Shivleelaamrit 9 Adhyay: कथा सारा सहित शिवलीलामृताचा ९ अध्याय!
Shivleelaamrit 9 Adhyay: नमस्कार, तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत कधी वाचले आहे का? शिवरात्रीच्या निमित्ताने, शिवभक्तांसाठी एक खास भेट.’शिवलीलामृत’ पारायणाची माहिती आणि कथासार… ‘शिवलीलामृत’ हे एक दिव्य ग्रंथ आहे, ज्याच्या पारायणाने भक्तांना अनेक लाभ मिळतात.
शिवरात्रीच्या काळात याचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. ‘शिवलीलामृत’ पारायण कसे करावे? त्याचे लाभ काय आहेत? ‘शिवलीलामृत’ मध्ये किती अध्याय आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेख मालिकेत मिळतील.
Shivleelaamrit 9 Adhyay: या लेख मालिकेत आम्ही तुम्हाला ‘शिवलीलामृत’ कथासार, प्रत्येक अध्यायाची माहिती आणि पारायणाची सोपी पद्धत सांगणार आहोत. रोज एक अध्याय वाचा आणि शिवलीलामृताच्या दिव्य अनुभवात सहभागी व्हा. तर, शिवरात्रीच्या या पवित्र काळात, ‘शिवलीलामृत’ पारायणाने आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा. आमच्या लेख मालिकेत रोज अध्याय वाचा आणि शिवकृपेचा अनुभव घ्या.
तर आज या लेखात आपण शिवलीलामृताचा नववा अध्याय पाहणार आहोत.
श्रीशिवलीलामृत ग्रंथाचे वाचन आपली संकटे दूर होऊन आपले सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यासाठी फार उपयुक्त आहे. या ग्रंथाचे सपूर्ण पारायण एका समाहात पूर्ण करावे. त्याचा रोजचा पाठ किती करावा ते पुढे दिले आहे.
Shivleelaamrit 9 Adhyay: पोथी घरात सर्वांनी ऐकावी अशी इच्छा असेल तर ज्याला किंवा जिला स्पष्ट वाचन करता येत असेल त्याने किवा तिने रोज ठरावीक वेळी पोथी वाचावी व सर्वांनी ऐकावी, सप्ताह पूर्ण झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटावा,
ॐ नमः शिवाय या शिवमंत्राचा सर्वांनी त्या सप्ताहात त्या वेळी पोथीबाचनापूर्वी १०८ वेळा जप करावा.

अध्याय नववा भस्ममहिमा
The Glory of Ashes
Shivleelaamrit 9 Adhyay: सूत म्हणाले, “सज्जन हो। वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी सर्वांगास भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच वनसंचार करीत असे. एके दिवशी भुकेने कासावीस झालेल्या एका ब्रह्मराक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असता मुनीच्या अंगावरचे थोडेसे भस्म त्याच्याही अंगाला लागले, त्या पवित्र भस्माच्या प्रभावाने त्याची सर्व पातके नष्ट होऊन तो दिव्यदेही झाला. त्याला आपल्या पूर्वीच्या जन्मांचे ज्ञान झाले. मुनिचरणांना वंदन करून तो म्हणाला, “गुरुदेव, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आणि आता तुमच्यासमोर माझे मनोगत सांगितले तर मी शिवपदास प्राप्त होईन.
” मग त्या ब्रह्मराक्षसाने वामदेवाला त्याच्या स्वतःच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला कोणत्या नरकयातना भोगाव्या लागल्या, कोणकोणत्या जीवकोटीत जन्म घ्यावा लागला ते सविस्तर सांगितले, त्यानंतर वामदेवाने त्याला एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला भस्माचा स्पर्श झाल्याने तो यमलोकी न जाता त्याला कैलासात कशी गती मिळाली ते सांगितले. शिवप्रणित भस्ममाहात्म्यही सांगितले, Shivleelaamrit 9 Adhyay: भस्मप्रभावाने निष्पाप झालेल्या त्या ब्रह्मराक्षसाला कैलासात स्थान मिळाले.”
