Shivleelaamrit 12,13 Adhyay Marathi: शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा बारावा आणि तेरावा अध्याय!

Shivleelaamrit 12,13 Adhyay Marathi:कथा सारा सहित शिवलीलामृताचा १२,१३ अध्याय !

Shivleelaamrit 10,11 Adhyay Marathi: नमस्कार वाचकांनो,‘शिवलीलामृत’ हा एक दिव्य ग्रंथ आहे, जो भगवान शिवाच्या अलौकिक लीलांचे वर्णन करतो. या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण केल्याने भक्तांच्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि ऐहिक तसेच पारलौकिक कल्याण होते. शिवरात्रीच्या पवित्र काळात या ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

ग्रंथाचे पारायण करताना दररोज ठरावीक वेळी एक अध्याय वाचावा किंवा ऐकावा. जर कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन हा ग्रंथ ऐकू इच्छित असतील, तर स्पष्ट आणि सुस्वर वाचन करणाऱ्या व्यक्तीने तो वाचावा आणि इतरांनी श्रद्धेने ऐकावा. सप्ताह पूर्ण झाल्यावर प्रसाद वाटून ग्रंथाची कृपा सर्वांवर यावी, अशी भावना ठेवावी. ‘शिवलीलामृत’ या ग्रंथाच्या माध्यमातून भक्त भगवान शिवाच्या अगाध कृपेचा अनुभव घेऊ शकतात आणि आपले जीवन आनंदमय आणि समृद्ध बनवू शकतात.

तर आज या लेखात आपण शिवलीलामृताचा बारावा आणि तेरावा अध्याय पाहणार आहोत.

पोथी घरात सर्वांनी ऐकावी अशी इच्छा असेल तर ज्याला किंवा जिला स्पष्ट वाचन करता येत असेल त्याने किवा तिने रोज ठरावीक वेळी पोथी वाचावी व सर्वांनी ऐकावी, सप्ताह पूर्ण झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटावा,

ॐ नमः शिवाय या शिवमंत्राचा सर्वांनी त्या सप्ताहात त्या वेळी पोथीबाचनापूर्वी १०८ वेळा जप  करावा.

Shivleelaamrit 12,13 Adhyay Marathi: शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा बारावा आणि तेरावा अध्याय!

अध्याय बारावा बहुलेची व भस्मासुराची कथा

सुत म्हणाले, सन्बन हो। दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नानाप्रमाणेच अमंगल होते. तेथे राहणारे विदुर आणि बहुला हे बापण दापत्यही व्यभिचारी होते. विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळते व शेवटी पिशाचयोनीत टाकले. विध्याचलाच्या दऱ्याखोऱ्याऱ्यांत तहानभुकेने व्याकूळ होऊन तो पिशाचरूपात भटकू लागला विधवा बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणाचा आहे हेही तिला माहीत नव्हते. एकदा ती गोकर्णक्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली तेव्हा पुराणिकबुवानी व्यभिचारी वियाना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली.

तिने बुवाची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्ये सांगितली व त्यांच्या चरणांवर पडून ‘यातून सोडवा’ असे विनविले बुवांनी तिला नमः शिवाय।’ मंत्राचा उपदेश करून शिवलीला ऐकविल्या. त्यामुळे ती सप्रेम शिवभक्ती करू लागली, भक्तीने पवित्र झाली. शंकराने तिला शिवलोकी नेले. तेथे तिने उमामहेश्वराची स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला बर मागण्यास सागितले असता तिने ‘पतीचा उद्वार व्हावा’ अशी इच्छा प्रकट केली त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विध्याचलावर पिशाचरूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकवून तिने त्याचा उद्धार केला.”

सूत पुढे म्हणाले, “एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला. त्यापासून जो असुर उत्पन्न झाला त्याचे त्यांनी ‘भस्मासुर नाव ठेवले व त्याला नित्य नवीन चिताभस्म आणून देण्यास सांगितले. ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट कराबी लागे म्हणून त्याने शंकरांकडे ‘मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे’ असा पर मागितला. सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून त्यांनी तो वर दिला. त्यामुळे तो उन्मत्त झाला.

त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला. त्याने भूलोकी थैमान घातले. तेव्हा प्रजाजनांनी विष्णूकडे धाव घेतली. त्याने त्यांना कैलासावर नेले. तेवढ्यात भस्मासुर तेथे आला व शंकरांच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला. तेव्हा शंकरानी पळ काढला. त्या वेळी भवानीच्या विनंतीवरून विष्णूने मोहिनीरूप धारण केले आणि भस्मासुराला आपल्या मोहजालात अडकवून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वतः समवेत नृत्य करावयास लावले. ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचे क्षणात भस्म झाले.”

।। श्रीशिवलीलामृत अध्याय बारावा ।। 

श्रीगणेशाय नमः 

।। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण। ब्रह्मचारी गृहस्र वानप्रस्थ पूर्ण। स्त्री बाल वृद्ध तरुण। सवीं शिवकीर्तन करावे ।।१। शिवस्मरण नावडे अणुमात्र। तो अंत्यजाहूनि अपवित्र । तो लेइला वर्खे अलंकार। जेवीं प्रेत शृंगारिलें ||२|| तेणें भक्षिलें जें अन्न। जैसें पशु भक्षिती यथेष्ट तृण। जैसे मयूराअंगी नयन। तैसेच नेत्र तयाचे ।।३।। वल्मीक-छिद्रवत कर्ण। दूमशाखावत हस्त चरण । त्याची जननी व्यर्थ जाण। विऊनि वांझ जाहली ।।४।। जो शिवभजनावीण। तो जाबो समुद्रांत बुडोन। अथवा भस्म करो वडवाग्न । कां सर्प डंखो तयासी ||५|| तरी श्रवणीं धरावी अ आवडी। जैसी पिपीलिका गुळासी न सोडी। अर्ध तुटे परी न काढी। मुख तेथूनि सर्वदा ।।६।।

कीं चुकला बहुत दिवस सुत। तेवढाच पोटीं प्रीतिवंत । त्याची शुभवार्ता ऐकतां अकस्मात। धांवती मातापिता जेवीं ।।७।। अमृताहूनि वाड। गोष्टी लागती कर्णास गोड। तैसें कथाश्रवणीं ज्यांचे न पुरे कोड। सर्व टाकोनि जाईजे ।।८।। गांवास गेला प्राणनाथ। प्रिय पतिव्रता वाट पहात । तो पत्र आलें अकस्मात । धावे श्रवण करावया ।।९।। निर्धनासि सांपडे धन। कीं जन्मांधासी आले नयन। कीं तृषेनें जातां प्राण। जीवन शीतळ मिळालें ।।१०।। ऐसें ऐकावया कथा पुराण। धावावें सर्व काम टाकून । चिंता निद्रा दूर करून। श्रवणीं सादर बैसावें ।।११।। वक्ता पंडित चातुर्यखाणी। नमावा तो सद्‌गुरु म्हणोनि । कीं हा शंकरचि मानूनी। धरिजे पूजनीं आदर ।।१२।। 

सुरभीच्या स्तनांतूनि अवधारा। सुटती जैशा सुधारसधारा। तैसा वक्ता वदतां शिवचरित्रा। कर्णद्वारें प्राशिजे ।।१३।। वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत । न पुसावें भलतें पाखंड मत। नसते कुतर्क घेब्रोनि चित्त । न शिणवावें सर्वथा ।।१४।। न कळे तरी पुसार्वे आदर। सांगेल ते श्रवण करावें सादरें। उगेंच छळितां पामरें। तरी ते पिशाचजन्म पावर्त ।।१५।। वक्त्यासी छळितां अवधारा । तरी दोष घडे त्या नरा। पुराणिकावेगळे नमस्कारा । न करावें सर्भत कोणासी ||१६|| मध्येच टाकून कथाश्रवण । उगाच गर्वे जाय उठोन । तरी तो अल्पायुषी जाण। संसार आपदा बहु भोगी ।।१७।। कुटिल खळ पापी धूर्त। तो मुख्य श्रोताकरावा यथार्थ। दुग्ध पितां सर्वांगीं पुष्ट होत। परी नवज्वरिता विषवत तें। ।।१८।। तैसा श्रवणीं बैसोन। कुतर्क घेवानि करी कथाखंडन। त्याचें व्यर्थ गेले श्रवण । नरकासी कारण पुढे केलें ।।१९।। 

कर्थेत न बोलावें इतर । मन करावे एकाग्र। कथेची फलश्रुती साचार। तरीच पावती बैसतां ।।२०।। वस्त्रे अलंकार दक्षिणासहित। वक्ता पूजावा प्रीतीं अत्यंत। धन देतां कोश बहुत। भरे आपुला निधर्धारं ।।२१।। रत्ने देतां बहुत। नेत्र होती प्रकाशवंत । अलंकारें प्रतिष्ठा अत्यंत । श्रोतयांची वाढतसे ।।२२।। एवं पूजितां षोडशोपचार। तेणें तुष्टमान होय उमावर। जे जे पदार्थ अर्पावे साचार। त्यांचे कोटिगुणें प्राप्त होती ।।२३।। त्यासी कदा नाहीं दरिद्र। शेवटीं स्वपदा नेईल भालचंद्र। कथेसी येतां पाऊले टाकी निर्धार। पापसंहार पदोपदीं ।। २४।। मस्तकीं उष्णीष घालूनि ऐकती। तरी जन्मांतरीं बाळपक्षी होती। म्हणाल उष्णीष काढितां न ये सभेप्रती । तरी मुख्य पल्लव सोडावा ।। २५ ।। 

जे विडा, घेवोनि ऐकती। तरी यमकिंकर त्यांसी जाचिती । नाना यातना भोगविती। मूळ व्यासवचन प्रमाण है ।। २६ ।। एक बैसती उगेच श्रवणीं। निद्रा मोडावी बहुत प्रकारेकरूनी। अंतर सद्गद नेत्रीं यावें पाणी। मग निद्रा कैची स्पर्शल ||२७।। वरी जीवन कार्य व्यर्थ लावून । जैसें एकांतीं द्रव्य आपुलें पूर्ण। तेथे घडतां जागरण। निद्रा न ये प्राणियां ।। २८ ।। निद्रा लागली दारुण। तरी उभे ठाकावें कर जोडून । निद्रा न ये तो उपाय करून । मुख्य श्रवण करावें ।। २९।। वक्त्याहूनि उंच आसन तत्त्वतां । तेथें न बैसार्वे धरूनि अहंता। हें न मानिती ते काग तत्त्वतां । जगपुरीष भक्षिती ||३०|| जे बैसती वीरासन घालून । ते होती वृक्ष अर्जुन । पाय पसरिती त्यांस सूर्यनंदन। शुष्ककाष्ठे झोडी बळें ।।३१।। 

