Shivleelaamrit 14,15 Adhyay Marathi: शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा चौदावा आणि पंधरावा अध्याय

Shivleelaamrit 14,15 Adhyay Marathi:कथा सारा सहित शिवलीलामृताचा १४,१५ अध्याय 

Shivleelaamrit 14,15 Adhyay Marathi: नमस्कार वाचकांनो,‘शिवलीलामृत’ हा एक दिव्य ग्रंथ आहे, जो भगवान शिवाच्या अलौकिक लीलांचे वर्णन करतो. या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण केल्याने भक्तांच्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि ऐहिक तसेच पारलौकिक कल्याण होते. शिवरात्रीच्या पवित्र काळात या ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

ग्रंथाचे पारायण करताना दररोज ठरावीक वेळी एक अध्याय वाचावा किंवा ऐकावा. जर कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन हा ग्रंथ ऐकू इच्छित असतील, तर स्पष्ट आणि सुस्वर वाचन करणाऱ्या व्यक्तीने तो वाचावा आणि इतरांनी श्रद्धेने ऐकावा. सप्ताह पूर्ण झाल्यावर प्रसाद वाटून ग्रंथाची कृपा सर्वांवर यावी, अशी भावना ठेवावी. ‘शिवलीलामृत’ या ग्रंथाच्या माध्यमातून भक्त भगवान शिवाच्या अगाध कृपेचा अनुभव घेऊ शकतात आणि आपले जीवन आनंदमय आणि समृद्ध बनवू शकतात.

तर आज या लेखात आपण शिवलीलामृताचा चौदावा आणि पंधरावा अध्याय पाहणार आहोत.

पोथी घरात सर्वांनी ऐकावी अशी इच्छा असेल तर ज्याला किंवा जिला स्पष्ट वाचन करता येत असेल त्याने किवा तिने रोज ठरावीक वेळी पोथी वाचावी व सर्वांनी ऐकावी, सप्ताह पूर्ण झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटावा,

ॐ नमः शिवाय या शिवमंत्राचा सर्वांनी त्या सप्ताहात त्या वेळी पोथीबाचनापूर्वी १०८ वेळा जप  करावा.

Shivleelaamrit 14,15 Adhyay Marathi: शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा चौदावा आणि पंधरावा अध्याय

अध्याय चौदावा  शबरी पार्वती व श्रियाळाची कथा

सूत म्हणाले, “सज्जन हो। एके दिवशी कैलासावर शिवपार्वती सारीपाट खेळत असताना नारदांचे आगमन झाले. त्यांनी त्या दोघांना पण लावून खेळण्यास सांगितले. ते मान्य करून ती दोघे खेळू लागली. त्या वेळी पार्वतीचीच सरशी होत गेली आणि शंकरांना आपले व्याघ्रांबर, गजचर्म, आयुधे, भूषणे व कौपीनही गमवावी लागली. शंकर दिगंबर झाले. त्या वेळी त्यांचे सर्वस्व हरण झालेले पाहून नारद हसून म्हणाले, “देवा, हे काय? एका खीने तुम्हांला हरवले? तुमचा महिमा फुकट आहे. आता भक्तांना काय सांगाल?” ते ऐकून रुसलेले शंकर लपून बसले. कोणालाही त्यांचा ठावठिकाणा लागेना.

पार्वतीने कसून शोधले तेव्हा कैलासनाथ हिमालयातील एकांतात स्वानंदसुखात रममाण दिसले. पार्वतीने भिल्लिणीच्या रूपात त्यांच्याजक जाऊन नृत्यगायन केले, नेत्रकटाक्षांनी त्यांना घायाळ केले. तेव्हा त्यांनी तिला विवाहाबद्दल विचारले असता तिने पार्वतीचा विषय काढला. त्यावर त्यांनी ‘मला तिचे तोंडही पाहायचे नाही’ असे उत्तर दिले. तेव्हा ‘विवाहासाठी माझ्या घरी चला’ असे सांगून तिने मोठ्या खुबीने शंकरांना कैलासावर नेले व तेथे आपले खरे स्वरूप प्रकट केले. त्या वेळी तिचे प्रेम पाहून शंकरानी हसून तिला जवळ घेतले.”

पुढील कथा सांगताना सूत महणाले, “नारदांकडून कांतिनगराचा राजा श्रियाळ याच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी घाणेरड्या रूपात त्याच्या द्वारी गेले व म्हणाले, “इच्छाभोजन देणार असाल तरच आत येतो अन्यथा तुमचे सत्त्व घेऊन मी परत जातो.” त्या वेळी त्यांचे म्हणणे मान्य करून श्रियाळ व त्याची पत्नी चांगुणा यांनी त्यांना घरात घेऊन त्यांची इच्छा विचारली. ते म्हणाले, “मला नरमांसाचे भोजन हवे व तेही तुमच्या चिलया बाळाचे.

ते शिजवताना तुम्ही रडलात तर मी निघून जाईन.” ते ऐकून ती दोघे बधिर झाली, पण तरीही सत्त्व राखण्यासाठी सर्व माया दूर करून त्यांनी आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढले. तेव्हा ‘निपुत्रिकाच्या घरी मी जेवत नाही’ असे सांगून अतिथीने चांगुणेला बाळास हाक मारण्यास सांगितले. तिने त्याला हाक मारताच तिचा पुत्र अंगणातून धावत आला. तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकरांनी मायारूप टाकून त्या सर्वांना दर्शन दिले आणि श्रियाळ व चांगुणा यांस दिव्य विमानातून शिवलोकी नेले.”

।। श्रीशिवलीलामृत अध्याय चौदावा ।।

श्रीगणेशाय नमः 

।। भस्मासुरहरणा भाललोचना। भार्गववरद भस्मलेपना । भक्तवत्सला भवभयहरणा। भेदातीता भूताधियते ।।१। भवानीवरा भक्ततारका । भोगिभूषणा भूतपालका । भाविकरक्षका भवभयहारका । भक्तरक्षका भवशोषणा ||२|| त्रितापशमना त्रिदोषहारका । त्रिगुणातीता त्रिपुरांतका। त्रिभुवनजनका त्र्यंबका। त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या ।।३।। तुझ्या कृपाबळे समस्त । त्रयोदश अध्यायांपर्यंत । कथिले शिवलीलामृत । आतां कळसाध्याय चौदावा ।।४।। तेराव्या अध्यार्थी शिवगौरीलग्न । सांगितलें स्वामिकार्तिकाचें जनन । यावरी शौनकादिकांलागून। सूत सांगे नैमिषारण्यीं ।।५।।

सिंहावलोकनें तत्त्वतां । परिसा गजास्य-षडास्यांची कथा। दोघेही धाकुटे असतां । जगदंबा खेळवी प्रीतीनें ।।६।। गजतुंडा ओसंगा घेऊन । विश्वजननी देत स्तनपान । शुंडादंर्डेकरून । दुग्ध ओढीत गजास्य ||७|| अंबेच्या पृष्ठीवरी प्रीतीं। शुंडा फिरवीत गणपती। शुंडेंत पय सांठवूनि षण्मुखाप्रती । वा ।।८।। म्हणे हे घेई का अमृत । ब्रह्मादिको जे अप्राप्त। स्कंद बोले क्रोधयुक्ता उच्छिष्ट तुझे न घे मी ।।९।। षडानन म्हणे चराचरंजननी। लंबनासिक मजलागुनी । उच्छिष्ट दुग्ध देतो पाहें लोचनीं । सांग मृडानी कांहीं यातें ।।१०।। शुंडेस धरूनियां खालें। पाडूं काय ये वेळे। माते याचें नासिक विशाळ आगळें। कां हो ऐसें केलें तुवां ।।११।। इंद्र चंद्र मित्र निर्जर। मूर्ति प्रसवलीस मनोहर । परी हा लंबनासिक कर्ण थोर। दंत एक बाहेर दिसतसे ||१२|| ऐसा कां प्रसवलीस बाळ । ऐकतां हांसे पयः फेनधवल । धराधरेंद्रनंदिनी वेल्हाळ । तिसीही हास्य नाटोपे ।।१३।।

स्कंद म्हणे जननी पाहीं। यास उतरीं मज स्तनपान देईं। मग जगदंबेनें लवलाहीं। विघ्नेशा खालीं बैसविलें ।।१४।। षण्मुख आडवा घेवोनी। स्तन जों घाली त्याच्या वदनीं। पांचही मुखें आक्रंदोनी। रडों लागलीं तेधवां ।।१५।। तें देखोनि गणनाथ। पोट धरोनि गदगदां हांसत । म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत। हाक फोडीत आक्रोशें ।।१६।। एक स्तन घातला याचें वदनीं। आणिक पांच आणिसी कोठूनी। ऐसें ऐकतांपिनाकपाणी। काय हांसोनि बोलत ।।१७।। काय म्हणतो गजवदन। ऐसा कां प्रसवलीस नंदन। यावरी अपर्णा सुहास्यवदन। प्रतिउत्तर देतसे ।।१८।। म्हणे हा तुम्हांसारिखा झाला नंदन। तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण। ऐकतां हांसला त्रिनयन। पुत्र पाहोन सुखावे ।।१९।।

यावरी षण्मुख आणि गणपती। लीलाकौतुकें दोघे क्रीडती। विनोदें कलह करिती। अंतरीं प्रीति अखंड ||२०|| दोघेही रडतां ऐकोनी । धांवोनि आली जगत्त्रयजननी। वक्रतुंडासी हृदयीं धरोनी। म्हणे बाळा काय झालें ।।२१।। तंव तो म्हणे स्कंदें येवोन । अंबे धरिले माझे कर्ण। बोलिला एक कठीण वचन। तुझे नयन सान कां रे ||२२|| जगदंबा मग हांसोन। अग्निसंभूताप्रती बोले वचन । गजाननासी कठीण भाषण। ऐसें कैसें बोलिलासी ।।२३।। स्कंद म्हणे तर्जनी उचलोन । येणें मोजिले माझे द्वादश नयन। यावरी हैमवती हांसोन। एकदंताप्रती बोलत ।।२४।। म्हणे हे तुवां अनुचित केलें। कुमाराचे नयन कां मोजिले। यावरी नागानन बोले। ऐक माते अन्याय याचा ।।२५।। माझी शुंडा लंबायमान। येणें-मोजिली चवंगे घालून । अन्याय हा थोर त्रिभुवनाहून । करी ताडन अंबे यासी ।।२६।।

यावरी स्वामी कार्तिक बोलत। अंबे येणें माझे मोजिले हस्त । यावरी करिमुख बोलत। मैनाकभागिनी ऐक पां ।। २७ ।। याचा अन्याय एक सांगेन। ऐकतां तूं यासी करिसील ताडण। नगात्मजा आणि त्रिलोचन । सावधान होऊन ऐकती ।। २८ ।। इभमुख म्हणे भेडसावून । मज बोलिला हा न साहवे वचन। तुझें पोट कां थोर पूर्ण। मोदक बहू भक्षिले ।।२९।। ऐसें ऐकतां मृडानी। दोघांसी हृदयीं धरी प्रीतीकरूनी। दोघांसी प्रिय वस्तु देऊनी। समजाविलें तेधवां ।।३०।। यावरी मदनांतक पाहे। सिंहासनीं बैसला आनंदमयें। जगदंबा मुखाकडे पाहे। हास्यवदन करूनियां ।।३१।। यावरी विरूपाक्ष बोलत । कां हो हास्य आलें अकस्मात । यावरी त्रैलोक्यमाता म्हणत । नवल एक दिसतसे ।।३२।।

तुमच्या जटामुकुटांत । ललनाकृति काय दिसत । तुमची करणी अद्भुत । पद्मज-बिडौजां समजेना ||३३|| कैलासपति म्हणे इभगमने। हरिमध्ये मृगशावकनयने । मस्तकीं जळ धरिलें वरानने । बिंबाधरे पिकस्वरे ।।३४।।यावरी चातुर्यसरोवरमराळी। हेरंबजननी म्हणे कपाळमौळी। जळांतरी स्त्रीचें वदन ये वेळीं। दिसतें मज भालनेत्रा ||३५|| यावरी बोले कैलासराज । विदुमाधरे मुख नव्हे तें वारिज । शोभायमान सतेज। टवटवीत दिसतसे ॥३६॥ यावरी सजलजलदवर्णा । स्कंदमाता म्हणे पंचदशनयना। नीलकेश व्याघ्रचर्मवसना। कृष्णवर्ण दिसताती ।।३७।। यावरी बोले पंचवदन। कमळीं मिलिंद घे सुगंध बैसोन। नसतेंच पुससी छंद घेवोन । रमारमणसहोदरी ।।३८ ।। यावरी बोले भुजंगत्रिवेणी । कमळास भोंवयां कां खट्वांगपाणी। तुमच्या मायेची विचित्र करणी। आम्नायश्रुती नेणती ।।३९।।

यावरी बोले हिमनगजामात। भ्रूकुट्था नव्हे पाहे त्वरित। सलिललहरी तळपत । दृष्टी तरळली तुझी कां हो ।।४०।। यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी। बोले कंबुकंठी कमंडलुस्तनी। म्हणे कैरवास नेत्र पिनाकपाणी। कां हो दिसती आकर्ण ते ।।४१।। यावरी शफरीध्वजदहन बोलत । कमळाभोंवतें नीर बहुत । नेत्र नव्हेती मीन तळपत । हंसगमने निरखीं बरें ।॥४२॥ जे अनंतगुणपरिपूर्ण वेल्हाळ । -विपुरहरसुंदरी बोल प्रमळा म्हणे राजीवा स्तनयुगुळ। कमंडलूऐसे दिसती कां ।॥४३।। यावरी बोले त्रिशूळपाणी। ऐके वसुधाधरनंदिनी। ते स्तन नव्हेती दोन्ही। विलोकोनि पाहें बरें ।।४४।। गंगा-हदाचे दोन्ही तीरीं। चक्रवाकें बैसली साजिरीं। दुर्गा म्हणे मदनारी। बहुत साहित्य पुरवितसां ।।४५।। एकाचें अनेक करून । दाखविलें है त्रिभुवन। तुमचें मौनेंच धरावे चरण। बोलतां अप्रमाण न म्हणावें ।।४६।।

मग मांडूनियां सारीपाट। खेळती दाक्षायणी नीळकंठ । ज्यांचे खेळ ऐकतां वरिष्ठ। भक्त होती त्रिजगीं ।।४७।। दोघे खेळतां आनंदघन । तों आला कमलोद्भवनंदन। ब्रह्मवीणा वाजवून । करी स्तवन अपार ।। ४८ ।। मग क्षण एक स्वस्थ होऊनी। खेळ विलोकी नारदमुनी। म्हणे पण केल्यावांचुनी। रंग न ये खेळातें ।॥४९।। दोघांसी मानलें तें बहुत । मग पण करूनियां खेळत । जिंकील त्यासी एक वस्त। आपुली द्यावी निर्धार हा ।। ५० ।। तो प्रथम डाव तेच क्षणीं। जिंकिती झाली मेनकानंदिनी। व्याघ्रांबर घेतलें हिरोनी। २ नारदमुनि हांसतसे ।।५१।। दुजाही डाव जिंकितां भवानी। घेतले गजचर्महिरोनी। एकामागें एक तेच क्षणीं। दहाही आयुधे घेतलीं ॥५२।। जो तो डाव जिंकी भवानी। सर्व भूषणे घेतलीं हिरोनी। शेवटीं कौपीनही सांडोनी। शंकर झाला दिगंबर ॥५३॥

सुरभीपुत्र जिंकिला। तोही देवीने आपुला केला। नारद गदगदां हांसिन्नला। काय बोलिला शिवासी ।।५४।। म्हणे खीनें जिंकिलें पण करून। गेला तुझा महिमा पूर्ण। सृष्टी अवघी मायाधीन । तूं निर्गुण निर्विकार ।।५५।। चराचर आहे मायाधीन। तुज इणें दिधलें सगुणपण। येरवीं तूं अव्यक्त पूर्ण। तुज कोण पुसत होते ।।५६।। एवं तूं मायाधीन झालासी पूर्ण। आतां भक्तांसी कैसें दाविसी वदन। ऐसे ऐकतां भाललोचन । गेला रुसून घोर वना ।। ५७।। इतुके कृत्य करून। गेला तेथून ब्रह्मनंदन। शंकरें सर्व संग टाकून । निरंजनीं वास केला ।।५८।। शोधितां न पडे कोणासी ठायीं। योगी ध्याती सर्वदा हृदयीं। न कळे मूळाग्र कोठें कांहीं। जाति कुळ नसेचि ।।५९।। नामरूपगुणातीत । गोत्रवर्णआश्रमविरहित। चहूं देहांर्सी अतीत। कोणा अंत न कळेचि ।।६०।। असो जगदंबा सख्या घेऊनियां। वनासी चालिली