Shivleelaamrit 9 Adhyay: पुढील कथा सांगताना सूत म्हणाले “पांचाळनरेश सिंहकेत एकदा शिकारीला गेला असताना काही भिल्लही त्याच्यासमवेत होते. त्यातील एका भिल्लाला भग्न शिवालयात खाली पडलेले एक शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखवताच तो भिल्लाला म्हणाला, “हे घरी नेऊन तू चिताभस्माने याची नित्य पूजा कर, चिताभस्माशिवाय नैवेद्य दाखवू नको.” त्याप्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले व तो त्याची रोज पूजा करू लागला. एके दिवशी खूप हिंडूनही त्याला ताजे चिताभस्म मिळाले नाही म्हणून तो चिंताग्रस्त झाला.
तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले. त्या भस्माने त्याने शिवपूजन केले व नेहमीच्या सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली, तर काय आश्चर्य। दिव्यरूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत पाहून त्याला मोठे आचर्य वाटले. शिवकृपेने तोही शिवरूप झाला आणि पत्नीसह शियलोनी गेला हे वृत्त कळताच सिंहकेतही शिवभक्ती करू लागला आणि अती शिवपदाल पोचला “
।। श्रीशिवलीलामृत अध्याय नववा ।।
।। श्रीगणेशाय नमः ।।
जेथें शिवनामघोष निरंतर । तेथें कैंचे जन्ममरणसंसार । तिहीं कळिकाळ जिंकिला समग्र । ‘शिव शिव’ छंदेंकरूनियां ।।१।। पाप जळावया निश्चितीं। शिवनामीं आहे ज्याची आसक्ती । त्यासी नाहीं पुनरावृत्ती । तो केवळ शिवरूप ||२|| जैसें प्राणियाचें चित्त । विषयीं गुंतलें अत्यंत । तैसें शिवनामीं होतां रत। तरी बंधन कैंचें तयां ।।३।। धनइच्छा धरूनि चित्तीं । धनाढ्याची करिती स्तुती । तैसे शिवनामीं प्रवर्तती । तरी जन्ममरण कैंचें तयां ।।४।। राज्यभांडारीचें धन। साधावया करिती यत्न । तैसें शिवचरणीं जडलें मन । तरी संकट विघ्न कैंचें तयां ।।५।। धन्य ते शिवध्यानीं रत । येचिविषयीं कथा अद्भुत । नैमिषारण्यीं सांगत। सूत शौनकादिकांप्रती ।।६।।
वामदेव नामें महाज्ञानी। शिवध्यानीं रत विचरे काननीं। एकाकी निर्माय शांत दांत जनीं । त्रिविधभेदरहित जो ।।७।। दिशा जयाचें अंबर। भस्मचर्चित दिगंबर। निराहार निरंतर । एकलाचि हिंडतसे ।।८।। काय करावें कोठें जावें । काय घेवोनि काय त्यजावें । विश्व शिवमय आघवें । खेद मोह भेदनाहीं ।।९।। अक्रोध वैराग्य इंद्रियदमन। क्षमा दया कृपा समान । निर्लोभदाता भय शोक मान। काळत्रयीं न धरीच ।।१०।। गृहापत्यदारावर्जित । कोणी एक परिग्रह नाहीं सत्य। काया-वाचा-मनोदंडयुक्त। मौनी न बोले इतरांसी ।।११।। ज्ञानचर्चा शिवस्मरण । त्यावीण नेणेचि भाषण। या नांव बोलिजे मौन । भेदाभेदरहित जो ।।१२।।