जे सांगतांही न ऐकती। बळेंच जेठा घालूनि बैसती। त्यांसी यमदूत बांधोनि नेती। नेऊन टाकिती नरककुंडीं ।।३२।। जो श्रवणीं निजे दाटून। तो उपजे अजगर होऊन। बैसे नमस्कार केलिया वांचून । वंशवृक्ष होय तो ॥३३॥ कर्थेत बोले भलत्या गोष्टी। तो मंडूक होय सदा वटवटी । हर्षे टाळिया न वाजवी हट्टी। हो कष्टी संसारीं ।॥३४।। जे शिवकीर्तन हेळसिती ।। ते शतजन्मीं सारमेय होती। दुरुत्तरें बोलती निश्चितीं। जन्मा येती सरड्याच्या ।।३५।। जे श्रवर्णी न होती सादर । ते अन्य जन्मीं होती सूकर। जे उच्छेदितीशिवचरित्र। ते वृकयोनी पावती ॥३६॥ वक्त्यासी देतां आसन शिवसन्निध वैसे जावोन। वखे देतां अन्न। प्राप्त होय तयातें ।।३७।। करित कधापुराण श्रवण। भक्ति वैराग्य ये अंगी पूर्ण। यदीं कथा सुगम जाण जेणें अनुताप उपजे मनीं ।।३८।। दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ। त्याचें नांव मुठींच बाष्कळ । सर्वधर्मविवर्जित केवळ । स्त्री-पुरुष जारकमीं ।।३९।। 

धर्म नाहींच अणुमात्र। अनाचारी परम अपवित्र। जप-तप विवर्जित अग्निहोत्र। वेद-शास्त्र कैचें तेथे ।।४०।। वेद आणि शास्त्र। हे विप्राचे उभय नेत्र। एक नाहीं तरी साचार। एकाक्ष तयासी बोलिजे ।।४१।। वेद-शास्त्र उभयहीन। तो केवळ अंधचि जाण । असो त्या नगरींचे लोक संपूर्ण । सर्व लक्षर्णी अपवित्र ।।४२।। तस्कर चाहाड आणि जार। मद्यपी मार्गघ्न दुराचार। मातापितयांचा द्रोह करणार। एवं सर्वदोषयुक्त जे ।।४३।। त्या ग्रार्मीचा एक विप्र । नाम तयाचें विदुर । वेश्येसी रत अहोरात्र। कामकर्दमर्मी लोळत ।।४४।। त्याची त्वी बहला नाम। तीही जारिणी अपवित्र परम। एके जारार्सी असत सकाम। भ्रतारें जपोनि धरियेली ॥४५।।

जार पळाला सत्वर। तीस भ्रता दिधला मार। यथेष्ट लत्तामुष्टिप्रहार। देतां बोले काय ते ।।४६।॥ म्हणे तूं झालासी जार। मीही तेंचि करितें निरंतर । मग बोले तो विप्र विदुर । तुवां द्रव्य अपार मेळविलें ।।४७।। तें द्रव्य दे मजलागून। मी देईन वारांगनेसी नेऊन । ती म्हणे मी देऊं कोठून। ऐकतां मारी पुढती तो ।।४८।। मग तिचे अलंकार हिरोनि घेत । घरची सर्व संपत्ति नेत। ते वारांगनेसी देत। तेही समर्पी जारातें ।।४९।। ऐसीं दोघेहीं पायें आचरत। तों विदुर विप्र पावला मृत्यु। यमदूर्ती नेला मारीत । बहुत जाचिती तयातें ।।५०।। कुंभीपाकादि परम दुःख । भोगूनियां तो शतमूर्ख। मग विंध्याचळाच्या दरींत देख। भयानक पिशाच जाहला ।।५१।।

आळेपिळे अंगासी देत । हिंडे क्षुधातृषापीडित । रक्तवर्ण अंग त्याचें समस्त । जेंवी शेंदूर चर्चिला ।।५२।। वृक्षासी घेत टांगून । सर्वेचि हांक देत फिरे वन । रक्तपिती भरोन । सर्वांग त्याचें नासलें ।।५३।। कंटकवन परम दुर्धर। न मिळे कदा फलमूलआहार। आपुल्या पापाचे भोग समग्र । भोगी विदुर विप्र तो ।।५४।। इकडे बहुला धवरहित। एक होता तियेसी सुत। तो कोणापासोनि झाला त्वरित । तेंस्मरण नाहीं तियेसी ।।५५।। तंव आलें शिवरात्रिपर्व। गोकर्ण यात्रेस चालिले सर्व। नाना वायें वाजती अभिनव । ध्वजा पताका मिरवती ।।५६।। शिवनामें गर्जती दास । वारंवार करिती घोष। कैचा उरेल पापलेश। सर्वदा निर्दोष सर्व जन ।।५७।। त्यांच्या संगती बहुला निघत। सर्वे घेवोनि धाकटा सुत। गोकर्ण क्षेत्र देखिलें पुण्यवंत। झाले पुनीत सर्व जन ।।५८।। 

बहुलेन स्नान करून । घेतलें महाबळेश्वराचे दर्शन। पुराणश्रवणीं बैसली येऊन। तों निरूपण निघालें ।।५९।। जी वनिता जारीण । तीस यमदूत नेती धरोन । लोहपरिघ तप्त करून। स्मरगृहामाजी घालिती ।।६०।। ऐसें बहुला ऐकोनी। भयभीत झाली तेच क्षणीं। अनुताप अंगीं भरोनी। रडों लागली अट्टाहासें ।।६१।। मग पुराणिकासी समस्त । आपुला सांगे वृत्तान्त। झाले जे जे पापांचे पर्वत । ते निजमुखें उच्चारी ।। ६२ ।। अंतकाळीं यमकिंकर । ताडण करतील मज अपार। ते वेळीं मज कोण सोडविणार। दुःख अपार सोसू किती ।।६३।। स्वामी माझें कांपतें शरीर। काय करूं सांगा विचार। गळां पाश घालूनि यमकिंकर । करिती मार तप्तशस्त्रे ।। ६४।। नानापरी विटंबविती। आसप्रचलनी हिंडविती । उफराटे बांधोनि टांगिती। नरककुंडी अधोमुख ।।६५।।

ताम्रभूमि तापवून । त्यावरी लोळविती नेऊन । तीक्ष्ण शस्त्रे आणोन । पोटामाजी खोंविती ।। ६६ ।। तीक्ष्ण धूम्र करून। वरी टांगिती नेऊन । भूमींत मज रोवून । तप्तशरें मार करिती ।। ६७ ।। तप्तशूळावरी घालिती। पार्टी चंडशिळा बांधिती । महानरकीं बुडविती। सोडवी कोण तेथुनि ।।६८।। बहुलेसी गोड न लागे अन्न । दुःखें रडे रात्रंदिन। म्हणे मी कोणास जाऊं शरण। आश्रय धरूं कोणाचा ।। ६९।। कोण्या नरकीं पडेन जाऊन । मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण। सदूरु मज तारी येथून । आलें शरण अनन्य मी ।।७०।। मग गुरु पंचाक्षर मंत्र। सांगे बहुलेप्रती सत्वर । शिवलीलामृत सुरस फार। श्रवण करवी शिवद्वारीं ।।७१।। मग तिर्णे सर्व ग्रंथ। गुरुमुखें ऐकिले प्रेमयुक्ता श्रवण भक्ति अवघ्यांत । श्रेष्ठ ऐसें जाणिजे ।।७२।। सत्संगें होय निःसंग। निःसंगें निर्मोह सहज मग । निर्मोहत्वें निश्चित उद्वेग। कैंचा मग तयासी ।। ७३।।

बहला झाली परम पवित्र । शिवनाम जपे अहोरात्र । दोष न उरे तिळमात्र । शूचिर्भूत सर्वदा ।।७४।॥ तव्याचा जाय बुरसा। मग तोसहजचि होय आरसा । कीं लोह लागतां परिसा । चामीकर सहजचि ।।७५।। की अग्नीत काष्ठ पडले। मग ते सहजचि अग्निमय झालें। गंगेसी बोहळ मिळाले। गंगाजळ सहजचि ।। ७६।। जप करितां पाप जाय निःशेष । ज्ञानाहूनि ध्यान विशेष । श्रवणा‌ह्नि मननास । सतेजता सहजचि ।।७७।। मननाहूनि निजध्यास। त्याहूनि साक्षात्कार समरस। मग तो शिवरूप निर्दोष। संशय नाही सर्वथा ।। ७८ ।। बहला निर्दोष होऊन। श्रवणे झाली सर्वपावन। जिव्हेने करू लागली शिवकीर्तन। मग कैचे बंधन तियेसी ।।७९।। श्रवणे थोर थोर पावन होत । श्रवणे याच जन्मी मुक्तत्र नलगे तीर्थाटन श्रम बहुत। श्रवणे सार्थक सर्वही ।।८०।।

ज्यासी न मिळे सत्समागम श्रवणा त्यानें करूं जावें तीर्थाटन । नलगे अष्टांगयोगसाधन । करावें श्रवण अत्यादरें ||८१।। योग याग व्रत साधन। नलगे कांहींच करावें जाण। नवविधा भक्ति पूर्ण। श्रवर्णेचि हाता येतसे ।।८२।। चारी वर्ण चारी आश्रम। श्रवणेंचि पावन परम। असो बहलेसी संतसमागम । सर्वानि थोर वाटे ।।८३।। गुरूची सेवा अखंड करी। त्यावरी राहिली गोकर्णक्षेत्री। जटावल्यन अजिनधारी। तीधी करी नित्य स्नान ||८४|| सर्वांगी भस्मलेपन। करी पुण्यरुद्राक्षघारण। सर्व आप्त सोडोनियां जाण। गुरुसेवा केली तिनें ।।८५।। नित्य गोकर्णलिंगाचे दर्शन । गोकर्णक्षेत्र पुण्यपावन । तेींचा महिमा विशेष पूर्ण। तृतीयाध्यायीं वर्णिला ।।८६।। 

