Shivleelaamrit 10,11 Adhyay Marathi: शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा दहावा आणि अकरावा अध्याय!

Shivleelaamrit 10,11 Adhyay Marathi:कथा सारा सहित शिवलीलामृताचा १०, ११ अध्याय 

Shivleelaamrit 10,11 Adhyay Marathi: नमस्कार वाचकांनो,’शिवलीलामृत’ हा एक दिव्य ग्रंथ आहे, जो भगवान शिवाच्या अलौकिक लीलांचे वर्णन करतो. या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण केल्याने भक्तांच्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि ऐहिक तसेच पारलौकिक कल्याण होते. शिवरात्रीच्या पवित्र काळात या ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

ग्रंथाचे पारायण करताना दररोज ठरावीक वेळी एक अध्याय वाचावा किंवा ऐकावा. जर कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन हा ग्रंथ ऐकू इच्छित असतील, तर स्पष्ट आणि सुस्वर वाचन करणाऱ्या व्यक्तीने तो वाचावा आणि इतरांनी श्रद्धेने ऐकावा. सप्ताह पूर्ण झाल्यावर प्रसाद वाटून ग्रंथाची कृपा सर्वांवर यावी, अशी भावना ठेवावी. ‘शिवलीलामृत’ या ग्रंथाच्या माध्यमातून भक्त भगवान शिवाच्या अगाध कृपेचा अनुभव घेऊ शकतात आणि आपले जीवन आनंदमय आणि समृद्ध बनवू शकतात.

तर आज या लेखात आपण शिवलीलामृताचा दहावा आणि अकरावा अध्याय पाहणार आहोत. Shivleelaamrit 10,11 Adhyay Marathi: शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा दहावा आणि अकरावा अध्याय!पोथी घरात सर्वांनी ऐकावी अशी इच्छा असेल तर ज्याला किंवा जिला स्पष्ट वाचन करता येत असेल त्याने किवा तिने रोज ठरावीक वेळी पोथी वाचावी व सर्वांनी ऐकावी, सप्ताह पूर्ण झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटावा,

ॐ नमः शिवाय या शिवमंत्राचा सर्वांनी त्या सप्ताहात त्या वेळी पोथीबाचनापूर्वी १०८ वेळा जप  करावा.

Shivleelaamrit 10,11 Adhyay Marathi: शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा दहावा आणि अकरावा अध्याय!

अध्याय दहावा शारदेची कथा सारांश रुपी

Shivleelaamrit 10,11 Adhyay Marathi: सूत म्हणाले, “सज्जन हो। आनर्त देशातील देवरथ नामक ब्राह्मणास शारदा नावाची कन्या होती. त्याने तिचा बाराव्या वर्षीच विवाह करून दिला. लग्नानंतर काही दिवस जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतले. एकदा शारदेचा पती स्नानसंध्या करून नदीवरून परतत असता विषारी साप चावून मरण पावला. त्या वेळी देवस्थाने मोठ्या धैयनि मुलीला सावरले व जावयाचे उत्तरकार्य केले.

कालांतराने एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैधृव नामक एक अंध ऋषी देवरथाकडे आले. शारदेने त्यांचा आदरसत्कार करून त्यांना संतुष्ट केले. तेव्हा त्यांनी तिला ‘तुझे सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र’ होईल,’ असा आशीर्वाद दिला. त्यावर खिन्नपणे हसून तिने ऋर्षीना आपली दुःखद कथा सांगितली. तेव्हा नैधृव म्हणाले, “मी माझे शब्द खरे करून दाखवीन. तू निश्चित राहा.” ही गोष्ट शारदेच्या मातापित्यांना कळताच त्यांच्याही मनात शंका आली, पण नैधृवांनी त्यांचे समाधान केले. त्यानंतर देवरथाकडेच राहून नैधृवांनी शारदेला ‘ॐ नमः शिवाय।’ या मंत्राचा जप करायला सांगितला.

शारदेकडून उमामहेश्वराचे व्रत करवून घेऊन त्याचे उद्यापनही केले. असे एक वर्ष सरले. एका रात्री नैधृव आणि शारदा उमामहेश्वराचे चिंतन करीत असताना भवानीने त्या दोघांना दर्शन दिले. तेहा नैधृवांनी तिची स्तुती करून ‘माझा आशीर्वाद खरा कर,’ अशी विनंती केली. तेव्हा देवीने शारदेचे पूर्वजन्मकृत कर्म व ऋणानुबंध सांगून पुढे म्हटले, “हिचा पूर्वजन्मीचा पती द्रविड देशात असून अजूनही हिच्यासाठी तळमळतो आहे. तो हिला स्वप्नात भोग देईल. त्यापासून हिला होणारा पुत्र शारदानंदन म्हणून विख्यात होईल.” असे बोलून देवी गुप्त झाली.

पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती झाली तेव्हा लोकांनी तिचा छळ केला. तेव्हा ‘शारदा निर्दोष असून तिची निंदा करणाऱ्याच्या जिभेला किडे पडतील’ अशी आकाशवाणी झाली. एका कुत्सित निंदकास तशी प्रचिती येताच जननिंदा थांबली. पुढे तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदानंदन ठेवण्यात आले. तो विद्वान पंडित झाला. पुढे दैवयोगाने शारदेची व द्रविड देशातील तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची श्रीक्षेत्र गोकर्ण येथे शिवरात्रीस भेट झाली. पतिपत्नी व पुत्र यांचे मीलन झाले. कालांतराने पतिनिधनानंतर शारदेने सहगमन केले व ती दोघे कैलासलोकी गेली.”

॥ श्रीशिवलीलामृत अध्याय दहावा ।।

।। श्रीगणेशाय नमः।। 

 कामगजविदारकपंचानना। क्रोधजलदविध्वंस प्रभंजना। मद-तमहारका चंडकिरणा। चंद्रशेखरा वृषभध्वजा ।।१।। मत्सरदुर्धरविपिनदहना । दंभनगच्छेदका सहस्रनयना। अहंकारअंधका-सुरमर्दना । धर्मवर्धना भालनेत्रा ||२|| आनंदकैलासनगविहारा । निगमागमवंद्या सुहास्यवक्त्रा। दक्षमखदलना आनंदसमुद्रा । ब्रह्मानंदा दयानिधे ।।३।। नवमाध्यायाचे अंतीं। उद्धरिला शबर सिंहकेतनृपती। यावरी सूत शौनकादिकांप्रती। नैमिषारण्यीं सांगत ।।४ ।। आनर्तदेशीं वास्तव्य करीत । एक द्विज नामें देवरथ। वेदाध्ययनी शास्त्ररत । पंडित आणि वंशज होय ।।५।।

त्याची कन्या चातुर्यखाणी। शारदा नामें कमलनयनी । जिचें स्वरूप देखोनी । जन होती तटस्थ ।।६।। तंव ते झाली द्वादशवर्षी। पित्यानें लग्न करूनि संभ्रमेसि । पद्मनाभ द्विजासी । देता झाला विधियुक्त ।।७।। तोही परम अधीत ब्राह्मण। सभाग्य आणि वेदसंपन्न । जयाची विद्या पाहोन। राजे होती तटस्थ ||८|| लग्नसोहळाजाहलियावरी। कांहीं दिवस होता श्वशुरघरीं। सायंकाळी नदीतीरी संध्यावंदनासी तो गेला ।।९।। परतोन येता अंधार। पायास झोंबला दुर्ध विखार। तेथेच पडिलें कलेवर। नगरांत हांक जाहली ।।१०।।

मातापितासमवेत । शारदा धांवोनि आली तेथ। गतप्राण देखो प्राणनाथ। शरीर घालीत धरणीवरी ||११|| म्हणे विद्याधनाचे सतेज आजि बुडालें माझे जहाज । वोस पडली सेज। बोलों गुज कोणास ।।१२।। माझे बुडाले भांडार। सर्परूपें वरी पडला तस्कर। दग्ध झाल आभरणे समग्र । म्हणोनि टाकी तोडोनियां ||१३|| देखोनि शारदेचं करुणा । अश्रू आले जनांचियां नयना । म्हणती अहा पशुपते भाललोचना हे आतां करील काय ।।१४।। मग त्या विप्राचें करूनि दहन । माता पित बंधु आप्त जन । शारदेस संगें घेऊन । सदनाप्रती गेले ते ।।१५।। कित्येव दिवस जाहलियावरी । घरचीं कार्यास गेलीं बाहेरी। शारदा एकली मंदिरीं तंव एक अपूर्व वर्तलें ।। १६ ।।