सर्वांच्या अनुग्रहास्तव । ते स्वरूप धरोनि विचरे शिव । जडजीव तारावया सर्व। विचरे सृष्टी स्वइच्छे ।।१३।। कार्याकार्य सारूनि कारण। आत्मस्वरूपी पावला समाधान। देहत्रयरहित विधिनिषेधहीन । प्रवृत्तिनिवृत्तिवेगळा ।।१४।। निरंकुश जो निःसंग। जैसा ब्रह्मारण्यों विचरे मातंग। तयाची रीति अभंग। वेदशाखें वर्णिती ।।१५।। तो स्वरूपीं सदा समाधिस्थ । गगन तेही अंगासी रुतत। म्हणूनि तेही परते सारीत । हेतुदृष्टांतवर्जित जो ।।१६।। तेणें तेजाचे दाहकत्व जाळिलें । उवींचे कठिनत्व मोडिलें। चंचलत्व हिरोनि घेतलें। प्रभंजनाचे तेणें पै ।।१७।।
आर्द्रत्व पूर्ण निरसोन। धुवोनि शुद्ध केलें जीवन। एवं पिंडब्रह्मांड जाळून । भस्म अंगी चर्चिले ||१८|| ऐसा तो मूर्तामूर्त। केवळ शुक की जडभरत कोचारण्यी विचरत। सर्वही देखत शिवरूप ॥१९॥ तो एक ब्रह्मराक्षस धावत। महाभयानक शरीर अद्भुत। कपाळी शेंदूर जिव्हा लळललित । भयानक मुखाबाहेरी ॥२०॥ खदिरोगार तैसे नेत्र। बहुत जीव भक्षिले अपरिमित। क्षुधित तृषित पापी कुपात्र। अकस्मात पातला ॥२१।। महाहिंसक सर्वभक्षक। तेणे वामदेव देखिला पुण्यश्लोक। धावोनियां एकाएक। कंठीं घालीत मिठी तयाच्या ।।२२।। लोह परिसासी झगटतां पूर्ण। तत्काळ होय दिव्य सुवर्ण। तेवीं त्याच्या अंगस्पर्शेकरून । मति पालटली तयाची ॥२३॥
वामदेवअंगीचे भस्म । त्याच्या अंगीं लागलें उत्तम। सत्त्ववृत्ति झाली परम। असूर भाव पालटला ॥२४॥ आपुल्या अंगी झगटोन। उद्धरला पिशिताशन । हें त्यासी नाहींच भान। समाधिस्थ सर्वदा ।।२५।। नेणे सुखदुःख शीतोष्ण। लोक निंदित्ती की बंदित्ती पूर्ण। शरीरी भोग की रोग दारुण । हेही नेणे कदा तो ॥२६॥ मी हिंडतों देशी की विदेशीं। हेही स्मरण नाहीं त्यासी। तो ब्रह्मानंद सौख्यराशी। विधिनिषेधी स्पर्शना ॥२७॥ ऐसा तो योगींद्र निःसीम। त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म । दिव्यरूपहोवोनि सप्रेम । चरणीं लागला तयाच्या ||२८|| सहस्रजन्मींचे झाले ज्ञान। त्यासी आठव झाला संपूर्ण । मानससरोवरी उदकपान। करितां काक हंस होय ।।२९।। कीं हाटकनदीतीरी देख । पडतां पाषाण काष्ठादिक। दिव्य कार्तस्वर होय सुरेख। तेवीं राक्षस पॅ झाला ।।३०।। कीं करितां सुधारसपान । तेथे सहजचि आलें देवपण । कीं शशिकिरणस्पर्शेकरून । द्रवे जैसा चंद्रकांत ।।३१।।
कीं रवि उगवतां निःशेष। निशा सरे प्रकटे प्रकाश। तैसा उदरला राक्षस । स्तवन करी तयाचें ।।३२।। म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण। मी तव दर्शन झालों पावन । तुजसीं करितां संभाषण । वाटतें पावेन शिवपदा ।।३३।। मज सहस्रजन्मींचे झालें ज्ञान। परी पंचवीस जन्मांपासून। पायें घडलीं जीं दारुण । तीं अनुक्रमें सांगतों ।॥३४।। पूर्वी मी राजा दुर्जय। यौवनमर्दे अति निर्दय । परम दुराचारी होय। ब्राह्मण प्रजा पीडीत ||३५|| प्रजेसी नित्य करी मार। आवडे तैसा विचरे स्वेच्छाचार। वेद पुराण शास्त्र। कैसे आहे मी नेणे ।।३६।। स्वप्नींहीं नेणें कदा धर्म। ब्रह्महत्यादि पापें केलीं परम। नारी अपूर्व आणून उत्तम। नित्य नूतन भोगीं मी ।।३७।।