स्वयातिकीर्तिपुष्टिवर्धन। बहुलेने तिन्ही देह जाळून। तेंचि भस्म अंगीं चर्चुन । झाली पावन शिवरूपीं ।।८७।। शंकरें विमान धाडिले ते काळीं। बहुला शिवपदाप्रती नेली। एवढी पापीण उद्धरिली । चतुर्दश लोक नवल करिती ।।८८।। सदाशिवापुढे जाऊन । बहुलेनें केलें बहुत स्तवन। मग अंबेची स्तुति करितां पावन । झाली प्रसन्न हिमनगकन्या ।।८९।। म्हणे इच्छित वर माग त्वरित । येरी म्हणे पति पडला अधोगतींत । कोठें आहे नकळे निश्चित । पावन करोनि आर्णी येथे ।।९०।। मग ते त्रिजगज्जननी। अंतरीं पाहे विचारूनी । तो विंध्याचळीं पिशाच होऊनि । रडत हिंडे पापिष्ट ||९१|| मग बहलेसी म्हणे भवानी। जाई सर्वे तुंबर घेऊनी। पतीस आणी विंध्याद्रीहुनी। श्रवण करवीं शिवकथा ||९२।। मग गेली विंध्याचळा। तंव पिशाच नग्न देखिला । धरोनि वृक्षासी बांधिला।तुंबरे बळेकरोनियां ।। ९३।।

मग वल्लकी काढून । सप्तस्वर मेळवून । आरंभिले शिवकीर्तन । ऐकतां पशुपक्षी उद्धरती ।।९४।। शिवकीर्तनरसराज । तुंबरें मात्रा देतां सतेज । सावध झाला विदुर द्विज। म्हणे मज सोडा आतां ।।९५।। मग सोडितांचि धांवोन। धरिले तुंबराचे चरण। म्हणे स्वामी धन्य धन्य । केलें पावन पापियातें ।।९६।। स्त्रियेसी म्हणे धन्य तूं साचार। केला माझा आजि उद्धार। मग तुंबरें शिवपंचाक्षर। त्यासी मंत्र उपदेशिला ।। ९७।। त्याचा करितां जप। तंव विमान आलें सतेजरूप। विदुर झाला दिव्यरूप। स्त्रीसहित विमानीं बैसला ।।९८।। आणिलीं शिवापाशीं मिरवीत । दोघेही शिवचरणीं लागत । लवण जळीं विरत । तैसीं मिळत शिवरूपीं ।। ९९।। जळीं विराली जळगार। नीं नाद विरे सत्वर । तैसीं बहुला आणि विदुर । शिवस्वरूप जाहलीं ।।१००।।

ज्योति मिळाली कर्पूरी। गंगा सामावली सागरीं। ब्रह्मस्वरूपीं निर्धारीं। विरालीं ऐक्य होऊनियां ||१|| शिवमंत्र शिवकथाश्रवण । शिवदीक्षा रुद्राक्षधारण। भस्मलेपर्ने उद्धरोन। गेली किती संख्या नाहीं ।।२।। भस्मांतूनि निघाला भस्मासुर । शिवद्रोही परम पामर। त्याचा कैसा केला उद्धार। ते चरित्र सांगा कैसें ।।३।। हे शिवपुराणी कथा सुरस। श्रोतीं ऐकावी सावकाश । कैलासीं असतां महेश। प्रदोषकाळीं एकदां ।।४।। भस्म स्वकरी घेऊन। अंगीं चचीं उमारमण । तंव एक खडा लागला तो शिवें जाण। भूमीवर ठेविला ।।५।। नवल शिवाचें चरित्र । तेथेंचि उत्पन्न झाला असुर । नाम ठेविलें भस्मासुर। उभा सदा कर जोडुनि ।।६।। 

म्हणे वृषभध्वजा सदाशिवा। मज कांहीं सांगिजे सेवा। शंभु म्हणे मज नित्य येधवां । चिताभस्म आणोनि देईजे ।।७।। नित्य नूतन आर्णी भस्म। हीच सेवा करी उत्तम। ऐसी आज्ञा होतां परम। भस्मासुर संतोषला ।॥८॥ कर्मभूमीस नित्य येवोन। वसुंधरा शोधी संपूर्ण। जो शिवभक्तपरायण। लिंगार्चन घडलें ज्यासी ||९|| शिवरात्री सोमवार प्रदोष । सदा ऐके शिवकीर्तन सुरस । त्याचेंच भस्म भवानीश। अंगिकारी आदरें ।।११०।। जे कां भक्त अभेद प्रेमळ । त्यांच्या मुंडांची करी माळ । स्मशानीं वैराग्य वाढे प्रबळ । म्हणोनि दयाळ राहे तेथें ।।११।। लोक स्मशानाहूनि घरा येती। वैराग्य जाय विषर्थी जडे प्रीती। म्हणोनि उमावल्लभे वस्ती। केलीमहास्मशानी ।।१२।। पंचभूतें तत्त्वांसहित। पिंडब्रह्मांड जाळोनि समस्त । सर्व निरसूनि जे उरत। स्वात्मसुख भस्म त्तेचि ।।१३।। तेचि ब्रह्मानंदसुख सोज्वळ । ते भस्म चचीं दयाळ। तो अमूर्तमूर्त कृपाळ। षड्विकाररहित जो ।।१४।।

अस्ति जायते वर्धते विपरिणमते। अपक्षीयते निधन षड्विकार समस्त। शिव परब्रह्म शाधत। विकाररहित निर्विकार जो ॥१५॥ जो षड्‌गुणेश्वर्यसंपन्न । यश श्री कीर्ति विज्ञान। औदार्य वैराग्य संपूर्ण। ऐसे कोठे असेना ।।१६।। आणिक षट्चिन्ही मंडित। ती ऐका सर्वज्ञ पंडित। कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व । विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै ।।१७।। या चिन्हीं मंडित शुद्ध। शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद। मायाचक्रचाळक शुद्ध। त्रिविधभेदरहित जो ।।१८।। भक्तरक्षणार्थ सगुण। शंभु झाला चैतन्यघन । तेणे भस्मासुर निर्मून। धाडिला भस्म आणावया ।।१९।। ऐसें नित्य आणितां चिताभस्म । असुर मातला मर्दे परम । गो-ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम । म्हणे संहारूनियां टाकू हे ।।१२०।। हे संहारूनियां सकळ । असुरराज्य करावे सबळ। जाऊनियां निर्जरमंडळ । शक्र कमलोद्भव जिंकावे ॥२१॥ विष्णु आणि धूर्जटी। हेही संहारावे शेवटी । त्रिभुवन जिंकिल्यापाठीं। मीच इंद्र होईन ||२२|| 

ऐसी मनी बांधोनि गांठीं। कैलासा गेला तो कपटी । म्हणे ऐकतोसी धूर्जटी। भस्म सृष्टी न मिळे कोठें ।।२३।। चार लक्ष मनुष्ययोनी पाहे। नित्य सव्वालक्ष घडामोड होये। शोधिली सर्व अवनी हे। परी भस्म शुद्ध न मिळेचि ||२४|| ऐसी कपटभक्ती दावी परम। म्हणे माझा टळतो नित्यनेम । तुज अर्पावें चिताभस्म । तरी एक वर्म सुगम असे ॥२५॥ म्हणे हरा पंचवदना। विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना। उमावल्लभा नागभूषणा । वरप्रदान दे मातें ।।२६।। मज देई एक वर। ज्याच्या माथां ठेवीन कर। तो भस्म व्हावा निर्धार। कार्य फार साधे येणें ॥२७।। म्हणोनि लोटांगण घालीत । इतुके माझे चालवीं व्रत । निष्कपट शिव भोळानाथ। वर द्यावया सिद्ध झाला ।। २८ ।। मग बोले हिमनगराजकुमारी। हा नष्ट परम दुराचारी। यासी वर देतां धरित्री। भस्म करील निर्धारं ।।२९।। महाशब्द करावयाची हौस । तो पातला फाल्गुन मास। आधींच वाटपाड्या चोरास । निरोप दिधला भूभुजें ॥१३०।।

 आधींच जारकर्मी रत। त्यासी प्रभुत्व दिधलें स्त्रीराज्यांत । कीं मद्यपियासी दावीत ।सिंदीवन साक्षेपें ।।३१।। मर्कटासी मद्यपान । त्यांत झाले वृश्चिकदंशन।। त्याहीवरी भूत संचरलें दारुण। मग अन्योन्य वर्ते जेवीं ।।३२।। यालागीं हा तामसी असुर। यास न द्यावा कदापि वर। षडास्य गजास्य वीरभद्र। नंदिकेश्वर हेचि सांगे ॥३३॥ परम भोळा शंकर। म्हणे आमुचे लेकरू भस्मासुर। यास द्यावा अगत्य वर। तो अन्यत्र राहाटी न करीच ||३४|| म्हणे बाळका तुज दिधला वर। ऐसे ऐकतांचि असुर । उडे नाचे आनंद थोर। त्रिभुवनामाजी न समाये ।।३५।। मृत्युलोकासी आला सत्वर। मग करीत चालिला संहार। संत भक्त गो विप्र । शोधूनि भस्म करीतसे ।।३६।। मस्तकीं हस्त ठेवितां तत्काळ । भस्म होय नलगे वेळ । ऋषिचक्र शोधूनि सकळ । भस्म करी एकदांचि ।। ३७।।

छप्पन्न देश शोधित । चमूसहित भूभुज समस्त । भस्म करी क्षणांत। थोर अनर्थ ओढवला ||३८|| कुटुंबासहित ब्राह्मण। गिरिविवरी बैसती लपोन । पृथ्वी उद्वस संपूर्ण । बाहेर कोणी न फिरेचि ।।३९।। जैसा श्येनपक्षी अकस्मात । पक्षी धरोनि संहारीत। तैसा अंतरिक्ष येवोनि त्वरित । मस्तकीं हस्तस्पर्श करी ।।१४०।। महायोद्धा रणपंडित । समरी जिंकी कृतान्त। परी भस्मासुरापुढे बलहत। कांहींच न चले युक्ति त्या ।।४१।। जैसा पाखांडी खळ तत्त्वतां । तो नावरे बहुतां पंडितां । तैसी त्या असुरापुढे पाहतां । न चले युक्ति कवणाची ।।४२।। असुर करितो नित्य संहार। शिवासी न कळे समाचार। भस्म नेऊनि दे सत्वर । महानम्र होय तेथे ।।४३।। सर्वेचि ये मृत्युलोका। मर्नी धरिला ऐसा आवांका। त्रिदशांसहित शचीनायका । भस्म करावें यावरी ।।४४।।

मग कमलोद्भव कमलावर । शेवटीं भस्म करावा गंगाधर। उमा त्रिभुवनांत सुंदर। हिरोनी घ्यावी वृद्धाची ।।४५।। पृथ्वी पडली उद्वस। मिळाल्या प्रजा ऋषी आसमास । सर्वांचे भय पावलें मानस । पुरुहूतास शरण आले ।।४६।। मग मघवा सकळांसहित ।। पद्मजाप्रति गाऱ्हाणें सांगत। तो म्हणे क्षीराब्धिजामात। त्यास सांगू चला आतां ।।४७।। अक्षज नाम इंद्रियज्ञान । तें ज्यानें केलें आर्धी दमन। म्हणोनि अधोक्षज नाम त्यालागून । अतींद्रियद्रष्टा तो ।।४८।। ऐसा जो अधोक्षज । जवळी केला वैकुंठराज। गाऱ्हाणें सांगती प्रजा द्विज। भस्मासुराचें समस्त ।।४९।। 