गुहा त्याचा मार्ग। जो ।।६९।। सर्वही तीर्थे शोधिली सवेग। बहुतांसी पुसिला शोधितां अष्टांगयोग। योगियां ठायीं पडेना ।। ६२ ।। पंचाग्निसाधन धूम्रपान । जटाधारी नग्न मौन। एकीं सदा झांकिले नयन। एक गगन विलोकिती ।।६३।। एक उभेचि निरंतर । घेती वायूचा आहार। त्यांसही पुसतां श्रीशंकर। कोठें आहे न बोलती ।।६४।। एक करिती सदा यज्ञ। एक करिती हिंसा बलिदान । परी तेही धुरें डोळे भरून । कष्टी होती सर्वदा ।।६५।। एक चौसष्ट कळा दाविती । एक चौदा विद्या मिरविती। एक वादविवाद निगुती । करितां बहुत भागले ।।६६।। एक सांगती पुराण। एक नाचती उड्या घेऊन । लोकांस सांगती उपदेशज्ञान । परी उमारमण दुरावला ।। ६७।। एक नाशिती कुश मृत्तिका उदका म्हणती आम्ही इतुकेनि पावन देख। त्यांसही पुसतां कैलासनायका न पडे ठायीं तत्त्वतां ।।६८।।

जे आदिमाया विश्वजननी । अनंतशक्तींची स्वामिनी । ते श्रमली नाना साधनीं । इतरांची कहाणी काय तेथें ।। ६९।। ठायीं पडावयाशिवस्वरूप । क्षीराब्धिजापती करी तप। मघवा दुहिण करिती साक्षेप। निशिदिनीं याचलागीं ।। ७०।। ऋग्वेद स्थापित कर्म। यजुर्वेद बोले ज्ञान निःसीम। उपासनामार्ग उत्तम। अथर्वण स्थापितसे ।।७१।। सामवेद सांगे गायन। न्यायशास्त्रीं भेद गहन । म्हणती ईश्वर समर्थ जीव सान। त्याचें पद न पावती ते ।।७२।। मीमांसक स्थापिती कर्ममार्ग। सांख्य प्रकृति-पुरुषविभाग। पातंजली सांगती योग। शब्दविभाग व्याकरणीं ।॥७३।। सर्व निरसूनि उरलें उत्तम । वेदान्ती म्हणती तेंचि ब्रह्म। तो शिव ब्रह्मानंद परम। वेदशास्त्रां अगम्य जो ॥७४।। त्या शिवाचे नाम घेवोनी। जगदंबा बाहे घोर वनीं। सकळ अभिमान टाकूनी। वल्लभा मी शरण तूतें ।॥७५।।

सकळ तत्त्वें शोधितां साचार। शेवटीं होय साक्षात्कार। तैसा हिमाचळीं त्रिपुरहर। विलोकिला जगदंबेनें ।। ७६।। तो स्वात्मसुखीं झाला तल्लीन । झांकिले असती पंचदश नयन । देवी म्हणे श्वशुरगृहीं येऊन । रहिवास केला असे ।।७७।। अपर्णा मनीं विचारी । याच रूपें जवळी जाऊं जरी। तरी मजवरी ये अवसरीं। क्रोधायमान होईल ॥ ७८ ॥ मग भिल्लीचा वेष चालिली ।।७९।। अनंत कमळभवांडमाळा । त्रिभुवनसुंदरी गुंफी हेळा। बचना अनुपम वप घरून। मुरहरभगिनी तिनें स्मरहर मोहिला। नृत्यगायनें करूनियां ।।८० ।। अनंत शक्ती भोंवत्या विराजती । विमानीं अष्टनायिका तन्मय होती। किन्नर गंधर्व आश्चर्य करिती। गायनरीती ऐकूनियां ।।८१।। वैरभाव वनचरें विसरती । आहार त्यजिला तन्मय होती। नद्यांचे जलप्रवाह खुंटती। पक्षी विसरती देहभाव ।।८२।।

निश्चळ झाला पवन । विधुकुरंग गेला वेधोन । कुंभिनीभार सांडोन। फणिपति वरी येऊं पाहे ।।८३।। अंर्गीचा सुटला दिव्य आमोद । देव पाहती होवोनि षट्पद । नृत्य करितां भाव विविध । दावी नाना प्रकारींचे ।।८४।। शीतलत्व दाहकत्व सांडून । वाटे ताटंक झाले विधु-चंडकिरण । देवललना म्हणती ओंवाळून । इजवरून जावें समस्तीं ।।८५।। आदिजननीचें अपार लाघव । नेणती शक्रादि कमलोद्भव । दिव्य हिरेखाणींचे वैभव । दंततेजें झांकिलें ।। ८६ ।। दंतपंक्तींचा झळकतां रंग। खडे ते हिरे होती सुरंग । तनूचा सुगंध अभंग। नभ भेदुनी वरी जाय।।८७।। पदमुद्रा जेथें उमटत । सुवास कमळे तेथे उगवत। जेथींच्या परागास वेधोनि वसंत । प्रदक्षिणा करी प्रीतीनें अनंतविद्युल्लताकल्लोळ । तैसें स्वरूपतेज निर्मळ । नेत्र उघडोनि जाश्वनीळ । पाहता झाला तेधवां ॥ ८९।। पायीं पैंजण नूपुरै रुणझुणती । त्यांत क्षुद्रघंटा रसाळ गर्जती। करींचीं कंकणें झणत्कारती। नृत्यगतीसरर्सीच ।।९०।।

भ्रूलताचाप चढवूनी। कामशत्रु विंधिला नयनकटाक्षवाणीं। मनकुरंग पाडिला धरणीं। सुरवरां करणी न कळेचि ।। ९१।। दिव्य स्वरूप विलोकितां पूर्ण। पंचबाणें व्यापिला पंचवदन। तप ध्यान विसरून । वृत्तान्त पुसे तियेतें ।।९२।। म्हणे तूं नारी कोठील कोण। कामानळ शांतवीं वर्षोनि घन। तुझें स्वरूप लावण्य। त्रिभुवनीं ऐसें दुजें नाहीं ।।९३।। तुझा वदनइंदु विलोकून । चकोर झाले माझे नयन। आतां वरीं मजलागून। तुजआधीन मी झालों ।।९४।। यावरी बोले भिल्लिणी। उमेऐसी ललना टाकूनी। कां बैसलासी घोर वनीं। कैलासभुवन त्यजोनियां ।।९५।। मी तों परनारी निश्चित । न वरीं न घडे कदा सुरत। तुवां मन जिंकिलें नाहीं यथार्थ। तरी तपस्वी कैसा तूं ।।९६ ।। बावरी बोले पिनाकपाणी। मी दुर्गेवरी आलों रुसोनी। तिचें मुख न पाहे परतोनी। नांव स्वप्नी न घेचि ।।९७।।

यावरी भिल्लीणी बोलत । पति माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाळील क्षणांत। अणुमात्र गोष्ट कळतांचि ।।९८।। यावरी बोले जगन्नाथ। ती बहुकाळाची कठीण अत्यंत। दक्षयागीं उडी घालीत क्रोध अद्भुत तियेचा ।। ९९।। पुढे गेली पर्वताचे पोटीं। मागुती तिर्स वरीं मी धूर्जटी। परी ती कौटाळीण मोठी। अतिकपटी मी जाएं ।।१००।। भिल्लीण म्हणे ऐकिलें कानीं। तूं कपटी आहेस तिजहूनी। शिरं ठेविली स्वर्धनी। भोळी भवानी अत्यंत ।।१।। दुर्गेऐसी पट्टराणी। टाकू कां हिंडसी वनीं। परललना देखोनि नयनीं। गळां येवोनि पडों पाहसं ।।२।। मागुती बोले कैलासनाथ। क्षणांत सृष्टी घडामोड करीत । शुभनिशुंभादि दैत्य । युद्ध करूनि मर्दिले तिणें ।।३।। ती जरी येथे आल धांवोन। उदंड प्रार्थना केली पूर्ण। तरी मी नव जाय परतोन। कैलासार निश्चयें ।।४।। तिसीं मी न करीं संभाषण। तूंचि वरीं मी झालतुजआधीन । जिकडे नेशील तिकडे येईन। वचनाधीन तुझ्या मी ॥५॥

यावरी बोले गोरटी। भवानी बैसली तुझ्या पाठीं। दोन वेळां वरिला धूर्जटी। तिची गति हे केली ।।६।। मग माझा पाड काय तुज । केव्हां टाकोनि जाशील न कळे मज । द्यूतीं पण खेळतां सहज । तुझे त्वांचि हारविलें ।।७।। न बोलेचि मदनदहन। भिल्लीणी मागुति करी नृत्यगायन । मग उठिला पंचदशनयन । तिसी आलिंगन द्यावया ||८|| अंबा चालिली सत्वर। दीर्घशब्दें बोले त्रिपुरहर। मुखशशी दावीं सुंदर। भाक घेई पै माझी ।।९।। तूं मज माळ घालीं येऊन । मी न जाय तुज टाकून । मग जगदंबा बोले हांसोन। यावें भुवना माझिया ।।११०।। मग तुमची होईन कामिनी । अवश्य बोले खट्ठांगपाणी। मदनांतक वेधोनी। कैलासासी नेला तेधवां ।।११।। सिंहासनीं बैसवून । षोडशोपचारें केलें पूजन। देवीनें दृढ धरिले चरण। कंठीं माळ घातली ।।१२।।

देवी आपुलें स्वरूप प्रकट करी। तटस्थ पाहे त्रिपुरारी। मग हांसती परस्परीं। एकमेकां पाहोनी ।।१३।। शिव म्हणे धन्य भवानी। त्वांचि आणिलें मज समजावोनी। सूत शोकादिकालागानी। कथा सांगे विचित्र ||१४|| करी चीणा घेवोनि ब्रह्मसुत। शिवाजवळी आला अकस्मात । म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ। तुझे भक्त देखिले बहु ।।१५।। परी कांतिनगरीं श्रियाळ । धीर गंभीर उदार सुशीळ । कीतींनें भरलें दिग्मंडळ । सात्त्विक केवळ क्षमावंत ।।१६।। तेणें घातलें अन्नसन्त्र । झालीं वर्षे दहा सहस्र । इच्छाभोजन दान पवित्र । अतीतांप्रती देतसे ॥१७॥ अवनीवरी ती जे अगम्य वस्त। भोजनीं मागितली अकस्मात । ती प्रयत्नें आणोनि पुरवीत । शिवभक्त थोर तो ।।१८।। ऐसें नारद सांगतां वर्तमान । त्याच्या गृहाप्रती पंचवदन । कुश्चिळ अतिथिवेष धरून । येता झाला ते समयीं ||१९||

आंगणीं उभा ठाकला येऊन । परम कोपी जेवीं दावाग्न । दुष्टवचन बोले कठीण। रूपही संपूर्ण कुश्चिळचि ।।१२०।। म्हणे मज देई इच्छाभोजन । नातरी जातों सत्त्व घेवोन । श्रियाळ चांगुणा येवोन। पाय धरिती सद्भावें ॥२१॥ आणोनि बैसविला आसनीं। त्याचीं क्रोधवचनें सोसुनी। षोडशोपचारें पूजा करोनीं। कर जोडोनि ठाकती पुढें ।॥२२॥ मागा स्वामी इच्छाभोजन । येरू म्हणेनरमांस देई आणोन। तूं चोर आणिसी धरून। त्याचे मांस न घेमी ।।२३।। धरूनि माझा उद्देश। विकत आणिसील मनुष्य । ते न घेमी निःशेष । सतय सत्य त्रिवाचा ||२४|| चांगुणा म्हणे कर जोडून। मी आपुलें मांस देतें करीं भोजन। श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण। माझे मांस देतों मी ।।२५।। येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्त्वतां । परी सर्व याचकांचे मातापिता। तुम्हां दोघांसी भक्षितां। अन्नसत्र खंडेल ||२६||

तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ। पांच वर्षांचा चिलया बाळ। बत्तीस लक्षणी वेल्हाळ । तो मज देई भोजना ॥२७॥ ऐसें ऐकतां वचन। मायामोहजाळ दूर करून । म्हणती अवश्य जा घेऊन । मग सदाशिव बोलत ||२८|| मी काय आहे वृक व्याघ्र रीस । भक्षं तव पुत्राचे मांस । उबग न मानूनि विशेष । पचवूनि घालीं मज आतां ||२९|| मायामोह धरून। कोणी कराल जरी रुदन । तरी मी जाईन उठोन । सत्त्व घेवोन तुमचें ।।१३०।। अवश्य म्हणोनि पतिव्रता। उभी ठाकोनि बाहे निजसुता । म्हणे बाळा चिलया गुणवंता । खेळावया कोठे गेलासी ||३१|| तुजलागीं खोळंबला – आला धांवोनी ।।३२।। अतिथीसी करूनि नमन। मातापित्यांचे धरी चरण। माता म्हणे तुझें पिशितदान। अतीथी मागतो राजसा ||३३|| बाळ बोले स्नेहॅकरून । हा देह म्यां केला शिवार्पण। अतिथी होतां तृप्त पूर्ण। उमारमण संतोषेल ||३४|| ऐसें ऐकतां झडकरी । बाळ घेतला कडियेवरी। पाकशाळेभीतरीं। घेवोनि गेली वधावया ।। ३५।।

चिलयासी चुंबन देऊन । हृदयीं धरिला प्रीतीकरून । बाळ म्हणे पुढती येईन। तुझ्या उदरीं जननीये ।।३६।। मायाजाळ सर्व सोडून । मन केलें वज्राहूनि कठीण । चिलयाचें शिर छेदून । काढिलें मांस अंर्गीचें ॥३७॥ आपणांसी पुत्र नाहीं म्हणोनियां। शिरकमळ ठेविलें पाहावया । शरीराचा पाक करूनियां। उठवी भोजना अतिथीतें ||३८|| अतींद्रियद्रष्टा श्रीशंकर । अनंतब्रह्मांडींचा समाचार। सर्व ठावुकें सूत्रधार। कळलें शिर ठेविलें तें ।।३९।। उठोनि चालिला तत्काळ। धांवती चांगुणा श्रियाळ । येरू म्हणे कळलें सकळ । शिरकमळ ठेविलें ॥१४०।। सर्व गात्रांत शिर प्रधान। तेंचि कैसे ठेविलेवंचून । तंव तीं दोघे धरिती चरण। तेही पचवूनि घालितो ।।४१।। क्षोभन धरावा अंतरीं। नेणतपणे चुकलों जरी। तरी सर्वज्ञा तूं क्षमा करीं। सत्त्व आमुचें राखावें ।।४२।।

मग बैसला आसनीं येऊन । म्हणे शिर येई बाहेर घेऊन । उखळांत घालून कंडन । मजदेखतां करी आतां ।।४३।। अश्रु आलिया तुझ्या नयनीं। कीं कष्टीं झालिया अंतःकरणीं। तरी पुत्र गेला सत्त्वास हानी। करून जाईन तुमच्या ।।४४।। अवश्य म्हणे नृपललना। शिर आणोनि करी कंडणा। सत्त्व पाहे कैलासराणा। अंतरी सद्गद होऊनी ।।४५।। निजसत्त्वाचे उखळ । धरिलें धैर्याचें करीं मुसळ। कांडीत बैसली वेल्हाळ । निर्धार अचळ धरूनियां ।।४६।। अतीत म्हणे परम मंगळ। गीत गाय रसिक सुढाळ। खंती करितां पयः फेनधवल । दुरावेल जाण पां ।॥४७॥ ते सद्भावसरोवरविलासिनी। कोमलहृदय नृपकामिनी । कीं निश्चळ गंगा भरूनी। जात मर्यादा धरूनियां ।।४८।। तिचें पाहतां निजवदन । काळवंडला रोहिणीरमण । मृगशावाक्षी गुणनिधान। उपमा नाहीं स्वरूपातें ।॥४९॥ म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा। सुलक्षणा सुशीला नृपकिशोरा । सुहास्यवक्त्रा राजीवनेत्रा येवोनि उदरा धन्य केलें ।।१५०।।

तूं सुकुमार परम गुणवंता। माझे निष्ठुर घांव लागती माथां । तुजवीण परदेशीं आतां । दुबळी भणंग झालें मी ।।५१।। कुचकमंडलीं अतिसुंदरा। कंचुकीबाहेर फुटल्या दुग्धधारा। कीं भूलिंगासी एकसरा। गळत्या लाविल्या तियेनें ।॥५२॥ म्हणे अतिथी जेवोनि अवधारीं। जाऊं दे राजद्वाराबाहेरी। देह त्यागीन ये अवसरीं। यावरी धीर न धरवे पैं ।॥५३॥ कैलासपंथ लक्षून। सखया एकला जातोसी मज टाकून । तुझे संगतीं मी येईन। उभा राहें क्षणभरी ।।५४। तूं मोक्षद्वीपाचे केणें भरून। जासी कैलासराजपेठ लक्षून। तुझे संगतीं र्म उद्धरेन । मज टाकूनि जाऊं नको ।।५५।। उदकावीण जैसा मीन। तैर्स मी तान्ह्या तुजवीण । माझें हृदय निर्दय कठीण। लोकांत वदन केवीं दार ।।५६।। तुझी माउली मी म्हणतां । लाज वाटे रे गुणवंता। तुवां आपुले सार्थकता। करूनि गेलासी शिवपदा ।।५७।। है त्रिभुवन शोधितां सकळ तुजऐसा न दिसे बाळ। मग तें पचवूनि तत्काळ । उठा म्हणे अतिथी॥५८॥