नैधृव नामें ऋषीश्वर। वृद्ध तपस्वी गेल नेत्र। शिष्य हातीं धरोनि पवित्र । सदना आला शारदेच्या ।।१७।। शारद आसन देऊनि सत्वर । पूजन करोनि करी नमस्कार। नैधृव म्हणे सौभाग्य वाढो अपार। हो तुज पुत्र वेदवक्ता ।।१८।। विप्रास न दिसे केवळ अंध। अमोघ वदला आशीर्वाद। हांसोनि शारदा करी खेद। शोक करी दुःखभरें ।।१९।। म्हणे हैं अघटित घडे केवीं पूर्ण। सांगितलें पूर्ववर्तमान । नैधृव म्हणे माझें वचन । असत्य नोहे कल्पान्ती ||२०|| माझे जिव्हेबाहेर आलें। तें माघारे न सरे कदाकाळे। माझें तपानुष्ठान वेगळे । अघटित तेंचि घडवीन ।।२१।। घरींचीं बाहेरूनि आलीं त्वरित। माता पिता बंधु समस्त । समूळ कळला वृत्तान्त । म्हणती विपरीत केर्वि घडे ।।२२।।

ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र । क्षणे रंकाचा करी सहस्रनेत्र । शार्पे न लगतां क्षणमात्र। कुळासहित संहारित ।।२३।। शापबळेंचि विशेष । सर्प केला राजा नहुष। यादवकुळ निःशेष । भस्म झालें ब्रह्मशापें ।।२४।।, ब्राह्मणर्णी क्षोभोनि निर्धारीं। शक्राची संपत्ति घातली सागरीं। ब्रह्मशापें मुरारी। अंबऋषीचे जन्म घेत ||२५|| विधि-हरि-हर चित्तीं । ब्रह्मशापाचे भय वाहती। विप्रशापें राव परीक्षिती। भस्म झाला क्षणार्थे ।।२६।।जमदग्नीचा क्रोध परम। चौघे पुत्र केले भस्म । त्रिया असतां पांडुराजसत्तम। भोग नाहीं सर्वदा ।।२७।। विप्रशापाची नवलगती। साठ सहस्र सगर जळती। कुबेरपुत्र वृक्ष होती। नारदशापेंकरोनियां ||२८।।

कृष्णासहित यादवकुळ । ब्रह्मशापें भस्म झालें सकळ । दंडकाऐसा नृपाळ। क्षणमात्रे दग्ध केला ||२९|| बह्मशाप परम दृढ। नृगराज केला सरड। धराधरशत्रु बळ प्रचंड। सहस्र भर्गे त्या अंर्गी ।।३०।। क्षयरोगी केला अत्रिनंदन। मेदिनीवसनाचे केले आचमन । शाप देवोनि सूर्यनंदन । दासीपुत्र केला पै ।।३१।। पाषाणाचे करिती देव। रंकाचेही करिती राव। मंत्राक्षतां टाकिता नवपल्लव । कोरड्या काष्ठा फुटले कीं ।।३२।। ब्राह्मण थोर त्रिजगतीं। है ब्रह्मांड मोडोनि पुन्हां घडती। यावरी नैधृव तियेप्रती। बोलता झाला तें ऐका ||३३|| महणे ऐके शारदे यथार्थ। तूं धरीं उमा-महेशव्रत। षडक्षर मंत्र विधियुक्ता नित्य जप करावा ।। ३४।। म्हणे या व्रताचें फळ होय पूर्ण। तंववरी मी येथेंचि राहीन । मग त्याच्या अंगणांत मठ करून। राहता झाला नैधृव तो ।।३५।।

म्हणे व्रताचा आरंभ प्रेर्मेसर्सी। करावा जाण चैत्रमासी। अथवा मार्गशीर्षेसीं। शुद्धपक्षीं करावा ।।३६।। पाहोनि सुमुहूर्त सोमवार । अष्टमी चतुर्दशी परिकर। पूजावा उमामहेश्वर। एक संवत्सर नेमेंसी ।।३७।। गुरुवचन शारदा ऐकोन । तैसेंचि करी न पडे न्यून । नैधृवगुरूपासून । षडक्षर मंत्र मंत्र घेतला ।।३८।। दिव्य शिवमंदिर करून । वरी दिधलें शुभ्रवितान । चारी स्तंभ शोभायमान । नान्य फळे शोभताती ।।३९।। अष्टगंधे सुवाससुमनें। भूमि शोधूनि रंगमाळा आस्तरणें । षोडशवर्ण यंत्रकरणें। अष्टदळे तयामाजी ।।४०।। तयामाजी चतुर्दळ । त्यावरी घालोनि तांदुळ । वरी घट स्थापोनि अढळ । शोभा बहुत आणिजे ।।४१।। उमा-महेश प्रतिमा दोन्ही। स्थापिजे सुवर्णाच्या करोनी। मग एकनिष्ठा धरूनी । षोडशोपचारीं पूजिजे ।।४२।।

यथासांग ब्राह्मण-संतर्पण । सुवासिनी पूजिजे प्रीतीकरून । षड्रस चतुर्विध अन्न । द्यावें भोजन तृप्तीवरी ॥४३॥ पुराणश्रवण कीर्तन । येणेचि करावें जागरण। गुरुवचनीं विश्वास पूर्ण। धरूनि वर्तणें सर्वदा ।।४४।। कुंदेंदुवर्ण केवळ । कर्पूरगौर पयःफेनधवल । ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ । रजतवर्ण निर्मळजो ।।४५।। सूर्यकोटिसम तेज विराजित। शुभ्र आभरणी भूषित। जगदानंदकंद गुणातीत। स्वर्धनी विराजित मस्तकीं ।॥४६॥ शुम्र जटामुकुटमंडित । सर्प मणियुक्त विराजित। किशोरचंद्र भाळीं मिरवत । भस्मचर्चित शुभ्र दिसे ।।४७ ।। उन्मीलित भाललोचन । केयूरांगद शुभ्र बीरकंकण । कण। मुंडमाळा शोभायमान । दिसती लोचन सूर्येदुवत ।।४८।। दिव्य गरुडपाचूहूनि वरिष्ठ। विराजमान दिसे नीलकंठ। दशभुज आयुर्धे सघट। झळकती प्रळयचपळेऐसीं ।।४९।।

खट्वांग त्रिशूळ कपाल डमरूप अंकुश पाश घंटा नागधरून पिनाक पाशुपत कमल तेजाकारूण शुभ्रवर्ण आयुधं ।।५०।। शुभ्र तेजस्वी शार्दूलचर्मवसन । शुभ्र स्फटिकवर्ण गजाजिन। मणिमय शुभ्र सिंहासन। नाना रत्नें विराजित ॥५१।। कैलासगिरी शुभ्रवर्ण। वरी मंडप शुभ्र सहस्रयोजन। स्तंभविरहित सहस्रकिरण। गगनीं जैवी प्रकाशे पैं ।।५२।। ऐरावताहूनि विशाळ शुभ्र। पुढें शोभे नंदिकेश्वर। मणिमय कुंडलें सुंदर। शेष तक्षक झळकती ।।५३।। ब्रह्मानंदसुख मुरोन। ओतिले शिवस्वरूप सगुण। आतां भवानीचे ध्यान। शारदा ध्यानीं आणीत ।।५४।। बाला तन्वंगी सुंदर। विराजमान चंद्रशेखर। चतुर्भुज पाशांकुशधर। गदापद्मयुक्त जे ।।५५।। सुरतरुसुमनमाळायुक्ता मल्लिक बकुळ कमळीं विराजित। इभमुक्तावतंस डोलत । शोभा अद्भुत कोण वणी ।।५६।।