मग समस्तांसहित नारायण। शिवाजवळी सांगे वर्तमान । भस्मासुरेंजाळून। भस्म केले सर्वही ॥१५०॥ उरली आम्ही समस्त तुक्यांचाही करील अंत। सदाशिवा तुझाही प्रांत। बरा न दिये आम्हांत ॥५१॥ हैमवती करी जतन। ऐकोनि हांसला माललोचना म्हणे भस्मासुरास मरण। जवळी आले यावरी ।।५२।। तुम्ही जावें स्वस्थाना सत्यर। ऐसे बोले जो करगीर। तो अकस्मात आला असूर। भरम घेऊन तेधवां ॥५३॥ आपुले गा आणिले येथ। मिळाले ते देखिले समस्त । अयुर मान तुकावीत। सरपाऐसी तयांवरी ।।५४|| म्हणे जे जे आले येथ। उद्यां भस्म कटरीन समस्त। मग क्रोधे बोले उमानाथ। भस्मासुरासी तेधवां ॥५५॥ अरे में अधम असुर। केला पृथ्वीचा संहार। तुज आम्हीं दिधला वर। परिणाम त्याचा बरा केला ।।५६।। असुर क्रोधे बोले ते समयीं। तुझी सुंदर दारा मज देई। नातरी तय मस्तकीं लवलाहीं। हस्त आतांचि ठेवितों ।।५७।। 

भवानी उठोन गेली सदनांत । असुर ग्रीवा तुकावीत । शिवाच्या माथां ठेवोनि हस्त। तुज नेईन क्षणार्थे ।।५८।। शिवमस्तकीं ठेवावया कर। वेगें धांविन्नला भस्मासुर । प्रजा आणि ऋषीश्वर। पळू लागले दशदिशा ॥५९॥ जो भक्तजनभवन मायालापत्री उमारंग। पळता झाला सवेग। घोरांदर वन घेतले ।।१६०।। पाठीं लागला भस्मासुर । म्हणे जोगडया उभा घरी धीर। आजि तुझा करीन संहार। रक्षा लावीन अंगासी ।।६१।। वेदशास्त्रां न कळे पार। मायाचक्रचाळक अगोचर। त्यास पामर भस्मासुर । धरीन म्हणे निजबळ ।।६२।। जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान। सनकादिकांचे देवतार्चन । त्यास भस्मासुर आपण। धरीन म्हणे पुरुषार्थे ।। ६३ ।।

त्यास वाटे धरीन मी आतां। दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा। ऐसा कोटि वर्षे धांवतां । न लगे हाता सर्वेश्वर ।।६४।। उणे पुरे शब्द बोलत। शब्दां नातुडे गिरिजाकांत। तर्क कुतर्क करितां बहुत । हांक फोडितां नातुडे ॥६५॥ वेदशास्त्रांचा तर्क चांचरे। घोकितां शास्त्रज्ञ झाले म्हातारे। सकळ विद्या घेर्ता एकसरें। मदनांतक नाटोपे ।।६६।। जे प्रेमळ शुद्ध भाविका त्यांचा विकला कैलासनायका उमेसहित त्यांचे घरीं देख। वास करी सर्वदा ।। ६७ ।। तप बळ विद्या धन। या बळें धरूं म्हणती ते मूर्ख पूर्ण। कल्पकोटि जन्ममरण। फिरतां गणित न होय ।।६८।। असो अहंकारें भस्मासुर । धांवतां नाटोपे शंकर। इकडे भवानीइंदिरावर। बंधु आपुला स्तवी तेव्हां ।।६९।। म्हणे कमलोद्भवजनका कमलनयना। कमलनाभा असुरमर्दना। कमलधारका शेषशयना। कमलाभरणा कमलाप्रिया ।।७०।।

जगद्वंद्या जगद्वयापका । जनजराजन्ममोचका। जनार्दना जगरक्षका। जगदुद्वारा जलाब्धिशयना ।। ७१॥ ऐसें ऐकतां माधव। मोहिनीरूप धरूनि अभिनव । शिवमनरंजन केशव। आडवा आला असुरातें ।।७२।। शिव न्यग्रोध होऊन देख। दुरून पाहता झाला कौतुक्का मोहिनी देखतां असुर निःशंका भुलोनि गेला तेधवां ।। ७३।। विमार्नी पाहती समस्त देव। म्हणती है कैर्चे रूप अभिनव । अष्टनायिकांचे वैभव । चरणांगुष्ठीं न तुळेचि ।। ७४।। नृत्य करीत मोहिनी। असुर तन्मय झाला देखोनी। म्हणे ललने तुजवरूनी। कमला अपर्णा ओवाळिजे ।।७५।। 

तुझे देखतां वदन । वाटे ओंवाळूनि सांडावा प्राण। तुवां नयनकटाक्षबार्णेकरून । मनमृग माझा विंधिला ।। ७६।। तुझे पदकमळ जेथे उमटलें। तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे। तुवां पसरोनि शृंगारजाळें। आकळिलें चित्तमीना ।। ७७ ।। मज माळ घाली सत्वर। तुझे दास्य करीन निरंतर । मायावेषधारी मुरहर। हास्यवदन बोलतसे ।।७८ ।। म्हणे मी तुज वरीन त्वरित । पैल तो न्यग्रोधतरु दिसत। माझे त्यांत आहे आराध्य दैवत । नवस तेथे केला म्यां ।। ७९ ।। लग्नाआधीं पतिसहित । तेथे करावें गायन नृत्य । परी मी जेथे ठेवीन हस्त। तुवां तेर्थेचि ठेवावा ।।१८०।। मी जे दावीन हावभाव । तूंही तैसेच दार्वी सर्व । तेथे अणुमात्र उणें पडतां देव। क्षोभेल मग तुजवरी ।।८१।। महाखडतर माझे दैवत । सकळ ब्रह्मांड जाळील क्षणांत । असुर तियेसी अवश्य म्हणत । सांगसी तैसा वर्तेन मी ।।८२।। ऐसा भुलवून तयासी। आणिला तो वटच्छायेसी । मग नमूनि दैवतासी। आरंभी नृत्य मोहिनी ।।८३ ।। 

मोहिनी नृत्य करित । अष्टनायिका तटस्थ पाहत । किन्नर गंधर्व तेथ। गायन ऐकतां भुलले ।।८४।। देव सर्व षट्पद होऊनी। सुवासा तिच्या वेधूनी। गुप्तरूपें गुंजारव करिती वनीं। परी ते कामिनी कोणा नेणवे ।।८५।। तिचें सुस्वर ऐकतां गायन । विधिकुरंग गेला भुलोन । कुंभिनी सोडून करावया श्रवण । कद्रुतनय येऊं पाहे ।।८६।। मोहिनी जेथे ठेवी हस्त। असुरही तैसेंच करीत । २ आपुले मस्तकीं ठेवीत । आत्मकर मोहिनी ।।८७ ।। मग असुरेही आपुले शिरींहातादेवितोभम झाला तेया मोहिनीरूप त्यागूनि भगवंत। चतुर्भुज जाहला ।।८८।। बट सोडोनि देख प्रकट झाला तेथे मदनांतका हरिहर मेटले झाले एका देव वर्पती सुमनमाळा ।।८९।। मोहिनीख्य जेव्हा धरिलें। पाहीनि शिवाचे चीर्य द्रवले। भूमीवर पडतां अष्टमाग झालें। अष्ट्रभैरव अवतार ते ॥१९७॥

असित अंगारचंड क्रोध। उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध। संहारमेव आठवा सुप्रसिद्ध। अंशावतार शिवाचे ||९१।। भस्मासुर वधिला हे माता प्रकटतां विलोक्य आनंदभरित। हस्त घरोनि रमाउमानाथ । येते झाले कैलासा ||१२|| अंबिका तत्काळ प्रकटोन। करी हरिहरांते बंदन। दोन्ही मूर्ती वैसवून। करी पूजन हैमवती ।।९३।। हरिहर नारायण नागभूषण। शिव सीतावद्धम नाम सगुण। पंचवदन पन्नगशयन। कर्पूरगौर कमलोद्भवपिता ।।९४।। पिनाकपाणी पीतांबरधर। नीलकंठ नीरदवर्णशरीर। वृंदारकपति वृंदावनवासी मधुहर। गोवाहन हर गोविंद ।।९५।। चंद्रशेखर शंखचक्रधर। विश्वनाथ विश्वभर । कपालनेत्र कमनीयगात्र। लीला विचित्र दोघांची ॥९६॥ मुरहर मायामल्लहर। व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर । बंधकगर्दन अधवकहर। असुरमर्दन दोघेही ।।९७।।

सिद्धेश्वर सिंधुजावर ।। नि संसार निरहंकार। नगतनयावर नंदकिशोर । ईशान ईश्वर इंदिरापती ।।९८।। क्षीरवर्णतनु क्षीराब्धिशयन। एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण। त्या दोघांसी पूजोन । आनंदमय जगदंबा ||९९।। आतां श्रोते सावधान। पुढें सुरस कथा अमृताहून । वीरभद्रजन्म शिवपार्वतीलग्न । आणि षडाननजन्म असे ।।२००।। शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ । गौतम स्वर्धनी भेटों येत। या अध्यार्थी कैलास वैकुंठनाथ। एके ठायीं मिळाले ||१|| तरी ह्या सिंहस्थीं भाविक जन । ग्रंथगीतमर्मी करिती स्नान । अर्थजीवनीं बुडी देवोन। अघमर्षणीं निमग्न जे ||२|| श्रीधरस्वामी ब्रह्मानंद । सुखावला तेथेंचि प्रसिद्ध । जेथें नाहीं भेदाभेद। अक्षय अभंग सर्वदा ||३|| शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड। परिसोत सज्जन अखंड। द्वादशाध्याय गोड हा ।।२०४।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।। ।। शुभं भवतु ।।

Shivleelaamrit 12,13 Adhyay Marathi: शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा बारावा आणि तेरावा अध्याय!