अतिथी म्हणे अवनीपती। उठा तुम्ही यजमान माझे पंकीं। ऐसे ऐकतां श्रियाळनृपती। झाला चित्तीं संकोचित ॥५९॥ चांगुणा म्हणे नृपनाया। सत्त्व राखावें सत्वर आतां। विन्मुख जाऊं न चार्य अतीथा। मनी चिंता न धरावी ॥१६०॥ नवमास चाहिला म्यां उदरांत। तुम्हांस जड नव्हे चौप्रहरांत। पोटींचा पोटर्टी घालितां सुत। चिंता काय नृपश्रेष्ठा ।।११।। राय बैसला पंक्तीसी। ताट वाढोनि आणिलें वेगेंसी। अतिथी म्हणे चांगुणेसी। तुंही येई सवेग ॥६२॥ अवश्य म्हणोनि झडकरी। येवोनि बैसली नृपसुंदरी। यावरी अतिथी म्हणे तुमच्या मंदिरीं। अन्न न ध्यायें सर्वथा ॥६३॥ निपुत्रिकांचे न पहावें वदन। मम तेथे कोण घेईल अन्न। दीपेंवीण शून्य सदन। पुत्रावीण तेवीं तुम्ही ।।६४।। नासिकेयांचोनि वदन। कीं वृक्ष जैसा फळावीण। कीं बुबुळांवीण जैसे नयन। शून्य सदन तुमचे तेवीं ॥६५।। तंव तीं दोघे बोलती सद्गदित। एक होता तो अर्पिला सुत। चांगुणा म्हणे गेलें सत्त्व । अतिथी विन्मुख जाईल आतां ।।६६।। एक बाळ तो दिधला भोजनासी। आतां महाराजा सत्त्व किती पाहसी।

ऐसे बोलतां चांगुणेसी। अद्भुत गहिवर दाटला ॥१७॥ ह बुडाले सकळ । वृथा गेलें माझें बाळ। मग कंठ मोकळा करूनि ते स्नेहाळ। हांक फोडी चांगुणा ।।६८।। नयनीं चालिल्या प्रेमाश्रुधारा। म्हणे अहा शिव कर्पूरगौरा। दीर्घस्वरें बाहे उमावरा । पाव सत्वरी या आकांतीं ।।६९।। अहा झालें वंशखंडन। न देखों पुढती पुत्रवदन। ऐसें ऐकतां अतिथीचे नयन। सवों लागले प्रेमभरें ।॥१७०।। बाहेर फुटली मात । वळसा थोर होत नगरांत। लोक दुःखें वक्षः स्थळ पिटीत । राजकिशोर आठवूनी ॥७१।। विमानीं दाटले सुरवर। म्हणती धन्य पतिव्रता सत्त्वधीर। ईस प्रसन्न होवोनि श्रीशंकर। काय देईल तें न कळेचि ॥७२।। अतिथी म्हणे चांगुणेसी। जें प्रिय असेल तुझे मानसीं। तें मजसीं माग सद्गुणराशी। यावरी सती काय बोले ॥७३॥ मज निपुत्रिक म्हणतील लोका हा धुवोनि काढीं कलंका ऐसें ऐकतां कैलासनायका बोलावीं म्हणे पुत्रासी ।॥७४॥ सत्य मानूनि अतिथीवचना। दीर्घ हांका फोडीत चांगुणा । म्हणे चिलया गुणनिधाना। येई स्नेहाळा धांवोनी ॥७५॥

अतिथीतुजवीण न घे ग्रास। कोठे गुंतलासी खेळावयास । माझे तान्हें तूं पाडस। सत्त्व राखें येवोनियां ॥७६॥ तू न येसी जरी धांवोन। तरी माझा जाऊं पाहे प्राण। दशदिशा विलोकून । चांगुणा पाहे तेधवां ।॥७७॥ मागुती हांक फोडी बेल्हाळ । तो जैसे उगवे मित्रमंडळ । तैसा धांवतचि आला बाळ। पाहे श्रियाळ स्नेहभरें ।। ७८ ।। अतिथीस्वरूप टाकून। शिव प्रकटला निजरूप पूर्ण। दशहस्त पंचवदन। दीनोद्वारण जगद्‌गुरू ।।७९।। चिलया शिवें हृदयीं धरिला । निजअंकावरी बसविला। श्रियाळ चांगुणा ते वेळां। पायांवरी लोळती ।।१८०।। सुरवर सुमनें वर्षती अपार । दुंदुभीनादें कोंदले अंबर। आनंदमय झालें नगर। धांवती लोक पाहावया ।।८१।। शिवें आणविलें दिव्य विमान। श्रियाळ चांगुणा दिव्यरूप होऊन । चिलयासी सिंहासनीं स्थापून । छत्र धरिलें तयावरी ।।८२।।

सचिवांस निरवोनि राज्यभार। विमानीं बैसली सत्वर। निजपदीं जगदुद्वार। श्रीशंकर स्थापी तयां ।।८३।। कांतिनगरी सौख्य अगाध । त्रिभुवनीं न माये आनंद। श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद। अभंग न विटे कालत्रयर्थी ।।८४।। सार शिवलीलामृत ग्रंथा झाला चतुर्दश अध्यायांपर्यंत। चौदा भुवनांच यथार्थ। चौदा अध्याय निर्मिले ।।८५।। कीं चौदा विद्यांचे सार। क चौदा गांठींचा अनंत परिकर। कीं चौदा पर्दे निरंतर। गयावर्जन घडे हैं ।।८६।। कीं चतुर्दश रत्नांचा प्रकाश। येथेंचि झाला एकरस । कीं चौदा चक्रे निःशेष। प्रिय चौदाही लोकांतें ।।८७।। कीं चौदा कांडें वेद । की चौदा कोहळीं द्रव्य प्रसिद्ध। कीं चौदा कोठड्या शुद्ध। शिवमंदिर निर्मिले ।।८८।। श्रवण पठण लेखन । निदिध्यास अनुमोदन । परम प्रीतीं करित ग्रंथरक्षण। फळ समान सर्वांसी ।।८९।। इतुक्यांसही शिव होऊर्जा माउली। करील निजांगाची साउली। आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी। ग्रंथश्रवा प्राप्त होय ।।१९०।।

आधि व्याधि जाय निरसोन। वंध्याही पा पुत्रसंतान । ग्रामा गेला बहुत दिन । पिता बंधु भेटेल ।।९१।। घरीं संर्पा दाटे बहुत । ऋणमोचन होय त्वरित । शत्रुक्षय यथार्थ। दक्षिणमुखें वाचि ।।९२।। शत आवर्तनें करितां भक्तियुक्ता पोटीं होय शिवभक्त सु ज्याच्या घरीं असेल हा ग्रंथ। पिशाच भूत न रिघे तेथें ।॥९३॥ त्रिमकरितां नित्य आवर्तन । सर्व संकटें जाती निरसोन। भावें प्रचीत पाहावी वाचोन। नाहीं कारण अभाविकांचे ।।९४।। सोमवारी ग्रंथ पूजून। अथवा प्रदोषकाळ शिवरात्रि लक्षून। शुचिर्भूत होवोनि करावें शयन। स्वप्नी प्रकटोनि शिव सांगे ॥९५॥ जें जें पडेल संकटा ते ते निवारील नीलकंठा चौदा अध्यायांचे फळ वरिष्ठ। वेगळाले लिहिले असे ।।९६।। प्रथमाध्यायीं मंगलाचरण। दाशार्हरायाचे आख्यान। कलावतीनें पति उद्धरिला पूर्ण। हेचि कथन निर्धार ॥९७।।

द्वितीयाध्यायीं निरूपण। शिवरात्रि कर्मविपाककथन । तिसऱ्यांत गौतमें कथा सांगोन। कल्माषपाद उद्धरिला ||९८।। चौथ्यांत महाकाळलिंगार्चन । गोपबाळ गेला उद्धरून। पांचव्यांत उमेनें पुत्र पाळून । राज्यीं स्थापिला शिवप्रसादें ।।९९।। सहावा अध्याय अतिरसिका सीमंतिनी आख्यान पुण्यकारका सातवा आठवा सुरस कौतुका भद्रायुरायाचें कथन पैं ।।२००।। नवमांत वामदेवाचें आख्यान सुरस। दुर्जय राजा झाला राक्षस । जन्मदुःखें कथिलीं बहुवस । अतिसुरस अध्याय तो ।।१।। दहाव्यांत शारदा आख्यान । अकराव्यांत रुद्राक्षमहिमा पूर्ण महानंदा गली उद्धरान । भद्रसेनराव तरला ।।२।।। बाराव्यांत विदुर-बहुला-उद्धार। विष्णूनें मर्दिला भस्मासुर । तेराव्या अध्यायांत समग्र। शिवगौरीविवाह पै ।।३।। चौदाव्यांत शिव-अपर्णा-विनोद । गौरी भिल्लिणी झाली प्रसिद्ध। पुढें श्रियाळचरित्र अगाध । चौदावा अध्याय संपूर्ण हा

।।४।। श्रीधरस्वामी ब्रह्मानंद। आनंदसंप्रदाय परम अगाध । क्षीरसागरी गोविंद। आधीं उपदेशी कमलोद्भवा ।।५।। तेथोनि अत्रिऋषी प्रसिद्ध। पुढें पूर्णब्रह्म दत्तात्रेय अगाध । त्यापासूनि सदानंद । रामानंद यती तेथोनि ||६|| तेथोनि अमलानंद गंभीर। मग ब्रह्मानंद उदार। त्यावरी कल्याणीं राहणार। सहजानंद यतींद्र पैं ।।७।। तेथोनि पूर्णानंद यती शुद्ध। त्यापासाव पितामह दत्तानंद । पिता तोचि सद्गुरु प्रसिद्ध । ब्रह्मानंद यतींद्र जो ।।८।। पंढरीहूनि चारी योजनें दूरी। नैऋत्य कोणर्णी नाझरें नगरी। तेथील देशलेखक निर्धारीं। पूर्वाश्रर्मी ब्रह्मानंद ।।९।। पुढें पंढरीसी येऊन । केलें तेर्थे संन्यासग्रहण। तेथेंचि समाधिस्थ होऊन । अक्षय वस्ती केली पैं ।।२१०।।

तो ब्रह्मानंद माझा पिता। सावित्री नामेंमाझी माता। वंदूनि त्या उभयतां । शिवलीलामृतग्रंथ संपविला ।।११।। शके सोळाशें चाळीस । विलंबीनाम संवत्सरास। शुद्धपौर्णिमा फाल्गुन मास। रविवारी ग्रंथ संपविला ।।१२।। ब्रह्मकमंडलूच्या तीरीं। द्वादशमती नाम नगरी। आद्यंत ग्रंथ निर्धारी। तेथेंचि झाला जाणिजे ।।१३।। शिवलीलामृतग्रंथ आद्यंत । चतुर्दश अध्यायापर्यंत । जयजय शंकर उमानाथ। तुजप्रीत्यर्थ हो कां सदा ।।१४।। अपर्णाजीवना कर्पूरगौरा । ब्रह्मानंदा जगदुद्वारा। श्रीधरहृदयाब्जभ्रमरा । अक्षर अभंग दयानिधे ।।१५।। शिवलीलामृतग्रंथ प्रचंड। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड। सदा परिसोत सज्जन अखंड। चतुर्दशाध्याय गोड हा ।। २१६।॥ एकंदर ओवीसंख्या ।।२४५३।। ।। 

श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।। ।। शुभं भवतु ।।

Shivleelaamrit 14,15 Adhyay Marathi: शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा चौदावा आणि पंधरावा अध्याय

अध्याय पंधरावा शंकराचार्यांचे चरित्र व कार्य

कवी म्हणतो, “कल्पारंभी सृष्टी निर्माण केल्यावर जनकल्याणार्थ वेद, शास्त्रे व पुराणे यांची निर्मिती झाली. कालांतराने कलिप्रभावामुळे श्रुती, स्मृती, पुराणे यांना कोणी विचारीनासे झाले. याला मंडणमिश्र अय्यासारख्या साधूंचा सनातन धर्माविरुद्धचा

अपप्रचारही कारणीभूत ठरला. या जैन साधूला शारदा प्रसन्न होती. तो अभ्यासू, उत्तम वक्ता व वादविवादपटू असल्याने त्या काळच्या विद्वानांनाही त्याचा धाक वाटत असे. त्याने नवीन शास्त्रांची रचना करून वेदोक्त मार्ग अधर्माचा असून आपला मार्गच उत्तम असल्याचे सांगितले. त्यामुळे पुराणोक्त पंथ व धर्मशास्त्रे मागे पडू लागली. लोक त्याच्या मताप्रमाणे वागू लागले, म्हणून त्याच्या प्रभावाला निष्प्रभ करून लोकांना सन्मार्गी करण्यासाठी भगवान शंकरांनी ब्राह्मणकुळात ‘शंकर’ नावाने अवतार घेतला. मुंज झाल्यानंतर सर्व विद्याभ्यास पूर्ण करून त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. शंकराचार्य झाल्यावर सर्वत्र संचार करून लोकांना खऱ्या धर्माची शिकवण दिली. जैनग्रामी आल्यावर त्यांनी मंडणमिश्राला वादविवादासाठी बोलावून त्यात पराभव झालेल्याने स्वतःचे ग्रंथ पाण्यात बुडवून दुसऱ्याची शास्त्रे शिकावी अशी अट घातली.

वादविवादास आरंभ होण्यापूर्वी मंडणमिश्राने पडद्याआड मद्याच्या घटात सरस्वतीची स्थापना करून ठेवली. प्रतिज्ञा करून दोघेही वादविवादास बसले तेव्हा शंकराचार्यांच्या आव्हानानुसार त्याने चारही वेद क्रमाने म्हटले. त्यानंतर शंकराचार्यांनी त्याला क्रम बदलून पूर्वीच्या वेदातील ऋचा म्हणून त्यांचा अर्थ सांगण्यास सांगितले, पण ते त्याला जमले नाही. यावरून शारदा प्रसन्न असल्यानेच हा वेदपठण करतो हे त्यांच्या लक्षात आले. त्या वेळी सरस्वतीचे कपट ओळखून त्यांनी जैनशास्त्रे स्थापण्यास तीच कारणीभूत झाली. म्हणून तिला शाप दिला. तेव्हा तिनेही शंकराचार्यांना शाप दिला.

त्यानंतर स्वतःचा पराभव मान्य करून मंडणमिश्र त्यांना शरण गेला. तेव्हा आचार्यांनी जैनशास्त्रांची गाठोडी बांधून ती समुद्रात टाकली. त्यानंतर लोकांना ‘पूर्वीप्रमाणे स्वधर्माचरण करा, वेदशास्त्राध्ययन करा’ असे सांगितले. त्याप्रमाणे लोक त्यांच्या आदेशाला, उपदेशाला अनुसरून वागू लागले. सनातन धर्मानुगामी झाले. अशा प्रकारे शंकराचार्यांनी जैनांच्या पाखंडी मतांचा प्रभाव उद्ध्वस्त करून धर्माची पुनर्स्थापना केली.”

श्री शिवलीलामृत अध्याय पंधरावा.

प्रस्तुत पंधरावा अध्याय ‘श्रीशिवलीलामृतकार’ श्रीधर स्वामींनीच लिहिलेला आहे की नाही याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. त्यातील वर्णनही पुराणबाह्य आहे. म्हणून श्रीशिवलीलामृताचे पारायण करताना अनुक्रमे पहिल्या चौदा अध्यायांचाच समावेश करणे योग्य होईल असे आम्हांला वाटते.