ऐशा स्त्रिया असंख्य भोगून । बंदी घालोनि केले रक्षण । सर्व देश धुंडीन। स्त्रिया नूतन आणवीं ॥३८। एकदां भोग देऊन । दुसऱ्यानें तिचे न पाहें वदन। त्या बंदीं रडती आक्रंदून शाप देती मजलागीं ।। ३९।। विप्र पळाले राज्यांतून। पट्टणे ग्रामें खेटके जाण । इतुकींही धुंडोन। स्त्रिया धरून आणिल्या ।।४०।। भोगिल्या तीन शर्ते द्विजनारी। चार शतें क्षत्रियकुमारी। वैश्यस्त्रिया सुंदरी। दहा शर्ते भोगिल्या ।।४१।। शूद्रांच्या सहस्र ललना। चांडाळ नारी चार शर्ते जाणा। त्यावरी अपवित्र मातंगकन्या । सहस्र एक भोगिल्या ।।४२।। चर्मककन्या पांच शत । रजकांच्या चार शर्ते गणित । वारांगना असंख्यात । मिती नाहीं तयांतें ।।४३।।
पांच शतें महारिणी। तितक्याच वृषली नितंबिनी। यांवेगळ्या कोण गणी। इतर वर्ण अष्टादश ।।४४।। इतुक्या कामिनी भोगून । तृप्त नव्हे कदा मन। नित्य करीं मद्यपान । अभक्ष्य तितुकें भक्षिले ।।४५।। ऐसे भोगितां पापभोग । मज लागला क्षयरोग। मृत्यु पावलों सवेग। कृतान्तदूत धरोनि नेती ।।४६।। यमपुरींचे दुःख अपार। भोगिलें म्यां अतिदुस्तर। तप्त ताम्रभूमि तीवर । मजलागीं चालविलें ।।४७।। लोहस्तंभ तप्त करून । त्यासी नेऊन देववितीआलिंगन। माझे घोर कर्म जाणून। असिपत्रवनीं हिंडविती ।।४८।। कढईत तेल झालें तप्त। त्यांत नेऊन बुडवीत। तोडीं घालिती नरक मूत्र। पाप बहुत घालिती पासलें पाडोनी । जाणोनि ।।४९।।
महाक्षार कटुरस आणोनी। मुखीं तीक्ष्ण चंचूचे गृध्र येवोनी। नेत्र फोडिती एकसरें ।।५०।। कुंभीपाकीं घालोनि शिजविती। कर्णी तप्त लोहदंड दडपिती। अहा तेथींची जाचणी किती । सांगों आतां गुरुवर्या ।।५१।। तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण । त्यांत पचविती कित्येक दिन। मांस तोडिती सांडसेंकरून। वरी शिंपिती क्षारोदक ॥५२।। जिव्हा नासिक आणि कर्ण। तीक्ष्ण शखें टाकिती छेदून। हस्त पाद खंडून। पोट फोडिती क्रूर शरखें ।।५३।। अंगाचा काढिती भाता। तप्त शरखें रोविती माथां । शिश्न छेदून गुदद्वारी अवचिता। तप्त अर्गळा घालिती ।।५४।। सर्वांगासीं टिपऱ्या लावून। सर्वेच करिती पाशबंधन। पृष्ठीकडे वांकवून। चरणीं ग्रीवा बांधिती ।।५५।।
बोटीं बोटीं सुया रोवून। पाषाणे वृषण करिती चूर्ण । हस्तपायीं आणून। पाषाणबेडी घालिती ।।५६।। सहस्र वर्षे न लगे अंत । ऐशिया नरकीं बुडवीत। एक येवोनि पाडिती दांत। पाश घालिती ग्रीवेसी ॥५७॥ आपुली विष्ठामूत्र। बळेच भक्षविती यमदूत। सर्वेच अंगाचे तुकडे पाडीत । दोष अमित जाणोनियां ।। ५८ ।। श्याम शबल श्वान लावून । चरचरां टाकिती फाडून। एक शिरास्थी काढिती ओढून। एक मांस उकरिती ।।५९।। लोहार्गळा उष्ण तीव्र । पृष्ठीं हृदयीं करिती मार। उखळीं घालोनि सत्वर । लोहतप्तमुसळे चेंचिती ।।६०।। तीक्ष्ण औषधींचे रस आणिती। नासिकाद्वारें आंत ओतिती। सर्वेचि वृश्चिककूपीं टाकिती। बहुत विपत्ती भोगिल्या ।।६१।।