अध्याय तेरावा दक्षाची कथा व कार्तिकस्वामीचे जन्मवृत्त

सूत म्हणाले, “सज्जन हो। दक्ष राजा शंकरांचा सासरा असूनही त्यांचा द्वेष व निंदा करीत असे. त्यांना हविर्भागही देत नसे. त्याने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले तेव्हा आमंत्रण नसूनही भवानी माहेरी गेली. तेथे सर्वांनी तिची उपेक्षा केली म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केले. या वृत्ताने संतापलेल्या शंकरांनी जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले. त्याने दक्षयज्ञाचा विध्वंस करून दक्षाचे मस्तक घडावेगळे केले. तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्याला शांत केले आणि बोकडाचे शिर दक्षाच्या घडाला लावून त्यास जिवंत केले. त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा नावाने जन्म घेतला आणि शंकरांच्या प्राप्तीसाठी कडक व्रत करू लागली.

तारकासुराचे पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन शिवाच्या वरदानाने उन्मत्त झाले तेव्हा शंकरांनी वीरभद्रासह त्यांच्यावर चढाई केली; पण त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईनात. तेव्हा श्रीकरधराने बौद्धरूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र असे चार्वाकशास्त्र सांगितले. त्यामुळे त्या व्यभिचार करू लागल्या. त्यांचा प्रभाव नष्ट होताच शंकरांनी पाशुपतास्त्राने त्या असुरांना ठार केले.

त्यानंतर ‘तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे,’ ही भविष्यवाणी लक्षात घेऊन देवांनी शिवपार्वतीच्या लग्नाचे वेत आखले व मदनाला बोलावून शंकरांचा तपोभंग करून त्यांचे उमेशी ऐक्य करण्यास सांगितले. त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणताच शंकरांनी तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले. त्यानंतर सप्तर्षीच्या सांगण्यावरून शंकर बटुवेषात पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करू लागले. तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले.

त्यानंतर एका सुमुहूर्तावर त्या दोघांचे लग्न झाले. पुढे त्यांना पुत्र होत नाही म्हणून देवांनी अग्नीला अतिथिरूपात शिवसदनी पाठविले. पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिववीर्य दिले. ते प्राशन केल्याने त्यास गर्भ राहिला. तो त्याने गंगातीरावर बसलेल्या सहा ऋषिपत्नींच्या उदरात घातला, पण त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला. त्यानंतर ते सहाही भाग एकत्र होऊन सहा तोंडांचा व बारा हातांचा मुलगा जन्मास आला. तो आपलाच पुत्र आहे हे शंकरांनी ओळखले. त्याचे ‘कार्तिकस्वामी’ नाव ठेवले. याच शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला.”

।। श्रीशिवलीलामृत अध्याय तेरावा ॥

श्रीगणेशाय नमः

।। जो सद्‌गुरु ब्रह्मानंद। अपर्णाहृदयाब्जमिलिंद । स्मरारि गजास्यजनक प्रसिद्ध। चरणारविंद नमूं त्याचे ।।१।। स्कंदपुराणर्णी सूत । शौनकादिकांप्रती सांगत। त्रेतायुगीं अद्भुत। कथा एक वर्तली ||२|| दक्षप्रजापति पवित्र। आरंभिता झाला महासत्र। निंदोनि स्वामी त्रिनेत्र। सर्व निर्जर बोलाविले ||३|| जगदात्मा सदाशिव । जयासी वंदिती पद्मज रमाधव । आम्नाय आणि वासव। स्तविती ज्यासी सर्वदा ॥ शिवमहिमा नेणोनि अद्भुत । दिवसनिशीं दक्ष निंदित। नरमुंडमाळा अपवित्र बहुत । गळां घालीत कैसा हा ।।५।। करी ओलें गजचर्म प्रावरण । न कंटाळे दुर्गंधीनें मन। भिक्षा मागे नरकपाल घेऊन । वसे स्मशानी सर्वदा ।।६।। चिताभस्म अंगीं चर्चिलें। विखार ठायीं ठायीं वेष्टिले । भ्रष्ट तितुके अंगिकारिलें। सर्वे पाळे भूतांचे ।।७।। अभद्र तितुकें अंगिकारिलें । यासी कोण म्हणतील भलें। ज्यासी जें योग्य नाहीं बोलिलें। तें दिलें येणें सर्वस्वें ।।८।।

यासी देव म्हणेल कोण। क्रोधे संतप्त अनुदिन । तृतीयनेत्रीं प्रळयाग्न । वाटे त्रिभुवन जाळील ।।९।। मस्तकीं वाहे सदा पाणी। नाचत जाऊन निजकीर्तनीं। भक्त देखितां नयनीं। बैसे देवोनि अवघेचि ।।१०।।। दैत्यांसी देवोनियां वर। येणेंचि माजविलें अपार । न कळे यासी लहान थोर। वाहन ढोर तयाचें ||११|| शिवनिंदा करावया कारण। एकदां दक्ष गेला कैलासालागून । शिवें नाहीं दिधलें अभ्युत्थान । तेणें दुःखें क्षोभला ।।१२।। ऐसा दक्ष शिवासी निंदी। यज्ञीं न पूजी विभाग नेदी। पुरली आयुष्याची अवधी। तरीच हे बुद्धि उपजली ||१३|| शिवभजन न करी जो पतित। त्यावरी विघ्नें पडती असंख्यात । याग जप तप दान व्यर्थ । उमानाथ नावडे जया ||१४|| जेणें निंदिला शिव दयाळ । परम निर्दय तो दुर्जन खळ । मनुष्यांमार्जी तों चांडाळ । त्याचा विटाळ न व्हावा ।।१५।। असो दक्षकन्या दाक्षायणी। कैलासीं वाट पाहे भवानी। म्हणे याग मांडिला पितृसदनीं । मज बोलावू न ये कां ।।१६।।

अपर्णा म्हणे त्रिनेत्रा । मी जाईन पित्याच्या सत्रा। तेणें सर्व कन्या पंचवक्त्रा। सन्मानेंसीं बोलाविल्या ।।१७।। मज विसरला काय म्हणोन। तरी मी तेथवरी जाईन ।यावरी बोले भाललोचन । मृडानीप्रती तेधवां ।।१८।। म्हणे मृगलोचने ऐक गौरी। पद्मजजनकसहोदरी। लावण्यामृतसरिते अवधारी। कदाही तेथे न जावें ।।१९।। तव पिता निंदक कुटिल। मम द्वेषी दुर्जन खळ । तूं जातांचि तत्काळ । अपमानील शुभानने ||२०|| ज्याच्या अंतरीं नाहीं प्रीती। त्याचे बदन न पाहावें कल्पान्ती। ऐसें त्र्यंचक बोले अंबिकेप्रती। तों नारद तेथे पातला ||२१|| म्हणे पितृसदना जावयालागून। न पाहावा कदाही मान। मग नंदीवरी आरूढोन। दाक्षायणी चालिली ||२२|| सर्वे घेतले भूतगण । मनोवेगें पातली दक्षसदन । तंव मंडप शोभायमान । ऋर्षीसुरवरी भरलासे ।।२३।। आपुलाल्या पूज्यस्थानीं। देव बेसविलें सन्मानेंकरूनी। एक सदाशिव वेगळा करूनी। पूजिले ऋषि सुरवर ||२४||

जैसा उडुगांत मिरवे अत्रिसुत । तैसा दक्ष मध्यें विराजित । शिवद्वेषी परम अभक्त । कुंडीं टाकीत अवदानें ।॥२५॥ भवानी जवळी आली ते वेळे। देखोनि सुरवर आनंदले। परी दक्षाचे धुरें डोळे भरले। कन्येकडे न पाहेचि ।। २६ ।। नंदीवरूनी उत्तरोनि। पितयासमीप आली भवानी। दक्ष सुख मुरडोनि । घाली ग्रंथी भूमंडळा ||२७|| जगन्माता गुणनिधान। न्याहाळूनि पाहे पितृवदन। म्हणे धुरे भरले नयन। म्हणोनि न पाहे मजकडे ||२८|| सकळ भगिनींचा सन्मान बहुत । दाक्षायणी तेव्हां देखत । जननीकडे विलोकीत । तेही न पाहे तियेतें ||२९|| मनांत दक्ष भावीत । ईस कोणें बोलाविलें येथ। कन्या आणि जामात। दृष्टीं मज नावडती ||३०|| आदिमाया प्रणवरूपिणी । अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी । तिचा अपमान देखोनि । भ्याले सकळ सुरवर ।।३१।।

म्हणती दक्ष भुलला यथार्थ। हे ब्रह्मांड जाळील निमिषांत । अपमान देखोनि उमा तेथ। क्रोधें संतप्त जाहली ।।३२।। प्रलयवीज पृथ्वीवरी पडत । तैसी उडी घातली कुंडांत। उर्वीमंडळ डळमळत । होय कंपित भोगींद्र ||३३|| वैकुंठ कैलास डळमळी। कमलभवांडर्डी हांक वाजली। कृतान्त कांपे चळचळी। म्हणे बुडाली सृष्टि आतां ।।३४।। हांक देवोनि शिवगण । गेले शिवापार्शी धांवोन। सांगती सर्व वर्तमान। जें जें जाहलें दक्षगृहीं ||३५|| ऐकतां क्षोभला उमाकांत । जेंवीं महाप्रलयींचा कृतांत । हांक देवोनि अद्भुत । जटा आपटीत आवेशें।।३६।। तों अकस्मात वीरभद्र। प्रकटला तेथे प्रलयरूद्र। वाटे प्रलयाझि आणि द्वादश मित्र। एकत्र होवोनि प्रकटले ।। ३७ ।। बाटे त्याचिया तेजांत। चंद्र सूर्य बुचकुळ्या देत। आकाश असे आसुडत। सडा होत नक्षत्रांचा ।।३८।। कुंभिनी बुडाली देख। चतुर्दश लोकीं गाजली हांक। दक्षगृहीं बलाहक। रक्तवर्षाव करीतसे ॥३९॥ अवचित उकलली क्षिती। दिवसा दिवाभीतें बोभाती । दक्षअंगींची सर्व शक्ती। निघोनि गेली तेधवां ।।४०।।

इकडे वीरभद्र शिवस्तवन । करोनि निघाला क्रोधायमान। एकवीस पद्म दळ घेऊन । मनोवेगें धांविन्नला ।।४१।। साठ कोटि गण घेऊन। मागून धांविन्नला अपर्णाजीवन । पुढे शिवपुत्र धांवोन। ख्याती केली दक्षयागीं ।।४२।। वारणचक्र असंभाव्य । त्यावरी एकला लोटे कंठीरव । कीं विनायकें घेतली धांव। अपार अही पाहोनी ।।४३।। आला देखोनि वीरभद्र । पळों लागले देव समग्र । अवदानें सांडोनि सत्वर । ऋत्विज पळाले तेथोनियां ।।४४।। आकांतला त्रिलोक । प्रळयकाळींचा पावक । दुमदुमिला ब्रह्मांडगोळक। शक्रादि देव कांपती ।।४५।। एक मळसूत्र भयें विसर्जिती धोत्र गळाली नेणती क्षितीं। कुक्कुटरूपें रोहिणीपती । पळता झाला तेधवां ।।४६।। शिखी होवोनियां शिखी। पळता झाला एकाएकीं। यम आपुलें स्वरूप झांकी। बकवेष घेवोनियां ।।४७।। नैऋत्यपति होय काक। शशक होय रसनायक । कपोत होवोनियां अर्क । पळता झाला तेधवां ।॥४८।।