हरिमध्या भुजंगवेणी। द्वादशादित्यशोभा जघनीं। कांची वरी झळकतसे ।। ५७।। मार्गे स्त्रिया जलजवदना आकर्णनयनी। वर्णिल्या बहुत । निःसीमरूपलक्षणयुक्ता ओवाळूनि टाकाव्या समस्त । जिच्या पादांगुष्ठावरूनी ।।५८।। कोटिमन्मथशोभा साजिरी। त्रिभुवनजननी त्रिपुरसुंदरी। ब्रह्मांड फोडोनियां वरी। अंर्गीचा सुवास धांवत ।।५९।। पदमुद्रा जेथें उमटती। तेथें आरक्त कमळे उगवती। द्विजपंक्तींचा रंग पडतां क्षिर्ती। खडे होती दिव्यमणी ।। ६० ।। या ब्रह्मांडमंडपांत देख। ऐसें स्वरूप नाहीं आणिका शशि मित्र द्विमुख। जिच्या तेजें शोभती ।। ६१।। विधि-शक्रादि बाळे अज्ञान । स्नेहें निजगभीं करी पाळण। समस्त त्रिभुवन लावण्य। ओतिलें स्वरूप देवीचें ।। ६२ ।। विशाळ ताटंकै प्रभाघन । ओतिलीं शशिमित्रतेज गाळून। गंडस्थळीं प्रभा पूर्ण। पडलीपैंजण। गर्जतां शिव समाधि विसरून। पाहे मुखचंद्र साव नेत्रचकोरेकरूनियां ।।८१।।

भक्त जे कां एकनिष्ठ। पार्टी दोल्हारे उ अनुवट। ऐसे स्वरूप वरिष्ठ । शारदा ध्यात ब्रह्मानंदें ।॥८२॥ ऐसें एक संवत्सरपर्यंत । आचरली उमा-महेश्वरव्रत । नैधृव उद्यापन करवीत। यथाविधिप्रमाणे ।।८३।। अकरा शर्ते दांपत्य । वस्त्र अलंकार दक्षिणायुक्ता पूजोनि शारदा हर्षभरित । तंव रवि अस्त पावला ।।८४।। जप ध्यान कीर्तन करीत। शारदा गुरूजवळी बैसत । अर्धयामिनी झालिया अकस्मात । भवानी तेथे प्रकटली ।।८५।। असंभाव्य तेज देखोनि । नैधृवासी नेत्र आले तेचि क्षणीं। नैधृव शारदा लागती चरणीं । प्रेमभावें करूनियां ।।८६।। देवीचें करिती स्तवन । उभे ठाकती कर जोडून। परी त्या दोघांवांचून । आणिक कोणी न देखती ।।८७।। जय जय भवानी जगदंबे । मूळप्रकृति प्रणवस्वयंभे । ब्रह्मानंदपददायिनी सर्वारंभे । चिद्विलासिनी तूं माये ।।८८।।

धराधरेंद्रनंदिनी। सौभाग्यसरिते हेरंबजननी।भक्तहृदयारविंदचिन्मयखाणी। वेदपुराणीं वंद्य तूं ।॥८९॥ तुझिया कृपें निधिती। गर्भाधासी नेत्र येती। मार्गे सांडून पवनगती। पांगुळ धांवती कृपें तुझ्या ।।९०।। मुके होती वाचाळ । मूर्ख पंडित होती तत्काळ । रत्लें होती सिकताहरळ। गारा होती चिंतामणी ।।९१।। भवभयहारके भवानी। भक्तपालके मनोल्हासिनी। वेदमाते द्विजजनरंजनी। वेधले ध्यानीं ब्रह्मादिक ।।९२।। त्रिपुरसुंदरी त्रिभुवनजननी। दोषत्रयहारके त्रितापशमनी । त्रिकाळ जे सादर तव ध्यानीं। त्रिदेहविरहित ते ।।९३।। शिवमानससरोवरमराळिके। जय जय विज्ञानचंपककलिके । सकळ ऐश्वर्यकल्याणदायके। सर्वव्यापके मृडानी ।।९४।। ऐसे ऐकतां सुप्रसन्न । देवी म्हणे माग वरदान। नैधृवें वृत्तान्त मुळींहून। शारदेचा सांगितला ।।९५।। मम मुखांतून वचन आलें । तें अंबे पाहिजे सत्य केलें। तुवां जर मनीं धरिलें। तरी काय एक न करिसी ।। ९६।।

यावरी शिवजाया बोल वचना। हे शारदा पूर्वी शुभानना । द्रविडदेशीं विप्रकन्या । नाम भामिर्न इयेचें ।। ९७ ।। इच्या भ्रतारासी स्त्रिया दोघीजणी। ही धाकुटी प्रिय मृदुभाषिणी। इणें वर वश करोनी। वडील कामिनी विघडविली ।।९८शेजारी एक जार होता। तो ईस बहुत दिवस जपत असतां । एकांत पाहोनि इच्या हाता। धरिता झाला दुर्बुद्धी ।। ९९।। इणें नेत्र करोनि आरक्ता झिडकारिला तो जार पतित। मग तो होवोनि खेदयुक्ता गृहासी गेला दुरात्मा ।।१००।। इचें त्यास लागले ध्यान। सुरत आलिंगन आठवून । इच्या ध्यासेंकरून। तो जार मृत्यु पावला ।।१।। ईस विधवा हो म्हणून। इच्या सवतीनें शापिलें दारुण। मग तीही पावली मरण। इच्या दुःखेंकरूनियां ।।२।। मग हेही काळे मृत्यु पावली। तेचि शारदा हे जन्मली। पूर्वीच्या जारें ईस वरिली। ये जन्मीं जाण निधरि ।।३।।

तोचि पद्मनाभ ब्राह्मण। गेला इसीं दावा साधून । इचा पूर्वजन्मींचा भ्रतार जाण। द्रविडदेर्शी आहे आतां ।।४।। तीनशेसाठ योजन। येथोनि दूर आहे तो ब्राह्मण। स्त्रीहीन इचें स्वरूप आठवून। तळमळीत सर्वदा ।।५।। तो ईस स्वप्नामध्यें नित्य येवोन । भोग देईल प्रीतीकरून । जागृतीहूनि विशेष जाण। सुख होईल इयेतें ।।६।। ऐसे लोटतां बहुत दिवस । पुत्र एक होईल शारदेस। शारदानंदन नाम तयास। लोकीं विख्यात जाण पां ।।७।। ईसनित्यभोगी होईल जो हरिख। तैसाच विप्र पावेल सुख। स्वप्नानंदें विशेष देख। तृप्ति होईल निधरि ।।८।। ऐसें तयासी सांगोन। अंबा पावली अंतर्धान । त्यावरी शारदा नित्य स्वप्न । देखती झाली तैसेंचि ।।९।। तंव  ती झाली गरोदर। जन निंदा करिती समग्र । दीर भावे सासू श्वशुर। आप्त सोयरे सर्व आले ।।११०।। देवीचे करणें अघटित । खदखदां जन हांसत । म्हणती हे केवीं घडे विपरीत । अंबा ईस भेटली कधीं ।।११।। एक म्हणती कर्ण नासिक छेदून। बाहेर घाला खरारोहण करून। तों आकाशवाणी बोले गर्जेन । सत्य गर्भ शारदेचा ।।१२।।

जन परम अमंगल । म्हणती हे कापट्यवाणी सकळ । त्यांत एक वृद्ध होता पुण्यशील । वदता झाला तें ऐका ।।१३।। ईश्वरी मायेचें अगम्य चरित्र । अघटित घडवी निर्धार। स्तंभवीण धरिलें अंबर। कुंभिनी तरे जळावरी ।।१४।। ग्रहगण भगणें विधु मित्र। यांस आहे कोणाचा आधार । सर्व देहीं व्यापक परमेश्वर। परी शोधितां ठायीं न पडे ।।१५।। परस्परें पंचभूतांसी २ वैर। तीं एकरूपें चालती कौतुक थोर। जननीगर्भी जीव समग्र । रक्षितोकसा पहा हो ।।१६।। काय एक न करी जगन्नाथ। राजा पूर्वी यूपकेत ।। त्याचे जळी पहले रेत। ते जळ प्राशीत वेश्या एक ।।१७।। तितुकेनि झाली ते गर्भिणी। पुत्र प्रसवली उत्तम गुणी। विभांडकाचे रेत जळीं पडीनी। ते जळ हरिणी प्राशीत ||१८|| तोचि झाला त्रऋषिश्रृंगी। तेणें ख्याती केली दशरथयागी। सौराष्ट्रराजा स्पर्शतां करें मृगी। दिव्य पुत्र प्रसवली ।।१९।। सत्यवती मत्स्यगर्भसंभूत। तो मत्स्य राजपुत्र होत। महिषासुर दैत्य। महिषीगभी जन्मला ।।१२०।। कित्येक ऋषि करुणावंत। वचनमात्रे गर्भ राहात। रेवतीरमण जन्मत। रोहिणीपोटीं कैसा पां ||२१||