श्री गणेशाय नमः

।। जयजया श्री गंगाधरा । त्रिशूळपाणी पंचवक्त्र । अर्धनारीनेश्वरा. श्री शंकरा नीलकंठ ||1|| भस्म-उचल, तीन-डोळे. कर्पूरगौरा नागभूषणा । गजस्यजनका गौरीरामणा । हे तुझ्या भक्तांवर दयाळू, हे दयेचे भांडार. तुम्ही सुरुवात किंवा मध्याशिवाय आहात. अजा अनंत भ्रमाच्या पलीकडे. जगभर विश्वनाथ । विश्वंभर जगद् गुरु ||३|| तुम्ही नाम आणि गुण यांच्या पलीकडे आहात. स्वेच्छेने प्रेमावर विसंबून. नामकरणाचे विविध रूप. ते खेळाच्या निमित्ताने असेल. हे निसर्गाचे तीन प्रकार, सत्व, रजस आणि तम. तू अभिनेत्री आहेस, यात काही शंका नाही. स्थिर-चर भुताटक. त्वद्रूपचि अहे बा ।।५।। तू ब्रह्मांड आहेस, आदिम कारण आहेस. विश्वसूत्र तुमच्या नियंत्रणाखाली आहे. जसे की हलविसी स्वेच्छेने. तैसें संपूर्ण नाचत ।।६।।

तुमचाइच्छेवांचुनी। कांहींच नोहे जीवांचेनी। ऐसें जाणोनी अंतःकरणीं। तुज शरण रिघती जे ।।७।। तयां भक्तांसी तूं शंकर। पूर्णकाम करोनि साचार। भवाब्धींतूनि नेऊनि पार। स्वपर्दी स्थिर स्थापिसी ।।८।। ऐसा तुझा अद्भुत महिमा। नकळे त्याची कवणा सीमा । म्हणोनि केवळ परब्रह्मा। शरण आलों असें पां ।।९।। तरी दयाब्धे मज पामरा । न्यावें भवाब्धिपैलपारा। तुजवांचुनी कोण दातारा। अनाथासी उद्धरील ।।१०।। असो आतां बहु विनवणी। आधीं पुरवीं मनाची धणी। त्वद्‌गुण प्राकृत वाणी। कीजे ऐसी असे जी ।।११।। तुझिया कृपें शिवलीलामृत । चौदा अध्याय वर्णिले यथार्थ। वेदव्यासें स्कंदपुराणांत । ब्रह्मोत्तरखंडर्डी कथिलें जें ।।१२।। परी माझ्या मनाची तृप्ती। जाहली नाहीं बा पशुपती । म्हणोनि आणिक हृदयीं स्फूर्ती। देऊनि कथा वर्णवीं पां ।।१३।। तूं शंकर होतां प्रसन्न। हातां येतें सर्व त्रिभुवन । महाराज तूं भक्तांलागून। वरप्रदानें तोषविसी ।।१४।। तुज श्रीशंकरासमान । वरदाना शक्त नसे कोण। तुझें देखोनि उदारपण। ब्रह्माविष्णूही लाजती ।।१५।। काय वर्णावी उदारता। प्रत्यक्ष आपुली सुंदर

कांता। देऊनियां रावणभक्ता । आत्मलिंग वोपिलेंसी ||१६|| तेवींच दैत्येंद्र त्रिपुर। तारक आणि भस्मासुर । इत्यादि स्वभक्तांलागीं अपार। अनिवार वर दिल्हेसी. ।।१७।। तूं अत्यंत भोळा भगवान । कपटेंही करितां तव सेवन। देऊनि इच्छित वरदान । आनंदविसी सेवकां ||१८|| असो ऐका श्रोते सर्व । ऐसा करितां म्यां शिवस्तव। हृदयीं प्रकटोनि दयार्णव । स्फूर्ति देत उत्तम ।।१९।। अरे ह्या कलियुगामाझारी। पाखंडी मातोनि पृथ्वीवरी । श्रुति स्मृति पुराणोक्त सारीं। कर्मे बुडविते जाहले ।।२०।। जैनमत तें आगळें। सर्व भूमंडळीं पसरलें। तेणेंयोगें वर्ण सगळे। भुलोनि गेले साचार ।।२१।। तें देखोनि म्यां सत्वर। तन्मतखंडनालागीं भूवर। शंकरनामें अति सुंदर। जो अवतार धरियेला ||२२।। तें माझें अद्भुत चरित्र। आधुनिकांसी न कळे पवित्र । तरी तूं प्राकृत भार्षे विचित्र । वर्णन करीं श्रीधरा ।।२३।। ऐसी शिवें केली प्रेरणा। म्हणोनि पुराणार्थ-विवरणा। एकीकडे ठेवूनि जाणा। जगद्‌गुरुचरित्र वर्णितों ।। २४।।

तरी सर्व तुम्ही श्रोते संत। सावध राहा हो श्रवणार्थ। जगद्‌गुरुकथा ऐकतां समस्त । पापपर्वत भंगती ॥२५।।कल्पारंभी कमळासनें। परब्रह्माच्या आज्ञेनें। जी महदादिकांच्या योगानें। ही। सर्व सृष्टी रचियेली ।।२६।। इयेच्या कल्याणालागून। सर्वमार्गदर्शक पूर्ण। ऋग्यजुः-साम-अथर्वण। हे चार वेद जाहले ।। २७ ।। परी त्या वेदांचे अर्थराशी। स्पष्ट न होत सर्वांसी। म्हणोनि परमात्म्याच्या मानसीं। कृपासमुद्र उचंबळला ।। २८ ।। मग तो स्पष्ट व्हावयालागुनी। पाणिन्यादि रूपें अवतरोनी। व्याकरणादि षट्शाखें झर्णी। करिता जाहला परमात्मा ||२९|| आणि मन्वादिक स्मृती। करिता झाला तो विंशती । तदभ्यासें सर्व जगतीं। श्रुत्यर्थ जाणूं लागले ।। ३० ।। पुढें कलियुग होतां प्राप्त । भूमंडळीं मानव समस्त । अल्पायु मंदद्मती अत्यंत । ऐसे जाण होतील ।।३१।। आणि श्रुति स्मृति शास्त्रे केवळ । गगनापरी अत्यंत विशाळ । म्हणोनि त्यांचा मानवां सकळ । अभ्यास नोहे कदापिं ।। ३२ ।। तेणें ते सर्व अति अज्ञानी। आणि सन्मार्गभ्रष्ट होऊनी। जन्ममरणादि तीव्र दुःखांनी। तडफडतील निश्चयें ।।३३।। ऐसें पूर्वी नारायणे। जाणुनी मग दयार्द्रपणें। कलिजनांच्या उद्धाराकारणें। व्यासावतार धरियेला ।।३४।। आणि त्या व्यासरूपें चांग। चारी वेदांचे करूनि विभाग। वेदार्थदर्शक ऐसें सवेग। महाभारत रचियेले-॥३५।।

आणि विष्णु शिव नारद पद्म । मार्कंडेय भागवत ब्राह्म । अग्नि भविष्य वराह कूर्म। मत्स्य लिंग ब्रह्मवैवर्त ।। ३६ ।। स्कंद वामन आणि गुरुड । तेवींचि अठरावें ब्रह्मांड। ऐसीं अष्टादश पुराणें प्रचंड। लोकोद्धारार्थ रचियेलीं ।। ३७ ।। मग मेदिनीं एकैक ब्राह्मण। व्यासकृत विभागांतून । यथामति एकैक भागांलागून। अभ्यासू लागले आनंदें ||३८|| आणि इतिहास पुराणें ऐकून । सन्मार्गे चालू लागले संपूर्ण। परी पुढे कलीच्या योगेंकरून । संकट दारुण पातलें ।। ३९ ।। वेदशास्त्र पुराणें निंदूनी। तयांचा दूरचि त्याग करूनी । पाखंड बौद्धमतें निशिदिनीं । वर्तुं लागले सकळिक ।।४०।। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। लोम विलोम आणि संकर। ह्या सर्व जातींचे नारीनर । अधर्मे वर्तुं लागले ।।४१।। सकळ मेदिनीवरुती। बौद्धधर्म पसरला अती। देव ग्रामदेवतांप्रती । भ्रमूं लागले जैनशास्त्रे ।।४२।।

वेदशास्त्रे पुराणें समस्त । अनुदिनीं चाललीं लोपत। श्रुति-स्मृति-पुराणोक्त पंथ। बहुतेक पैं लोपले ।।४३।। अहो श्रोते तम्ही कराल प्रश्न। ऐसें व्हावया कायकारण। तरी मंडनमिश्र नामेकरून। एक जैन उद्भवला ।।४४|| तो केवळ बुद्धीचा सागर। देवगुरूपरी वक्ता चतुर। जयाच्या विद्येची साचार। सरी न पावे शुकही ।।४५।। तेणें स्वयें अति दारुण। करूनियां में अनुष्ठान । सरस्वती आणि कृशान। प्रसन्न करून घेतलें ॥४६॥ अग्नीमाजर्जी हवन करूनी। कल्पिलें काढी कुंडांतुनी। याचकजनांची इच्छा झणीं। तृप्त करी सर्वदा ॥४७।। जैसा पूर्वी रावणसुत। महापराक्रमी इंद्रजित । हवन करोनि अश्वांसहित। रथ काढिता जाहला ॥४८॥ तैसा तो मंडनमिश्र अय्या। अग्नींत हवन करुनियां । त्यांतूनि पीतांबरादिक वस्तुया। काढीतसे यथेच्छ ।।४९।।

विद्या पाहतां अति प्रबळ । हुंकारें सूर्यासी उभा करील । अत्यद्भुत सामर्थ्य केवळ । सांगतां वाचे न वदवें ।।५०।। शास्त्री पुराणिक पंडित। अय्याचा मानिती धाक बहुत । वाद‌विवाद करितां समस्त । खंडित होत तत्क्षणीं ।।५१।। स्वर्ये नवीं शास्त्रे करूनी। पंडितां जिंकी तयांचेनी। कोर्णी न टिकती सभास्थानीं। मुखा गवसणी घालीत ।। ५२ ।। मोठे मोठे पंडित सगळे । वादविवाद करितां थकले। सकळ सृष्टीतें जिंकिलें। आपुल्या शास्त्रीं अय्यानें ।॥५३॥ श्रुतिस्मृत्युक्त सद्धर्ममार्ग। अधर्म ऐसे दावूनि सक्न। आपुली शाखें सर्वत्र सांग। स्थापना केली दुष्टानें ।॥५४।। आणि चारी वर्ण अठरा याती। यांच्या मती भ्रष्टवूनि अती। ग्रामदैवतें आपुल्या हातीं। आपुल्या शाखें स्थापिलीं ।।५५।। पूर्वशास्त्रे पडलीं एकीकडे। जैनें स्वशास्त्र केलें उघडें। तया अय्याच्या सामर्थ्यापुढे। चकित झाले सर्वही ।।५६।।

आणि आमुचा धर्म नाहीं उत्तम। जैनधर्म हा बहु सुगम। ऐसें म्हणोनि सर्व जन परम । अंतरीं खिन्न जाहले ।।५७।। मग वेदशास्त्रं पुराणें सोज्ज्वळ । यांसी टाकूनि तत्काळ। चारी वर्ण अठरा याती सकळ । चालवू लागले जैनधर्म ।।५८।। अहो त्या मंडनमिश्रालागून । असे सरस्वती सुप्रसन्न । म्हणोनि त्याच्या जिह्वाग्रीं बैसोन। बोलिल्या वचना सत्य करी ।।५९।। आणि सदा होऊन अंकित । तया अय्याच्या घरीं राबत । मद्यपान करूनि सतत । अनाचार वाढवी तो ।। ६० ।। नित्य प्रातःकाळी उठोन। मद्याचा एक घट मांडून। तेथें सरस्वतीची पूजा करून। नैवेद्य अर्पी मद्याचा ।।६१। ऐसा तो अय्या त्रिकाल जाणा। सरस्वतीच्या करूनि पूजना। प्रसादम्हणोनि मद्यपाना। करीतसे यथेष्ट ।।६२।। नाहीं आचार ना विचार। कर्मभ्रष्ट पाखंडी थोर। आपुला शास्त्रधर्म साचार। सर्व स्थळीं स्थापीतसे ।।६३।। सर्व जनांसी शिष्य करून। स्वयें तयांचा गुरु होऊन । श्रुतिस्मृत्युक्त धर्म संपूर्ण। आचरों नेदी कवणासी ।।६४।।

ऐसा अनर्थ करितां फार। भूमीसी होऊनि अति भार। रात्रंदिवस ती अनिवार। दुःखाश्रु टाकू लागली ।।६५।। देव ब्राह्मण साधुसंत। दुःखें पोळती अहोरात । कांहीं काळे हे वृत्त समस्त । श्रुत जाहलें शंकरासी ।। ६६ ।। तेव्हां तो शंकर पिनाकपाणी। अत्यंत कोपाविष्ट होऊनी। म्हणे सर्व कर्ममार्ग वर्तती कीं जैनधर्मे ।। ६७ ।। सकळही भूमंडळावर । जैनधर्माचा झाला की बुडवुनी। प्रसार। तरी आतां मी अवतरोनि शंकर। जैनधर्मा उच्छेदितों ।।६८।। ऐसें कोपें बोलोनि शिव । जो अनाथनाथ कृपार्णव। पुराणपुरुष महादेव। भाललोचन जगदात्मा ||६९।। जो अनंतब्रह्मांडनायका भस्मासुरवरदायका त्रिशूळपाणी मदनांतका चंद्रशेखर उमापती ।। ७० ।। तेणें तत्काळ मेदिनीवर। उत्तरदेशीं निर्मळ क्षेत्र । तेथें विप्रकुळामाजीं सत्वर। घेतला अवतार नररूपें ।॥ ७१।।

तेव्हां समुद्रवसनेलागून । परमानंद झाला असे पूर्ण। दशदिशांतरें प्रसन्न । देव संपूर्ण हर्षले ||७२।। मंद सुगंध शीतळ। वाहूं लागला तो अनिळ । वापी कूप नद्यांचें जळ। झालें निर्मळ तत्क्षणीं ।।७३।। ऐसीं शुभ चिन्हें अपार। होऊं लागलीं पृथ्वीवर। मुनि जाणूनि समाचार। निर्मळ क्षेत्रीं पातले ।।७४ ।। आणि जाऊनियां विप्रसदनीं। बालजातक वर्तवूनी। शंकराचार्य ऐसें तत्क्षणीं। नाम ठेविते जाहले ।।७५।। आतां ह्या नामासी काय कारण। तरी ‘शं’ म्हणजे सुकल्याण । ‘कृञ्’ धातूचा अर्थ करण। आणि ‘आचार्य’ म्हणजे सद्‌गुरु ।।७६।। ऐसा हा तीन शब्दांचा अर्थ। आणि हा सदुपदेशें यथार्थ। सर्व लोकांचें कल्याण सतत । करणार असे निश्चयें ||७७ || अथवा संकर छेदावया । अवतरला असे म्हणोनियां । शंकराचार्य ऐसें तया। नाम ठेविते जाहले ।। ७८ ।।

असो ऐसा तो कर्पूरगौर। वैदिकमार्ग स्थापावया सत्वर । ‘शंकराचार्य’ नामें भूवर। निर्मळक्षेत्रीं अवतरला ॥७९॥ पुढे झालें उपनयन । सकळ विद्या अभ्यासून । अल्पवयांतचि संन्यासग्रहण। करिता झाला मातृआझें ।।८०।।मग सर्वे घेऊनि शिष्यमंडळी । तीर्थयात्रार्थ भूमंडळीं। फिरतां जैनमताची आगळी। प्रवृत्ति देखिली सर्वत्र ||८१।। देशोदेशींचे निखिलजन। शंकराचार्यांचा करिती अपमान । सकळ जनांचं लागलें ध्यान । जैनशास्त्राकडे पां ।॥८२|| असो ऐसें फिरतां मेदिनीसी । आचार्य पातले कोल्हापुरासी । मग शिष्यांसहित एके दिवशीं। ग्रामांत चालिले मिक्षार्थ ।।८३।। घरोघरी मिक्षा याचीत । येऊनि कासारांच्या आळींत । तयांजवळी भिक्षा मागत। तों हांसू लागले जैन ते ।।८४।। आणि म्हणती मिक्षा कैंची येथ। कांचरस आहे कढईत । पाहिजे तरी हा समस्त । भिक्षेलागीं समर्पितों ।।८५।।

तैं स्वामी म्हणती कासारांप्रती। तुमची आहे जैन याती। तरी अन्य भिक्षा न घेऊं निश्चिती । कांचरसचि आम्हां द्या ।। ८६ ।। ऐसें तयांप्रती सांगुनी। स्वामी म्हणती शिष्यांलागुनी। तुम्ही स्वहस्तांच्या ऑजळी करूनी। कांचरस प्राशिजे ।। ८७ ।। ऐसें स्वामींचं ऐकूनि वचन । भिवोनी सकळ शिष्यजन । म्हणती वांचलों तरी यासमान । बहुत गुरु संपादू ।।८८।। हा प्रत्यक्ष तप्त कांचरस । स्पर्शतां मृत्यु येईल आम्हांस । ज्याचेंत्याणेचि घ्यावे विष। आम्हां न लगे सेवा ही ||८९|| ऐसे बोलून शिष्यजन। पळू लागले सर्व तेथून । मग स्वामी स्वर्ये ऑजळ करून। म्हणती ओता कांचरस ||९०|| अहो पूर्वी समुद्रमंथनकाळीं । कालकूटविष ज्वाळामाळी। प्रकटला येऊनि तयाजवळी । स्वर्ये प्राशिता झाला जो ।।९१।। तोचि तो शंकराचार्य भगवान । तयासी काय कांचरस कठीण । कल्पांर्तीच्या कृशानूलागून। गिळील जाण क्षणार्धे ||९२||

असो मग ते दुष्ट कासार। तो तप्त कांचरस प्रखर । आचार्यांच्या ऑजळींत सत्वर । ओतिते झाले भिक्षेसी ।।९३।। जया रसाचा बिंदु तत्त्वतां । भूमीवरी पडला असतां । जळोनि जाईल भूमि समस्ता। ऐसा तप्त अत्यंत ।।९४।। परी तो जगद्‌गुरु भगवान । अति शीतल मधुर जीवन । प्यावें तैसें त्या रसा तत्क्षण। प्राशिता झाला साचार ।।९५।। ऐसें तयाचे पाहूनि साहस । कासारांचें दचकलें मानस । म्हणती हा पैं पुराणपुरुष । धर्मस्थापनार्थ अवतरला ||९६|| अहो पाहतां ज्या रसाप्रती। आमुचे नेत्र गरगरां फिरती। तो रस प्याला स्वर्ये निगुती । धन्य मूर्ति शंकराचार्य ||९७|| ऐसें सर्व कासारीं बोलून । घट्धरिले स्वामींचे चरण। मग शंकराचार्य तेथून। जैनग्रामासी पातले ।।९८।।