ज्यांचें विष परम दुर्धर। ऐसे अंगास डसविती विखार। अग्निशिखा लावोनि सत्वर। है शरीर भाजिलें ।। ६२ ।। अंतरिक्ष असिधारे बैसवून। पायीं बांधिती जड पाषाण। सर्वेचि पर्वतावरी नेऊन । ढकलूनि देती निर्दयपणें ।।६३।। आंतडीं काढून निश्चितीं। ज्यार्ची त्याजकडोन भक्षविती । ऊर्ध्व नेवोनि टांगिती। आपटिती क्रोधभरें ।। ६४ ।। लोहकंटकीं उभे करून। करिती इंगळांचे आंथरूण। मस्तकीं घालूनियां पाषाण । फोडोनि टाकिती मस्तक ।।६५।। लोहचणक करूनि तप्त । खा खा म्हणोनि दूत मारीत । ओष्ठ धरोनि फाडीत । तप्त सळ्या नाकीं खोंविती ।।६६।। उफराटें टांगून। ग्रीवेसीबांधोनि धोर पाषाण । रीस व्याघ्रादिक आणोन । विदारिती त्यांहातीं ।॥६७।
गजपदाखालीं चूर्ण। करविती तप्तनीरप्राशन। अष्टांगें कर्वतून। वेगळाली टाकिती ।।६८।। भयानक भूतें भेडसाविती। लिंग छेदून खा म्हणती । सांधे ठायी ठायीं मोडिती। तीक्ष्णशखेंकरूनियां ।। ६९।। भूमींत रोवोनियां शरीर। करिती बहुत शरमार। सर्वेचि शूळ परम तीव्र । त्यावरी पालथे घालिती ।।७०।। वरी मारिती मुसळघायें। मग पाषाण बांधोनि लवलाहें। नरकवार्षीत टाकिती पाहें। अंत न लागे उतरतां ।।७१।। कांचा शिसे यांचा रस करून । बळेंचि करविती प्राशन। तेथे जात नाही कदा प्राण। यातना दारुण भोगितां ।।७२।। ऐशा तीन सहस्र वर्षेपर्यंत । नरकयातना भोगिल्या बहुत । त्यावरी मज ढकलोनि देत । व्याघ्रजन्म पावलों ||७३।। दुसरे जन्मीं झालों अजगर । तिसरे जन्मीं वृक भयंकर । चौथे जन्मीं सूकर। सरडा झालों पांचवा ।।७४।।
सहावे जन्मीं सारमेय सबळ । सातवे जन्मीं शृगाल। आठव्यानें गवय विशाळ । गुरुवर्या मी झालों ।। ७५ ।। नववे जन्मीं मर्कट प्रसिद्ध। दहावे जन्म झालों गर्दभ निषिद्ध। त्यावरी नकुळ मग वायस विविध । तेरावे जन्मीं क झालो ।।७६।। चौदावे जन्मीं बनकुक्कुट । त्यावरी गीध झालों पापिष्ठ। मग मार्जारयोनी दुष्ट। मंडूक त्यावरी जाण पां ।। ७७ ।। अठरावे जन्मीं झालों कूर्म । त्यावरी मत्स्य झालों अधम । सर्वेचि पावलों मूषकजन्म। उलूक त्यावरी झालों मी ।।७८ ।। बाविसावे जन्मीं वनद्विरद । त्यावरी उष्ट्रजन्म प्रसिद्ध । मग दुरात्मा निषाद। आतां राक्षस जन्मलों ।। ७९ ।। सहस्रजन्मींचें ज्ञान । झालें स्वामी मज पूर्ण। तव दर्शनाच्या प्रतापेंकरून । पावन झालों स्वामिया ।।८०।। गंगास्नानें जळे पाप। अत्रिनंदन हरी ताप। सुरतरु दैन्य अमूप। हरीत दर्शनेंकरूनियां ||८१||