सांबाचे पोटी मुसळ झालें। ते कोणी कैसें घातलें। कुंतीपोटी पांडव जन्मले। पांच देवांसमागमें ||२२|| ऐसें बोलती वृद्धजन। तरी निंदा करिती दुर्जन। मागुती देववाणी झाली पूर्ण। ऐका वचन मूर्ख हो ।।२३।। शारदेसी कोणी असत्या म्हणती । तरी जिव्हा चिरोनि किडे पडती। ऐसे ऐकतां सात्त्विक सुमती । सत्य सत्य म्हणती त्रिवाचा ||२४|| कित्येक दुर्जन पुन्हां बोलता है सर्वही कापट्य असत्य। तो जिव्हा चिरोनि अकस्मात। किडे गळों लागले ॥२५॥ हैं देखोनि सर्व जन । शारदेसी घालिती लोटांगण। म्हणती माते तूं सत्य पूर्ण। जानकी रेणुकेसारखी ।।२६।। मग तीस पुत्र झाला सतेज । लोक म्हणती शारदात्मज । वाढत जैसा द्विजराज। शुद्ध द्वितीयेपासूनी ।। २७ ।। उपनयन झालिया पूर्ण। आठवे वर्षी वेदाध्ययन। चारी वेद षट्शास्त्रे जाण। मुखोद्रत पुराणे ।।२८।। नवग्रहांत जैसा वासरमणी। तेवीं पंडितांत अग्रगणी। जेणें अनुष्ठानें पिनाकपाणी। प्रसन्न केला सर्वस्वें ।।२९।।

यावरी शारदा पुत्रसमवेत । लक्षूनि शिवरात्रिव्रत अद्भुत । गोकर्णक्षेत्राप्रति जात। यात्रा बहुत मिळाली ॥१३०।। तों द्रविडदेशींचा ब्राह्मण। तोही आला यात्रेलागून । परस्परें पाहून। कष्टी होती अंतरीं ||३१|| परस्परां कळली खूण। पूर्वी देवी बोलिली पतीसी ॥३२॥ पुत्र देई त्याचा त्यास । तूं त्यापासीं राहें चार मास । वचन । उमा-महेश्वरव्रताचें पुण्य। अर्ध देई समागम न करीं निःशेष । शिवपदासी पावसी ।।३३।। मग शिवरात्रि यात्रा करून । भ्रतारासी केलें नमन। म्हणे हा घ्या आपुला नंदन। म्हणोनिकरीं दिधला ।।३४।। उमा-महेश्वरव्रत। त्याचे अर्धपुण्य देत। मग शारदा सर्वे जात। द्रविडदेशाप्रती तेव्हां ॥३५॥ शारदा व्रतस्थ पूर्ण। दुरून पतीचे घे दर्शन। विख्यात झाला शारदानंदन। महापंडित पृथ्वीवरी ।।३६।। तप आचरला अपार। मातृपितृभजनीं सादर। माता भवानी पिता शंकर। हेचि भावना तयाची ||३७||

जो न करी जनकजननींचे भजन। धिक् त्याचे तप ज्ञान। धिक् विद्या धिक् थोरपण। धिक् भाग्य तयाचें ।।३८।। घरीं सांठवी स्त्रियेचें गोत। आणि मायबापां शिणवीत । अन्न नेदी बाहेर घालीत । शब्दबाणें हृदय भेदी ||३९।। तो जरी पढला षट्शास्त्र । परी अनामिकाहूनि अपवित्र । तयाचें न पहावें वक्त्र । विटाळ कदा न व्हावा ।।१४०।। यद्यपि झाला स्पर्श जाण । तरी करावें सचैल स्नान । महादोषी तो कृतघ्न। यम दारुण गांजीत ।।४१।। यावरी शारदेचा भ्रतार। महातपस्वी योगीश्वर। शरीर ठेवोनि परत्र । पावला तो शिवपदा ।।४२।। शारदाही चिंतून मदनदहन । करी विधियुक्त सहगमन । पतिसमवेत कैलासभुवन । पावोनि सुखें राहिली ॥४३॥

शिवलीलामृत सुरस पूर्ण। किंवा है दिव्य रसायन । भवरोगी सेवितां जाण । आरोग्य होऊनी शिव होती ।।४४।। जे मृत्यूनें कवळिले सहज । त्यांसी नावडे हा रसराज । ज्यांची सुकृतें तेजः पुंज । तेचि अधिकारी येींचे ।। ४५ ।। ब्रह्मानंदें श्रीधर । श्रोतयां विनवी जोडोनि कर। शिवलीलामृत निर्जर। तुम्ही सेवा आदरें ।।४६।। पुढील अध्यायीं सुरस कथा। पावन होय श्रोता वक्ता। मृडानीसहित शिव तत्त्वतां । पाठी राखी सर्वार्थी ।।४७।। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड। दशमाध्याय गोड हा ।।१४८।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।। ।। शुभं भवतु ।।

Shivleelaamrit 10,11 Adhyay Marathi: शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा दहावा आणि अकरावा अध्याय!

अध्याय अकरावा महानंदा, सुधर्म व तारक यांची कथा  सारांश रुपी

Shivleelaamrit 10,11 Adhyay Marathi: !सुत म्हणाले, “”सजन हो। काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधानपुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र व शिवभक्त होते. त्यांना अंगाला राख फासून, रुद्राक्षमाळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्याच्या अशा वागण्याने राजा व प्रधानास मोठी चिंता वाटे. एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिता सांगितली. तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर म्हणाले, “पूर्वी नंदिग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत असे. तिने एक कोंबडा व माकड पाळले होते. ती त्यांना रुद्राक्षमाळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवीत असे त्यांना नृत्यशाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे, त्यांना पुराणश्रवणाचाही लाभ होत असे. अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत होते.

एकदा भगवान शकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले. तिने त्यांचे स्वागत करून ‘मी तीन दिवस फक्त तुमचीच आहे,’ असे सागितले. तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे दिले व म्हणाला, “हे लिंग म्हणजे माझा आण आहे. ते जपून ठेव, ते जळले वा मंगले तर मी अग्निप्रवेश करीन.” महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले, त्या रात्री ती उभयता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मसात झाले. महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली, त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली. त्या वेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चितेत उडी घेतली.

तेव्हा शंकरांनी तिला वरचेवर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले महानदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत. पण हे राजा ।। तुझा पुत्र अल्पायुषी असून आजपासून सातव्या दिवशी मरणार आहे. हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संततधार धरून रुद्राध्यायाची पारायण कर.” राजा मनोमन घाबरला होता तरीही त्याने ऋर्षीनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैयनि केले. सातव्या दिवशी मृत्युघटका येताच सुधर्मा शुद्ध हरपून खाली पडला तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला. तेव्हा नारदांनीही तेथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला. मग भद्रसेनाने आनदोत्सव करून नारद व पराशरांचा सन्मान केला आणि सुघर्याला गादीवर बसवून प्रधानासह तपासाठी वनात गेला. शंकराने त्यानाही निजकृपेने आपल्यात विलीन करून घेतले.”