आणि स्वकीय शिष्यमुखेंसीं । निरोपिलें मंडनमिश्रासी । कीं तुम्हीं भेटूनि आम्हांसी। शास्त्रविवाद कीजिये ।।९९।। वादीं स्वमतशास्त्रवैभव । आम्हांलागीं त्वां जिंकावें। अथवा आम्हीं पराभवावें। सद्धर्मशास्त्रं तुम्हांसी ।।१००।। ऐसा शंकराचार्यांचा निरोप । ऐकोनि तो महागर्वकूप। मंडनमिश्र आगळे अमूप । बोलता झाला अभिमानें ।।१।। अरे आजपर्यंत बहु पंडित । वादार्थ आले मी मी म्हणत। परी ते म्यां जिंकिले समस्त । आमुच्या जैनशास्त्रेसीं ||२|| आतां हा येऊनि संन्यासी। सांगोन पाठवितो आम्हांसी। तरी मी आजि जिंकीन यासी। सरस्वतीचे प्रसादें ||३|| ऐसें गर्वे बोलत वचन । सरस्वतीचें करूनि ध्यान। तो मंडनमिश्र जगद्‌गुरूंलागून । जाऊनि भेटला तत्काळ ।।४।। ते दोघेही तेजस्वी महापुरुष । केवळ जैसे चंद्र चंडांश। दोघांचेही पराक्रम विशेष । समसमान निर्धारें ।।५।। दोघेही बोलती एकपेकांसीं । सभा करावी आजिचे दिवसीं। ३ वेदशास्त्राची स्वमुखेंसीं। चर्चा व्हावी सविस्तर ।।६।।

पूर्वपक्ष उत्तरपक्ष -करीन। अर्थ विवरावा संपूर्ण ज्यासी अर्थ न होय पूर्ण। तयाचे शास्त्र मिथ्या पै ।।७।। आणि जो पराजय पावेल । तद्धर्म विध्वंसूनि सकळ । ग्रंथही तयाचे तत्काळ । बुडवूनियां टाकावे ।।८।। ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलुनी। बैसले मध्ये पडदा लावुनी। सर्व जातींचे लोक तत्क्षणीं। सभेलागुनी पातले ।।९।। तो मंडनमिश्रे पडद्याआंत । शंकराचार्यांसीं नकळत । मद्यघट ठेवूनि तयांत। सरस्वती स्थापूनि पूजिली ।।११०।। तै त्या मद्याच्या घटांतूनी। सरस्वती बोले अय्यालागुनी। आतां मी शंकराचार्यांसी झणीं। शास्त्रमतें विध्वंसितें ।।११।। तूं माझ्या मार्गे बैसून । चमत्कार पाहें संपूर्ण। मी तुज आहें सुप्रसन्न । वचन सत्य करीन तुझें ।।१२।। ऐसिये प्रकारें सुंदर। सरस्वतीचा ऐकूनि वर। तो महापंडित मंडनमिश्र । समाधान पावला ।।१३।।

मग पडद्याआंतून । शंकराचार्यांसी बोले वचन । कोणता वेद आरंभून। अर्थ करूं सांग पां ।।१४।। तै शंकराचार्य बोलत । चारी वेद करीं समाप्त। जें जें मी पुसेन यथार्थ। तें तें मजसी सांगावें ।।१५।। ठायीं ठायींचे अर्थ पुसेन । त्यांचें करावें समाधान । न सांगतां पदवीपासून । भ्रष्ट करीन क्षणमात्रै ।।१६।। मग त्याच आचार्यभाषिता। मान्य करूनि तो तत्त्वतां । सरस्वतीसी म्हणे हे माता । बोलें आतां सत्वरी ।।१७।। तैं श्रीशंकराचार्याप्रती । बोलूं लागली सरस्वती । परी शंकराचार्यांच्या चित्तीं। जैन बोलतो ऐसेंच ।।१८।। म्हणोनि आचार्य बोलले। अय्या ऋग्वेद आरंभी ये वेळे। तंव सरस्वतीनें मुख काढिलें। घटांतूनि बाहेरी ।।१९।। प्रथम ऋग्वेद ऋचांसहित । सरस्वती चालली बोलत । ठायीं ठायीं आचार्य पुसत । अर्थकूटें तेधवां ।। १२० ।। परी ज्याच्या मुखापासून। चारी वेद झाले उत्पन्न । त्या ब्रह्मयाचें तें कन्यारत्न । अडखळे कोठेंचि ||२१।। शंकराचार्य जें जें पुसत। त्याचें तत्क्षणीं ती उत्तर देत । असो ऐसा ऋग्वेद समस्त। समाप्त जाणा जाहला ।।२२।। परी सरस्वती म्हणते वेद । हा आचायर्थी नेणोनि भेद। आतां बोलें रे यजुर्वेद । ऐसें अय्यासी सांगितलें ||२३||

तें स्वामीचें ऐकूनि भाषित। सरस्वती पडद्याआंत । यजुर्वेदालागीं त्वरित । आरंभिती जाहली ||२४|| अस्खलित शब्द उमटती। शंकराचार्य अर्थ पुसती । परी कुशलत्वें ती सरस्वती। करी न समाधान तत्काळ ||२५|| आचार्यांचा न चाले उपाव। कोठेंच न होय पाडाव । मग अंतरीं एक उपाव। ऐसा त्यांनीं योजिला ।। २६ ।। पूर्वी ऋग्वेद जाहला । आतां यजुर्वेद असे चालला । तरी यासी ऋग्वेदांतील भला। पुनरपि प्रश्न करावा ।। २७ ।। ऐसा करूनियां निश्चय। अय्यासी बोलती आचार्य। अरे तूं सांप्रत निःसंशय । यजुर्वेद बोलतोसी ।। २८ ।। परी ऋग्वेदामाजी देख। शंका राहिली असे एका ती ऋचा बोलूनि सम्यक । अर्थ सांगें पुनरपि ।। २९।। ऐशा स्वार्मीच्या प्रश्नाला । ऐकून स्तब्धली ब्रह्मबाळा । पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला। परी तिसी त्याचा आठव नसे ।।१३०।। अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग। कीं वेद शास्त्र पुराणें सांग। आरंभापासोनि स्पष्ट सवेग। संपूर्णही म्हणे पां ।।३१।। परी पुढे पुढे म्हणत असतां । मध्येंच पुशिलें पूर्वोक्त अर्था। तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा। स्मरत नसे कांहीच ।।३२।। म्हणोनि अंतरीं गडबडोन । स्तब्ध होतसे तत्क्षण। हैं तियेचें वर्म कठीण । ठावुकें नसे कोणासी ॥३३।। परी शंकराचार्य चतुर । अंतरीं करीत विचार। ऐसे वेद सार्थ साचार। ब्रह्मांडीं कोण बोलणार।।३४।। ब्रह्मा आणि सरस्वती। हीं मात्र बोलतील निश्चितीं। या दोघांवांचूनि जगीं। नसे कोणी समर्थ ।।३५।। ह्या अय्याच्या बापाचेनें। ऐसें नोहे वेद बोलणें। मग ह्या क्षुल्लक पामराचेनें। कोठोनियां बोलवेल ।।३६।। तरी येथे कांहीं तरी। कपट आहे निर्धारीं। ऐसें जाणोनियां अंतरीं। अय्यालागीं बोलत ||३७|| अरे आतां उगा कां राहिलासी। मम प्रश्नासी कां नोत्तरिसी। तों तो अय्या गडबडोनि मानसीं। म्हणे अनर्थ ओढवला ।।३८।। दोन चार वेळां स्वामींनी। प्रश्निलें असें अय्यालागुनी। परी तो अत्यंत भय पावोनी। कांहींच वाणी बोलेना ।। ३९ ।। मग शंकराचार्य उठोन। पाहती पडदा उघडोन। तों तेथें मद्यघटांतून। मुख बाहेर आलें असे ।।१४०।। तें पाहतां ही सरस्वती होय। ऐसा अंतरीं करूनि निश्चय । त जगद्‌गुरु शंकराचार्य। कोपें संतप्त जाहले ।।४१।। मग सकळ पडदे फाडून । शिरीं घातला दंड दारुण । तेणें तो मद्यघट फुटोन। चूर्ण तत्क्षण जाहला ।।४२।। आणि म्हणती हे दुराचारिणी। जैनालार्गी प्रसन्न होऊनी । वेदशास्त्रचर्चा रात्रंदिनीं । चांडाळिणी करितेस ।॥४३।। तुझें न पाहावें

जारिणी मुख। ज्याच्या पोटी जन्मलीस देख। त्या ब्रह्मयासीच तूं निःशंका अंगभोग देसी निर्लज्जे ।।४४।। ऐसी तूं महापापिणी। ह्या जैनासी वश होऊनी। जैनशास्त्र स्थापावयालागुनी। सर्वदा रत झालीस ।।४५।। ह्या दृष्ट पाखांडमतासी। आश्रय देऊनि अहर्निशीं। अठरा याति चार वर्षांर्सी। एकंकार केलास ।।४६।। जैनी झाले लोक समग्र । हा तूंचि केलासी वर्णसंकर। वेद शास्त्रे पुराणें परिकर। एकीकडे राहिलीं ।।४७।। या जैनाचर्ची शास्त्रे संपूर्ण। तुवां त्यांचा धरोनि अभिमान । जैनमत प्रकटवून । लोकां पाखंडीं घातलेंस ।।४८।। तुझ्या आश्रयें ह्या दुष्टें स्वमतें । पृथ्वीवरील ग्रामदैवतें। स्थापूनियां स्वकीय हस्तें। भ्रष्ट केलीं सर्वही ।।४९।। ऐसा तुझ्यायोगें सगळा । अत्यनर्थ वोढवला । तो म्यां कैलार्सी ऐकियला। म्हणोनि घेतला अवतार ।।१५०।। तूं अनाचार केलासी अत्यंत । तरी सदा राहें नीचमुखांत । अंत्यजादिकांच्या गृहीं सतत । वास होवो मम शापें ।।५१।।

ऐसें रीतीं सरस्वतीप्रती। शंकरस्वामी शाप देती। मग ती कोपोनि सरस्वती। स्वामींप्रती बोलत ।। ५२ ।। तूं तों धर्म स्थापावयासी । साक्षात्शंकर अवतरलासी। तरी तुझा देह कीकटदेशीं। पडेल जाण मद्वचनें ।॥५३॥ ऐसें स्वामींसी शापून। सरस्वती गुप्त झाली तत्क्षण। मग स्वार्मीचे धरूनि चरण। मंडनमिश्र लोळत ।।५४।। परी शंकराचायीं तत्क्षणीं। ि जैनशाखांच्या मोटा बांधुनी। अति अगाध समुद्रजीवनीं। नेऊनियां बुडविल्या ।।५५।। त्यांतूनि एक अमरकोश। सर्वोपयोगी असे विशेष ।म्हणोनि त्या मात्र ग्रंथास । शंकराचार्थी रक्षिले ।।५६।। असो ऐसें जैनशाखांसी। विध्वंसूनियां क्षणार्धेसीं। मग जवळ पाचारूनि जनांसी। स्वामी तयांसी बोलत ।।५७।। अहो हीं ग्रामदैवतें समस्त । आहेत खरी जैनस्थापित। परी त्यांतें तुम्हीं सतत । भजत जावें स्वधर्मे ।।५८।।

जैनें स्थापिलीं म्हणोनी। संशय कांहीं न धरावा मनीं। आपुला धर्म आपणा लागुनी। देवापाशीं काय असे ।।५९।। ऐसें स्वामी सकळ लोकां। सांगती तेव्हां अय्या देखा। स्वामीचरणीं स्वकीय मस्तका। ठेवूनियां विनवीत. ।।१६०।। म्हणे स्वामी जैनमत संपूर्ण। तुम्ही टाकिलें उच्छेदून। परी कृपें जैनाचें अभिधान । किंचित् तरी रक्षावें ।। ६१।। ऐसी ऐकतां दीनवाणी।कृपा उपजोनि स्वामींच्या मनीं। ग्रामदैवतांच्या सन्निधानीं। जैनाचा घोडा स्थापिला ।।६२।। जेथे जेथें ग्रामदैवत । तेथें जैनाचा धोंडा वसत । ग्रामदेवतांसंगें त्याप्रत । प्रतिदिनीं पूजिती ।॥ ६३।। असो मग स्वामी तेजोराशी। आज्ञापिती सकळ जनांसी। कीं आपुल्या जातिधर्मेसीं। पूर्वीप्रमाणें वर्तावें ।।६४।। जरी अधर्मे वर्ताल कोणी। तरी दंडीन ऐसें बोलुनी। वेदशास्त्र पुराणें तत्क्षणीं। प्रकट केलीं साचार ।।६५।।

मग सकळही ब्राह्मण । करूं लागले वेदशास्त्राध्ययन । आणि अन्य जनही संपूर्ण। वर्तुं लागले स्वधर्मे ।। ६६।। ऐसें शंकराचार्ये दयाळे। आपुल्या उत्तम बुद्धिबळें। जैनाचें पाखंडमत आगळें। विध्वंसिलें सर्वही ।।६७।। श्रुतिस्मृत्युक्त धर्म परिकर। सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर । तेवींच अद्वैताचा साचार। मार्ग सर्वांसी दाविला ||६८।। एवं महाराज शंकर। भक्तवत्सल कर्पूरगौर। अवतरोर्नियां भूमीवर। भूभार हरिता जाहला ।।६९।। अहो शंकराची लीला अगाध । जो भक्तवत्सल स्वानंदकंद। सेवकां तारूनियां विशद । निजपदासी नेतसे ।।१७०।। काय वर्णावें त्याचें चरित। जे दीनअनाथ सद्भक्ता शिव पंचाक्षरी षडक्षरी जपत । तयां तारीत प्रसादें ।॥ ७१।। दाशार्ह राव आणि कलावती। बहुला विदुर पापमती । तींही शिवपंचाक्षरें जपतां निगुती। अक्षय गती पावली ।।७२।।

शबर केवळ निषाद। शिवकृपेिं तरला है प्रसिद्ध । भस्म होऊनियां तद्भार्या शुद्ध। पुनरपि देहें प्रकटली ।।७३।। श्रीशिवयोगियानें। सुमति-भद्रायूकारणें। शिवकवचाच्या उपदेशानें। पावन केलें साचार ||७४ || मैत्रेयीच्या उपदेशेंकरूनी। शिवव्रत आचरतां सीमंतिनी। यमुनेंत पति बुडाला असोनी। आला वांचोनी शिवकृपें ।।७५।। पराशर ऋषीनें आपण। रुद्राभिषेकेंकरून । राजपुत्राचा मृत्यु टाळून । तयासी राज्यीं स्थापिलें ।।७६।। ऐसें शिवकवच रुद्र। षडक्षरी पंचाक्षरी इत्यादि मंत्र। सर्वोद्धारक आहेत पवित्र । परी अभक्तां काय ते ॥७७।। जरी गर्गमुनीसारिखे सद्‌गुरूव दाशार्हरायापरी शिष्य थोरून भाविक असतील तरी उद्घास्त्र होईल जाण निश्चयें ॥७८॥ जरी भद्रायूसम शिष्यजन । शिवयोगियापरी गुरु सुजाण । तरी प्रत्यक्ष शिव प्रकटोन। नेईल शिष्या कैलासीं ।।७९।। कलियुगामाजीं गुरु महंत । एक अडक्यासी तीन मिळत। परी सद्‌गुरुसम अत्यद्भुत । सामर्थ्य तेथें कैंचें पां ।।१८०।।

द्रव्याची इच्छा धरूनि मनीं। केवळ शिष्यजनांसी भोंदुनी। मंत्रतंत्र फुंकोनि कानीं। व्यर्थ साधना लाविती ।।८१।। शिष्यही अभाविक दुर्जन। गुरूचें पाहती सदा न्यून। म्हणोनि दोघां नरक दारुण । प्राप्त होय शेवटीं ।॥८२॥ आतांचे गुरुशिष्य सकळिका केवळ द्रव्याचें गिऱ्हाईका दाशार्हादिकांपरी तों एका शिष्य न दिसे कलियुगीं ।।८३।। सद्‌गुरु तो शिष्यांच्या धना। नरकासमान मानिती जाणा। सच्छिष्यही तन-मन-धना । अर्पितात गुरुपार्थी ।।८४।। म्हणोनि तरले ते दाशार्हादिका नातरी तेच मंत्र सकळिका परी हे आतांचे जन मूर्ख। द्रव्यलोर्भे भुलले पैं ।॥८५॥ अहो कृतयुगामाजीं पाहतां । अस्थिगत प्राण होता। जेव्हां अस्थी पडती सर्वथा। तेव्हां प्राण जातसे ।।८६।। म्हणोनि तोंपर्यंत साधन। करीत बैसती अरण्यीं जाऊन । त्रेतायुर्गी ते चर्मगत प्राण। चर्म झडतां मृत्यु होय ।। ८७।। द्वापारीं प्राण नाडीगत । नाही सुकती तों वांचत । ऐसें पूर्वी आयुष्य बहुत । होतें सकळ मानवां ।।८८।। आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे। ऐसीं तेव्हां होतीं आयुष्यें। म्हणोनिसकळ बहुत वर्षे। अनुष्ठानें आचरत ||८९।। आणि ऐसें तप करित। कीं जेणें अंगीं वारुळे वाढत । मग प्रसन्न होऊनि भगवंत । आपुल्या नेत पदासी ।।१९०।।