पाप ताप आणि दैन्य। संतसमागमें जाय जळून। यावरी वामदेव योगींद्र वचन। बोलता झाला तेधवां ||८२।। एक विप्र होता महाअमंगळ। शूद्रस्त्रियेसीं रतला बहुत काल। तिच्या भ्रतारे साधूनि वेळ। जिवें मारिलें द्विजातें ।।८३ । ग्रामाबाहेर टाकिलें प्रेत। कोणी संस्कार न करीत । तो यमदूतीं नेला मारीत। जाच बहुत भोगीतसे ।।८४।। इकडे शिवसदन उत्तम । त्यापुढें पडिलें असे भस्म । महाशिवरात्रिदिवशीं सप्रेम । भक्त पूजना बैसले ।।८५।। त्या भस्मांत श्वान सवेग । येऊनि बैसलेंपाहे शिवलिंग । भस्मचर्चित त्याचें अंग। जात मग त्वरेने ।।८६।। पडिलें होतें विप्रप्रेत । त्यावरी गेलें अकस्मात। कुणपास भस्म लागत । पापरहित झाला तो ।।८७।। तों यमदूतीं नरकांतूनि काढिला । शिवदूर्ती विमानीं वाहिला। कैलासासी जावोनि राहिला । संहारिला पापसमूह ।।८८।।
ऐसें है पवित्र शिवभूषण । त्याचें न वर्णवे महिमान । राक्षस पुसे कर जोडून। भस्ममहिमा सांगा कैसा ।।८९।। भस्म कोणतें उत्तम। शिवभक्तीं लावावें कैसा नेम यावरी वामदेव उत्तम । चरित्र सांगे शिवाचें ।।९०।। मंदगिरी परम पवित्र । उंच योजनें अकरा सहस्र । त्यावरी एकदां त्रिनेत्र । देवांसहित पातला ||९१।। यक्षगण गंधर्व किन्नर। चारण पिशाच गुह्यक समग्र । देव उपदेव पवित्र । महेशा वेष्टून बैसले ||९२|| मरुद्रण पितृगण समस्त । एकादश रुद्र द्वादशादित्य । अष्ट वसु अष्ट भैरव सत्य । अष्ट दिक्पाळ पातले ।।९३।। अठ्ठ्याऐंशीं सहस्र ऋषीश्वर। साठ सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र । पाताळनाग पृथ्वीचे नृपवर । शंकरा वेष्टूनि बैसले ।।९४।। विष्णु विधि पुरंदर। शिवध्यान पाहती समग्र । भुतांचे मेळे अपार । मंदराचळीं मिळाले ।।९५।। सिंधुरवदन वीरभद्र कुमार। साठ कोटि गण समग्र । पुढें विराजे नंदिकेश्वर। दुसरा मांदार। शुभ्र दिसे ।।९६।।
तेथें आले सनत्कुमार। साष्टांग करूनि नमस्कार। स्तवन करूनि अपार । विभूतिधारणविधि पुसती ।। ९७।। यावरी बोले जाश्वनीळ । विभूति जाणा तेचि निर्मळ । शुद्ध करूनि गोमयगोळ । मृत्तिकाकणविरहित ।।९८ ।। ते वाळवूनि उत्तम । मग करावें त्यांचे भस्म । शुद्ध विभूति मज परम । शिवगायत्रीनें मंत्रिजे ||९९।। आधीं अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व । मग मस्तकाभोवतें वेष्टिजे शुद्ध । तर्जनी न लाविजे निषिद्ध । कनिष्ठिका वेगळी करावी ।।१००।1 दों बोटांनीं लाविजे भाळीं। अंगुष्ठे मध्यरेखा तेजागळी। ऐसें त्रिपुंड्रधारण चंद्रमौळी। सनत्कुमारां सांगत ||१|| तर्जनी न लावितां सर्वांगीं विभूति । त्रीबोटीं लाविजे निश्चितीं। येणें महत्पापें भस्म होती। शिवभूषणप्रसादे ।।२।। अगम्यागमन सुरापान । ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष्यभक्षण। महत्पापांचे पर्वत जाण। भस्मचर्चनें भस्म होती ||३||
ऐसा भस्माचा महिमा वामदेव । ब्रह्मराक्षसा सांगे सर्व। विमान आलें अपूर्व। दिव्यरूप असुर झाला ।।४।। कैलासाप्रती जाऊन । राहिला शिवरूप होऊन । वामदेव पृथ्वीपर्यटन ।स्वेच्छे करीत चालिला ।।५।। सत्संगाचा महिमा थोर। वामदेवासंगें तरला असुर । भस्मलेपनें भालनेत्र । सदा सुप्रसन्न भक्तांसी ।।६।। मंत्र तीर्थ द्विज देव । गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व । येथे जैसा धरिती भाव। सिद्धि तैसी तयांसी ।।७।। पांचाळदेर्शी नृपनाथ। नाम जयाचे सिंहकेत । जैसा शक्रनंदन की तृतीय सुत। पृथादेवीचा पुरुषार्थी ।।८।। मृगयेस गेला तो भूपाळ। मार्गे चालत धुरंधर दळ। शबरांचेही मेळ । बहुसाल निघती तयासवें ।।९।। वनोवनीं हिंडतां भूपाळक। शबर एक परम भाविक । भग्न शिवालय एक। गेला त्यांत निषाद तो ।।११०।।
