Shree Gajanan Leela Gatha 8 Adhyay: गुरु गजाननाच्या पोथीचा आठवा अध्याय
Shree Gajanan Leela Gatha 8 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज यांचा गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा आठवा अध्यायाय आपल्याला वाचायला मिळणार आहे.
अध्याय आठवा
श्रीगणेशाय नमः
।। हे विष्णो वैकुंठपते। शुदर्शनधारी श्रीपते ।। शरण तव चरणाते । आलो मी प्रसन्न हो ।।१।। तु सृष्टीचा निर्माता । तूच तिचा पालनकर्ता ।। तू जगताचा पिता । माळे आम्ही तुझी रे ।।२।। ब्रह्मदेव तुजपासोन । नाभीतूनी उत्पन्न ।। त्याने चराचर निर्भून। सृष्टीरचना केली की ।।३।। आपण तात मी तान्हा । वशुचेन तू भी कान्हा ।। तू जननी कृपेचा पान्हा । मुखी माझ्या पडो रे ।।४।।
आता देवा ऐसे करी। कृपा करोनी मजवरी।। गजाननाची लीला सारी । लिहून घेई मम हस्ते ।।५।। शेगावी मारुती मंदिरात । गजानन होते राहत ।। नित्य येऊनी मंदिरात । खंडू दर्शन घेतसे ।।६।। एकदा या खंडूने । कुळास केले बोलवणे ।। म्हणे माझा निरोप देणे । ठाण्यावरी जाऊनी ।।७।। या कुळास मनोमन । देशमुखांचे आकर्षण ।। पाटील देशमुखालागोन । वैमनस्य बहु होते
।।८।। म्हणून कुळ बोलला । जात नाही मी ठाण्याला ।। करणे असेल ते तुला । करोनी तू घेई रे ।।९।। त्याची वृत्ती उर्मट। वागणे होते उध्दट ।। मूर्ख होता आचरट । अवमानिले खंडूते ।।१०।। तेणे खंडू संतापला । कुळास त्याने बडविला ।। हात त्याचा मोडोनी गेला। देशमुख गेले ठाण्यात ।।११।। तेथे त्यांनी खोटेनाटे । बळेची पढविले पोलिसाते ।। खंडूवरी पकडण्याते। वॉरंट मग जारी झाले ।।१२।। तो शरण गुरुला। गुरुपायी लीन झाला ।। आसवांच्या पावसाला । खंड नसे येतुलाही ।।१३।। गजाननाला सारे काही । तो बोलला लवलाही ।। म्हणे काही होत नाही। निश्चिंत तू असावे ।।१४।। नको चिंता रडू नको । स्वतःस दुषणे देऊ नको ।। मुळीच वेडया भिऊ नको । निर्दोष तू ठरशील ।।१५।।
गुरुकृपेची प्रतीति आली। खंड्डु पाटलाची पीडा गेली ।। चिंतामुक्त वृत्ती झाली । हायसे तयास वाटले ।।१६।। मग खंडुने गुरूला । घरी नेलेराहण्याला ।। त्याच्या भावभक्तिला । कशाचीच तुलना नसे ।।१७।। गुरु राहिले खंडूघरी । विनम्रभावे तो सेवा करी ।। निष्ठा गुरुचरणावरी । त्याची असे सदैव ।।१८।। खंडुघरी महाराज असता । वेदज्ञ आले अवचिता ।। गुरुसी उठविण्याकरिता । मंत्र म्हणू लागले ।।१९।। मंत्र म्हणता झाली चूक । गुरु दुरूस्त करीती देख ।। तैलंगी होती चकित। माथा चरणी नमविती ।।२०।।
एकदा काही गोसावी । अवचित आले शेगावी ।। कृष्णा पाटलास ते विनवी । गोष्ट ऐका आमुची ।।२१।। ते वेळी गुरुस्वामी । मळयात होते मुक्कामी ।। मळा कृष्णाजीचा म्हणोनी । गोसावी आले भेटाया ।।२२।। आमुचे गुरु ब्रम्हगिरी । साक्षात ते श्रीहरी ।। स्वतः आले तुझ्या द्वारी। त्यांना विन्मुख लावू नको ।।२३।। राहू तीन दिवस । शिरापुरी दे भोजनास ।। विनविती कृष्णाजीस । तो ही हो म्हणाला ।।२४।। गजाननाची करीती निंदा। नामजपाचा त्यांचा धंदा ।। आम्ही संत आम्हास वंदा । लोका सांगती परोपरी ।।२५।।
ब्रम्हगिरी वेदान्ती । म्हणे जाणीतो श्रृती स्मृती ।। आपण आपुली करी स्तुती। ऐसा होता नाठाळ ।।२६ ।। रात्री त्याचे प्रवचन । मळयामाजी झाले जाण ।। दूर बैसोनि गजानन । पहात होते गंमत ।।२७ ।। गुरु आपुल्या पलंगावरी । चिलीम चालली वरचेवरी ।। ठिणगी नकळत गादीवरी । पेट घेतला कपडयांनी ।। २८ ।। पलंग आणि गादीला । अग्नीचा तर वेढा पडला ।। परी गुरु तसाच बसला । त्या जळत्या पलंगी ।।२९।। जा भास्करा ब्रम्हगिरीला। घेऊनी यावे या स्थला ।। नैनं दहति…” वचनाला । सत्य करा सांगितले ।। ३० ।।
ब्रम्हगिरी घाबरला । ढोंगीपणा सिध्द झाला ।। वंदुनी गुरु पादुकाला। अनन्यभावे शरण तो ।। ३१ ।। फुकटचे खाण्यासी । चार टिकल्या कमवण्यासी ।। शिष्यांना दाखविण्यासी । । चाळे चाळे त्याचे चालत ।। ३२ ।।अवधा जो का ढोंगीपणा । त्याने सोडूनि दिला जाणा ।। पहाटे सोडूनी सा-यांना । शिष्यांसह परते तो ।। ३३ ।। अशी ही गुरुकथा । त्यांचे चरणी ठेवुनी माथा ।। संपूर्ण करु इथे आता। हा आठवा अध्याय ।। ३४ ।।
इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ अष्टमोऽध्याय समाप्तः ।। शुभं भवतु ।।
Shree Gajanan Leela Gatha 8 Adhyay: आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!