।। श्रीशिवलीलामृत अध्याय अकरावा।।

श्रीगणेशाय नमः

।। धन्य धन्य तेचि जन। जे शिवभजनीं परायण। सदा शिवलीलामृत श्रवण। अर्चन सदा शिवाचें ।।१।। सूत म्हणे शौनकादिकांप्रती। जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती। त्यांच्या पुण्यास नाहीं मिती। त्रिजगतीं तेचि धन्य ।।२।। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण। त्यासी वंदिती शक्रादि सुरगण। तो शंकरचि त्याचे दर्शन। घेता तरती जीव बह ||३|| अथवा षोडश षोडश दंडीं जाण। बांधावे रुद्राक्ष सुलक्षण। शिखेमाजी एक बांधावा पूर्ण। शिवस्वरूप म्हणवुनी ।।४।। त्यावरोनि करितां स्नान। तरी त्रिवेणीस्नान केल्यासमान। असो द्वादश द्वादश मनगटीं पूर्ण। रुद्राक्ष बांधिजे आदरे ।।५।। कंठीं बांधावे बत्तीस । मस्तकाभोंवते चोवीस । सहा सहा कणीं पुण्य विशेष। बांधितां निर्दोष सर्वदा ।।६।। अष्टोत्तरशतमाळा। सर्वदा असावी गळां। एकमुखी रुद्राक्ष आगळा। पूजितां भाग्य विशेष ।।७।। पंचमुख षण्मुख अष्टमुख । चतुर्दशमुख लक्ष्मीकारका सकळ मंत्र सुफळ देख। रुद्राक्षजप नित्य करितां ।।८।।

नित्य रुद्राक्षपूजन। तरी केले जाणिजे शिवार्चन। रुद्राक्षमहिमा परम पावन। इतिहास ऐका येविषयीं ||९|| काश्मीरदेशींचा नृप पावन । नामाभिधान भद्रसेन । विवेकसंपन्न प्रधान। परम चतुर पंडित ।।१०।। प्रजा दायाद भूसुर। धन्य म्हणती तोचि राजेश्वर। लांच न घे न्याय करी साचार । अमात्य थोर तोचि पें ।।११।। सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी। पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी । सुत सभाग्य विद्वान गुणी। विशेष सुकृतें पाविजे ।।१२।। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर। शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार। वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार। विशेष सुकृतें लाहिजे ||१३|| श्रोता सप्रेम चतुर सावधान । यजमान साक्षेपी उदार पूर्ण। काया आरोग्य सुंदर कुलीन । पूर्वसुकृतें प्राप्त होय ।।१४।। असो तो भद्रसेन आणि प्रधान। बहुत करितां अनुष्ठान । दोघांसी झाले नंदन। शिवभक्त उपजतांचि ।।१५।। राजपुत्र नामा सुधर्म। प्रधानात्मज तारक नाम । दोघे शिवभक्त निःसीम । सावधान शिवध्यानीं ।।१६।। बालें होऊनि सदा प्रेमळ । अनुराग चित्तीं वैराग्यशीळ । लौकिकसंगे धृव अमंगळ। त्यांची संगती नावडे त्यां ।।१७।।

पंचवर्षी दोघेकुमर। लेविती वरखें अलंकार। गजमुक्तमाळा मनोहर। नानाप्रका लेवविती ।।१८।। तंव ते बाळ दोघेजण। सर्वालंकारउपाधी टाकून। करितं रुद्राक्षधारण। भस्म चर्चिती सर्वांगीं ।।१९।। आवडे सर्वदा एकांत। श्रवण करिती शिवलीलामृत। बोलती शिवनामावळी नित्य। पाहणे शिवपूज सर्वदा ।।२०।। आश्चर्य करिती राव प्रधान। यांस कां नावडे वखमूषण। करिती रुद्राक्ष-भस्मधारण। सदा स्मरण शिवाचे ||२१|| विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती। मागुती वखें भूषणे लेवविती। ते सर्वोचि ब्राह्मणांसी अर्पिती। घेती मागुती शिवदीक्षा ||२२|| शिक्षा करितां बहुत । परी ते न सांडिती आपुलें व्रत। राव प्रधान चिंताग्रस्त । म्हणती करावे काय आतां ॥२३॥ ती उगवला सुकृतमित्र। घरासि आला पराशर। सर्वे वेष्टित ऋषींचे भार। अपर सूर्य तेजस्वी ॥२४॥ जो कृष्णद्वैपायनाचा जनिता। त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टिकर्ता। जो वसिष्ठाचा नातू तत्त्वतां। राक्षससत्र जेणे केलें ।।२५।।

जेवीं मनुष्ये वागती अपार । तैसेच पूर्वी होते रजनीचर । ते पितृकैवारें समग्र । जाळिले सत्र करूनियां ||२६|| जनमेजयें सर्पसत्र केलें। तं आस्तिकै मध्येच राहविलें। पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले। मग वांचले रावणादिक ।।२७।। विरंचीस दटावूनि क्षणमात्रै। प्रतिसृष्टि केली विश्वामित्र। तेवीं पितृकैवारें पराशरें। वादी जर्जर पैं केलें ।।२८ ।। ती सांगावी समूळ कथा। तरी विस्तार होईल ग्रंथा। यालागीं ध्वनितार्थ बोलिलों आतां। कळलें पाहिजे निर्धार ||२९|| ऐसा महाराज पराशर । ज्याचा नातू होय शुकयोगींद्र। तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार। घरा आला जाणोनि ।।३०।। राव प्रधान सामोरे धांवती। साष्टांग नमूनि घरासि आणिती । षोडशोपचारी पूजिती । भाव चिर्ती विशेष ||३१|| समस्तां वस्त्र भूषणे देऊन । राव विनवी कर जोडून । म्हणे दोघे कुमर रात्रंदिन । ध्यान करिती शिवाचें ||३२||

नावडती वस्त्रे अलंकार। रुद्राक्ष-भस्मावरी सदा भर। वैराग्यशील अणुमात्र । भाषण न करिति कोणार्सी ।।३३।। इंद्रियभोगावरी नाहीं भर। नावडे राजविलास अणुमात्र । गजवाजियानीं समग्र । आरूढावें आवडेना ।।३४ ।। पुढें हे कैसें राज्य करिती । हे आम्हांसी गूढ पडिलें चित्तीं। मग ते दोघे कुमर आणोनि गुरूप्रती। दाखविले भद्रसेने।।३५।। गुरूने पाहिले दृष्टीसीं। जैसे मित्र आणि शशी। तैसे तेजस्वी उपमा तयांसी। नाहीं कोठे शोधितां ।। ३६।। यावरी बोले शक्तिसुत। म्हणे हे कां झाले शिवभक्ता यांची पूर्वकथा समस्त । एक तुज सांगतों ।। ३७।। पूर्वी काश्मीरदेशांत उत्तम। महापट्टण नंदिग्राम। तेथील वारांगना मनोरम। महानंदा नाम तियेचें ॥३८॥ त्या ग्रामींचा तोचि भूपा पृथ्वीमाजी निःसीम स्वरूप । ललिताकृती पाहोनि कंदर्प। तन्मय होवोनि नृत्य करी ।।३९।।

जैसा उगवला पूर्णचंद्र। तैसें तिजवरी विराजे छत्र। रत्नखचित याने अपार । भाग्या पार नाहीं तिच्या ।।४० ।। रत्नमय दंडयुक्ता चामरें जीवरी सदा ढळत । मणिमय पादुका रत्नखचित । चरणीं जिच्या सर्वदा ।।४१।। विचित्र वसनें दिव्य सुवास । हिरण्मय रत्नपर्यंक राजस । चंद्ररश्मिसम प्रकाश । शय्या जिची अभिनव ।।४२।। दिव्याभरणर्णी संयुक्ता अंर्गी सुगंध विराजित। गो-महिषी खिल्लारें बहुत । वाजी गज घरी बहुवस ।।४३।। दास दासी अपार । घरीं माता सभाग्य सहोदर। जिचें गायन ऐकतां किन्नर। तटस्थ होती कोकिळा ।।४४।। जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन। सकळ नृप डोल डोलविती मान। तिचा भोगकाम इच्छून। भूप सभाग्य येती घरा ।।४५।। वेश्या असोनी पतिव्रता । नेमिला जो पुरुष तत्त्वतां । त्याचा दिवस न सरतां। इंद्रासही वश्य नव्हे ।।४६ ।।