आतां तो अन्नमय प्राण। अन्नाविना सत्वर मरण। आणि आयुष्य तेही अपूर्ण। नोहे साधन कांहींच ||९१।। देहाचा नाहीं भरंवसा । कोण दिवस येईल कैसा । म्हणोनि साक्षात् जगदीशा। अंतरीं दया उद्भवली ।।९२।। आणि औट घटिकांत पूर्ण। परमेश्वरप्राप्ती होऊन । मोक्षासी जावें उद्धरोन। ऐसा मार्ग काढिला ।।९३।। तो मार्ग म्हणाल कवण। तरी सद्‌गुरूसी जावें शरण। यावीण मोक्षलाभालागून । इतर साधन नसेचि ।।९४।। आतां सद्‌गुरु तो कैसा असावा। सदा आनंद तन्मनीं वसावा । वामदेव गर्ग शुक किंवा । पराशरापरी साचा ।।९५।। शिष्यही असावे भाविका गुरूचि मानावा ईश्वर एका ऐसें घडतां हे सकळिका जन तरतील कलियुगीं ।।९६।। श्रीधर म्हणे श्रोतयांसी। ज्या मंत्रीं तरले महाऋषी। तेचि हे मंत्र तुम्हांसी। प्रकाशित केले पां ।।९७।।

ज्या मंत्र भद्रायु तरला। जेणें दाशार्हराव उद्धरला । आणि जो मंत्र सुमति राणीला । शिवयोगियें दिधला असे ।।९८।। ज्या मंत्र बहुला उद्धरली। विदुर पावला शिवपदकमळीं। -आणि भ्रतारासहित तरली। सीमंतिनी ज्या मंत्रे ||९९।। तेचि षडक्षर पंचाक्षरी रुद्र। मृत्युंजय शिवकवच पवित्र । इत्यादि सकळही मंत्र। या ग्रंथात कथियेले ।।२००।। परी श्रोते तुम्हीं म्हणाल जरी। तेचि मंत्र असतां निर्धारीं। तिंहीं सांप्रत पूर्वीच्या परी। कां न उद्धरती जन हे ।।१।। तरी जपकर्त्याचें मन। शुद्ध असेल तरी तत्क्षण । पूर्वीप्रमाणें तयासी गुण। येईल जाणा निश्चर्ये ।।२।। यालागीं विशुद्ध भावेंसी। जपावें या शिवमंत्रांसी। आणि सर्वांनींही अहर्निशीं। शिवलीलामृतासी ऐकिजे ||३|| आपुल्या प्रपंचालागुनी। सावध जैसे निशिदिनीं। तैसें जरी शिवस्मरणीं। तरी मग उणें कायसें ।।४।।

कलियुगींच्या जनाकारणें। शंकराचार्य ह्या अभिधानें । अवतार घेऊनियां शिवार्ने । जैनमत बुडविलें ।।५।। ऐसा सद्धर्मप्रतिपालका जो शंभु अपर्णानायका तयाचें स्मरण करितां सकळिका भवभय निरसे पैं ।।६।। आपुल्या कार्यात रात्रंदिन। गुंतले असती जे कां जन। ते अभागी आयुष्य सरोन। पावती निधन अकस्मात ||७|| जे कित्येक प्रपंचीं गुंतले।इच्छेवांचुनी। कांहींच नोहे जीवांचेनी। ऐसें जाणोनी अंतःकरणीं। तुज शरण रिघती जे ।।७।। तयां भक्तांसी तूं शंकर। पूर्णकाम करोनि साचार। भवाब्धींतूनि नेऊनि पार। स्वपदीं स्थिर स्थापिसी ।।८।। ऐसा तुझा अद्भुत महिमा। नकळे त्याची कवणा सीमा। म्हणोनि केवळ परब्रह्मा। शरण आलों असें पां ।।९|| तरी दयाब्धे मज पामरा । न्यार्वे भवाब्धिपैलपारा। तुजवांचुनी कोण दातारा। अनाथासी उद्धरील ।।१०।। असो आतां बहु विनवणी। आधीं पुरवीं मनाची धणी। त्वद्‌गुण प्राकृत वाणी। कीजे ऐसी असे जी ।।११।।

तुझिया कृपें शिवलीलामृत । चौदा अध्याय वर्णिले यथार्थ। वेदव्यासें स्कंदपुराणांत । ब्रह्मोत्तरखंडर्डी कथिलें जें ।।१२।। परी माझ्या मनाची तृप्ती। जाहली नाहीं बा पशुपती। म्हणोनि आणिक हृदयीं स्फूर्ती। देऊनि कथा वर्णवीं पां ।।१३।। तूं शंकर होतां प्रसन्न । हातां येतें सर्व त्रिभुवन । महाराज तूं भक्तांलागून । वरप्रदानें तोषविसी ।।१४।। तुज श्रीशंकरासमान । वरदाना शक्त नसे कोण। तुझें देखोनि उदारपण। ब्रह्माविष्णूही लाजती ।।१५।। काय वर्णावी उदारता । प्रत्यक्ष आपुली सुंदर-कांता। देऊनियां रावणभक्ता । आत्मलिंग वोपिलेंसी ||१६|| तेवींच दैत्येंद्र त्रिपुर। तारक आणि भस्मासुर । इत्यादि स्वभक्तांलागीं अपार। अनिवार वर दिल्हेसी. ।।१७।। तूं अत्यंत भोळा भगवान । कपटेंही करितां तव सेवन। देऊनि इच्छित वरदान । आनंदविसी सेवकां ||१८|| असो ऐका श्रोते सर्व। ऐसा करितां म्यां शिवस्तव । हृदयीं प्रकटोनि दयार्णव । स्फूर्ति देत उत्तम ।।१९।।

अरे ह्या कलियुगामाझारी। पाखंडी मातोनि पृथ्वीवरी । श्रुति स्मृति पुराणोक्त सारीं। कर्मे बुडविते जाहले ||२०|| जैनमत तें आगळें। सर्व भूमंडळीं पसरलें। तेणेंयोगें वर्ण सगळे । भुलोनि गेले साचार ||२१|| ते देखोनि म्यां सत्वर। तन्मतखंडनालागीं भूवर । शंकरनामें अति सुंदर। जो अवतार धरियेला ||२२।। तें माझें अद्भुत चरित्र । आधुनिकांसी न कळे पवित्र । तरी तूं प्राकृत भाषे विचित्र । वर्णन करीं श्रीधरा ।।२३।। ऐसी शिवें केली प्रेरणा । म्हणोनि पुराणार्थ-विवरणा। एकीकडे ठेवूनि जाणा जगद्‌गुरुचरित्र वर्णितों ।। २४।। तरी सर्व तुम्ही श्रोते संत। सावध राहा हो श्रवणार्थ। जगद्‌गुरुकथा ऐकतां समस्त । पापपर्वत भंगती ।।२५।।कल्पारंभी कमळासनें। परब्रह्माच्या आज्ञेनें। जी महदादिकांच्या योगानें। ही सर्व सृष्टी रचियेली ।।२६।। इयेच्या कल्याणालागून। सर्वमार्गदर्शक पूर्ण। ऋग्यजुः साम-अथर्वण। हे चार वेद जाहले ।। २७ ।। परी त्या वेदांचे अर्थराशी। स्पष्ट न होत सर्वांसी। म्हणोनि परमात्म्याच्या मानसीं। कृपासमुद्र उचंबळला ||२८||

मग तो स्पष्ट व्हावयालागुनी। पाणिन्यादि रूपें अवतरोनी। व्याकरणादि षट्शाखें झणीं। करिता जाहला परमात्मा ||२९|| आणि मन्वादिक स्मृती। करिता झाला तो विंशती। तदभ्यासें सर्व जगतीं। श्रुत्यर्थ जाणू लागले ।।३०।। पुढें कलियुग होतां प्राप्त । भूमंडळीं मानव समस्त । अल्पायु मंदमती अत्यंत । ऐसे जाण होतील ।।३१।। आणि श्रुति स्मृति शास्त्र केवळ । गगनापरी अत्यंत विशाळ । म्हणोनि त्यांचा मानवां सकळ । अभ्यास नोहे कदापिं ||३२|| तेणें ते सर्व अति अज्ञाणी। आणि सन्मार्गभ्रष्ट होऊनी। जन्ममरणादि तीव्र दुःखांनी । तडफडतील निश्चये ।।३३।। ऐसें पूर्वी नारायणे। जाणुनी मग दयार्द्रपणे। कलिजनांच्या उद्धाराकारणें। व्यासावतार धरियेला ||३४|| आणि त्या व्यासरूपें चांग चारी वेदांचे करूनि विभाग। वेदार्थदर्शक ऐसे सवेग। महाभारत रचियेले ॥३५।। आणि विष्णु शिव नारद पद्म। मार्कंडेय भागवत ब्राह्म । अग्नि भविष्य वराह कूर्म। मत्स्य लिंग ब्रह्मवैवर्त ।।३६।।

स्कंद वामन आणि गुरुड । तेवींचि अठरावें ब्रह्मांड। ऐसीं अष्टादश पुराणें प्रचंड। लोकोद्धारार्थ रचियेलीं ।।३७।। मग मेदिनीं एकैक ब्राह्मण। व्यासकृत विभागांतून । यथामति एकैक भागांलागून। अभ्यासू लागले आनंदें ।।३८ ।। आणि इतिहास पुराणें ऐकून । सन्मार्गे चालू लागले संपूर्ण। परी पुढे कलीच्या योगेंकरून । संकट दारुण पातलें ||३९।। वेदशास्त्र पुराणें निंदूनी । तयांचा दूरचि त्याग करूनी। पाखंड बौद्धमतें निशिदिनीं। वर्तुं लागले सकळिक ।।४०।। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। लोम विलोम आणि संकर। ह्या सर्व जातींचे नारीनर। अधर्मे वर्तुं लागले ।।४१।। सकळ मेदिनीवरुती। बौद्धधर्म पसरला अती। देव ग्रामदेवतांप्रती। भ्रमूं लागले जैनशास्त्रं ।।४२।। वेदशास्त्रे पुराणें समस्त । अनुदिनीं चाललीं लोपत। श्रुति-स्मृति-पुराणोक्त पंथ। बहुतेक पैं लोपले ।।४३।। अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न। ऐसे व्हावया कायकारण। तरी मंडनमिश्र नामेकरून । एक जैन उद्भवला ॥४४।।

तो केवळ बुद्धीचा सागर। देवगुरूपरी वक्ता चतुर। जयाच्या विद्येची साचार। सरी न पावे शुकही ।।४५।। तेणें स्वयं अति दारुण। करूनियां पै अनुष्ठान । सरस्वती आणि कृशान। प्रसन्न करून घेतलें ।।४६।। अग्नीमार्जी हवन करूनी। कल्पिलें काढी कुंडांतुनी। याचकजनांची इच्छा झणीं। तृप्त करी सर्वदा ।।४७।। जैसा पूर्वी रावणसुत। महापराक्रमी इंद्रजित। हवन करोनि अश्वांसहित । रथ काढिता जाहला ।।४८।। तैसा तो मंडनमिश्र अय्या । अग्नींत हवन करुनियां । त्यांतूनि पीतांबरादिक वस्तुया। काढीतसे यथेच्छ ।।४९।। विद्या पाहतां अति प्रबळ । हुंकारें सूर्यासी उभा करील । अत्यद्भुत सामर्थ्य केवळ । सांगतां वाचे न वदवें ।।५०।। शास्त्री पुराणिक पंडित। अय्याचा मानिती धाक बहुत । वादविवाद करितां समस्त । खंडित होत तत्क्षणीं ।।५१।। स्वयें नवीं शास्त्रे करूनी। पंडितां जिंकी तयांचेनी। कोणा न टिकती सभास्थानीं। मुखा गवसणी घालीत ।। ५२ ।।

मोठे मोठे पंडित सगळे। वादविवाद करितां थकले। सकळ सृष्टीतें जिंकिलें। आपुल्या शास्त्रीं अय्याने ।।५३।। श्रुतिस्मृत्युक्त सद्धर्ममार्ग। अधर्म ऐसे दावूनि सवेग। आपुलीं शाखें सर्वत्र सांग। स्थापना केली दुष्टानें ।।५४।। आणि चारी वर्ण अठरा याती। यांच्या मती भ्रष्टवूनि अती। ग्रामदैवतें आपुल्या हातीं। आपुल्या शाखें स्थापिलीं ।। ५५।। पूर्वशास्त्रे पडलीं एकीकडे। जैनें स्वशास्त्र केलें उघडें । तया अय्याच्या सामर्थ्यापुढे। चकित झाले सर्वही ।।५६।। आणि आमुचा धर्म नाहीं उत्तम। जैनधर्म हा बहु सुगम। ऐसें म्हणोनि सर्व जन परम। अंतरीं खिन्न जाहले ।। ५७।। मग वेदशास्त्रे पुराणें सोज्ज्वळ । यांसी टाकूनि तत्काळ । चारी वर्ण अठरा याती सकळ । चालवू लागले जैनधर्म ।।५८।। अहो त्या मंडनमिश्रालागून। असे सरस्वती सुप्रसन्न । म्हणोनि त्याच्या जिह्वाग्रीं बैसोन । बोलिल्या वचना सत्य करी ।।५९।। आणि सदा होऊन अंकित । तया अय्याच्या घरीं राबत। मद्यपान करूनि सतत । अनाचार वाढवी तो ।। ६० ।।

नित्य प्रातःकाळी उठोन । मद्याचा एक घट मांडून। तेथें सरस्वतीची पूजा करून। नैवेद्य अर्पी मद्याचा ।। ६१।। ऐसा तो अय्या त्रिकाल जाणा। सरस्वतीच्या करूनि पूजना। प्रसादम्हणोनि मद्यपाना। करीतसे यथेष्ट ।। ६२।। नाहीं आचार ना विचार। कर्मभ्रष्ट पाखंडी थोर । आपुला शास्त्रधर्म साचार। सर्व स्थळीं स्थापीतसे ।।६३।। सर्व जनांसी शिष्य करून। स्वयें तांचा गुरु होऊन । श्रुतिस्मृत्युक्त धर्म संपूर्ण। आचरों नेदी कवणासी ।। ६४ ।। ऐसा अनर्थ करितां फार। भूमीसी होऊनि अति भार। रात्रंदिवस ती अनिवार । दुःखाश्रु टाकू लागली ।।६५।। देव ब्राह्मण साधुसंत। दुःखें पोळती अहोरात । कांहीं काळे हे वृत्त समस्त । श्रुत जाहले शंक शंकरासी ।।६६।। तेव्हां तो शंकर पिनाकपाणी। अत्यंत कोपाविष्ट होऊनी। म्हणे सर्व कर्ममार्ग बुडवुनी । वर्तती की जैनधर्मे ।। ६७ ।। सकळही भूमंडळावर । जैनधर्माचा झाला कीं प्रसार। तरी आतां मी अवतरोनि शंकर। जैनधर्मा उच्छेदितों ।।६८।।

ऐसे कोपें बोलोनि शिव। जो अनाथनाथ कृपार्णव । पुराणपुरुष महादेवा भाललोचन जगदात्मा ।।६९।। जो अनंतब्रह्मांडनायका भस्मासुरवरदायका त्रिशूळपाणी मदनांतका चंद्रशेखर उमापती ।।७०।। तेणें तत्काळ मेदिनीवर। उत्तरदेशीं निर्मळ क्षेत्र । तेथे विप्रकुळामार्जी सत्वर । घेतला अवतार नररूपें ।।७१।। तेव्हां समुद्रवसनेलागून। परमानंद झाला असे पूर्ण। दशदिशांतरें प्रसन्न । देव संपूर्ण हर्षले ।। ७२ ।। मंद सुगंध शीतळ। वाहूं लागला तो अनिळ। वापी कूप नद्यांचे जळ । झालें निर्मळ तत्क्षणीं ।।७३।। ऐसीं शुभ चिन्हें अपार । होऊं लागलीं पृथ्वीवर। मुनि जाणूनि समाचार । निर्मळ क्षेत्रीं पातले ||७४।। आणि जाऊनियां विप्रसदनीं । बालजातक वर्तवूनी। शंकराचार्य ऐसें तत्क्षणीं। नाम ठेविते जाहले ।।७५।। आतां ह्या नामासी काय कारण। तरी ‘शं’ म्हणजे सुकल्याण । ‘कृञ्’ धातूचा अर्थ करण। आणि ‘आचार्य’ म्हणजे सद्‌गुरु ।।७६।।

ऐसा हा तीन शब्दांचा अर्थ। आणि हा सदुपदेशें यथार्थ। सर्व लोकांचें कल्याण सतत । करणार असे निश्चये ॥७७॥ अथवा संकर छेदावया । अवतरला असते म्हणोनियां। शंकराचार्य ऐसें तया। नाम ठेविते जाहले ।। ७८ ।। असो ऐसा तो कर्पूरगौर। वैदिकमार्ग स्थापावया सत्वर। ‘शंकराचार्य’ नामें भूवर। निर्मळक्षेत्रीं अवतरला ।। ७९ ।। पुढे झालें उपनयन । सकळ विद्या अभ्यासून । अल्पवयांतचि संन्यासग्रहण। करिता झाला मातृआज्ञे ।।८०।।मग सर्वे घेऊनि शिष्यमंडळी। तीर्थयात्रार्थ भूमंडळीं। फिरतां जैनमतार्थ आगळी। प्रवृत्ति देखिली सर्वत्र ॥८१॥ देशोदेशींचे निखिलजन। शंकराचार्याचा करिती अपमान । सकळ जनांचे लागले ध्यान। जैनशास्त्राकडे पां ।।८२|| असो ऐसे फिरतां मेदिनीसी। आचार्य पातले कोल्हापुरासी। मग शिष्यांसहित एके दिवशीं। ग्रामांत चालिले मिक्षार्थ ॥८३॥