उन्मळोनी पडलें दिव्य लिंग। पंचसूत्री रमणीय अभंग। सिंहकेतरायातें सवेग । दाविता झाला तेधवां ।।११।। राजा म्हणे लिंग चांगलें। परी पाहिजे भावें पूजिलें। उर्गेचि देवार्चन मांडिलें । दंर्भेकरूनि लौकिकीं ||१२|| लौकिकी मिरवावया थोरपण । प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करून। जेवीं कासारें मांडिलें दुकान । प्रतिमाविक्रय करावया ।।१३।। ब्राह्मणवेष घेवोनि शुद्ध । यात्रेत हिंडती जैसे मैंद। कीं मार्गघ्न वाटेंत साधुसिद्ध। वेष धरूनि बैसले ||१४|| काळनेमी साधुवेष धरून । वाटेत बैसला करावया विघ्न । एवं भावेंवीण देवतार्चन । व्यर्थ काय दांभिक ।।१५। शबरासी म्हणे नृपसत्तम । तुज है लिंग सांपडलें उत्तम। निषाद म्ह पूजनक्रम । कैसा आहे सांग पां ।। १६ ।। विनोदें बोले नृपवर । पूजेचे आहेत बहुत प्रकार। परी चिताभस्म पवित्र । नित्य नूतन आणावें ।।१७।। चिताभस्मावीण । नैवेद्य करूं नये समर्पण। हेंचि मुख्य वर्म जाण । शैवलक्षण निष्ठेचें ।।१८।।
नृपवचन मानूनि यथार्थ। शबर लिंग घरा आणीत । शबरीस सांगे वृत्तान्त । हर्षभरित ते झाली ||१९|| सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून। दोघे पूजिती एकनिष्ठेकरून । चिताभस्म नित्य नूतन । आणिती मेळवून साक्षेपें ।।१२०।। एकार्ती होतांचि सुंदरी। नैवेद्या आणीत झडकरी। उभयतां जोडल्या करीं। शिवस्तवीं सादर ||२१|| ऐसें नित्य करितां पूजन। लोटले कित्येक दिन । त्यांची निष्ठा पहावया पूर्ण। केलें नवल पंचवदनें ।। २२ ।। ऐसें एकदां घडोनि आलें । चिताभस्म कोठें न मिळे । शबरें बहुत शोधिलें । अपार क्रमिर्ले भूमंडळ ।।२३।। परतोनि सदनासी येत । शबरीस सांगे वृत्तान्त । तीही झाली चिंताक्रांत । म्हणे पूजन केवीं होय ।।२४।। केलें शिवपूजन उत्तम। परीन मिळतां चिताभस्म । तो शबर भक्तराज परम। नैवेद्य शिवासी अपींना ।।२५।।
शिवदीक्षा परम कठीण। निष्ठा पाहे उमारमण । शबरी म्हणे प्रियालागून। मी आपुलें भस्म करितें आतां ।। २६ ।। पाकसदनीं वैसोन। लावोनि घेतें आतां अग्न। तें चिताभस्म चर्चुन । सांबपूजन करावें ।। २७।। मग शुचिर्भूत होवोनि शबरी । शिवध्यान स्मरण करी । अग्नि लावोनि झडकरी । भस्म करी कलेवर ||२८|| शबर घेवोनि तें भस्म । चर्ची सदाशिवासी सप्रेम । परी नैवेद्य आणावया उत्तम। दुसरें कोणी नसेचि ||२९|| भोळा चक्रवर्ती उदार। तारावया धैर्य पाहे शंकर। आसन घालोनि शबर। परम सादर शिवार्चनीं ।।१३०।। शबरी उत्तम पाक करून। नित्य येत नैवेद्य घेवोन । शबर एकार्ती करोन । पूर्वाभ्यासें बोलावीत ||३१||