परम शिवभक्त विख्यात । दानशीळ उदार बहुत । सोमवार प्रदोषव्रत । शिवरात्र करी नेर्मेसर्सी ।।४७।। अन्नछत्र सदा चालवीत । नित्य लक्षत्रिदळे शिव पूजीत । ब्राह्मणहस्तें अद्भुत । अभिषेक करवी शिवासी ॥४८॥ याचक मनीं जें जें इच्छीत । तें तें महानंदा पुरवीत । कोटि लिंगे करवीत । श्रावणमासीं अत्यादरें ||४९|| ऐक भद्रसेना सावधान । कुक्कट मर्कट पाळिले प्रीतीकरून । त्यांच्या गळां रुद्राक्ष बांधोन। नाचूं शिकविले कौतुकें ।॥५०॥ आपुलें जें कां नृत्यागार। तेथें शिवलिंग स्थापिलें सुंदर। कुक्कुट मर्कट त्यासमोर । तेथेंचि बांधी प्रीतीनें ।।५१।। करी शिवलीलापुराणश्रवण । तेही ऐकती दोघेजण। सर्वेचि महानंदा करी गायन । नृत्य करी शिवापुढें ।। ५२ ।। महानंदा त्यांसी सोडून । नृत्य करवी कौतुकेकरून । त्यांच्या गळां कपाळीं जाण। विभूति चर्ची स्वहस्तें ।।५३।। एवं तिच्या संगतीकरून । त्यांसही घडतसे शिवभजन । असो तिचेंहे नव्हे ।।५७ ।।

सौदागरे ते सत्त्व पाहावयालागोन। सदाशिव पातला ।।५४।। सौदागराचा वेष धरिला । महानंदेच्या सदना आला । त्याचे स्वरूप देखोनि ते अबला । तन्मय झाली तेघवां ।।५५।। पूजा करोनि स्वहस्तकीं। कीं । त्यास वैसविलें रत्नमंचकीं। तो पृथ्वीमोलाचे हस्तकी। कंकण त्याच्या देखिलें ।।५६।। देखतां गेली तन्मय होऊन । म्हणे स्वगींची वस्तु वाटे पूर्ण। विश्वकर्त्यानं निर्मिली जाण। काढून । तिच्या हस्तकीं घातले मानवी कर्तृत्व कंकण। येरी होवोनि आनंदघन । नेम करी तयासीं ।। ५८ ।। पृथ्वीचे मोल हे कंकण। मीही बत्तीसलक्षणी पद्मिण। तीन दिवस संपूर्ण । दासी तुमची झाले मी ।।५९।। तयासी ते मानले। सर्वेचि त्यानें दिव्यलिंग काढिले । सूर्यप्रभेहून आगळे। तेज वर्णिलें नवजाय ।। ६०।। लिंग देखोनि ते वेळीं। महानंदा तन्मय झाली। म्हणे जय जय चंद्रमौळी। म्हणोनि वंदी लिंगातें ।।६१।।

म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी। कोटि कंकणे टाकार्वी ओंवाळूनी । सौदागर म्हणे महानंदेलागुनी। लिंग ठेवीं जतन है ।।६२।। म्हणे या लिंगापाशी माझा प्राण। भंगलें कीं गेले दग्ध होऊन । तरी मी अग्निप्रवेश करीन । महाकठीण व्रत माझें ॥६३॥ येरीनें अवश्य म्हणोन। ठेविले नृत्यागारी नेऊन । मग दोघे करिती शयन। रत्नखचित मंचकीं ।।६४।। तिचें कैसें आहे सत्त्व। धैर्य पाहे सदाशिव । भक्त तारावया अभिनव । कौतुकचरित्र दाखवी ।। ६५ ।। त्याच्या आज्ञेकरून । नृत्यशाळेस लागला अग्न्न । जन धांवों लागले चहुंकडोन । एकचि हांक जाहली ।। ६६।। तीस सावध करी मदनारी। म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी। येरी उठली घाबरी । तंव वातात्मज चेतला ||६७ || तशामाजी उडी घालून । कंठपाश त्यांचे काढून । कुक्कुट-मर्कट दिधले सोडून । गेले पळोन वनाप्रती ||६८।।

नृत्यशाळा भस्म झाली समग्र । मग शांत झाला सप्तकर । यावरी पुसे सौदागर । महानंदेप्रती तेधवां ।। ६९ ।। माझें दिव्यलिंग आहे कीं जतन । महानंदा घाबरी ऐकोन । वक्षःस्थळ घेत बडवून । म्हणे दिव्यलिंग दग्ध जहालें ।।७०।। सौदागर बोले वचन । नेमाचा आजि दुसरा दिन । मी आपुला देतों प्राण। लिंगाकारणें तुजवरी ॥ ७१ ॥ मग त्रिचरण चेतविला । आकाशपंथें जाती ज्वाला। सौदागर सिद्ध झाला। समीप आला कुंडाच्या।।७२।। अति लाघवी उमारंग। जो भक्तजनभवभंग। उडी घातली सवेग। ॐ नमः शिवाय म्हणवुनी ॥७३।। ऐसे देखतां महानंदा। बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा। लुटविली सर्व संपदा । कोशसमवेत सर्वही ॥७४।। अश्वशाळा गजशाळा संपूर्ण। सर्वसंपत्तिसहित करी गृहदान। महानंदेने स्नान करून । भस्म अंगी चर्चिलें ।॥७५।। रुद्राक्ष सर्वांगी लेऊन। हृदयी चितिले शिवध्यान। हर हर शिव म्हणून । उडी निशंक घातली ।।७६ ।।

सूर्यबिंव निघे उदयाचळी। तैसा प्रकटला कपाळमौळी। दशभुज पंचवदन चंद्रमौळी। संकटीं पाळी भक्तांतें ।। ७७ ।। माथां जटांचा भार। तृतीयनेत्रीं वैश्वानर। शिरीं झुळझुळ वाहे नीर। अभयंकर महाजोगी ।। ७८ ।। चंद्रकळा तयाचे शिरीं। नीलकंठ खट्वांगधारी । भस्म चर्चिलें शरीरी। गजचर्म पांघरला ।।७९।। नेसलासे व्याघ्रांबर। गळां मनुष्यमुंडांचे हार। सर्वांर्गी वेष्टित फणिवर। दशभुजा मिरवती ।।८०।। वरचेवरी कंदुक झेलीत । तेीं दहा भुजा पसरोनि अकस्मात। महानंदेसी झेलूनि धरीत । हृदयकमळीं परमात्मा ।।८१|| म्हणे जाहलों मी सुप्रसन्न । महानंदे माग वरदान। ती म्हणे हे नगर उद्धरून। विमानी बैसवीं दयाळा ।।८२।। माताबंधूसमवेत । महानंदा विमानीं बैसत । दिव्य रूप पावोनि त्वरित । नगरासमवेत चालली ।।८३।।

पावलीं सकळ शिवपदीं। जेथें नाहीं आधिव्याधी। क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी। भेदबुद्धि कैंचि तेथें ।।८४।। नाहीं काम क्रोध द्वंद्व दुःख। मद मत्सर नाहीं निःशंका जेींचें गोड उदका अमृताहून कोटिगुणें ।।८५।। जेथे सुरतरूंचीं वर्ने अपारें। सुरींचीं बहुत खिल्लारें। चिंतामणींचीं धवलागारें। भक्तांकारणें निर्मिली ।।८६।। जेथे वोसणतां बोलती शिवदास । तें तें प्राप्त होय तयांस । शिवपद सर्वदा अविनाश। महानंदा तेथे पावली ॥८७॥ हे कथा परम सुरस। पराशर सांगे भद्रसेनास । म्हणे हे कुमर दोघे निःशेष । कुक्कुट मर्कट पूर्वीचे ।।८८।। कंठीं रुद्राक्षधारण। भाळीं विभूति चर्चुन । त्याच पूर्वपुण्येंकरून । सुधर्म तारक उपजले ।।८९।। हे पुढें राज्य करितील निर्दोष । बत्तीसलक्षणी डोळस । शिवभजनीं लवितील बहुतांस । उद्धरतील तुम्हांतें ।।९०।। अमात्यसहित भद्रसेन । गुरूसी घाली लोटांगण । म्हणे इतुकेन मी धन्य। सुपुत्र उदरींजन्मले ।।९१।। भद्रसेन बोलत पुढती। हे राज्य किती वर्षे करती आयुष्यप्रमाण किती। सांगा यथार्थ गुरुवर्या ||९२||