कीर होवोनि वृत्रारी। पळतां भय वाटे अंतरीं। नाना पक्षिरूपें झडकरी । नवग्रह पळाले ।।४९।। मिंधियांवरी वीज पडत। दक्षावरी तेवीं अकस्मात । महावीर शिवसुत । वीरभद्र पातला ।।५०।। षड्बाहु वीर देदीप्यमान । असिलता खेटक धनुष्य बाण। त्रिशूळ डमरू शोभायमान । सायुध ऐसा प्रकटला ।।५१।। पूषाचे पाडिले दांत । भगदेवाचे नेत्र फोडित । खांड मिशा उपडीत । ऋत्विजांच्या तेधवां ।। ५२ ।। चरणीं धरुनि आपटिले । बहुतांचे चरण मोडिले। कितीकांचे प्राण गेले। वीरभद्र देखतां ।।५३।। मागूनि पातला शंकर । तेणें दक्षपृतना मारिली सत्वर । कुंडमंडप समग्र । विध्वंसूनि जाळिला ।।५४।। देखोनियां विरूपाक्ष। भयभीत झाला दक्ष। पद्मज आणि सहस्राक्ष। पूर्वीच तेथूनि पळाले ।।५५।। वीरभद्र म्हणेशतमूर्खा दक्षा । त्यां निंदिले कैसे विरूपाक्षा। तुज लावीन आतां शिक्षा । शिवद्वेषिया पाहें पां ।।५६।। विद्युत्प्राय असिलता तीव्र। ऊर्ध्वहस्ते महावीर। छेदिता झाला दक्षशिर। प्रलय थोर जाहला ।।५७।।

दक्षशिर गगनीं उसळलें। वीरभद्रे पायांतळीं रगडिलें। मग उमाधवापाशी ते वेळें । देव पातले चहू‌कडोनी ।।५८।। सकळ सुरांसहित कमळासन। करीत उमावल्लभाचे स्तवन । म्हणे वृषभध्वजा कृपा करून। दक्षालागीं ऊठवीं ।।५९।। संतोषोनि कर्पूरगौर। म्हणे आणोनि लावा दक्षाचे शिर। परी ते नेदी वीरभद्र। पायांतळीं रगडिलें ।। ६० ।। म्हणे शिवद्वेषी दुराचार। त्याचा करीन ऐसा संहार। जो शिवनाम न घे अपवित्र। जिव्हा छेदीन तयाची ।।६१।। जो न करी शिवार्चन। त्याचे हस्तचरण छेदीन। जो न पाहे शिवस्थान । त्याचे नयन फोडीन मी ।। ६२।। विष्णु थोर शिव लहान । हर विशेष विष्णु सान। ऐसें म्हणे जो खळ दुर्जन। संहारीन तयातें ।।६३।। सर्वथा नेदी मी दक्षशिर। काय करितील विधि-हरि-हर। मग मेषशिर सत्वर। दक्षालागीं लाविलें ।।६४।। सजीव करोनियां दक्ष। तीर्थाटना गेला विरूपाक्ष । द्वादश वर्षे निरपेक्ष । सेवीत वने उपवने ।। ६५ ।।

महास्मशान जें आनंदवन । तेथे शंकर राहिला येऊन । मग सहस्र वर्षे संपूर्ण । तपासनीं बैसला ।। ६६ ।। पुढें हिमाचळाचे उदरीं। अवतरली त्रिपुरसुंदरी । शिवआराधना नित्य करी। हिमाचीं सर्वदा ।। ६७ ।। हिमनगाची स्त्री मेनका। तीस पुत्र झाला मैनाक-पर्वत देखा। पार्वती कन्या जगदंबिका । आदिमाया अवतरली ||६८ ।। ब्रह्मांडमंडपामाझारीं। जिची प्रतिमा नाहीं दुसरी। कमळजन्मा वृत्रारी। त्यांसही दुजी करवेना ।।६९।। तिर्चे स्वरूप पाहावया। येती सुर भूसुर मिळोनियां। जिचे स्वरूप वर्णावया । सहस्रवदना शक्ति नव्हे ।। ७० ।। मृग मीन कल्हार खंजन । कुरवंडी करावे नेत्रांवरून । अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण। चरणांगुष्ठीं न तुळे जिच्या ॥७१।। आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज। देखोनि लज्जित होय द्विजराज। कंठीरव देखोनि जिचा माज। मुख न दावी मनुष्यां ।। ७२।। परम सुकुमार घनश्यामवणीं । ओतिली इंद्रनीळ गाळूनी। दंततेज पडतां मेदिनी। पाषाण महामणी पैं होती ॥७३।।

आदिमाया प्रणवरूपिणी। ते झालीहिमनगनंदिनी। अनंतशक्तींची स्वामिनी। वेदपुराणी वंद्य जे ।।७४।। कोट्धानुकोटी मीनकेतन। सांडणी करावीं नखांवरून। अंगींचा सुवास संपूर्ण। ब्रह्मांड फोडोनि वरी जाय ।।७५।। ब्रह्मादि देव मुळीहूनी। गर्मी पाळी बाळे तीन्ही। बोलतां प्रकाश पडे सदनीं। निराळवर्णी कोमलांगी ।।७६।। सहज बोलतां क्षितीं। बाटे रत्नराशी विखुरती। पदमुद्रा जेथे उमटती। कमळे उठती दिव्य तेथे ॥७७॥ त्या सुवासासी वेधोनि वसंत । भोवता गडबडां लोळत । केवळ कनकलता अद्भुत । कैलासाहूनी उतरली ॥७८॥ नंदीसहित त्रिपुरारी। येवोनि हिमाचळी तप करी। शिवदर्शना झडकरी। हिमनग येता जाहला ।।७९ ।। घालोनियां लोटांगण । करीत तेव्हां बहुत स्तवन । यावरी पार्वती येऊन। करीत भजन शिवाचें ।।८०।।

साठ सहस्र लावण्यखाणी। सर्वे सखिया जैशा पद्मिणी। तयांसहित गजास्यजननी। सेवा करी शिवाची ॥८१॥ द्वारीं सुरभीपुत्र रक्षण। ध्यानस्थ सदा पंचवदन । लाविले पंचदश लोचन । सदा निमग्न स्वरूर्षी ।।८२।। तारकासुराचे पुत्र तिघेजण । तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन । तिहीं घोर तप आचरोन । उमारमण अर्चिला ।।८३।। सहस्रदळ कमळेकरून । त्रिवर्ग पूजिती त्रिनयन। सहस्रांत एक न्यून । कमळ झाले एकदां ।।८४।। तिघेही काढूनि नेत्रकमळे । शिवार्चन करिते झाले। मागुती एक न्यून आलें। मग स्वशिरकमळे अर्पिलीं ।॥८५॥ प्रसन्न होवोनि त्रिनेत्र। तिघे उठविले तारकपुत्र। तिघांसी दिधले अपेक्षित वर। झाले अनिवार त्रिभुवनीं ।।८६।। तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी। त्रिपुरें दिधर्ती अंतरिक्षगमनी। दिव्य सहस्र वर्षे पाहतां शोधोनी। निमिषार्धे एक होती ।।८७।।

इतुक्यांत जो धनुर्धर। मारील लक्ष्य साधूनि शर। त्रिपुरांसहित संहार। तुमचा करील निर्धारं ॥८८॥ यावरी त्या तिघां जीं। त्रिभुवन त्रासिलें बळेंकरूनी । देव पळविले स्वस्थानाहूनी । पीडिली धरणी बहु पायें ।।८९।। मग देव ऋषि सकळ मिळोन । वैकुंठपतीस गेले शरण । गरुडध्वज सर्वांस घेऊन । शिवापार्शी पातला ||९० ।। करितां अद्भुत स्तवन । परम संतोषला पंचवदन । म्हणे मी झालों प्रसन्न। मागा वरदान अपेक्षित ।।९१।। म्हणती त्रिपुरें पीडिलें बहुत । देव ऋषि झाले पदच्युत। शिव म्हणेझाला पाहिजे रथ। त्रिपुरमर्दनाकारणें ।।९२।। तंव देव बोलती समस्त । आम्ही सजोनि देतों दिव्यरथ। मग कुंभिनी स्यंदन होत। चक्रे निश्चित शशि-मित्र ।।९३।। मंदगिरी अक्ष होत। स्तंभ झाले चारी पुरुषार्थ। चारी वेद तुरंग बळिवंत। मूर्तिमंत पैं झाले ।।९४।।

सारथी विधि होत सत्वर । लाविले शास्त्रांचे वाग्दोर। पुराणें तटबंध साचार। उपपुराणें खिळे बहु ।।९५।। कनकाद्रि धनुष्य थोर। धनुर्ज्या होत भोर्गीद्र । शर तेजस्वी ।।९६।। रथीं चढतां उमानाथ। रसातळीं चालिला रथ । वैकुंठींचा सुकुमार। कोणासी न उपडे निश्चित । मग नंदी काढीत शृंगार्ने ।।९७।। मग स्यंदनीं एक चरण। दुजा नंदीवरी ठेवून। अपार युद्ध करून। त्रिपुरदळें संहारिली ।।९८।। होता युद्धाचें घनचक्र। वीरभद्रं संहारिले असुर । परी अमृतकुंड समग्र । दैत्यांकडे असती पैं ।।९९।। अमृत शिंपितां अमित । सजीव होती सर्वेचि दैत्य। शिर्वे मेघास्त्र घालूनि समस्त । अमृतकुंडें बुडविर्ती ।।१००।। अंतराळीं त्रिपुरे भ्रमती। लक्ष्य साधी मृडानीपती। दिव्य सहस्र वर्षे झालीं येच रीर्ती। न लवती पार्टी कदापि ॥१॥ अंगीं लोटला घर्मपूर। ते हे भीमरथी गंगा धोर। नेत्रींचे जलबिंदु पडतां अपार । रुद्राक्ष तेथे जाहले ।।२।।