घरोघरी मिक्षा याचीत । येऊनि कासारांच्या आळींत । तयांजवळी भिक्षा मागत। तो हांतू लागले जैन ते ।।८४।। आणि म्हणती मिक्षा कैची येथ। कांचरस आहे कढईत । पाहिजे तरी हा समस्त । भिक्षेलागीं समर्पितों ।।८५।। तै स्वामी म्हणती कासारांप्रती। तुमची आहे जैन याती। तरी अन्य भिक्षा न घेऊं निश्चिती। कांचरसचि आम्हां द्या ।। ८६ ।। ऐसें तयाप्रती सांगुनी। स्वामी म्हणती शिष्यांलागुनी। तुम्ही स्वहस्तांच्या ऑजळी करूनी। कांचरस प्राशिजे ।।८७ ।। ऐसे स्वामींचे ऐकूनि वचन । मिवोनी सकळ शिष्यजन । म्हणती वांचलों तरी यासमान । बहुत गुरु संपादू ।।८८।। हा प्रत्यक्ष तप्तम कांचरस । स्पर्शतां मृत्यु येईल आम्हांस । ज्याचें त्याणेंचि घ्यावे विष। आम्हां न लगे सेवा ही ||८९|| ऐसे बोलून शिष्यजन । पळू लागले सर्व तेथून । मग स्वामी स्वर्ये ऑजळ करून। म्हणती ओता कांचरस ||९०।।

अहो पूर्वी समुद्रमंथनकाळीं। कालकूटविष ज्वाळामाळी। प्रकटला येऊनि तयाजवळी । स्वयें प्राशिता झाला जो ।।९१।। तोचि तो शंकराचार्य भगवान । तयासी काय कांचरस कठीण । कल्पांतींच्या कृशानूलागून । गिळील जाण क्षणार्धे ||९२।। असो मग ते दृष्ट कासार। तो तप्त कांचरस प्रखर। आचार्यांच्या ऑजळींत सत्वर । ओतिते झाले भिक्षेसी ।।९३।। जया रसाचा बिंदु तत्त्वतां । भूमीवरी पडला असतां। जळोनि जाईल भूमि समस्ता। ऐसा तप्त अत्यंत ।।९४।। परी तो जगद्‌गुरु भगवान । अति शीतल मधुर जीवन । प्यावें तैसें त्या रसा तत्क्षण। प्राशिता झाला साचार ।।९५।। ऐसें तयाचें पाहूनि साहस । कासारांचे दचकले मानस । म्हणती हा पैं पुराणपुरुष। धर्मस्थापनार्थ अवतरला ।। ९६।। अहो पाहतां ज्या रसाप्रती। आमुचे नेत्र गरगरां फिरती। तो रस प्याला स्वयें निगुती। धन्य मूर्ति शंकराचार्य ।।९७।। ऐसें सर्व कासारीं बोलून। घट्टधरिले स्वामींचे चरण। मग शंकराचार्य तेथून। जैनग्रामासी पातले ।।९८।। आणि स्वकीय शिष्यमुखेंसी। निरोपिलें मंडनमिश्रासी। कीं तुम्हीं भेटूनि आम्हांसी। शाखविवाद कीजिये ॥९९।। वादी स्वमतशास्त्रवैभवे। आम्हांलागीं त्वां जिंकावें। अथवा आम्हीं पराभवावें। सद्धर्मशास्त्रे तुम्हांसी ।।१००।।

ऐसा शंकराचार्याचा निरोप। ऐकोनि तो महागर्वकूप। मंडनमिश्र आगळे अमूप। बोलता झाला अभिमानें ।।१।। अरे आजपर्यंत बहु पंडित । वादार्थ आले मी मी म्हणत। परी ते म्यां जिंकिले समस्त । आमुच्या जैनशाखेसीं ।।२।। आतां हा येऊनि संन्यासी । सांगोन पाठवितो आम्हांसी। तरी मी आजि जिंकीन यासी । सरस्वतीचे प्रसादें ।॥३॥ ऐसें गर्वे बोलत वचन । सरस्वतीचे करूनि ध्यान। तो मंडनमिश्र जगद्‌गुरूंलागून। जाऊनि भेटला तत्काळ ॥४।॥ ते दोघेही तेजस्वी महापुरुष । केवळ जैसे चंद्र चंडांश। दोघांचेही पराक्रम विशेष । समसमान निर्धारें ।।५।। दोघेही बोलती एकपेकांसीं । सभा करावी आजिचे दिवसीं। वेदशास्त्राची स्वमुखेंसीं। चर्चा व्हावी सविस्तर ।।६।। पूर्वपक्ष उत्तरपक्ष करोन। अर्थ विवरावा संपूर्ण। ज्यासी अर्थ न होय पूर्ण। तयाचे शास्त्र मिथ्या पैं ।।७।। आणि जो पराजय पावेल । तद्धर्म विध्वंसूनि सकळ । ग्रंथही तयाचे तत्काळ । बुडवूनियां टाकावे ।।८।।

ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलुनी। बैसले मध्ये पडदा लावुनी। सर्व जातींचे लोक तत्क्षणीं। सभेलागुनी पातले ।।९।। तो मंडनमिश्रे पडद्याआंत । शंकराचार्यांसीं नकळत । मद्यघट ठेवूनि तयांत । सरस्वती स्थापूनि पूजिली ।।११०।। तै त्या मद्याच्या घटांतूनी। सरस्वती बोले अय्यालागुनी। आतां मी शंकराचार्यांसी झणीं। शास्त्रमतें विध्वंसितें ॥११॥ तू माझ्या मागे बैसून । चमत्कार पाहें संपूर्ण। मी तुज आहें सुप्रसन्न । वचन सत्य करीन तुझे ।।१२।। ऐसिये प्रकारें सुंदर। सरस्वतीचा ऐकूनि वर। तो महापंडित मंडनमिश्र । समाधान पावला ॥१३॥ मग पडद्याआंतून । शंकराचार्यासी बोले वचन । कोणता वेद आरंभून। अर्थ करूं सांग पां ॥१४॥ तै शंकराचार्य बोलत। चारी वेद करीं समाप्त। जें जें मी पुसेन यथार्थ । तें तें मजसी सांगावें ।।१५।। ठायीं ठायींचे अर्थ पुसेन । त्यांचे करावें समाधान।न सांगतां पदवीपासून । भ्रष्ट करीन क्षणमात्रे ।।१६।। मग त्याच आचार्यभाषिता। मान्य करूनि तो तत्त्वतां । सरस्वतीसी म्हणे हे माता। बोलें आतां सत्वरी ।।१७।।

तै श्रीशंकराचार्यांप्रती। बोलू लागली सरस्वती। परी शंकराचार्याच्या चित्तीं। जैन बोलतो ऐसेंच ।।१८।। म्हणोनि आचार्य बोलले। अय्या ऋग्वेद आरंभी ये वेळे। तंव सरस्वतीनें मुख काढिलें। घटांतूनि बाहेरी ।।१९।। प्रथम ऋग्वेद ऋचांसहित । सरस्वती चालली बोलत । ठायीं ठायीं आचार्य पुसत। अर्थकूटें तेधवां ।। १२० ।। परी ज्याच्या मुखापासून । चारी वेद झाले उत्पन्न । त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न । न अडखळे कोठेंचि ||२१|| शंकराचार्य जें जें पुसत। त्याचें तत्क्षणर्णी ती उत्तर देत । असो ऐसा ऋग्वेद समस्त । समाप्त जाणा जाहला ||२२|| परी सरस्वती म्हणते वेद । हा आचायीं नेणोनि भेद। आतां बोलें रे यजुर्वेटा ऐसें अय्यासी सांगितलें ||२३|| तें स्वामीचें ऐकूनि भाषित। सरस्वती पडद्याआंत । यजुर्वेदालागीं त्वरित । आरंभिती जाहली ||२४|| अस्खलित ३ शब्द उमटती। शंकराचार्य अर्थ पुसती । परी कुशलत्वें ती सरस्वती। करी समाधान तत्काळ ||२५|| आचार्याचा न चाले उपाय । कोठेच न होय पाडाव। मग अंतरीं एक उपाव। ऐसा त्यांनीं योजिला ||२६||

पूर्वी ऋग्वेद जाहला । आतां यजुर्वेद असे चालला । तरी यासी ऋग्वेदांतील भला। पुनरपि प्रश्न करावा ॥२७॥ ऐसा करूनियां निश्चय । अय्यासी बोलती आचार्य। अरे तूं सांप्रत निःसंशय । यजुर्वेद बोलतोसी ||२८।। परी ऋग्वेदामाजी देख। शंका राहिली असे एका ती ऋचा बोलूनि सम्यक। अर्थ सांगें पुनरपि ||२९|| ऐशा स्वामींच्या प्रश्नाला । ऐकून स्तब्धली ब्रह्मबाळा । पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला। परी तिसी त्याचा आठव नसे ।।१३०।। अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग । कीं वेद शास्त्र पुराणें सांग आरंभापासोनि स्पष्ट सवेग। संपूर्णही म्हणे पां ।। ३१।। परी पुढे पुढे म्हणत असतां । मध्येच पुशिलें पूर्वोक्त अर्था। तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा। स्मरह नसे कांहीच ।।३२।। म्हणोनि अंतरीं गडबडोन । स्तब्ध होतसे तत्क्षण। तियेचें वर्म कठीण। ठावुकें नसे कोणासी ।।३३।। परी शंकराचार्य चतुर अंतरी करीत विचार। ऐसे वेद सार्थ साचार। ब्रह्मांडीं कोण बोलणार।।३४।।

ब्रह्मा आणि सरस्वती । हीं मात्र बोलतील निश्चितीं। या दोघांवांचूनि जगतीं। नसे कोणी समर्थ ।।३५।। ह्या अय्याच्या बापाचेनें। ऐसें नोहे वेद बोलणें। मग ह्या क्षुल्लक पामराचेनें। कोठोनियां बोलवेल ।।३६।। तरी येथे कांहीं तरी। कपट आहे निर्धारीं। ऐसें जाणोनियां अंतरीं। अय्यालागीं बोलत ।। ३७ ।। अरे आतां उगा कां राहिलासी। मम प्रश्नासी कां नोत्तरिसी। तों तो अय्या गडबडोनि मानसीं। म्हणे अनर्थ ओढवला ।।३८।। दोन चार वेळां स्वामींनी। प्रश्निलें असें अय्यालागुनी। परी तो अत्यंत भय पावोनी। कांहींच वाणी बोलेना ।। ३९ ।। मग शंकराचार्य उठोन । पाहती पडदा उघडोन। तों तेथे मद्यघटांतून । मुख बाहेर आलें असे ।।१४०।। तें पाहतां ही सरस्वती होय। ऐसा अंतरीं करूनि निश्चय । तै जगद्‌गुरु शंकराचार्य। कोपें संतप्त जाहले ।।४१।। मग सकळ पडदे फाडून शिरीं घातला दंड दारुण । तेणें तो मद्यघट फुटोन। चूर्ण तत्क्षण जाहला ।।४२।।

0आणि म्हणती हे दुराचारिणी। जैनालागीं प्रसन्न होऊनी। वेदशास्त्रचर्चा रात्रंदिनीं। चांडाळिणी करितेस ॥४३॥ तुझें न पाहावें जारिणी मुख। ज्याच्या पोटीं जन्मलीस देख। त्या ब्रह्मयासीच तूं निःशंका अंगभोग देसी निर्लज्जे ।।४४।। ऐसी तूं महापापिणी। ह्या जैनासी वश होऊनी। जैनशास्त्रे स्थापावयालागुनी। सर्वदा रत झालीस ।।४५।। ह्या दुष्ट पाखांडमतासी । आश्रय देऊनि अहर्निशीं। अठरा याति चार वर्णांसर्सी। एकंकार केलास ।।४६।। जैनी झाले लोक समग्र । हा तूंचि केलासी वर्णसंकर। वेद शास्त्रे पुराणें परिकर। एकीकडे राहिलीं ।।४७ ।। या जैनाचीं शास्त्रे संपूर्ण। तुवां त्यांचा धरोनि अभिमान । जैनमत प्रकटवून । लोकां पाखंडर्डी घातलेंस ।।४८।। तुझ्या आश्रयें ह्या दुष्टें स्वमतें । पृथ्वीवरील ग्रामदैवतें। स्थापूनियां स्वकीय हस्तें। भ्रष्ट केलीं सर्वही ।।४९।। ऐसा तुझ्यायोगें सगळा । अत्यनर्थ वोढवला । तो म्यां कैलासीं ऐकियला। म्हणोनि घेतला अवतार ।। १५० ।।

तूं अनाचार केलासी अत्यंत । तरी सदा राहें नीचमुखांत। अंत्यजादिकांच्या गृहीं सतत । वास होवो मम शापेर। ।।५१।। ऐसें रीतीं सरस्वतीप्रती। शंकरस्वामी शाप देती। मग ती कोपोनि सरस्वती । स्वामींप्रती बोलत ।। ५२ ।। तूं तों धर्म स्थापावयासी । साक्षात्शंकर अवतरलासी। तरी तुझा देह कीकटदेशीं। पडेल जाण मद्वचनें ।।५३।। ऐसे स्वामींसी शापून। सरस्वती गुप्त झाली तत्क्षण। मग स्वामींचे धरूनि चरण। मंडनमिश्र लोळत ।।५४।। परी शंकराचार्थी तत्क्षणीं। जैनशास्त्रांच्या मोटा बांधुनी। अति अगाध समुद्रजीवनीं। नेऊनियां बुडविल्या ।।५५।। त्यांतूनि एक अमरकोश। सर्वोपयोगी असे विशेष । म्हणोनि त्या मात्र ग्रंथास । शंकराचार्थी रक्षिलें ।।५६।। असो ऐसें जैनशास्त्रांसी। विध्वंसूनियां क्षणार्धेसीं। मग जवळ पाचारूनि जनांसी। स्वामी तयांसी बोलत ॥५७॥ अहो हीं ग्रामदैवतें समस्त । आहेत खरी जैनस्थापित । परी त्यांतें तुम्हीं सतत । भजत जावें स्वधर्मे ।।५८।।

जैनें स्थापिलीं म्हणोनी। संशय कांहीं न धरावा मनीं। आपुला धर्म आपणा लागुनी। देवापाशीं काय असे ।।५९।। ऐसें स्वामी सकळ लोकां। सांगती तेव्हां अय्या देखा। स्वामीचरणीं स्वकीय मस्तका। ठेवूनियां विनवीतं ।।१६०।। म्हणे स्वामी जैनमत संपूर्ण। तुम्ही टाकिलें उच्छेदून । परी कृपें जैनाचें अभिधान। किंचित् तरी रक्षावें ।। ६१।। ऐसी ऐकतां दीनवाणी।-कृपा उपजोनि स्वामींच्या मनीं। ग्रामदैवतांच्या सन्निधानीं। जैनाचा घोडा स्थापिला ।।६२।। जेथे जेथे ग्रामदैवत । तेथे जैनाचा धोंडा वसत । ग्रामदेवतांसंर्गे त्याप्रत । प्रतिदिनीं पूजिती ।॥ ६३॥ असो मग स्वामी तेजोराशी। आज्ञापिती सकळ जनांसी। कीं आपुल्या जातिधर्मेसर्सी । पूर्वीप्रमाणें वर्तावें ।।६४।। जरी अधर्मे वर्ताल कोणी । तरी दंडीन ऐसें बोलुनी। वेदशास्त्र पुराणें तत्क्षणीं। प्रकट केलीं साचार ।। ६५ ।। मग सकळही ब्राह्मण। करूं लागले वेदशास्त्राध्ययन । आणि अन्य जनही संपूर्ण। वर्नू लागले स्वधर्मे ।। ६६।॥

ऐसें शंकराचार्ये दयाळें। आपुल्या उत्तम बुद्धिबळें। जैनाचें पाखंडमत आगळें। विध्वंसिलें सर्वही ।।६७।। श्रुतिस्मृत्युक्त धर्म परिकर। सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर । तेवींच अद्वैताचा साचार। मार्ग सर्वांसी दाविला ।। ६८ ।। एवं महाराज शंकर। भक्तवत्सल कर्पूरगौर। अवतरोर्नियां भूमीवर। भूभार हरिता जाहला ।। ६९ ।। अहो शंकराची लीला अगाध । जो भक्तवत्सल स्वानंदकंद । सेवकां तारूनियां विशद । निजपदासी नेतसे ।।१७०।। काय वर्णावें त्याचें चरित। जे दीन-अनाथ सद्भक्ता शिव पंचाक्षरी षडक्षरी जपत । तयां तारीत प्रसादे ।।७१|| दाशार्ह आणि कलावती। बहुला विदुर पापमती। तीही शिवपंचाक्षरे जपतां निगुती। अक्षय गती पावली ।।७२।। शबर केवळ निषाद। शिवकृपें तरला हे प्रसिद्ध। भस्म होऊनियां तद्भार्या शुद्ध। पुनरपि देहें प्रकटली ।।७३।।

