Gharkul Yojana New update 2025: घरकूल योजनेत ५० हजार रुपयांची वाढ..

Gharkul Yojana New update 2025:घरकूल योजनेत वाढ आणि नवीन धोरणांची घोषणा

Gharkul Yojana New update 2025: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यामध्ये Gharkul Yojana निधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 50 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचा आणि विविध विकास योजनांचा समावेश आहे.

निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अर्थसंकल्पात होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी राज्य सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार आहे. यामध्ये घरकूल योजनेतील निधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

घरकूल योजनेत ५० हजार रुपयांची  मिळणार आहे वाढ?

Gharkul scheme to get Rs 50,000 increase

‘सर्वांसाठी घरे’ या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारने नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्याची माहिती अजित पवार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन, रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास आणि धर्मवीर आनंद दिघे घरकुल यासारख्या योजनांचा कार्यान्वय करण्यात येत आहे.

हे पहा >>>>>आता घरबसल्या पहा तुमची ई-पीक पाहणी झाली आहे का?

Gharkul Yojana New update 2025:आतापर्यंत एकूण ४४ लाख ७ हजार घरकुल मंजूर करण्यात आली आहेत.” लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून या योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले जाणार आहेत.

हे पहा >>>>> “बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी: प्रत्येक महिन्याला ५००० रुपये! अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू!”

परकीय गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती

अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. येत्या काळात ४० लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. रोजगारामध्ये वाढ होऊन उत्पन्न वाढवण्याचे लक्ष्य राज्य सरकारने ठेवले आहे, ज्यासाठी ५० लाख रोजगार निर्मितीचा उद्देश आहे. यासाठी नवे कामगार नियम तयार केले जाणार आहेत.

महाराष्ट्राचा देशाच्या निर्यातीत १५.४ टक्के वाटा आहे. लवकरच महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण जाहीर केले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. येत्या पाच वर्षांत वीज खरेदीत १ लाख ५ हजार कोटींची बचत होईल, ज्यामुळे वीज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधांसाठी येत्या पाच वर्षांत विक्रमी गुंतवणूक केली जाणार आहे.

हे पहा>>>> “सुवर्णसंधी! बीज भांडवल महामंडळ योजना खास युवकांसाठी”

तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.

 हे पहा>>>तुम्ही केला आहे का अर्ज पाईपलाईन योजनेसाठी!

१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

Loading