दैत्यस्त्रिया पतिव्रता थोर। तेणें असुरांसी जय अपार। मग बौद्धरूपें श्रीकरधर । दैत्यस्त्रियांत प्रवेशला ||३|| वेदबाह्य अपवित्र । प्रकट केलें चार्वाक शास्त्र। पतिव्रताधर्म मोडोनि समग्र । व्यभिचारकर्मे करविलीं ।।४।। तेणें दैत्यांस झालें अकल्याण। तंव इकडे शिवें लक्ष्य साधून । धनुष्यीं योजिला विष्णुबाण। पाशुपतास्त्र स्थापुनी ।।५।। उगवले सहस्र मार्तंड। तैसें अस्त्र चालिले प्रचंड । कीं उभारिला कालदंड। संहारावया विश्वातें ।।६।। कीं प्रळयाग्नीची शिखा सबळ । कीं कृतान्ताची जिव्हा तेजाळ। कीं ते प्रळयमेघांतील । मुख्य चपला निवर्वाडली ।।७।। कीं सप्तकोटिमंत्रतेज पाहीं। एकवटलें त्या अस्त्राठायीं। देव दैत्य भयभीत हृदयीं। म्हणती कल्पान्त मांडिला ।।८।। न्याससहित जपोनि मंत्र। सोडोनि दिधलें दिव्यास्त्र । नवखंड धरणी आणि अंबर। तडाडलें ते कार्की ।।९।।

सहस्र विजा कडकडती। तैसी धांविन्नली अस्त्रशक्ती। भर्ये व्यापिला सरितापती। अंग टाकूं पाहती दिग्गज ||११०।। देव विमानें पळविती ।गिरिकंदरी असुर दहती। एक मूच्र्छना येवोनि पड़ती। उठती ना मागुते ।।११।। त्या अखें न लागतां क्षण। त्रिपुरे टाकिली जाळून । त्यांत तृतीय नेत्रींचा प्रलयान। साहा झाला तयातें ।।१२।। तिन्ही ग्राम सेनेसहित । त्रिपुरे भस्म झाली तेथ। देव शिवस्तवन करीत। चरण धरित सप्रेम ।।१३।। त्यावरी त्रिपुरपिता तारकासुर । तेणे प्रलय मांडिला थार। देव पळविले समग्र । चंद्र सूर्य धरूनि नेले ||१४|| भागीरथी आदि गंगा पवित्र। धरूनि नेत तारकासुर। देवांगना समग्र । दासी करोनि देविल्या ।।१५।। ब्रह्मा विष्णु शचीवर। करिती एकांती विचार। म्हणती शिव-उमा करावी एकत्र। होईल पुत्र षण्मुख ।।१६।। त्याचे हस्तै मरेल तारकासुर । मग बोलावूनि पंचशर। म्हणती तुवां जावोनि सत्वर। शिवपार्वती एक्य करीं ।।१७।। हिमाचळीं तप करी व्योमकेश। मन्मथा तूं भुलवीं तयास । मग रतीसहित कुसुमेश। शिवाजवळी पातला ।।१८।। पार्वतीच्या स्वरूपांत । रती तेव्हां प्रवेशत। वसंतें वन समस्त । शृंगारिलें तेधवां १।१९।। शिवाच्या मानसी सतेज । प्रवेशला शफरीध्वज । पांखरें करिती

बहु गजबज । शिवध्यान विक्षेपिती ॥१२०॥ ते पक्षी हांकावया नंदिकेश्वर। गेला होता तेव्हां दूर। तों पार्वती होवोनि कामातुर। पाटीसी उभी मन्मथाच्या ॥२१॥ शिवें उघडिले नयन। तो पुढे देखिला मीनकेतन । म्हणे माझ्या तपासी केलें विघ्न। मग भाललोचन उघडिला ||२२|| निघाला प्रलयवैश्वानर। भस्म केला कुसुमशर। फाल्गुन पौर्णिमा साचार। काम जाळिला ते दिनीं ||२३|| शिवदूत भूतगण । महाशब्दें हांक देऊन । स्मरगृह शब्द उच्चारून। नानापरी उपहासिती ||२४|| शिवाची आज्ञा तैपासून । फाल्गुनमासीं हुताशनी करून। जो है व्रत न पाळी पूर्ण। अवदसा जाण त्या बाधी ||२५|| ऐसा संहारुनि पंचशर। विचार करूनि पंचवक्त्र । तत्काळ उठोनि कर्पूरगौर। गेला कैलाससदनासी ||२६|| रती शोक करी बहुत। मग समाधान करी निर्जरनाथ। म्हणे कृष्णावतारी तुझा कांत। रुक्मिणीउदरीं अवतरेल ||२७||

कमलासनें कन्येसी भोगितां । कंदर्पास शाप दिधला होता। कीं शिवदृष्टीनें तत्त्वतां । भस्म होसील कामा तूं ।।२८।। असो इकडे हिमनगकुमारी। शिवप्राप्तीलागीं तप करी। सप्तऋषिप्रार्थिती त्रिपुरारी। वरी कन्या हिमनगाची ।।२९।। पार्वती तप करी जे वनीं। शिव तेथे गेला बटुवेष घरोनी। गायनाच्या छंदें करूनी। पुसे भवानीप्रति तेव्हां ।।१३०।। कासया तप करिसी येथ। येरी म्हणे जो कैलासनाथ। पति व्हावा एतदर्थ। आचरे तप येथे मी ।।३१।। बटु बोले ते अवसरीं। तूं तंव हिमनगराज कुमारी। शंकर केवळ भिकारी। महाक्रोधी दारुण ।।३२।। ओलें गजचर्म प्रावरण। शार्दूलचर्म नेसला सर्पभूषण । वसविलें महास्मशान। भूतगण सभोंवते ॥३३॥ तरी विष्णु विलासी सगुण । त्यासी वरीं तूं ऐक बचन। तुज योग्य पंचवदन। वर नव्हे सर्वथा ।।३४।।

ऐकतां क्षोभली जगन्माता। म्हणे शिवनिंदका होय परता। वदन न दाखवीं मागुता। परम खळा द्वेषिया ।।३५।। शिवनिंदक जो दुराचार । त्याचा विटाळ न व्हावा साचार। तुज शिक्षा करीन निर्धार। विप्र म्हणोनि राहिलें ।।३६।। देखोनि दुर्गेचा निर्धार। स्वरूप प्रकट करी कर्पूरगौर। पार्वतीनें करूनि जयजयकार। चरण दृढ धरियेले ।। ३७।। शिव म्हणे ते समयीं। प्रसन्न झालो माग लवलाहीं। अंबिका म्हणे ठाव देई। अर्धांगी शिवें हिमाचळा तुझ्या जगदात्म्या ||३८|| अवश्य म्हणोनि त्रिपुरारी। कैलासासी गेला ते अवसरीं। पितृसदना झडकरी। गेली तेधवां जगदंबा ।। ३९ ।। मग सप्तऋषि ते वेळे।पाठविले । हिमनगें ते आदरें पूजिले । षोडशोपचारें करूनियां ।।१४०।। अरुंधतीनें येऊन। भवानी पाहिली अवलोकून । म्हणे शिव आणि भवानी पूर्ण। जोडा होय निर्धार ।।४१।।

मन्मथ संवत्सर चैत्रमार्सी। लग्न नेमिलें शुद्ध अष्टमीसी। निश्चय करूनि सप्तऋषी । स्वस्थानासी पातले ।।४२।। कधीं होईल शिव-गौरी लग्न । इच्छिती बोंद्रादि सहस्रनयन । तारकासुराचा तो प्राण। शिवपुत्र घेईल कधीं ।।४३।। इकडे नंदीस पाठवूनि ते वेळे। सर्व देव शिवें बोलाविले । घेवोनि त्रिदशांचे पाळे । पाकशासन पातला ||४४।। इंदिरेसहित इंदिरावर । सावित्रीसहित चतुर्वक्त्र । अठ्ठयाऐशीं सहस्र ऋषीश्वर । शिष्यांसहित निघाले ।।४५।। सिद्ध चारण गुह्यक । पितृगण मरुद्रण वसुअष्टक । एकादशरुद्र द्वादशार्क। यक्षनायक पातला ।।४६।॥ आपुलाल्या वाहनीं बैसोन । लोकपाल निघाले संपूर्ण। नवग्रह अष्टनायिका आदिकरून। किन्नर गंधर्वसर्वही ।।४७।।

एवं सर्वांसहित शंकर। हिमाचलासी आला सत्वर। नगेंद्र येवोनि समोर । पूजोनि नेत सकळांतें ।।४८।। दशसहस्र योजनें मंडप । उभविला ज्याचें तेज अमूप। सुवर्णसदने देदीप्य। जानवशासी दीधली ।।४९।। शिवस्वरूप पाहतां समस्त । वन्हाडी होत विस्मित। एक म्हणती वृद्ध बहुत । पुराणपुरुष अनादि ।।१५०।। हा आहे केवळ निर्गुण । नवरी स्वरूपें अति सगुण । असो देवकप्रतिष्ठा करून। मूळ आला हिमाद्री ।।५१।। आयंत अवघे साहित्य । कमलोद्भव स्वर्ये करीत । नवनिधी अष्ट महासिद्धी राबत । न्यून तेथे नसे कांही ।।५२|| असो नवरा मिरवीत । नेला आपुल्या मंडपांत । मधुपर्कादि पूजाविधि समस्त । हिमाचळ करीतसे ।।५३।। लग्नघटिका आली जवळी । तंव ते श्रृंगारसरोवरमराळी। बाहेर आणिली हिमनगबाळी। उभी केली पटाआड ।।५४।। लग्नघटिका पाहे दिनपती। मंगळाष्टके म्हणे बृहस्पती । ॐ पुण्याहं निश्चितीं। कमलासन म्हणतसे ।।५५।। असो यथाविधि संपूर्ण। दोघां झालें पाणिग्रहण। होमासी करिती प्रदक्षिण। शिव शक्ति तेधवां ।।५६।। इतुके याज्ञिक झालें

सर्वही। परी नोवरी कोणी देखिली नाहीं। प्रदक्षिणा करिता ते समयीं । पदनख देखिलें विधीनें ।॥५७।। कामें व्यापिला सूर्यजामात । पटपटां वीर्यबिंदु पडत । साठी सहस्र वालखिल्य तेथ। जन्मले क्षण न लागतां ।।५८।। अन्याय देखोनि थोर। मदनांतक कोपला अनिवार । ब्रह्मयाचे पांचवें शिर। छेदूनि टाकिलें तेधवां ।। ५९।। झाला एकचि हाहाकार। त्यावरी वैकुंठींचा सुकुमार। समाधान करी अपार । चतुर्वक्त्र नाम तैपासुनी ।।१६०।। असो यथाविधि सोहळे। चारी दिवस संपूर्ण जाहले । सकळ देव गौरविले। वस्त्रालंकारीं हिमनगें ।। ६१।। सर्वे पार्वती घेऊनी । कैलासा आला शूलपाणी। यावरी सर्व देव मिळोनी। प्रार्थिते झाले विश्वनाथा ।।६२।। खुंटली विश्वाची उत्पत्ती। मन्मथ उठवीं उमापती। मग तो मीनध्वज पुढती। अनंग करोनि जीवविला ।।६३।।

