त्या पुण्यासी पार नाहीं ।।९८।। ब्रह्मद्वेषाएवढे विशेष । मारक नाही कदा विष। सत्समागम रात्रंदिवस । तुच्छ सुधारस त्यापुढें ।। ९९।। प्रतापें न व्हावें संतप्त । परसौख्यें हर्षभरित । सद्वार्ता ऐकतां सुख अत्यंत । तोचि भक्त शिवाचा ||२००।। पाषाण नाम रत्ने व्यर्थ । चार रत्नें आ आहेत पृथ्वींत । अन्न उदक सुभाषित। औदार्य रत्न चौथे पैं वर्म कोणाचें न बोलावें। सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे। भाग्याभाग्य येत स्वभावें। स्वधर्मध्रुव न ढळावा ||२|| पूर्वविरोधी विशेष । त्याचा न धरावा विश्वास। गर्भिणी पाळी गर्भास। तेवीं प्रजा पाळी कां ।।३।।
गुरु आणि सदाशिव । यांसीं न करावा भेदभाव । भाग्य-विद्यागर्व सर्व। सोडोनि द्यावा जाण पां ।।४।। नराची शोभा स्वरूप पूर्ण। स्वरूपाचे सटुण आभरण।गुणांचे अलंकार ज्ञान। ज्ञानाचे भूषण क्षमा शांति ||५|| कुल शील विद्या धन। राज्य तप रूप यौवन । या अष्टमर्देकरून । मन भुलों न द्यावें ।।६।। ऐसा नानापरी शिवयोगी। बोधिता झाला भद्रायूलागीं। हे नीति ऐकतां जगीं। सांकडें न पडे सर्वथा ||७|| सातवा अध्याय गिरी कैलास । यावरी वास्तव्य करी उमाविलास। पारायण प्रदक्षिणा करिती विशेष । निर्दोष यश जोडे तयां ।।८।।
कीं हा अध्याय हिमाचल । भक्तिभवानी कन्या वेल्हाळ । तिसी वरोनी पयः फेनधवल । श्वशुरगृहीं राहिला ।।९।। पुढिले अध्यायीं कथा सुरस । शिवयोगी दया करील भद्रायूस । ब्रह्मानंद निशिदिवस । श्रवण करोत विद्वज्जन ।।२१०।। भवगजविदारक मृगेंद्र । श्रीधरवरद आनंदसमुद्र। तो शिव ब्रह्मानंद यतींद्र। जो जगगुरू जगदात्मा ||११।। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । सप्तमाध्याय गोड हा
|| श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।। ।। शुभं भवतु ।।
Shivleelaamrit 7 Adhyay: ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा सहावा अध्याय!
Shivleelaamrit 7 Adhyay: जाणून घेऊया महाराजांच्या दहा गडकिल्ले !
आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!