बहुत करितां नवस । येवढाच पुत्र आम्हांस । परम प्रियकर राजस । प्राणांहून आवडे बहु ।।९३।। तुमच्या आगमर्नेकरून । स्वामी मज समाधान । तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाण। सांगा स्वामी मज तत्त्वतां ।।९४।। ऋषि म्हणे मी सत्य बोलेन देख। परी तुम्हांसी ऐकतां वाटेल दुःख । हे सभा सकळिका द खार्णवीं पडेल पैं ।।९५।। प्रत्ययसदृश बोलावें वचन । नातरी अंगास येतें मूर्खपण। तुम्हां वाटेल विषाहून। विशेष कठीण ते गोष्टी ।।९६।। भद्रसेन म्हणे सत्य वचन । बोलावया न करावा अनमान । तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असती जाण पां ।।९७ ।। आजपासोनि सातवे दिवर्शी। मृत्यु पावेल या समयासी। राव ऐकतां धरणीसी । मूर्च्छा येऊनि पडियेला ॥९८।। अमात्यासहित त्या स्थानीं। दुःखाग्नींत गेले आहाळोनी। अंतःपुरीं सकळ कामिनी । आकांत करिती आक्रोशें ।। ९९।। करूनियां हाहाकार। वक्षःस्थळ पिटी नृपवर । मग रायासी पराशर। सावध करोनि गोष्ट सांगे ।।१००।।

नृपश्रेष्ठा न सोडी धीर। एक एक सांगतो विचार। जै पंचभूतें नव्हतीं समग्र । शशिमित्र नव्हते तें ||१|| नव्हता मायामय विकार । केवळ ब्रह्ममय साचार। तेथे झालें स्फुरण जागर। अहंब्रह्म म्हणोनियां ।।२।। ते ध्वनि माया सत्य। तेथोनि जाहलें महत्तत्त्व । मग त्रिविध अहंकार होत । शिवइच्छेकरूनियां ।।३।। सत्त्वांशें निर्मिला पीतवसन। रजांशें सृष्टीकर्ता दृहिण। तमांशें रुद्र परिपूर्ण। सर्गस्थित्यंत करविता ।।४।। विधीस म्हणे सृष्टि रचीं पूर्ण। येरू म्हणे मज नाहीं ज्ञान। मग शिवें तयालागून। चारी वेद उपदेशिले ।।५।। चहूं वेदांचे सार पूर्ण। तो हा रुद्राध्याय परम पावन । त्याहून विशेष गुह्यज्ञान । भुवनत्रयीं असेना ।।६।। बहुत करीं हा जतन । त्याहूनि आणिक थोर नाहीं साधन। हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून । श्रीशंकर स्वर्ये बोले ।।७।। जे रुद्राध्याय ऐकती पढती । त्यांच्या दर्शनें जीव उद्धरती। मग कमलोद्भव एकांतीं। सप्तपुत्रां सांगे रुद्र हा ।।८।।

मग संप्रदायें ऋर्षीपासोन । भूतळीं आला अध्याय जाण। थोर जप तप ज्ञान। त्याहूनि अन्य नसेचि ।।९।। जो हा अध्याय जपे संपूर्ण। त्याचेनि दर्शनेंत्तीर्थे पावन। स्वर्गीचे देव दर्शन । त्याचें घेऊ इच्छिती ।।११०।। जप तप शिवार्चन । याहूनि थोर नाहीं जाण। रुद्रमहिमा अगाध पूर्ण। किती म्हणोनी वर्णावा ।।११।। रुद्रमहिमा वाढला फार। ओस पडिलें भानुपुत्रनगर। पाश सोडोनि यमकिंकर। रिते हिंडों लागले ।।१२।। मग यमें विधीलार्गी पुसोन। अभक्तिकृत्या निर्मिली दारुण । तिणें कुतर्कवादीं भेदी लक्षून । त्यांच्या हृदयीं संचरली ।।१३।। त्यांसी मत्सर वाढविला विशेष । वाटे करावा शिवद्वेष । तेणें ते जावोनि यमपुरीस । महानरकीं पडले सदा ।।१४।। यम सांगे दूतांप्रती। शिवद्वेषी जे पापमती। ते अल्पायुषी होती। नाना रीतीं जाचणी करा ।।१५।। शिव थोर विष्णु लहान । हरी विशेष हर गौण। ऐसें म्हणती जे त्यांलागून। आणोनि नरकीं घालावें ।।१६।। रुद्राध्याय नावडे ज्यांसी। कुंभीपाकीं घालावें त्यांसी। रुद्रानुष्ठानें आयुष्यासी । वृद्धि होय निधरिं ।।१७।। याकरितां भद्रसेना अवधारी। अयुत रुद्रावर्तनें करीं। शिवावरी अभिषेकधार धरीं। मृत्यु दुरी होय साच ।।१८।।

अथवा शत घट स्थापून । दिव्य वृक्षांचे पल्लव आणून । रुद्रे उदक अभिमंत्रून । अभिषिंचन पुत्रा करी ।।१९।। नित्य दहा सहस्र आवर्तनें पूर्ण। क्षोणीपाळा करी सप्तदिन । रायें धरिले दृढ चरण। सद्गद होवोनि बोलत ।। १२० ।। सकळ ऋषिरत्नमंडित पदका स्वामी तूं त्यांत मुख्य नायका काळ मृत्यु भय शोका गुरु रक्षी त्यांपासूनी ||२१|| तरी त्वां आचार्यत्व करावें पूर्ण। तुजसर्वे जे आहेत ब्राह्मण । आणिक सांगसी ते बोलावून । आतांचि आणितो आरंभीं ||२२|| मग सहस्र विप्र बोलावून । ज्यांची रुद्रानुष्ठानीं भक्ति पूर्ण। न्यासध्यानयुक्त पढून । गुरूपासून जे आले ।।२३।। परदारा आणि परधन । ज्यांस वमनाहुनि नीच पूर्ण । विरक्त सुशील गेलिया प्राण। दुष्टप्रतिग्रह न घेती ।।२४।॥ जे शापानुग्रहसमर्थ। सामर्थ्यं चालों न देती मित्ररथ । किंवा साक्षात उमानाथ। पुढे आणोनि उभा करिती ||२५।। ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण। बैसला व्यासपिता घेऊन । सहस्र घट मांडून । अभिमंत्रोनि स्थापिले ।। २६ ।। स्वर्धनीचें सलिल भरलें पूर्ण। त्यांत आम्र-पल्लव घालून । रुद्रघोर्षे गर्जिन्नले ब्राह्मण । अनुष्ठान दिव्य मांडिलें ।॥२७।।

शास्त्रसंख्या झाले दिवस । सातवे दिवशीं माध्यान्हीं आला चंडांश।मृत्युसमय येतां धरणीस। बाळ मूर्च्छित पडियेला ||२८।। एक मुहूर्त निचेष्टित । चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ। गुरु देत नाभीकारा ||२९।। रुद्रोदक शिंपोन। सावध केला राजनंदन। त्यासी पुसती वर्तमान। वर्तलें तेंचि सांगत ॥१३०।। एक काळपुरुप भयानक थोर । ऊध्र्वजटा कपाळी शेंदूर। विक्राळ दाढा भयंकर। नेत्र खदिरांगारासारिखे ।।३१।। तो मज घेऊनि जात असतां । चौघे पुरुष धांवोनि आले तत्त्वतां । पंचवदन दशभुज त्यांची साम्यता। कमळभवांडी दुजी नसे ।।३२।।

ते तेजे जैसे गभस्ती। दिगंततम संहारिती। भस्म अंर्गी व्याघ्रांबर दिसती । दशहस्ती आयुध ।।३३।। ते महाराज येऊन । मज सोडविलें तोडोनि बंधन । त्या काळपुरुषासी धरून। करीत ताडण गेले ते ।।३४।। ऐसें पुत्रमुखींचे ऐकतां उत्तर। भद्रसेन करी जयजयकार । ब्राह्मणांसी घाली नमस्कार। आनंदाश्रू नेत्रीं आले ।।३५।। अंगीं रोमांच दाटले । मग विप्रचरणीं गडबडां लोळे । शिवनाम गर्जत तये वेळे। देव सुमनें वर्षती ।। ३६ ।। अनेक वाद्यांचे गजर। डंका गर्ने अवघ्यांत थोर। मुखद्वयार्ची महासुस्वर। मृदंगवार्थे गर्जती