अंधकपुत्र तारकासुर तेणें पळविले देव समग्र । शिवासी होईल कधीं पुत्र। देव समग्र वांच्छित ।।६४।। चारों युर्गेपर्यंत । शिव उमा एकांतीं रमत। परी नोहें वीर्यपात। नव्हे सुत याकरितां ।। ६५।। तो तारकासुरें केला आकांत । स्वर्ग जाळिलेसमस्त । देवललना धरूनि नेत। दासी बहुत चें केल्या ।।६६।। देव शिवासी शरण जाती। तंव तीं दोघे एकांर्ती रमती। देव ऋषी बाहेर तिष्ठती। प्रवेश कोणा नव्हेचि ॥६७।। मग अग्नि आंत पाठविला । अतीतवेष तेणे धरिला। जो तृतीयनेत्रीं शिवाच्या राहिला। देवीं पाठविला मित्र म्हणोनी ।। ६८।। हांक फोडोनि मिक्षा मागत। शिव पार्वतीस आज्ञापित। माझे वीर्य धरोनि अद्भुत। मिक्षा देई अतीताते ।।६९।।

मग अमोघ वीर्य धरून। अग्नीस देत अंबिका आणोन। सांडले जेथे वीर्य जाण । रेतकूप झाला तो ।।१७०।। तोचि पारा परम चंचळ । न घरवे कोणा हातीं तेजाळ। असो कृशानूने वीर्य तत्काळ । प्राशन केलें तेधवां ॥७१।। अग्नि झाला गरोदर। परम लज्जित हिंडे कांतार। तो साही कृत्तिका परम सुंदर। ऋषिपत्या देखिल्या ।।७२।। त्या गंगेत स्नान करूनी। तापत बैसल्या साहीजणी। तंव अग्नीनें गर्भ काढूनी। पोटांत घातला साहींच्या ॥७३॥ साहीजणी झाल्या गर्भिणी। परम आश्चर्य करिती मनीं। मग लज्जेनें गर्भ काडुनी। साहीजणींनी त्यागिला ॥७४॥ साहींचे रक एक झाले । दिव्य शरीर तत्काळ घडले। सहा मुखे हस्त शोभले । द्वादश सरळ तेजस्वी ।।७५।। कार्तिकमासीं कृत्तिकायोगी। कुमार जन्मला महायोगी। मयूरवाहन भस्म अंगीं। उपासीत शिवातें ।॥७६।। शिवं निजपुत्र जाणोनी। नेवोनि लाविला अपर्णास्तनीं। सप्त वर्षे मृडानी। लालन पालन करी त्याचें ॥ ७७||

देवांसी सांगे वैश्वानर। शिवासी झाला स्कंद पुत्र। ऐकतां देव समग्र । तारकावरी चालिले ||७८|| सेना जयाची बाहत्तर अक्षौहिणी। त्याचें नगर वेढिती सुधापानी। पृतनेसहित तेच क्षणीं। तारकासुर बाहेर निघे ।। ७९।। इंद्रे स्वामिकार्तिकापार्सी जाऊन । सेनापतित्व दिधलें संपूर्ण। दिव्य रथीं बैसवून। अभिषेकिला कुमार ।।१८०।। इकडे तारकासुर सुधापानी। युद्ध करिती झोटधरणी। देव त्रासिले दैत्यांनीं। आले पळोनि कुमाराकडे ||८१|| स्कंदापुढें कर जोडून । देव करिती अपार स्तवन। रक्षीं तारकासुरापासून। शिवनंदन तोषला ।।८२।। देवांचा वृत्तान्त जाणोनि सकळ । कुमारें धरिलें रूप विशाळ । तों तारकासुर धांविन्नला प्रबळ । शिवकुमार लक्षूनी ।।८३।। तेहतीस कोटीसुरवर । उभे स्वामीचे पाठीं भार। तारकाअंगी बळ अपार। दशसहस्र कुंजरांचे ।।८४।।

तारकासुर अनिवार। वर्षे सायकांचे संभार। स्वामीचे पाठीसीं सुर। लपती सत्वर जाऊनी ।।८५।। लक्षूनियां पाकशासन । तारके शक्ति दिधली सोडून । प्रळयचपळेस मार्गे टाकून। मनोवेगें चालिली ।।८६।। भयभीत शक्र होऊन । करी हरिस्मरण कर जोडोन। म्हणे हे इंदिरामानसरंजन। निवारी येवोनि शक्ति हे ॥ ८७।। ब्रह्मानंदा विश्वव्यापका । दशावतार-चरित्रचालका। मधु-मुर-नरकांतका। निवारी प्रळयशक्ति हे ।।८८।। वैकुंठींहूनि योगमाया। हरीने धाडिली तिणें तें शक्ति परतोनियां । एकीकडे पाडिली ।।८९।। यावरी तारकें बाणांचे लवलाह्या । पूर। स्वामीवरी सोडिले अपार। मुख पसरोनि शिवकुमार। तितुकै गिळितां जाहला ।।१९०।। नाना शस्त्रे अस्त्रशक्ती । तारकें सोडिल्या अनिवारगती। तितुक्या गिळिल्या सहजस्थितीं। शास्त्रसंख्यावदनानें ॥९१।। कल्पान्तरुद्रासमान । भयानक दिसे मयूरवाहन। तारके ब्रह्मास्त्र दिधलें सोडून। तेही गिळीं अवलीळे ||९२।। जितुके शस्त्रमंत्र निर्वाण । तितुके प्ररीतसे चहुंकडून । प्रळयकाळासम शिवनंदन । गिळी क्षण न लागतां ।।९३।।

मग निःशस्त्र तारकासुर । स्यंदनाहूनि उतरला सत्वर । स्वामीवरी धांवे अनिवार। सौदामिनीसारखा ।।९४।। ऐसें देखोनि षडानन । कृतान्ताऐसी हांक देऊन । रथाखालीं उतरून । मल्लयुद्ध आरंभिलें ।॥९५।। व सप्तदिनपर्यंत । युद्ध झालें परम अद्भुत । तारकासुर अत्यंत । जर्जर केला आपटोनी ।।९६।। पार्टी धरोनि अवलीला। चक्राकार भोवंडिला । मग म धरणीवरी आपटिला। चूर्ण झाला मृद्घटवत ॥९७॥ निघोनि गेला प्राण। दुंदुभी वाजवी शचीरमण। पुष्पें वर्षिती सुरगण। कर जोडोनि स्तुती -करिती ।।९८।। मारिला जेव्हा तारकासुर । तेव्हां सात वर्षांचा शिवकुमार । मग सेनापतित्व समग्र । इंद्रे त्यासी दीधलें ।।९९|| तारकासुराचें नगर । इंट्रें लुटिलें समग्र । देवस्त्रिया सोडविल्या सत्वर । सर्व देव मुक्त झाले ।।२००।।

लागला तेव्हां जयवाद्यांचा घोष। कुमार गेला वाराणसीस। नमूनि शिवमृडानींस । सुख अपार दीधलें ||१|| मग झालें मौंजीबंधन । सर्व तीर्थे करी षडानन । मग कपाटीं बैसला जाऊन । अनुष्ठान करी सुखें ॥२॥षडाननास भवानी म्हणत । ब्रह्मचर्य केले आजपर्यंत । आतां त्री करूनि यथार्थ। गृहस्थाश्रम करीं कीं ।।३।। षडानन म्हणे अंबेप्रती। सांग खिया कैशा असती। म्यां देखिल्या नाहीं निश्चितीं। कैसी आकृति सांगें मज ।।४।। अपर्णा म्हणे सुकुमारा। मजसारिख्या स्त्रिया सर्वत्रा। ऐकतां हांसे आलें कुमारा। काय उत्तरा बोलत ।।५।। तुजसारिख्या स्त्रिया जरी। तुजसमान मज निर्धारीं। तुझ्या वचनासी मातुश्री। अंतर पडों नेदीं मी ।।६।। ऐसें कुमार बोलोन । महाकपाटांत जाय पळोन। मग ते जगन्माता आपण । धरूं धांविन्नली तयातें ।।७।।

नाटोपे कुमार ते क्षीं। अंबा दुःखें पडे धरणीं। जे त्रिभुवनपतीची राणी। वेदपुरार्णी वंद्य जे ।।८।। अरे तूं कुमारा दार्वी वदना। आला माझ्या स्तनासी पान्हा। कोणासी पाजू षडानना । निजवदना दाखवीं ।।९।। घेई तुझे दूध लोणी। म्हणोनि कुमार वमी ते क्षणीं। बोले तेव्हां शापवाणी। क्रोधेंकरूनि कुमार तो ॥२१०।। माझे दर्शना जी स्त्री येईल। ती सप्तजन्म विधवा होईल । स्वामिदर्शना पुरुष येईल। कार्तिकमासीं कृत्तिकायोगी ||११|| तो सप्तजन्म सभाग्य । होईल धनाढ्य वेदपारंग। अनामिक हो अथवा मातंग । दर्शन लाभसमानचि ।।१२।। स्वामींस ऋषि विनविती समस्त । भवानी तुजलागी तळमळत । भेटोनि येई त्वरित । वाराणसीस जाऊनी ।।१३।।

मग स्वामी आनंदवना जाऊनी। आनंदविर्ती शिव-भवानी। उभयतांचे समाधान करोनी। मागुती गेला पूर्वस्थळा ।।१४।। स्कंदपुरार्णी कथा सूत। शौनकादिकांप्रती सांगत। ऐकतां विघ्नें समस्त । क्षणमात्रे दग्ध होती ।।१५।। अपर्णाहृदयाब्जमिलिंदा। श्रीधरवरदा ब्रह्मानंदा। पूर्णब्रह्मा अनादिसिद्धा। आनंदकंदा जगद्‌गुरु ||१६|| शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड। परिसोत सज्जन अखंड । त्रयोदशाध्याय गोड हा ।।२१७।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।। ।। शुभं भवतु ।।

मोका..मोका..पुन्हा भारत पाकिस्तान लढत?

आजच्या अनुकूल दिवसाचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा!

श्री गजानन लीला गाथा १४ अध्याय (लहान पोथी)

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

श्री गजानन लीला गाथा १३ अध्याय (लहान पोथी)

Shivleelaamrit 9 Adhyay:  ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा पाचवा अध्याय !

१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..

 शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/

 हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!

Loading