एकातर्ती होतांचि सदाशिवा । त्रुटी न वाजतां नैवेद्य दावावा। विलंब होतां महादेवा। क्षोभअत्यंत पैं होय ||३२|| सर्व अन्याय क्षमा करी शंकर। परी नैवेद्यासी होतां उशीर। क्षोभोनि जातो श्रीशंकर। उशीर अणुमात्र सोसेना ||३३|। शबर आनंदमय शिवार्चनीं। स्त्रियेनें शरीर जाळिलें हें नाठवे मीं। म्हणे ललनेजय नैवेद्य आणी । तंव पाठीसी उभी घेवोनियां ||३४|| रंभा उर्वशी मेनका सुंदरी । त्यांहूनि दिव्यरूप झाली शबरी । चतुर्विध नैवेद्य करीं। देत पतीच्या तेधवां ।।३५।। नैवेद्य अर्पूनि शबर। पूजा झाली षोडशोपचार । दोघे जोडोनियां कर। स्तवन करिती शिवाचें ।॥३६॥
जय अनंतब्रह्मांडनायका। जय जय शिव मायाचक्रचालका। दुर्जनदमना मदनांतका । भवहारका भवानीपते ।। ३७ ।। पूजन झालें संपूर्ण। शबर पाहे स्त्री विलोकून । अलंकारमंडित सगुण । आपणही शिवरूप जाहला ||३८|| एक नीलकंठ वेगळा करून । शिवभक्त शिवसमान । तंव आर्ले दिव्य विमान । वायें अपार वाजती ||३९।। येत दिव्य सुमनांचे परिमळ । आश्चर्य करी सिंहकेत नृपाळ। विमानीं बैसवूनि तत्काळ । शिवपद पावलीं दोघेही ।।१४०।।
राव म्हणे विनोदेंकरून । म्यां सांगितलें चिताभस्मपूजन । परी धन्य शबराचें निर्वाण। उद्धरोनि गेला कैलासा ।।४१।। धन्य ती शबरी कामिनी । देह समर्पिला शिवार्चनीं। एवं एकनिष्ठा देखिल्यावांचोनी। पिनाकपाणी प्रसन्न नव्हे ।।४२।। सिंहाकेतासी लागला तोचि छंद। सर्वदा शिवभजनाचावेध । शिवलीलामृत प्रसिद्ध । श्रवण करी सर्वदा ।।४३।। शिवरात्रि प्रदोष सोमवार । व्रतें आचरे प्रीतीं नृपवर । शिवप्रीत्यर्थ उदार । धनें वांटी सत्पात्रीं ।।४४।। ऐसें करितां शिवभजन । सिंहकेत शिवरूप होवोन । शिवपदीं राहिला जावोन । धन्य भजन निष्ठेचें ||४५|| शिवलीलामृतमंडपीं सुरवाडली । चढत जात श्रीधरवाग्वल्ली। अहळबहळ पसरली । ब्रह्मानंदेंकरूनियां ॥४६।। ते छाया सघन अत्यंत । तेथें बैसोत शिवभक्त। प्रेमद्राक्षफळे पक्व बहुत । सदा सेवोत आदरें ।॥४७।।
श्रीधरवरदा ब्रह्मानंदा। मृडानीहृदयाब्जमिलिंदा । कैवल्यपददायका अभेदा। लीला अगाध बोलवीं पुढें ।।४८ ।। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । नवमाध्याय गोड हा ।।१४९।।
।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।। ।। शुभं भवतु ।।
Shivleelaamrit 9 Adhyay: आजच्या अनुकूल दिवसाचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा!
श्री गजानन लीला गाथा १४ अध्याय (लहान पोथी)
आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?
श्री गजानन लीला गाथा १३ अध्याय (लहान पोथी)
Shivleelaamrit 9 Adhyay: ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा पाचवा अध्याय !
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!