श्रीशिवयोगियानें। सुमति-भद्रायूकारणें। शिवकवचाच्या उपदेशानें। पावन केलें साचार ।। ७४|| मैत्रेयीच्या उपदेशेंकरूनी। शिवव्रत आचरतां सीमंतिनी। यमुनेंत पति बुडाला असोनी । आला वांचोनी शिवकृपें ।।७५।। पराशर ऋषीनें आपण। रुद्राभिषेकेंकरून । राजपुत्राचा मृत्यु टाळून । तयासी राज्यीं स्थापिलें ।।७६ ।। ऐसें शिवकवच रुद्र। षडक्षरी पंचाक्षरी इत्यादि मंत्र। सर्वोद्धारक आहेत पवित्र । परी अभक्तां काय ते ।। ७७ ।। जरी गर्गमुनीसारिखे सद्‌गुरूव दाशार्हरायापरी शिष्य थोरून भाविक असतीला तरी उद्धारून होईल जाण निश्चये ॥ ७८ ॥ जरी भद्रायूसम शिष्यजना शिवयोगियापरी गुरु सुजाण । तरी प्रत्यक्ष शिव प्रकटोन। नेईल शिष्या कैलासीं ।।७९।। कलियुगामाजीं गुरु महंत । एक अडक्यासी तीन मिळत। – परी सद्‌गुरुसम अत्यद्भुत । सामर्थ्य तेथे कैचे पां ।।१८०।। द्रव्याची इच्छा धरूनि मनीं। केवळ शिष्यजनांसी भोंदुनी। मंत्रतंत्र फुंकोनि कानीं। व्यर्थ साधना लाविती ।।८१।। शिष्यही अभाविक दुर्जन । गुरूचें पाहती सदा न्यून। म्हणोनि दोघां नरक दारुण। प्राप्त होय शेवटीं ।।८२।।

आतांचे गुरुशिष्य सकळिका केवळ द्रव्याचें गिऱ्हाईका दाशार्हादिकांपरी तो एका शिष्य न दिसे कलियुगीं ।॥८३॥ सद्‌गुरु तो शिष्यांच्या धना। नरकासमान मानिती जाणा। सच्छिष्यही तनु-मन-धना । अर्पितात गुरुपायीं ।।८४।। म्हणोनि तरले ते दाशार्हादिका नातरी तेच मंत्र सकळिका परी हे आतांचे जन मूर्ख। द्रव्यलोर्भे भुलले पैं ।॥८५॥ अहो कृतयुगामाजीं पाहतां । अस्थिगत प्राण होता। जेव्हां अस्थी पडती सर्वथा । तेव्हां प्राण जातसे ।।८६।। म्हणोनि तोपर्यंत साधन । करीत बैसती अरण्यीं जाऊन । त्रेतायुगी ते चर्मगत प्राण। चर्म झडतां मृत्यु होय ।। ८७।। द्वापारीं प्राण नाडीगत । नाही सुकती तो वांचत । ऐसें पूर्वी आयुष्य बहुत । होतें सकळ मानवी ।।८८।। आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे। ऐसीं तेव्हां होतीं आयुष्यें। म्हणोनिसकळ बहुत वर्षे। अनुष्ठानें आचरत ।।८९।। आणि ऐसें तप करित। कीं जेणें अंर्गी वारुळे वाढत । मग प्रसन्न होऊनि भगवंत। आपुल्या नेत पदासी ।।१९०।। आतां तों अन्नमय प्राण। अन्नाविना सत्वर मरण। आणि आयुष्य तेही अपूर्ण। नोहे साधन कांहींच ।।९१।। देहाचा नाहीं भरंवसा । कोण दिवस येईल कैसा। म्हणोनि साक्षात् जगदीशा। अंतरीं दया उद्भवली ।।९२।। आणि औट घटिकांत पूर्ण। परमेश्वरप्राप्ती होऊन । मोक्षासी जावें उद्धरोन। ऐसा मार्ग काढिला ।।९३।। तो मार्ग म्हणाल कवण । तरी सद्‌गुरूसी जावें शरण। यावीण मोक्षलाभालागून । इतर साधन नसेचि ।।९४।। आतां सद्‌गुरु तो कैसा असावा। सदा आनंद तन्मनीं वसावा। वामदेव गर्ग शुक किंवा। पराशरापरी साचा ।।९५।। शिष्यही असावे भाविका गुरूचि मानावा ईश्वर एका ऐसें घडतां हे सकळिका जन तरतील कलियुगीं ।। ९६।। श्रीधर म्हणे श्रोतयांसी। ज्या मंत्रीं तरले महाऋषी। तेचि हे मंत्र तुम्हांसी। प्रकाशित केले पां ।।९७।। ज्या मंत्रे भद्रायु तरला जेणे दाशार्हराव उद्धरला। आणि जो मंत्र सुमति राणीला। शिवयोगियें दिर्घला-

असे ।।९८।। ज्या मंत्र बहुला उद्धरली। विदुर पावला शिवपदकमळीं।। आणि भ्रतारासहित तरली। सीमंतिनी ज्या मंत्रे ।। ९९।। तेचि षडक्षर पंचाक्षरी रुद्र। मृत्युंजय शिवकवच पवित्र । इत्यादि सकळही मंत्र। या ग्रंथात कथियेले ।।२००।। परी श्रोते तुम्हीं म्हणाल जरी। तेचि मंत्र असतां निर्धारीं। तिंहीं सांप्रत पूर्वीच्या परी। कां न उद्धरती जन हे ।।१।। तरी जपकर्त्याचें मन । शुद्ध असेल तरी तत्क्षण। पूर्वीप्रमाणें तयासी गुण। येईल जाणा निश्चयें ।।२।। यालागीं विशुद्ध भावेंसी। जपावें या शिवमंत्रांसी। आणि सर्वांनींही अहर्निशीं। शिवलीलामृतासी ऐकिजे ||३|| आपुल्या प्रपंचालागुनी। सावध जैसे निशिदिनीं । तैसें जरी शिवस्मरणीं। तरी मग उणें कायसें ।।४।। कलियुगींच्या जनाकारणें। शंकराचार्य ह्या अभिधानें। अवतार घेऊनियां शिवानें। जैनमत बुडविलें ।।५।।

ऐसा सद्धर्मप्रतिपालका जो शंभु अपर्णानायका तयाचें स्मरण करितां सकळिका भवभय निरसे पैं ।।६।। आपुल्या कार्यात रात्रंदिन । गुंतले असती जे कां जन। ते अभागी आयुष्य सरोन। पावती निधन अकस्मात ।।७।। जे कित्येक प्रपंचीं गुंतले।शिवध्यान करूं विसरले। जन्मासी आले तैसेचि गेले। ते जन्मले मेले सारखेच ।।८।। जे जन्मोनि कांही करीत नाहीं। ते शेवटीं जावोनि यमाचें गेहीं। तेथे पडोनि नरकडोहीं। अनेक भोग भोगिती ।।९।। अणि पुनरपि नाना योनींत । जन्मोनि अनंत दुःखें भोगीत । एवं संसृतीच्या आवर्तात । बुचकळत सर्वदा ।।२१०।। म्हणोनि सांगतों सर्वांलागुन । शिवचरणीं भाव धरोन। करितां शिवलीलामृतपान । जन्म-मरण खंडेल ।।११।। शिवस्मरणकर्त्या जनांसी। शिव नेतो मोक्षपदासी । ब्राह्मणादि सर्व जातींसी। शिवस्मरण तारक ।।१२।। परी ब्राह्मण आपुल्या कर्मांत । बैसती बहुत ग्रंथ घोकीत। आणि प्रपंचीं होऊनि रत। शिवस्मरण विसरले ।।१३।। आणि क्षत्रिय ते संपूर्ण। नाना शस्त्रे सांभाळून। सदा युद्ध इच्छिती म्हणोन । शिवस्मरण विसरले ।।१४।। वैश्य ते आपुल्या व्यवहारेंसी। द्रव्याची दुणाई इच्छूनि मानसीं। तागडी धरिती अहर्निशीं। शिवस्मरण मग कैंचें ।।१५।। कुणब्यासी नाहीं घरदार। नित्य नूतन संसार। भूमिसेवा करिती निरंतर। मग शिवस्मरण कैचें तयां ।।१६।। सोनार सुतार कासार। करीत आपुले

व्यवहार। प्रपंचीं गुंतले निरंतर । मग शिवस्मरण कोठूनी ।।१७।। ऐशा सकळही याती। आपुल्या व्यवहारीं गुंतती। जन्ममरणांच्या आवृत्ती । न सुटती साचार ।।१८।। पुनः पुनः जन्ममरणें। चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगणें। परी तयांच्या परिहाराकारणें। शिवनामामृत समर्थ ।।१९।। यालार्गी शिवलीलामृत ग्रंथ। पापीजनोद्धारक निश्चित । यातें जे श्रवण पठण करीत । ते जन होत शिवरूपी ||२२० ।। एक मंडळामाझारी । म्हणजे बेचाळीस दिनाभीतरीं। सदा शिवमूर्ति ध्याऊनि अंतरीं। सात आवर्तनें करिती जे ।।२१।। तयां श्रीगौरीरमण। प्रत्यक्ष देऊनियां दर्शन । सकळ कामना करितो पूर्ण। ऐसा महिमा ग्रंथाचा ||२२|| श्रावणमासीं सोमवारीं। एक एक आवर्तन जो करी। श्रीशंकर तयाचे घरीं। वास करितो सर्वदा ।।२३।। श्रीशंकर झालिया प्रसन्न । जगीं तयासी काय न्यून। जैसी कामधेनू मिळतां संपूर्ण। मनोरथ पूर्ण होतात ।।२४।। जरी पाहिजे शंभूची कृपा । तरी हा आहे मार्ग सोपा। करीत पंचाक्षरादि मंत्रजपा । शिवलीलामृत वाचा ।।२५।। शनिप्रदोषीं शिवरात्रिदिनीं । तीन आवर्तनें करितां तत्क्षणीं। सर्वीबंधमुक्त होऊनी। इच्छिला पदार्थ लाधतो ।। २६ ।।

आतां शंकेल श्रोत्यांचे मन। श्रीशिवमंत्राच्या जपेंकरून। जैसीं दाशार्हाच्या अंगांतून। पायें निघालीं काकरूपें ।। २७।। तेंवीं पंचाक्षरीमंत्राचा जप। आम्ही करीत असतां अमूप। काकरूपें आमुचें पाप। गेलें कां न दिसे पैं ||२८|| तरी श्रोतेजन हो ऐका। ऐसी अंतरीं न धरा शंका। स्कंदपुराणर्णी व्यासें जें का। लिहिलें तेंचि है कथिलेंसे ||२९।। यालागीं हैं असत्य म्हणतां । जिव्हेसी कीटक पडतील तत्त्वतां । दाशार्हापरी भावें वर्ततां । पार्षे भस्म होतील ।।२३०।। चौदा अध्यायांभीतरीं। जे मंत्र कथिले ऋषीश्वरी। तिहीं निष्पाप होऊनि सत्वरी। बहुत जन उद्धरले ||३१|| शिवकवचें भद्रायुबाळ। शिवमंत्र शारदा निर्मळ। राजपुत्राचा आलेला काळ । रुद्रावर्तने परतला ||३२|| शबरस्त्री भस्म झाली। परी ती नैवेद्यार्पणाच्या वेळीं। अन्नपात्र घेऊनि पतीजवळी । उभी राहिली पूर्ववत ॥३३॥ बहुला ती केवळ पातकी। पश्चात्तापें गेली स्वर्गलोकीं। विदुरभ्रतार होता नरकीं। तोही तेथे आणविला ||३४|| वामदेवें ब्रह्मराक्षसास । गौतमें कल्माषपादरायास । श्रीशिवें श्रियाळ

चांगुणेस । आणि चिलयास उद्धरिलें ||३५|| दाशार्हराव आणि कलावती। शिवमंत्र पावलीं मुक्ती । व्याध तरला अरण्यपंथीं। कीर्तनश्रवणमात्रेच ।।३६।। गोरक्षक बाळ अज्ञान । तोही तरला शिवमंत्रेकरून । मंत्रांत मंत्र श्रेष्ठ हे दोन। पंचाक्षरी आणि षडक्षरी ||३७|| शिवकवच महामंत्रासहित । मृत्युंजय भस्ममंत्र विख्यात । रुद्रावर्तन चिताभस्मपूत। आणि शिवदर्शन उत्तम ।।३८।। ह्यांची माहात्म्यें संपूर्ण। चौदा अध्यायांत वर्णन । ह्या पंधराव्या अध्यायीं आख्यान। जगद्‌गुरूचें कथियेलें ||३९।। स्कंदाप्रती शंकर सांगत। जे ह्या मंत्रासी मुखें बोलत । तयां मी प्रत्यक्ष उमानाथ। दर्शन देतों प्रीतीनें ।। २४०।। जो शिवलीलेसी पठण करी । तयासी प्रसन्न गिरिकुमारी। आणि मीही तयासी अहोरात्रीं। न विसंबें निश्चयें ।।४१।। ऐसें श्रीगिरिजानाथ। कथिते जाहले स्कंदाप्रत । म्हणोनि मीही तैसेंचि येथ। वर्णियेलें असे पां ।।४२।।

मी आपल्या पदरींचें कांहीं। उगाच वर्णन केलें नाहीं। श्रोतेजनीं हृदयांठायीं। विकल्प कांहीं न धरावा ॥४३॥ शिवलीलेचे चौदा अध्याय । हा पंधरावा कोठील काय। ऐसा मनीं विकल्प होय । तरीसांगतों ऐकिजे ॥४४।। ज्या शिवें भक्त तारिले अपार । आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र । त्यानेंच ह्या कलियुगीं अवतार । धर्मस्थापनार्थ घेतला ।।४५।। शिवमहिमा अगाध । सकळही कीजे प्रसिद्ध। म्हणोनि पंधरावा अध्याय शुद्ध। शिवाज्ञेनें वर्णिला ।।४६।। पूर्वयुर्गी जी लीला वर्तली। ती चौदा अध्यायीं वर्णिली। कलियुर्गी श्रीचंद्रमौळी। शंकराचार्य अवतरले ।।४७ ।।

तेंचि सविस्तर कथन । या पंधराव्यांत केले पूर्ण। श्रोतीं श्रवणार्थ रात्रंदिन । सादर असावें साचार ।।४८।। हे पंधरा अध्याय संपूर्ण । नित्य करावे श्रवण पठण । अथवा सात पारायणे। अत्यादरें करावीं ।।४९।। मद्य मांस भक्षून । न करावें ग्रंथपठण । कीं स्नान केल्यावांचून । पारायण न करावें ।। २५०।। रजस्वलेच्या श्रवणीं। न पडावा हा मंत्रशिरोमणी । कीं अभक्ष्यभक्ष्य भक्षूनी। शिवू नये या ग्रंथा ।।५१।। आणि जो दुष्ट दुर्जन। अविश्वासू निंदक महान। तयाच्याही श्रवणीं जाण । न घालावा सर्वथा ।।५२।। रजस्वला स्त्रियांसमान । दुर्जननिंदकांचे मन । केवळ अशुद्ध असत म्हणोन। ग्रंथश्रवणा योग्य नव्हे ॥५३॥

ह्या ग्रंथाच्या पठणेकरून । इच्छिलेंसर्व प्राप्त होऊन । गंडांतरें रोग मृत्यु पाप ऋण। दरिद्र संकटें निरसती ।।५४।। अष्टकुष्ठादि रोग निरसती। शृंखळादि बंधनें तुटती। आयुष्यवर्धन धनसंतती । अखंडित होय पां ।। ५५।। आणि तुष्टि पुष्टि सायुज्यसदन। पठणमात्रै लाधतें पूर्ण। याच्या नित्यपारायणासमान। पुण्य नाहीं दुसरे ।।५६।। पंधरा अध्याय ग्रंथ सकळ । जरी नित्य नेमें न वाचवेल । तरी बेचाळीस ओव्या सोज्वळ । भक्तिभावें वाचाव्या ।।५७।। नित्य प्रभाती स्नान करून । बेचाळीस ओव्या वाचितां पूर्ण। सर्व शिवलीलामृत पठण। केल्याचें पुण्य येईल ||५८|| शिवलीलामृत ग्रंथ विशेष । पंधरा अध्याय बहुत सुरस । त्यांतील निवडोनि सारांश । बेचाळीस ओव्या काढिल्या ।।५९।। आतां बेचाळीस ओव्या कोणत्या । तरी सांगतों ऐकाव्या त्या। श्रवणमात्रे सकळ श्रोत्यां । स्वर्गप्राप्ती निश्चर्ये ।।२६०।।

असे म्पंहणतात,धरावा अध्याय हा पारायण करताना शक्यतो धरल्या जात नाही.

 दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना न मिळालेल्या पाच अधिकार!

‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा पाचवा अध्याय !

१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..

 शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/

 हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!

Loading