॥३७॥ अनेक वाद्यांचे गजर। शिवलीला गाती अपार। शृंगें भृगे कहाळ थोर। सनया अपार वाजती ||३८|| चंद्रानना धडकती भेरी। नाद न माये। नभोदरीं। असो भद्रसेन यावरी। विधियुक्त होम करीतसे ।।३९।। षड्रस अन्ने शोभिवंत । अलंकार दिव्य वस्त्रे देत। अमोलिक वस्तु अद्भुत । आणोनि अर्पी ब्राह्मणांसी ।।१४०।। दक्षिणेलागीं भांडारें। मुक्त केलीं राजेंद्रे। म्हणे आवडे तितुकें भरा एकसरें। मार्गे पुढे पाहू नका ।।४१।। सर्व याचक केले तृप्त । पुरे पुरे हेचि ऐकिली मात। धनभार झाला बहुत । म्हणोनि सांडिती ठायीं ठायीं ।।४२।। ब्राह्मण देती मंत्राक्षता। विजय कल्याण हो तुझिया सुता। ऐसा अति आनंद होत असता। तो अद्भुत वर्तलें ।।४३।। वसंत येत सुगंधवनीं। कीं काशीक्षेत्रावरी स्वर्धनी। कीं श्वेतोत्पले मृडानी। रमणलिंग अर्चिजे ।।४४।। कीं निर्देवास सांपडे चिंतामणी। कीं क्षुधितापुढें क्षीराब्धी ये धांवुनी। तैसा कमलोद्भवनंदन ते क्षीं। नारदमुनि पातला ।।४५।।

वाल्मीक सत्यवतीनंदन । औत्तानपादी कयाधुहृदयरत्न । हे शिष्य ज्याचे त्रिभुवनीं जाण। वंद्य जे कां सर्वांतें ।।४६।। जो चतुःषष्टिकलाप्रवीणनिर्मळ । ज्यासी चतुर्दशविद्या करतलामळ । ज्याचे स्वरूप पाहतां केवळ । नारायण दुसरा कीं ।।४७।। हे कमळभवांड मोडोनि। पुनः सृष्टि करणार मागुतेनी। अन्याय विलोकितां नयनीं। दंडे ताडील शक्रादिकां ।।४८।। तो नारद देखोनि तेच क्षणीं। कुंडांतूनि मूर्तिमंत निघे अग्नि । दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी। उभे ठाकले देखतां ।।४९।। पराशरादि सकळ ब्राह्मण। प्रधानासहित भद्रसेन । धांवोनि धरिती चरण। ब्रह्मानंदें उचंबळले ।।१५०।। दिव्य गंध दिव्य सुमनीं। षोडशोपचारें पूजिला नारदमुनी। राव उभा ठाके कर जोडोनी । म्हणे स्वामी अतींद्रियद्रष्टा तूं ।॥५१॥ त्रिभुवनीं गमन तुझे सर्व। कांहीं देखिलें सांग अपूर्व। नारद म्हणे मागीं येतां शिव। दूत चौघे देखिले ।।५२।। दशभुज पंचवदन। तिंही मृत्यु नेला बांधोन। तुझ्या पुत्राचे चुकलें मरण। रुद्रानुष्ठानें धन्य केलें ।॥५३॥

तव पुत्ररक्षणार्थ ते वेळां । शिवें वीरभद्र मुख्य पाठविला । मज देखतां मृत्यूस पुसू लागला। शिवसुत ऐका तें ।।५४।। तूं कोणाच्या आज्ञेकरून । आणीत होतास भद्रसेननंदन । त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण। आयुष्य असे निश्चये ।।५५।। तो सार्वभीम होईल तत्त्वतां । रुद्रमहिमा तुज ठाऊक असतां । शिवमर्यादा उल्लंघुनि तत्त्वतां । कैसा आणीत होतासी ।।५६।। मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन। पत्रिका पाहिली वाचून । तंव द्वादशवर्षी मृत्युचिन्ह। गंडांतर थोर होतें ।।५७।। तें महत्पुण्यें निरसूनि सहज । दहा सहस्र वर्षे करावें राज्य । मग तो सूर्यनंदन महाराज। स्वापराधे कष्टी बहू ।।५८।। मग उभा ठाकून कृतान्त । कर जोडूनि स्तवन करीत । हे अपर्णाधव हिमनगजामात । अपराध न कळतां घडला हा ॥५९॥ ऐसें नारदे सांगतां ते क्षणीं। रायें पायांवर घातली लोळणी। आणिक सहस्र रुद्र करूनी। महोत्साह करीतसे ।।१६०।। शतरुद्र करितां निःशेष। शतायुषी होय तो पुरुष। हा अध्याय पढतां निर्दोष। तो शिवरूप याच देहीं ।। ६१।।

तो येथेंचि झाला मुक्ता त्याच्या तीर्थे तरती बहुत। असो यावरी ब्रह्मसुत। अंतर्धान पावला ।।६२।। आनंदमय शक्तिनंदन। रायें शतपद्म धन देऊन । तोषविला गुरु संपूर्ण। ऋर्षीसहित जाता झाला ।। ६३ ।। हें भद्रसेनआख्यान जे पढती । त्यांसी होय आयुष्य संतती। त्यांसी काळ न बाधे अंतीं। वंदोनि नेती शिवपदा।।६४।। दशशत कपिलादान। ऐकतां पढ़तां घड़े पुण्य। केलें असेल अभक्ष्य भक्षण। सुरापान ब्रह्महत्या ।।६५।। एवं महापापपर्वत तत्त्वतां । भस्म होती श्रवण करितां। हा अध्याय त्रिकाळ वाचितां। गंडांतरे दूर होती ।।६६।। यावरी कलियुगीं निःशेष। शिवकीर्तनाचा महिमा विशेष। आयुष्यहीन लोकांस। अनुष्ठान हेचि निधरि ।।६७।। मग तो राव भद्रसेन। सुधर्म पुत्रास राज्य देऊन। युवराजपद तारकालागून। देता झाला ते काळीं ।। ६८।। मग प्रधानासमवेत राव जाणा। जाता झाला तपोवना। शिवअनुष्ठान रुद्रस्याना। करितां महारुद्र तोषला ।।६९।। विमानी बैसवूनि त्वरित । राव प्रधान नेले मिरवीत । विधिलोक वैकुंठी वास बहुत । स्वेच्छेंकरूनि राहिले

।।१७०।। शेवटी शिवपदासी पावून। राहिले शिवरूप होऊन। हा अकरावा अध्याय जाण। स्वरूप एकादश रुद्रांचें ।। ७१।। हा अध्याय करितां श्रवण । एकादश रुद्रां समाधान। कीं हा कल्पद्रुम संपूर्ण। इच्छिलें फल देणार ॥७२।। मृत्युंजयजप रुद्रानुष्ठान । त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न। पिशाचबाधा रोग दारुण । न बाधीच सर्वथाही ।।७३।। येथे जो मानील अविश्वास। तो होईल अल्पायुषी तामस । है निंदी तो चांडाळ निःशेष। त्याचा विटाळ न व्हावा ।।७४।। त्यास प्रसवोनी वांझ झाली माता। त्याची संगती न धरावी तत्त्वतां । त्यासीं संभाषण करितां। महापातक जाणिजे ॥७५।। ते आपल्या गृहास न आणावें। आपण त्यांच्या सदनास न जावें । ते त्यजावे जीर्वेभावें। जेवीं सुशील हिंसकगृह ।। ७६।।

तो प्रत्यक्ष भक्षितो विष। जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस । त्यांसी मृत्यु आला या गोष्टीस। संदेह कांहीं असेना ।।७७।। असो सर्वभावें निश्चित । अखंड पहावें शिवलीलामृत । हे न घडे जरी त्वरित । हा अध्याय तरी वाचावा ।। ७८ ।। या अध्यायाचें करितां अनुष्ठान । तयासी नित्य रुद्र केल्याचें पुण्य । त्याचे घरीं अनुदिन । ब्रह्मानंद प्रकटेल ।।७९।। अपर्णाहृदयाब्जमिलिंद । श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद। जो जगदानंदमूळकंद। अभंग न विटे कालत्रीं ।।१८०।। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । एकादशाध्याय गोड हा ।।१८१।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।। ।। शुभं भवतु ।।

आज आहे समर्थ रामदास स्वामींची पुण्यतिथी!

 ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा  नववा अध्याय!

आजच्या अनुकूल दिवसाचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा!

श्री गजानन लीला गाथा १४ अध्याय (लहान पोथी)

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

श्री गजानन लीला गाथा १३ अध्याय (लहान पोथी)

 ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा पाचवा अध्याय !

१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..

 शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/

 हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!

Loading